वीज, नोकरी, निवास, रोजगार, भाकरी
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण
- डॉ. कैलास गायकवाड
एक 'मध्यमवर्गीय घुसमट' ह्या दोन ओळींतून डॉ. गायकवाड खुबीने मांडतात. अख्खी हयात ह्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी झिजत झिजत निघून जावी, ही एक शोकांतिकाच ! मुंबईसारख्या महानगरात टीचभर घरात राहणारी ७-८ जणांची कुटुंबं वर्षानुवर्षं ह्या प्राथमिक गरजांवर तीच ती वेळ मारून नेणारी उपाययोजना करत आहेत. समस्या बदलत नाहीत आणि उपाययोजनाही ! आणि हे एक प्रकारचे दुष्टचक्र थांबवण्यासाठी, परिस्थितीला भिडण्याची हिंमत, डोक्या-खांद्यावर असलेला जबाबदारीचा डोलारा करू देत नाही. ह्या विवंचनेत, घुसमटीत लोक जगत नसतात, फक्त जिवंत राहत असतात. दोन दोन पिढ्या तेच हाल काढून दिवस ढकलत असताना, विकासाच्या चक्राच्या गतीला जवळून पाहणारी नवी पिढी मात्र ही फरफट नाकारते आणि जबादारीच्या डोलाऱ्यासकट परिस्थितीशी झगडा करायची हिंमत करते. 'हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा' म्हणतात आणि एक दुष्टचक्र थांबतं. घाण्याला जुंपलेले बैल मुक्त होतात आणि एक मोठ्ठा मोकळा श्वास घेतात.
तर कधी ही हिंमत अंगाशीही येते आणि डोलारा कोसळून त्या ढिगाऱ्याखाली दबण्याचीही वेळ येते. रक्ताचं पाणी करून, पोटाला चिमटा काढून, अनन्वित कष्ट उपसून केलेली जमवाजमव हातातून निघून जाते आणि पटावर सोंगट्या पुन्हा एकदा पहिल्या घरांत येतात. परत एकदा -
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण
- सुरु होतं. दुष्टचक्र थांबत नाही. आता ते भरडायलाही लागतं.
लखलखत्या मुंबापुरीच्या अस्मानी श्रीमंतीच्या पायाशी अश्या अनेक घुसमटी मूकपणे सगळा झगमगाट बघत असतात. त्यांपैकीच एक आहे लालबागमधल्या एका चालीत राहणारं 'नाईक' कुटुंब. थोरल्या मुलाचं - अमितचं (अंकुश चौधरी) - लग्न होऊन घरात 'मंजिरी' (मुक्ता बर्वे) येते आणि आयुष्याची ३१ वर्षं केवळ तडजोडी करत घालवलेल्या अमितला राहण्यासाठी एका मोठ्या घराची गरज प्रकर्षाने जाणवायला लागते. समजूतदार मंजिरी, घरी मसाले बनवून विकणारी आई (वंदना गुप्ते) आणि धाकटा हिप-हॉपर भाऊ अशी चौघांची टीम नव्या घराच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी झटायला लागते. अल्पसंतुष्ट वडिलांना हा 'उपद्व्याप' वाटत असतो, पण चौघांना ह्या एकाच ध्येयाने जणू झपाटलंच असतं.
एका मध्यमवर्गीय कुटुंबाची धडपड आपण ह्यापूर्वीही पाहिलेली आहे. अडचण, त्यातून बाहेर पडत असताना नवीन संकट अशी सगळी कहाणी आपल्याला तोंडपाठ असते. चित्रपटाचं नाव - 'डबल सीट' - सुद्धा आपल्याला पुढे होऊ घातलेल्या तथाकथित नाट्याची कल्पना देते. जो अंदाज आपण मनाशी बांधतो, त्यापेक्षा वेगळं काही होत नाही. एका पतपेढीत जेव्हा अमित सगळी मिळकत जमा करत असतो, तेव्हाच आपल्याला माहित असतं की ही 'पतपेढी' आहे म्हणजे ही बुडणार आहे, बुडतेच !
