फेसबुकवर सध्या एक मेसेज फिरत आहे - खात असलेल्या फळांच्या बिया साठवून ठेवा आणि पावसाळ्यात कुठे फिरायला गेलात तर त्या आजूबाजूला टाका, निदान काही तरी रुजतील. तेवढाच पर्यावरण हरित करण्यास आपला हातभार.
कल्पना खरंच खूप छान आहे. सध्या आंबे, फणस, जांभळं वगैरेचे दिवस आहेतच. त्यामुळे या सगळ्या फळांच्या बिया एकत्र करून ठेवायला हरकत नाही. शिवाय ही खास आपल्या भूमीतील झाडं. मग ही झाडं रुजवायला थोडा अजून सजग हातभार लावता येईल का?
समजा प्रत्येकानं / किंवा एखाद्या गटानं मुद्दाम यंदाच्या पावसाळ्यात असा प्रयत्नपुर्वक उपक्रम हाती घेतला तर?
वर उल्लेख केलेल्या बिया तर आहेतच पण शिवाय जर शक्य असेल तर दुकानांतून खास इतर बिया अथवा झाडेच विकत घेतली आणि पाऊस सुरू झाल्यावर आठवडाभरानं गावा / शहराबाहेरच्या एखाद्या वापरात नसलेल्या जमिनीच्या तुकड्यावर लावली तर?
एकटे जाऊन लावा, कुटुंबासकट जाऊन लावा, मित्रमैत्रिणींबरोबर जाऊन लावा, एखाद्या संस्थेतर्फे मोहिम काढून लावा, गटग करून लावा ..... एक बी लावा, एक झाड लावा, ट्रकभर झाडे लावा ...... पण लावा!
कोणकोणती झाडं आवता येतील बरं? फुलांची लावण्यापेक्षा फळांची, उपयोगी झाडं लावण्यावर कटाक्ष ठेवला तर? म्हणजे फळझाडं, मोठे वृक्ष, भाज्या वगैरे लावल्या तर?
एक यादी करतेच. यादी करताना स्थानिक उपयुक्त झाडं आणि वृक्ष लक्षात घेतले आहेत. सह्जपणे रुजणारी आणि मेंटेनन्स न लागणारी झाडं निवडली आहेत.
फळझाडं : आंबा, फणस, जांभूळ, नारळ, सीताफळ, चिकू, केळी, पपया
याव्यतिरिक्त इतर वृक्ष : वड, पिंपळ
भाज्या : मिरच्या, टोमॅटो, अळूचे कंद, सुरण, रताळ्याचे कंद, शेवगा, वाल, भोपळा, घोसाळी, कारली
यात अजून भर घालता येईल. मूळ कल्पनाही अधिक कशी चांगली राबवता येईल याचा विचार करता येईल.
काय सुखद फोटो आहे हा.
काय सुखद फोटो आहे हा.
अशा सकारात्मक बातम्या हुरूप
अशा सकारात्मक बातम्या हुरूप वाढवतात.
अतिशय सकारात्मक बातमी. +१ एस.
अतिशय सकारात्मक बातमी.
+१ एस.
वाहवा!
वाहवा!
मस्त!!
मस्त!!
(No subject)
वाह सहीच की, कुठलया शहरातला
वाह सहीच की, कुठलया शहरातला भाग हा.
अंजू,
अंजू,
हे जुन्या शांघाय एअरपोर्ट च्या जागेवर बनवलेले Xuhui Runway Park (क्षुहवे) आहे.
Seed bombs कुठे मिळतील मुंबईत
Seed bombs कुठे मिळतील मुंबईत?
रानभुली, छान फोटो.
रानभुली, छान फोटो.
असाच अजून एक सुखद बदल
https://youtu.be/-I5qMDCcvTI?si=5Apyo4bjxqmdXp99
मामी, खरंच खूप छान आहे हे.
मामी, खरंच खूप छान आहे हे. आधी पाहिले आहे.
एक आठवण आहे.
आम्ही त्या वेळी सिंहगड रस्त्याला लागून ( आताच्या पुल देशपांडे गार्डन ) असलेल्या एका सोसायटीत रहायचो. तेव्हां सिंहगड रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडी कापण्याचे काहीतरी फर्मान निघाले होते. आमच्या सोसायटीत एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी देवव्रत मेहता या तेव्हांच्या आयुक्तांकडे निवेदन दिले होते (नाव अजून लक्षात आहे). तसेच रास्ता रोको पण केले होते. त्यांना घरी येऊन दमदाटी झाली होती.
नंतर रस्ता रूंद झाल्यावर पुन्हा झाडी लावण्यात येतील असं आश्वासन मिळालं. आजतागायत ती झाडी कुठे आहे ते दिसलेले नाही. असे म्हणतात कि पूर्वी असलेल्या या दुतर्फा वृक्षांमुळे भर उन्हाळ्यात लोक ऐन दुपारी सायकलवरून सिंहगडला जाऊ शकत होते. आता पहाटे चारला उठून सात पर्यंत परत यावं लागतं नाहीतर सात वाजताच उन्हं भाजायला सुरूवात होते.
सिंहगड रस्ता पूर्वी आणि आता
सिंहगड रस्ता पूर्वी आणि आता


पण असं नाही कि दयाळू प्रशासनाने झाडांची कमी भरून काढण्यासाठी काहीच केलं नाही..

Pages