बिल्डरच्या चुकिची शिक्षा रहिवाशांना नको, लतादिदि

Submitted by Babaji on 10 June, 2014 - 00:18

बिल्डरच्या चुकीची शिक्षा रहिवाशांना नको, लतादिदि केम्पा कोलावासियांच्या पाठिशी.

लतादिदिंनी केलेल ट्विस्ट.

http://www.twitlonger.com/show/n_1s22pf7

latamangeshkar ✔ @mangeshkarlata
Follow

Namaskar.campa cola compound case ke baare mein main Maharashtra government se ek hi baat kehena chahti hun ki yaha ke makan todne se hazaaro log beghar ho jaayenge jisme kai bacche aur budho'n ka samavesh hai. Aaj tak 3 vyaktiyo'n ki jaanein is sadme se jaa chuki hai. Builders ki galti ki saza aam nagriko'n ko bhugatni pade ye anyaay hai.

http://tl.gd/n_1s22pf7
3:41 PM - 9 Jun 2014

खरच बिल्डर लोक चुका करतात नि सामान्य, गरिब मानसाला त्या चुकामुळे मनस्ताप, नुकसान भोगाव लागत. केम्पा कोला सोसायटितल्या लोकाना शिक्षा नको तर बिल्डरला करा हे लतादिदिंनी सांगितल हे बर झाल. दिदिंनि सामाजिक विषयाच्या या प्रश्नता सहभाग घेतला हे पन बर झाल. कारन आता त्यामुळ न्याय मिळल अस वाटत.

लतादिदिंच्या मुखात सरस्वति आहे.
त्यांनी सचिनला म्हटले कि मला तुला भारतरतन झालेल बघायचे आहे तर तसच झाल.
त्यानी नरेन्द्र मोदि याना म्हटले कि मला तुम्हाला पन्तप्रधान झालेले बघायला आवदेल तर तसच झाल.
त्यामुळ आता लतादिदिंनी म्हटले तस्च होईल हि शक्यता आहे.

लतादिदिंनी आपल्या D पोजिशनचा सामाजिक कामासाठि वापर करुन चान्गला आदर्श घालुन दिला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे माझ्या राजा, ५० लाखांचे घर ऐकायला बरे वाटते, पण तिथे राहणे सोडून त्याच्या monetary value/price चा काय उपयोग ना? असं म्हणतोय. कारण लोन फिटल्याशिवाय काही ते घर संपूर्ण आपले होत नाहि. असो.

बाकी चालुद्या.

ब्र आ यात आक्षेपार्ह काय आहे. बिनडोक हे विषेषण युक्तीवादास आहे. त्याला डोके नाहीये. युक्तीवाद करणा र्‍याचे डोके हा वाद्य विषय नाही. . त्यामुळे भाषा अल्लाऊड अल्लाऊड असा निर्णय मी माझ्या अधिकारात देत आहे::फिदी:

पुण्यात उरुळीकांचन वगैरे ठिकाणी आनंदग्राम वगैरे प्रोजेक्टमधे १५ लाखात दोन बेडरूमचा फ्लॅट मिळतो. त्याचा ईएमआय ३०००० रु कसा काय येईल ? मार्गदर्शन करा म्हणून विचारले म्हणून सांगावे लागतेय. या माणसाला तात्पुरता निवारा नकोय तर आलिशान घर हवेय. पुन्हा विकताना त्याचे पैसेही हवेत आणि १००० रु कमावणा-याने नाईलाजाने सुद्धा झोपडपट्टीत राहू नये याचे सल्ले देतोय.

आता हे ल्क मोदींना सल्ले देणार असतील तर मागच्याप्रमाणेच पाच वर्षांनी फ्युज उडणार यात शंका नाही.

रॉबीनहूड तुम्हाला हा युक्तीवाद बिनडोक वाटतो का ?
मग मुलं जन्माला घालू नयेत हा सल्ला भारतरत्नसाठी रिकमेण्ड करणार का ? Proud

कोणाच झोपडपट्टीत रहाणार्‍याला वाटत नाही की, आपण मुलांना अगदी बेसिक गोष्टी पण देउ शकणार नाही, तर मग आपण कोणाला जन्माला घालु नये.
---- असे युक्तिवाद या आधी वाचले आहेत... Sad सामाजिक अजाणता आणि प्रश्नाच्या गाम्भिर्य पासुन आपण कोसाने दुर आहोत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. मुलान्ना जन्म देण्याचा (अथवा न देण्याचा) निर्णय हा प्रत्येकाचा मुलभुत नैसर्गिक अधिकार आहे त्याबाबत इतरान्नी बोलणेही गैर आहे असे मला वाटते. अशा विचारान्नी विषमतेची दरी कमी होणे दुरच पण दिवसन्दिवस वाढतच रहाणार आणि या विषम जगात कोलावासिय (अजुन ६० वर्षा नन्तर) देखिल सुरक्षित नसणार. आपण पुढच्या पिढीसाठी खुप आव्हान निर्माण करत आहोत असे वाटते... याची अवशक्ता नाही आहे.

मुळ प्रश्न कोलाचे अनिधिकृत बान्धकाम आणि लताजीन्चे पत्र... या पासुन भरकटतो आहे.