अक्षरश: काहीही अनपेक्षित न घडणारं कथानक केवळ आणि केवळ चारही प्रमुख कलाकारांच्या लाजवाब कामामुळे बघावंसं वाटतं. अंकुश चौधरीने डॅशिंग भूमिका अनेक केल्यात. 'दुनियादारी'तला त्याचा दिग्या लोकांनी खूप डोक्यावर घेतला. पण खऱ्या अर्थाने जर तो कुठल्या भूमिकेत शोभला असेल तर ती 'अमित नाईक' ह्या सोशिक, समजूतदार मध्यमवर्गीय सरळमार्गी तरुणाची ठरावी. एकाही फ्रेममध्ये तो मिसफिट वाटत नाही की 'अमित नाईक' व्यतिरिक्त इतर कुणी वाटत नाही, तो स्वत:सुद्धा नाही.
'मंजिरी'च्या भूमिकेत मुक्ता बर्वे अशी दिसली आणि वावरली आहे की कुणाही अविवाहिताने ताबडतोब सांगावं, 'मला अशीच बायको हवी!' तिचं सौंदर्य ईश्वरी नाही. पण साधेपणातल्या सौंदर्याची ती परिसीमा असावी. ती अगदी सेंट पर्सेंट 'गर्ल नेक्स्ट डोअर' वाटते. सहजाभिनय हा काही तिच्यासाठी नवीन नाही. (अवांतर - मिलिंद जोशींसोबतचा तिचा 'रंग नवा' हा कवितांचा आगळावेगळा कार्यक्रम पाहिल्यानंतर तर मला तिच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागला आहे. 'मुक्ता बर्वे' हे एक अभ्यासू, तल्लख, चतुरस्र व्यक्तिमत्व आहे ह्याबद्दल अजिबातच शंका नाही.)
विद्याधर जोशी व वंदना गुप्ते ह्यांना प्रत्येकी एक दृश्य असं मिळालं आहे, ज्यात त्यांना आपली 'सिग्नेचर' सोडायची संधी होती. अशी संधी असे कसलेले अभिनेते सोडतील, हे अशक्यच ! तो बाप आणि ती आई मन जिंकतात.
मराठी नाट्यसृष्टीचा मराठी चित्रपटसृष्टीवर जो संस्कार आहे, त्यामुळे सामान्यातले सामान्य मराठी चित्रपटही उत्तमातल्या उत्तम हिंदी चित्रपटांपेक्षा सरस ठरतात. ताकदीचे नवे-जुने अभिनेते ही रंगमंचाचीच देणगी. त्यामुळे इथे कलाकारांकडून उत्तम काम काढून घेताना दिग्दर्शकाची नक्कीच दमछाक होत नसावी. अश्या वेळी दिग्दर्शक इतर गोष्टींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकत असेल का ? म्हणजे, मला असं म्हाणायचं आहे की जरी संकलन, छायाचित्रण, लेखन, पटकथालेखन, संगीत वगैरे सगळं सांभाळणारे जरी ते ते लोक असतील, तरी त्यांच्याकडूनही हवं ते करवून घेण्याची अंतिम जबाबदारी दिग्दर्शकाचीच ना ? मग ते बाप-मुलाच्या भांडणावेळी धाडकन झूम इन, झूम आउट होणारं कॅमेरावर्क का ? आरडाओरड्याने संपृक्त गाणी का ? अशक्य पांचट डायलॉग्स का ? कहाणीची तीच ती साचेबद्ध वळणं का ? त्यांची हाताळणीही अगदी नेहमीसारखीच का ?
असे सगळे 'का?' घेऊन आपण बाहेर येतो. खूप आनंददायी नसलेला, पण अगदीच कंटाळवाणाही नसलेला एखादा प्रवास संपावा आणि सगळ्या लहानश्या बऱ्या-वाईट स्मृती तिथेच त्या टप्प्यावर आपण अगदी सहजपणे सोडून द्याव्यात, तसाच हा 'डबल सीट' प्रवास संपतो. मनाची पाटी कोरीच राहते. कारण हा चांगल्या बाईकवरचा हा रोजचा प्रवास असतो. तेच खड्डे, तीच वळणं आणि त्याच जागेपासून त्याच जागेपर्यंत.
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2015/08/movie-review-double-seat.html
अंकुश चौधरी म्हटले की
अंकुश चौधरी म्हटले की दुनियादारी आठवतो यातच सारे आले रसप,
आणि दुनियादारी बद्दल बोलायलाच नको, तो मराठी चित्रपटसृष्टीचा शोले आहे.
अगदी शोलेसारखे लहानातले लहान पात्रे नाही पण मुख्य पात्रे सारीच अअजरामर केलीत त्याने.
