भारतात बुलेट ट्रेन व्हावी का ?

Submitted by बाळू पॅराजंपे on 29 March, 2015 - 02:50

भाजपने भारतात बुलेट ट्रेन सुरू व्हावी असं निवडणुकी आधी सूचित केलं होतं. निवडून आल्यानंतरही बोलून दाखवलं होतं. मुंबई अहमदाबाद या मार्गाचं सवेक्षण झालेलं आहे असंही सांगितलं गेलं होतं. रेल्वेमधे काय बदल व्हावेत असा भाजपाचा एक फोरम आहे, यात बुलेट ट्रेनला वाढता पाठिंबा आहे. हे सरकार बुलेट ट्रेन आणू शकेल याबद्दल शंका नाही.

पण भारतात या मार्गावर बुलेट ट्रेन यावी का ?
उत्तर हो असल्यास कारणे अपेक्षित आहेत. नाही असल्यासही कारणे अपेक्षित आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठलाही धागा असला तरी भाजपा-कोन्ग्रेस यायला पाहिजे का?
कुठे नेउन ठेवलाय 'विकास' भारताचा?

काय करणार ? विकास म्हंटला की यांच रडगाण सुरुच होत,

विकास म्हणजे अडाणी आणि अंबानीच दिसतात ह्यांना !!

तरी बर विकासाच्या नावाने कोळश्यालाही सोडल नाही !!

बसल्या बसल्या तब्बल १५ लाख कोटींचा घोटाळा केला.

विमानप्रवास दिसायला २ तासाण्चा असला तरी त्याचे बाळंतपण किती तासाचे असते त्याचा हिशेब करावा. एअर पोर्टवर जाणे १ ते २ तास, चेक इन फॉर्म्यालितीज २ तास, प्रवास २ तास, सामानाची वाट पाहणे आणि महानगरात येणे १ ते २ तास, ६ ते ८ तास आरामात जातात. सगळी स्टेशने गावात असतात ३०-४० किमी बाहेर नव्हेत. ऐन वेळी काढलेल्या अथवा व्ही आय पी दिवसाचे विमानाचे तिकीट दर काय असतात भौ ? ६ चे प्लेन पकडण्यासाठी पहाटे ३-३|| वाजता उठावे लागते . स्वतःची सोडवण्याची व्यवस्था नसेल तर साढे तीन बजे रतिया विमानतळावर जायला का पुष्पक विमान येते भौ?
(सकाळी ११ च्या दिल्लीतील मीटिंगाना वैतागलेला रॉबीनहूड ::राग: )

रॉबिनहूड,

रेल्वे स्थानकात जायला पण वर्दळीचा अटकाव होतोच की. निदान मुंबईत तरी होतोच. मी ठाण्याला असलो तरी दिल्लीची द्रुतगाडी पकडायला मला दादर वा बोरीवली गाठावं लागतंच. तिथे गेलाच की १ तास. मग सांताक्रूझ विमानतळ तेव्हढाच दूर पडतो. शिवाय गाडी पकडायलाही अगदी ऐन वेळेत जाणं होत नाही. किमान अर्धा पाऊण तास अगोदर जायला लागतंच.

हां, तुम्हाला सकाळी ११ ला दिल्लीच्या मेलनास उपस्थित राहायचं असेल तर आदल्या रात्री द्रुतगाडी पकडू शकता. तशी सोय बरी पडेल. आरामात झोपून तरी जाता येईल.

आ.न.,
-गा.पै.

गामा, पण विमान पकडायला लागणारा वेळ आणि रेल्वे पकडायला लागणारा वेळ यात बराच फरक आहे ना.

प्राचिन भारतात बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान आधीपासूनच होते, ते इब्न-ए-हुतूतू या म्लेंछाने चोरून चीनला नेले. या ट्रेनला 'बलातरथ' म्हणत ज्याचा अपभ्रंश बुलेट असा झाला. त्या काळी ही ट्रेन तक्षशिला ते नालंदा हे अंतर अत्यंत वेगाने पार करीत असे . त्यामुळे प्रवाश्यांना दोन्ही गावे जवळच आहेत असा भास होत असे. पुरातन संस्कृतीच्या सच्च्या पाईकांना तर अजूनही तसेच वाटते असे ऐकिवात आहे, असो.
बुलेट ट्रेन जरुर असावी पण ती गोमूत्रावर चालणारी पाहिजे, अन्यथा तीव्र विरोध.

खरंतर आता विमानात सुद्धा "गोनाईल" वापरुन स्वच्छता केली पाहिजे. विशेषतः बिझिनेस क्लासमध्ये!

भारतात्ला सर्वोत्तम प्रवास म्हणजे शिवनेरी मुम्बै-पुणे - मुम्बई असे माझे मत आहे. अगदी स्वतःच्या वाहनानेनी एवढा कम्फर्टेबल प्रवास होत नाही.

भारतात्ला सर्वोत्तम प्रवास म्हणजे शिवनेरी मुम्बै-पुणे - मुम्बई असे माझे मत आहे. अगदी स्वतःच्या वाहनानेनी एवढा कम्फर्टेबल प्रवास होत नाही.

>>>>

ऑब्जेक्शन मायलॉर्ड ... शिवनेरी एसीने प्रवास करताना उलटी करून झालीय माझी!

एसी मधून प्रवास केला की होते असे, पुढच्या वेळी सेमि-लक्झरीने प्रवास कर.
<<
<<
मी तर म्हणेन लाल डब्यातुनच प्रवास करायला हवा त्यांनी. Happy

लाल डबा हा उलटीसाठी उत्तम व्यवस्था आहे. आरामशीर आणि मनसोक्त करता येते. पब्लिक ही सहिष्णू असते....

हूडा.... Lol
ओली पार्टी करून झाल्यावर लाल डब्यात बसाल, एसीगाडीत बसाल, रेल्वेत बसाल नैतर विमानात... उलटी होणारच, गाड्यांना का दोष देता?

मला कुठेही उलटी होत नाही. प्रवास बै. गा. ते विमाण सर्व करावा लागतो. येक बरीक आठवलं बरेच दिवस सायकलवर नाही बसलो. (मर्ढेकरांच्या बरेच दिवस चांदण्यात नाही गेलो ... च्या चालीवर वाचावे )

आगाऊ,

१.
>> प्राचिन भारतात बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान आधीपासूनच होते, ते इब्न-ए-हुतूतू या म्लेंछाने चोरून चीनला नेले.
>> या ट्रेनला 'बलातरथ' म्हणत ज्याचा अपभ्रंश बुलेट असा झाला.

अरेवा! तुम्हाला या क्षेत्रातली बरीच माहिती दिसतेय. ही वस्तुस्थिती रेल्वे खात्यास ताबडतोब कळवावी अशी तुम्हांस आग्रहाची विनंती.

२.
>> बुलेट ट्रेन जरुर असावी पण ती गोमूत्रावर चालणारी पाहिजे, अन्यथा तीव्र विरोध.

लवकरात लवकर गोमूत्रावर रेल्वेगाडी चालवायचे स्वामित्वाधिकार (=पेटंट) घेऊन टाका, म्हणतो मी.

आ.न.,
-गा.पै.

Pages