Submitted by mansmi18 on 30 May, 2014 - 01:40
नमस्कार,
(बाणेर) पुणे - नाशिक प्रवासासाठी रस्ता कसा आहे?
गूगल वर शोधल्याप्रमाणे पुणे नाशिक अंतर २१० किमी आणि ड्राइव्ह टाईम अंदाजे ४ तास १५ मि आहे. पण रस्ता चांगला नाही .अॅक्चुयल ड्राईव्ह टाईम ६-७ तास लागु शकतात असे लिहिले आहे.
पर्यायी मार्ग त्यानी पुणे-कल्याण-ठाणे आणि मग नाशिक महामार्ग असा सुचवला आहे. (अंतर ५५-६० किमी जास्त आहे) पण रस्ता चांगला आहे असे लिहिले आहे.
कृपया आपल्या सुचना लिहाल का?
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुणे-कल्याण-ठाणे आणि मग नाशिक
पुणे-कल्याण-ठाणे आणि मग नाशिक महामार्ग
>>> छे छे! अजिबात नाही!
पुणे-नाशिक महामार्गाचे रूम्दीकरण सुरु आहे. मागच्या महिन्यात सिन्नरपर्यंत गेलो होतो. राजगुरूनगर पासून टू लेन रस्ता असला तरी मध्येमध्ये अनेक ठिकाणी रूंद झालेला आहे.
दुपारी निघालात तर ट्राफिक कमी लागण्याची शक्यता.
६ ते ७ तास लागतात सध्या.
६ ते ७ तास लागतात सध्या.
धन्यवाद
धन्यवाद आनंदयात्री/फारएंड..
६-७ तास दोन्ही पर्यायाना?
मी लिहीले आहे ते थेट लागणारा
मी लिहीले आहे ते थेट लागणारा वेळ. कल्याणला जाऊनही कदाचित तेवढाच लागेल.
हो. दोन्ही मार्गांनी तेवढाच
हो. दोन्ही मार्गांनी तेवढाच वेळ लागेल.
माझ्या मते व्हाया कल्याण जाणारा मार्ग असा असावा -
पुणे- एक्स्प्रेस वे मार्गे कळंबोली-शीळ फाटा-डोंबिवली-कल्याण-भिवंडी-कसारा (आग्रा हायवे)-नाशिक. (ठाण्याला जायची गरज नाही)
यातला कळंबोली ते भिवंडी पर्यंतच्या रस्त्यावर ट्राफिक असणारच आहे.
बाकी टोल इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या तर पुणे-नाशिक हायवेवर फक्त दोन टोल (तेही न देऊन प्रसंगी गाडी काढता येते) आहेत. व्हाया कल्याण मार्गावर टोलला चिकार पैसे जातील.
तुम्ही जर स्वतःच्या गाडीने
तुम्ही जर स्वतःच्या गाडीने जाणार असाल तर पहाटे ३-४ ला निघून सकाळी ८-९ पर्यंत आरामात पोहचू शकता. (पुणे-सिन्नर-नाशिक मार्ग) आम्ही नेहेमीच असं करतो. बसने गेलात तर ६ तास धरूनच चला. दुपारी निघाल्यामुळे रहदारी कमी लागेल असे वाटत नाही कारण नाशिकला पोहोचेपर्यंत परत ती वाढतेच. किंवा मग सरळ रात्रीचा प्रवास करायचा, पण तो सगळ्यांना सोयीस्कर नसतो.
मनस्मी.. पुणे नाशिक
मनस्मी.. पुणे नाशिक रस्त्यानेच जा.. मधे काही ठिकाणीच रस्ता छोटा आहे... सकाळी लवकर म्हणजे ६ च्या सुमारास निघलात तर साडेपाच तासात नाशिक मध्ये पोहोचाल.. कारण रहदारी कमी असेल.. पण ९ वाजता निघालात की साडे सहा तास लागलेच..
राजगुरुनगर पर्यंत काहीच प्रश्न नाही.. वन वे रस्ता.. तिथून पुढे जिथे जिथे मोठी गावे आहेत.. म्हणजे नारायण गाव, संगमनेर, सिन्नर तिथे थोडा ट्रॅफिक लागतो.. पण अडकाअडकी शक्यतो खूप काळासाठी होत नाही..