<<< दुनियादारी बद्दल बोलायलाच
<<< दुनियादारी बद्दल बोलायलाच नको, तो मराठी चित्रपटसृष्टीचा शोले आहे.>>> काहिहि हां ऋन्मेऽऽष
सोडा हा विषय इथेच, उगाच धागा
सोडा हा विषय इथेच, उगाच धागा भरकटवायचे पाप माझ्या माथी नको, तसेही दुदाचा विषय मी नाही काढलाय.
पण तुमच्या काहीही हं चे उत्तर उधार राहिले
पाप कसले रे त्यात ! लोकांना
पाप कसले रे त्यात !
लोकांना दोन क्षण खुदकन हसवणं, ह्यासारखं दुसरं पुण्य नाही ऋन्म्याsssss !!
ऋन्मेऽऽष >> मराठी
ऋन्मेऽऽष >> मराठी चित्रपटसृष्टीचा शोले ??
मराठीमध्ये सांगते ऐका नावाचा चित्रपट येउन गेला त्याचा ईतिहास शोध बघू आणि न विसरता इथेच रीप्लाय दे
अंकुश चौधरी म्हटले की
अंकुश चौधरी म्हटले की दुनियादारी आठवतो>> कुणाला? मला मातीच्या चुली आणी चेकमेट आठवतो.
चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द बेस्ट पिक्चरपैकी आहे.
मला मातीच्या चुली म्हटले की
मला मातीच्या चुली म्हटले की तो सर्वात शेवटी आठवतो..
आधी त्याची बायको, आई, बाबा हे सारे आठवतात..
बेधुंद मनाच्या लहरी मधला अंकुश त्यापेक्षा जास्त आठवतो.
त्याचा ईतिहास शोध
त्याचा ईतिहास शोध बघू
>
उद्या, आता हाफिस सुटले
दुनियादारीमध्ये अंकुश आहे?
दुनियादारीमध्ये अंकुश आहे? मला बोलका बाहुला, जितु आणि शिरीन एवढेच आठवतात.
मो , अग दिग्याची भूमिका
मो , अग दिग्याची भूमिका साकारली आहे ना . त्या सुरेखाचा प्रियकर असतो तो
मुक्ता बर्वेचा अभिनय
मुक्ता बर्वेचा अभिनय झकास.अं.चौ.आता म्हातारा दिसायला लागला.विद्याधर जोशी व अं.चौ.(बाप-लेक) यांच्याकडे पाहिले तर बापाला १०-१५ व्या वर्षी मूल झाले असे वाटते.
एकूण पिक्चर बरा आहे.
>चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ
>चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द बेस्ट पिक्चरपैकी आहे.> +१०० अंकुशचं काम छानच आहे त्यात.
रसप - परिक्षण छान लिहिलं आहेत पण प्रोमो बघुन निर्माण झालेली उत्सुकता परिक्षण वाचुन निघुन गेली हे सुद्धा मान्य करतो. अर्थात त्याबद्दल तक्रार नाही कारण काही अपवाद वगळता मी नेहमीच एक दोन परिक्षणे वाचुन मगच चित्रपट थेटरात जाऊन बघायचा कि नाही हे ठरवतो.
ऋन्मेषची खेचायची म्हणून नाही
ऋन्मेषची खेचायची म्हणून नाही पण खरंच आठवला नाही, जाई.
आता बुद्धीला ताण दिल्यावर आठवतोय हळू हळू. एकंदरीत तो सिनेमाच इंपॅक्टफुल वाटला नसल्याने कोणीच लक्षात राहिले नाही, पण वरची ३ कॅरेक्टर्स सिनेमाच्या नावावरुन आठवली तरी. अंकुश नव्हता आठवला.
चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द
चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द बेस्ट पिक्चरपैकी आहे.
>>>अगदीच. स्वप्नील जोशीनं भारी काम केलेला हा एकच सिनेमा. आणि एकुणच जमून आलेला हा सिनेमा. टेकिंग भारी. त्यातला तो राहुल मेहेंदळे कुठं बरं गेला?
हास्यास्पद असलेल्या पण सुपरहिट ठरलेल्या दुनियादारीत अंकुश हेच एक बलस्थान होतं. पण अंकुशचा आवाज (दुनियादारीच्या रोलसाठी) ?? छे..!