रॉबीन - तुमचे प्रतिसाद अभ्यासनिय असतात... पुस्तकी कायदा आणि वास्तव व्यावहारात काय चालले आहे याचे आकलन होते...

मध्यमवर्गीयांच्या बाबतीत असे युक्तीवाद चालतात, पण झोपडपट्टीवासियांच्या बाबतीत लगेच निषेध. हा दुटप्पीपणा आहे.

मध्यमवर्गीय आपल्या कामाचे पैसे चोख घेतात. पण दुस-याकडून सेवा घेताना त्याच्या कामाच्या वेतनाबद्दल, हक्काबद्दल उदासीन असतात. हा दुटप्पीपणा नाही का ?
त्यांचे वेतन वाढवून द्यायला विरोध असेल तर मग
मध्यमवर्गियांचे उत्पन्न पण झोपडपट्टीत राहणा-यांइतके केले तर कदाचित गाडी रुळावर येईल.

मध्यमवर्गीयान्नीही मागच्या कaही पिढ्यात दहा दहा पोरे परवडत नसतानाही पैदा केली आहेत. १ ०० कोटी सगळी लोकसन्ख्या झोपडपट्टीने वाढवलेली नाही.

खुद्द मन्गेशकरच सान्गत असतात. घरात पाच भावन्डे /खायला नसायचे, चिरमुरे खाउन दिवस काढले.

ब्रह्मांड आठवले विचारवंत आणि माझा कोणताही संबंध नाही आहे, तुमच्या वैचारिक वादात तुम्ही माझ्या नावाचा केलेला उल्लेख पाहून वाईट वाटले. धाग्याच्या विषयाला अनुसरून मी माझा प्रतिसाद पुर्वीच दिला होता.

निर्णय न्यायालयाने दिला आहे. सरकारला अंमलबजावणी करायची आहे.
या देशात कायद्याचे राज्य आहे हे लता पण जाणून आहे. तिने ट्वीटरवर टाकलेला मेसेज म्हणजे सरकारला दिलेला आदेश नाही. तिचे ते मत आहे. न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान द्यायचेच तर कसे द्यायचे हेदेखील तिला माहीत आहेच.
किती तो किस पाडायचा ?

उद्या मायबोलीवरच्या एखाद्या पोस्टवर पण असा कल्ला कराल.. करताच म्हणा !

एक किस्सा.

एक तिकीट चेकर रेल्वेत चेकिंग करत असतो. एक चुकून विना तिकीट चढलेला प्यासेंजर त्यात सापडतो. दंडाची तयारी होते. तेवढ्या तो पॅसेन्जर टॉयलेटच्या पॅसेजमधल्या बसलेल्या (अर्थातच विब्नातिकीट) भिकार्‍याकडे बोट दाखवून रागावून विचारतो ' काहो तुम्हाला हे फुकटे दिसत नाहीत का? आमच्याच मागे लागताय? ' त्यावर तो टीसी शांतपणे उत्तर देतो ' साहेब, तुम्ही त्याच्या स्तरावर जा, मग मीही तुम्हाला तिकीट विचारणार नाही '

Happy

ज्या ट्विटमुळे चर्चा चालू झाली.एकमेकांची कॉलर ऑनलाईन धरून झाली,त्या ट्विटचा बाहेर किती परीणाम झाला...?
चांगल्या लिखाणाची वाणवा लागताच नव्याने मनोरंजन बरोबर होते ... हे माबोवर ग्रेसफूल की शेमफूल..?

१०० + धागा काढल्याबद्दल दुकान्याचे अभिनन्दन

कोणत्याही कम्पुचे पाठबळ नसताना त्यान्नी हे यश मिळवले, त्याबद्दल त्यान्चे पुन्हा एकदा अभिनन्दन.

मुमं म्हणतात, "सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जाणार नाही अशा प्रस्तावावर विचार केला जाईल." समजा प्रत्येक कुटुंबाला ५० लाख रुपये राज्यसरकारच्या तिजोरीतून अनुदान दिले तर? जे बेघर होतील ते कोकणात आपले (दुसरे किंवा तिसरे?) घर घेऊ शकतील! Happy

सर्वानि खुप महत्वाचि माहिति द्लि आनि खेळिमेळित मतं दिली. पन त्या रहिवाशांपैकि खरच ज्याच्याकड पैशे नसतिल त्यान मुम्बईत कस काय करायच या प्रश्नाच उत्तर नाहि मिलाल. कोनच ते देउ शकत नाहि याच वाईत वाटल.

समाप्त

समाप्त वाचून टचकन डोळ्यात पाणी आलं.
माबोवरच्या कुठल्याही चर्चाप्रस्तावानंतर चक्क धागाकर्त्याने न चिडता समाप्त म्हणणे म्हणजे 'मै कहां हुं?' सिच्युएशन झालीय.
नाहीतर- 'हेमाशेपो, अ‍ॅडमिन हा धागा बंद करा, यापुढे माबो सोडून चाललो/ले ' असे धाग्याचे समारोप वाचायची सवय झाली आहे.
Wink

Pages