आता गंमत अशी, की एक्झॅक्टली तोच अंकुशचा आवाज डबलसीटमध्ये बलस्थान ठरला असता. पण पुन्हा छे! काहीतरी बिघडलंय त्याचं. अख्ख्या डबलसीट भरून अपवाद वगळता हा आपला किंचित अवघडलेल्या अवस्थेत. ती 'आॅल द बेस्ट' ची स्पाँटेनिटी गेली कुठं?
रसप, स्टोरी लिहित जाऊ नका अशी विनंती करावीशी वाटतेय. काय आहे की कुणाला काय महत्वाचं वाटेल, ते आपण सांगू शकत नाही. दुसरं म्हणजे ती सिनेमावाली टीम वेळ शक्ती पैसे खर्च करून जे काय भलंबुरं बनवतात त्याला बरंवाईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला नक्कीच आहे. पण दोन मिनिटात एका परिच्छेदात ती त्यांची स्टोरी सांगुन टाकण्याचा मात्र नक्की नाही- असं वाटतं..
आत्ता परीक्षण वाचलं. रसपनी
आत्ता परीक्षण वाचलं. रसपनी स्टोरी काढली का? मला तरी इथे "स्टोरी" कुठे दिसली नाही. आक्षेप "अमित सगळी मिळकत जमा करत असतो, तेव्हाच आपल्याला माहित असतं की ही 'पतपेढी' आहे म्हणजे ही बुडणार आहे, बुडतेच !" हा वाक्याला आहे का? त्यातल्या त्यात हे एकच वाक्य काही तरी भांडेफोड करणारं वाटलं. बाकी मला तरी थोडक्यात आढावा दिसला, जो आता परीक्षण लिहिताय तर थोडाफार लिहावाच लागेल. स्टोरी कुठे सापडली नाही. म्हणून वाटलं की एकतर स्टोरी काढली आहे किंवा मला सापडली नाही जो माबुदो असेल.
चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द
चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द बेस्ट पिक्चरपैकी आहे.
>>>अगदीच. स्वप्नील जोशीनं भारी काम केलेला हा एकच सिनेमा.
>>>>
बोल्ड केलेले अक्षर वगळता +७८६
स्वप्निला हा एक गुणी आणि स्टायलिश अभिनेता आहे. सध्या त्याला मराठी चित्रपटसृष्टीचा शाहरूख बनवायचे प्रयत्न चालू आहेत. आता हे त्याच्यासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले की वाईट हे येणारा काळच ठरवेल.
मो, आक्षेप घेणारे आपण कोण?
मो, आक्षेप घेणारे आपण कोण? एका वाक्याकरताही नाही.
<<
लखलखत्या मुंबापुरीच्या अस्मानी श्रीमंतीच्या पायाशी अश्या अनेक घुसमटी मूकपणे सगळा झगमगाट बघत असतात. त्यांपैकीच एक आहे लालबागमधल्या एका चालीत राहणारं 'नाईक' कुटुंब. थोरल्या मुलाचं - अमितचं (अंकुश चौधरी) - लग्न होऊन घरात 'मंजिरी' (मुक्ता बर्वे) येते आणि आयुष्याची ३१ वर्षं केवळ तडजोडी करत घालवलेल्या अमितला राहण्यासाठी एका मोठ्या घराची गरज प्रकर्षाने जाणवायला लागते. समजूतदार मंजिरी, घरी मसाले बनवून विकणारी आई (वंदना गुप्ते) आणि धाकटा हिप-हॉपर भाऊ अशी चौघांची टीम नव्या घराच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी झटायला लागते. अल्पसंतुष्ट वडिलांना हा 'उपद्व्याप' वाटत असतो, पण चौघांना ह्या एकाच ध्येयाने जणू झपाटलंच असतं.
एका मध्यमवर्गीय कुटुंबाची धडपड आपण ह्यापूर्वीही पाहिलेली आहे. अडचण, त्यातून बाहेर पडत असताना नवीन संकट अशी सगळी कहाणी आपल्याला तोंडपाठ असते. चित्रपटाचं नाव - 'डबल सीट' - सुद्धा आपल्याला पुढे होऊ घातलेल्या तथाकथित नाट्याची कल्पना देते. जो अंदाज आपण मनाशी बांधतो, त्यापेक्षा वेगळं काही होत नाही. एका पतपेढीत जेव्हा अमित सगळी मिळकत जमा करत असतो, तेव्हाच आपल्याला माहित असतं की ही 'पतपेढी' आहे म्हणजे ही बुडणार आहे, बुडतेच !>>
ही त्या सिनेमाची संपूर्ण स्टोरी. मान्य आहे, की सिनेमा यथातथाच अाहे. पण ते तुम्ही तुमच्या स्टार रेटिंग मधून, टीकेतून दाखवून द्या ना! त्यासाठी सगळी कथाच विस्कटून सांगायची गरज नाही. 'परीक्षण' म्हणवताना नाहीच. मित्राचे पैसे वाचवण्यासाठी एखाद्या सिनेमाची गोष्ट सांगणं वेगळं आणि परीक्षण लिहीणं वेगळं असं अजूनही वाटतं.
ह्म्म, चित्रपट पाहिला नाहीये
ह्म्म, चित्रपट पाहिला नाहीये पण स्टोरी काय ह्याबद्दलच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये थोडा फरक आहे असं वाटतंय. मान्य आहे की "त्यांपैकीच एक आहे लालबागमधल्या एका चालीत राहणारं 'नाईक' कुटुंब. थोरल्या मुलाचं - अमितचं (अंकुश चौधरी) - लग्न होऊन घरात 'मंजिरी' (मुक्ता बर्वे) येते आणि आयुष्याची ३१ वर्षं केवळ तडजोडी करत घालवलेल्या अमितला राहण्यासाठी एका मोठ्या घराची गरज प्रकर्षाने जाणवायला लागते. समजूतदार मंजिरी, घरी मसाले बनवून विकणारी आई (वंदना गुप्ते) आणि धाकटा हिप-हॉपर भाऊ अशी चौघांची टीम नव्या घराच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी झटायला लागते. अल्पसंतुष्ट वडिलांना हा 'उपद्व्याप' वाटत असतो, पण चौघांना ह्या एकाच ध्येयाने जणू झपाटलंच असतं." हे चित्रपटाची जिस्ट देतंय पण मुख्य चित्रपट हा "नव्या घराच्या स्वप्नाला साकार करण्यासाठीचा प्रवास" ह्याबद्दल असेल असं वाटलं, आणि त्याबद्दल त्यांनी काही लिहिले नाहीये. फक्त बॅकग्राउंड दिलंय असं वाटतं.
असो, वाद घालायचा नाहीये. फक्त तुला जी स्टोरी वाटली तो मला चित्रपटाचा बॅकग्राउंड वाटला म्हणून वरची पोस्ट.
चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द
चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द बेस्ट पिक्चरपैकी आहे.
>>>अगदीच. स्वप्नील जोशीनं भारी काम केलेला हा एकच सिनेमा. आणि एकुणच जमून आलेला हा सिनेमा. टेकिंग भारी. >>> +१
अंकुश लक्षात राहिला 'ऑल द बेस्ट' आणि 'बेधुंद मनाच्या लहरी' मधेच.
आशुडीशी सहमत. एका
आशुडीशी सहमत.
एका मध्यमवर्गीय कुटुंबाची धडपड आपण ह्यापूर्वीही पाहिलेली आहे. अडचण, त्यातून बाहेर पडत असताना नवीन संकट अशी सगळी कहाणी आपल्याला तोंडपाठ असते. चित्रपटाचं नाव - 'डबल सीट' - सुद्धा आपल्याला पुढे होऊ घातलेल्या तथाकथित नाट्याची कल्पना देते. जो अंदाज आपण मनाशी बांधतो, त्यापेक्षा वेगळं काही होत नाही. एका पतपेढीत जेव्हा अमित सगळी मिळकत जमा करत असतो, तेव्हाच आपल्याला माहित असतं की ही 'पतपेढी' आहे म्हणजे ही बुडणार आहे, बुडतेच !>>काहीकाही वाक्ये खरच टाळता आली असती.
>> म्हणून वाटलं की एकतर
>> म्हणून वाटलं की एकतर स्टोरी काढली आहे किंवा मला सापडली नाही जो माबुदो असेल. <<
'माबुदो' म्हणजे काय ते कळलं नाही.
मी स्टोरी सांगितलेली नाही. जितकं सांगितलं आहे, तितकं तर सांगायलाच लागतं, जर एक लेख लिहायचा असेल तर. मला फेसबुक स्टेटस अपडेट टाकायचं नव्हतं. अब यह बात और है की, सांगायचीच असेल तर फेसबुक स्टेटस अपडेटमधूनही पूर्ण स्टोरी सांगता येईल.
मी आधीच म्हटल्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीने एक आक्षेप नोंदवला की त्याला 'प्लस वन' करत, तीच 'रीsss' ओढण्यात बरेच जण स्वारस्य घेतात. मला कुणाला स्पष्टीकरण द्यायचं नव्हतं किंवा वादही करायचे नव्हते. कारण 'स्टोरी सांगितली आहे' हे मत माझ्या मते रीडीक्युलस आहे. म्हणूनच मी लेख काढून टाकला होता. मग सगळे जण पोस्ट करा म्हणाले म्हणून पुनर्प्रकशित केला. आता केलाच आहे आणिया असंही रिलीज होऊन आठवडा उलटून गेला आहे, त्यामुळे पुनर्डिलीट करत नाही. राहू देतो.
धन्यवाद व क्षमस्व !
माबुदो म्हणजे माझ्या
माबुदो म्हणजे माझ्या बुद्धीमत्तेचा दोष !
अभिनयाबाबत मराठी सिनेमा नेहमीच श्रीमंत होता. कथा, गीत आणि संगीतात मात्र खुपदा निराशा होते आता. तांत्रिक बाबी कधी कधी चांगल्या पण बर्याचदा निराशा करतात.
अंकुश चौधरी म्हणजे 'ऑल द
अंकुश चौधरी म्हणजे 'ऑल द बेस्ट'मधला आंधळा! बास्स!
चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द
चेकमेट हा मराठीमधल्या वन ऑफ द बेस्ट पिक्चरपैकी आहे.>>>
+१००
दु.दा. मराठी चित्रपटसृष्टीचा शोले ??>>>
काहीही! ऋन्मेष चे पर्सनल मत असल्यास माफ केले
ंखरं म्हणजे मी सुरुवातीला हे परीक्षण वाचले तेव्हा मला तर वाटले होते की स्टोरी ऐवजी बाकीच जास्त लिहिलेय.
जितकं लिहिलंय ती आणि तितकीच स्टोरी असेल तर मिनिमम तितकं तरी लिहायला हवंच की! तसंही नुसती स्टोरी कळली म्हणून कुणी सिनेमा बघायला जायचं टाळत नाहीच. ती स्टोरी पडद्यावर जिवंत कशी केलीय हे पाहण्यासाठी आणि त्या त्या कलाकारांची फॅन मंडळी म्हणूनही पब्लिक सिनेमा पाहण्यासाठी जाणारच की!
"एका मध्यमवर्गीय आणि चाळीत राहणार्या कुटंबाचा अपार्ट्मेंट मधील मोठे घर घेण्याचा संघर्ष" इतक्याच शब्दांत स्टोरीची बोळवण करावी की काय!
एका पतपेढीत जेव्हा अमित सगळी मिळकत जमा करत असतो, तेव्हाच आपल्याला माहित असतं की ही 'पतपेढी' आहे म्हणजे ही बुडणार आहे, बुडतेच !>>
इथे पतपेढी बुडण्याचा पॉईंट फक्त नसला असता तर चालले असते. पण असल्यानेही खूप मोठा रहस्यभेद झालाय असेही नाहीये.
पूर्ण स्टोरी कशी सांगितली
पूर्ण स्टोरी कशी सांगितली जाते ह्याकरिता ह्या बाफलेखकांचे दोनेक वर्षांपूर्वीचे लेख वाचावेत आणि ह्याच सिनेम्याबाबतचं उदाहरण हवं असल्यास फेबुवर पिंग करावे. एक लिंक देण्यात येईल.
आपला नम्र,
महादुष्ट भूषण रसप
"स्टोरी लिहित जाऊ नका" असं
"स्टोरी लिहित जाऊ नका" असं लिहिलंय. याचा अर्थ- हे फक्त याच परीक्षणाबद्दल नाही. खरं तर फक्त याच लेखकाच्या परीक्षणांबद्दलही नाही. आपल्याकडे अजूनही 'गोष्टीला' फार महत्त्व आहे. लोकांना 'कथा' ऐकायला फार आवडतं. त्यामुळेच अनेक (वर्तमानपत्री) परीक्षणांत गोष्टीचा भागच जास्त दिसतो. सो कॉल्ड रिव्ह्यूज लिहिणार्यांना जनतेची उत्सुकता ओलांडून पुढे जाणं कठीण होतं आहे असं दिसतंय. परीक्षण समीक्षण- यात गोष्टीचा भाग / प्लॉट / थीम आल्याशिवाय ते कसं पूर्ण होईल? मात्र असं लिहिणार्यांकडून निव्वळ गोष्ट, यानं चांगलं काम केलं आहे, त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे, संगीत लक्षात राहत नाही, टेकिंग संथ आहे, सेकंड हाफ गोंधळलेला आहे- याच्या व्यतिरिक्त अनेक अंगांनी बघून त्यावर भाष्य करणं अपेक्षित असतं. सिनेमे जगण्याचं प्रतिबिंब असतात आणि शिवाय एक स्वतंत्र कलाकृतीही- या एकाच वाक्यातून त्याकडे बघण्याचे किती तरी दृष्टीकोन दिसतात. वर्तमानपत्रांचा वाचक वेगळा असतो, आणि वाचकानुनय करणं त्यांना आवश्यक असतं. शिवाय शब्दसंख्येचं लिमिट. या तीनही अडचणी सोशल मिडियावर नसल्याने इथं विस्तृत लिहायला हरकत नाही खरं तर..
याशिवाय माझी तक्रार परीक्षणांच्या शीर्षकाबद्दलही आहे. या रिव्ह्यूच्या शीर्षकातून काय म्हणायचं आहे ते कळत नाही. दृश्यमच्या रिव्ह्यूचं शीर्षक दृष्यमबद्दल काहीच बोलतं नव्हतं. बाहुबली रिव्ह्यूच्या शीर्षकात 'गोष्टीवेल्हाळपणा' हा शब्द चुकीच्या संदर्भाने वापरला गेला- असं वाटलं. असे अनेक. इथं अनेक लोक वाचतात. आणि सिनेम्याबद्दल बरीवाईट इमेज करून घेतात- हे एक. आणि शिवाय काही रिव्ह्यूज चांगले आहेत, तर ते आणखी चांगले वाचायला मिळतील- असा स्वार्थी हेतू या तक्रारीमागे आहे.
अर्थातच इथं लोकशाही आहे. प्रत्येक लेखक आणि वाचक स्वतंत्र आहे. इथं या निमित्ताने मी एक मत माडलं, इतकंच.
>> म्हणून वाटलं की एकतर
>> म्हणून वाटलं की एकतर स्टोरी काढली आहे किंवा मला सापडली नाही जो माबुदो असेल. <<
'माबुदो' म्हणजे काय ते कळलं नाही.
मी स्टोरी सांगितलेली नाही. जितकं सांगितलं आहे, तितकं तर सांगायलाच लागतं, जर एक लेख लिहायचा असेल तर. मला फेसबुक स्टेटस अपडेट टाकायचं नव्हतं. अब यह बात और है की, सांगायचीच असेल तर फेसबुक स्टेटस अपडेटमधूनही पूर्ण स्टोरी सांगता येईल.
मी आधीच म्हटल्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीने एक आक्षेप नोंदवला की त्याला 'प्लस वन' करत, तीच 'रीsss' ओढण्यात बरेच जण स्वारस्य घेतात. मला कुणाला स्पष्टीकरण द्यायचं नव्हतं किंवा वादही करायचे नव्हते. कारण 'स्टोरी सांगितली आहे' हे मत माझ्या मते रीडीक्युलस आहे. म्हणूनच मी लेख काढून टाकला होता. मग सगळे जण पोस्ट करा म्हणाले म्हणून पुनर्प्रकशित केला. आता केलाच आहे आणिया असंही रिलीज होऊन आठवडा उलटून गेला आहे, त्यामुळे पुनर्डिलीट करत नाही. राहू देतो.
धन्यवाद व क्षमस्व !
------------------------------------------------------------------------------------------------
मुळात आशुडी ह्यांनी तुमच्या परीक्षणावर आक्षेप नोंदवला म्हणून लगेच परीक्षण डिलीट करण हे अतिशय बालिश पणाच वर्तन आहे
आणि मी आशुडी ह्यांच्या प्रतिसादावर प्लस १ केलं ,ते माझही मत तसच होत म्हणून री ओढण्यासाठी नव्हे किंबहुना मी तेच लिहायला आले होते
आणि तुम्ही काही लिहिलत म्हणजे त्यावर कुणी आक्षेप घ्यायचाच नाही का ?
तुम्ही जवळ जवळ सगळी स्टोरीच सांगितलीच होतीत फक्त शेवटची काही मिनिट वगळता
स्टोरी सांगणे म्हणजे प्रत्येक प्रसंग सांगणे अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्टोरी नाही सांगितली
आणि ह्या मतामध्ये रीडीक्युलस वाटण्यासारख काय आहे ?
स्टोरी न सांगताही लेख कसा लिहिता येतो हे जाणून घ्यायच असेल तर ह्याच चित्रपटाच महाराष्ट्र टाईम्स मधल परीक्षण वाचा
किंवा मायबोलीवरची इतरांची परीक्षण वाचा
आता राहीला मुद्दा लेख पुनर्प्रकाशित करण्याचा
तर आशुडी ह्यांनी आक्षेप घेतल्यावर तुम्ही लेख डिलीट केलात म्हटल्यावर साहजिकच बाकीचे नक्की काय बर होत हे जाणून घेण्यासाठी पोस्ट करा अस म्हणणार हे साहजिकच होत नाही का ?कारण कुठलीही आक्षेप घेतलेली गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते पण तुम्ही मात्र म्हणणार लोकांनी सांगितल म्हणून मी पुन्हा पोस्ट केलं नाहीतर मी करणारच नव्हतो
आणि जर स्पष्टीकरण द्यायच नव्हत तर ही पोस्ट कशासाठी ?
टिका सुद्धा सहन करायला शिका तुम्ही लिहिलेल्या पोस्ट्स च प्रत्येक वेळी कौतुकच होईल अस नाही
अरे यार ! लोक तर माझी शाळाच
अरे यार ! लोक तर माझी शाळाच घेऊ लागलेत !!
टिकेचं स्वागतच आहे. इन फॅक्ट त्याचसाठी मायबोलीवर पोस्टतो. इथे बहुतेक जण लाल पेन घेऊन असतात. फेबुवर सगळे ओवाळण्यासाठी असतात.
काही लोक म्हणतायत, 'स्टोरी सांगितली'. काही लोक म्हणतायत की 'नाही सांगितली.' मला वाटतं की 'मी जितकी सांगायला हवी तितकीच सांगितली.' आता हे ज्याचं त्याचं मत झालं ना ? तरी ते लादायचा प्रयत्न का होतोय कळत नाही !
मी लेख का काढून टाकला होता, त्याचं कारण मी वर सांगितलंच आहे. परत तेच उगाळणार नाही.
इथे कुणीही तुमची शाळा घेत
इथे कुणीही तुमची शाळा घेत नाहीये
पण आशुडी ह्यांनी जेव्हा त्याचं मत व्यक्त केल आणि मी प्लस १ केल तेव्हा तुम्ही ती गोष्ट खिलाडू वृत्तीने घेऊन लेख डिलीट केला नसतात तर वाद निर्माण झालाच नसता
ज्याच त्याच मत हे अगदी बरोबरच आहे
पण जर ते मत तुमच्या मताच्या विरुद्ध असेल तर तुम्हाला राग येतो
एकीकडे म्हणायचं मत दुसऱ्यावर लादू नये
पण समोरच्याचा मताचा आदर करण्याऐवजी ते मत रीडीक्यूलस अस म्हणायचं
परीक्षणात लेखक ,दिग्दर्शक ,गीतकार ,संगीतकार वगैरे लोकांचा साधा नामोल्लेख सुद्धा नाही
हि गोष्ट खरच खटकली
:स्पॉयलर अलर्टः १. शेवटी सगळी
:स्पॉयलर अलर्टः
१. शेवटी सगळी फॅमिली एकत्र राहील असे वाटलं होतं. फक्त जागेचाच प्रश्न होता तर जुनं घर विकुन अजुन एखादी रूम नव्या घरात मिळाली असती. मग आई, भाऊ आणि वडीलांनी नुसतेच मदत म्हणून पैसे दिले हे मला झेपलं नाही.
२. ३-४ प्रसंगात खुप रडले. विशेषतः वडील-मुलाचा, सासू-सुनेचा प्रसंग.
३. वंदना गुप्तेंना नेहमीच्या खाष्ट भुमिकेत न दाखवता नवरा आणि मुलगा दोहोंना सांभाळणारी स्त्री दाखवलीये जे खुप वास्तवदर्शी वाटलं.
४. मंजिरी या कॅरेक्टरचा पॉझिटिव्ह अॅटिट्युड लाजवाब.
५. इतरही सर्वांचीच कामे मस्त. अभिनयासाठी बघावाच.
Pages