मी उद्याच जाणार आहे.. अजून जास्त माहिती उद्या देतो...
पुणे - कल्याण - नाशिक हा बर्यापैकी त्रासदायक प्रकार आहे... पुणे पनवेल काही प्रश्न नाही.. पुढे पनवेल ते कल्याण छळ होतो.. छोटा रस्ता.. प्रचंड ट्रॅफिक.. आणि ड्रायव्हिंगचा त्रास.. नंतर परत कल्याण नाशिक सुखावह.. पण मधला पॅचच वैताग आणतो..
माझ्या माहितीनुसार संगमनेरला
माझ्या माहितीनुसार संगमनेरला बायपास करणारा रस्ता झाला आहे.
आमचा पुणे नाशिक प्रवास सकाळी
आमचा पुणे नाशिक प्रवास सकाळी 6 ते 11 या वेळात पूर्ण झाला होता. त्यातही आम्ही ½ तासाचा ब्रेक घेतला होता.
जर पुणे नाशिक गेलात तर राजगुरु नगर नंतर समर्थ वडेवाले (जाताना डाव्या हाताला) भेट द्या. 1 नंबर मिसळ पाव आणि वडा स्यांपल असतो.
संगमनेर बायपासचे काम चालू
संगमनेर बायपासचे काम चालू होते.. पूर्ण झाल्याचे माहिती नाही.. झाले असेल तर फारच उत्तम होइल..
माझा अनुभव सकाळी आणि दुपारी
माझा अनुभव सकाळी आणि दुपारी (उन्हात) ट्रॅफिक कमी होतं. पहाटे बहुदा ट्रकची गर्दी असेल का, याचा अंदाज नक्की घ्या. रात्री ट्रकची गर्दी असते, ती शक्यतो टाळा. प्रवासास शुभेच्छा.
गरज असेल तर sygic हे जिपीएस अॅप वापरा. शहरात वापरण्यास उत्तम. नाशिकमध्ये जिपिएसचा खुप फायदा झाला.
गुगल मॅप्स वरती तरी संगमनेर
गुगल मॅप्स वरती तरी संगमनेर बायपास पूर्ण झाल्याचे दाखवत आहेत.. तसे असेल तर मग दिवसाच्या कुठल्याही वेळेस गेल्यावर फार वेळ लागणार नाही..
संगमनेर गावातून जाणारा रस्ताच सगळ्यात त्रासदायक आहे.. दुपारी १ ते ४ ह्या वेळेत त्या रस्त्यावरुन अवजड वहानांना परवानगी असते.. आणि पूल छोटा असल्याने कायम ट्रॅफिक जाम होते.. त्यामुळे ठराविक वेळेच्या आत संगमनेर क्रॉस केल्यास तो ट्रॅफिक लागत नाही. पण जर बायपास झाला असेल तर हे सगळेच वाचेल..
सिन्नर च्या पुढेही रस्ता
सिन्नर च्या पुढेही रस्ता अरूंद आहे ना? तेथून पुढेही खूप वेळ लागला होता मी एक दोन दा गेलो होतो तेव्हा. विशेषतः बैलगाडीवर ऊस घेऊन जाणारे असले की आणखीनच.
सिन्नर- नाशिक बरा आहे रस्ता.
सिन्नर- नाशिक बरा आहे रस्ता. मागच्याच आठवड्यात जाऊन आलो. घाटात थोडी गर्दी होते. आता उसाच्या बैलगाड्यांऐवजी सहा-आठ आसनी रिक्षा/ मालवाहू त्रासदायक ठरतात.
संगमनेर बायपास पुर्ण झाला
संगमनेर बायपास पुर्ण झाला आहे... संगमनेर गावात अजिबात जायची गरज पडत नाही मस्त वेळ वाचतॉ
१/२ ते १ तास वाच्तो
वा वा.. लय भारी.. उद्या लवकर
वा वा.. लय भारी.. उद्या लवकर पोचणार मी नाशकात..
सगळ्याना धन्यवाद. हिम्सकूल ऑल
सगळ्याना धन्यवाद. हिम्सकूल ऑल द बेस्ट.. उद्या आंखो देखा हाल लिहा
पुणे-संगमनेर (विशेषत:
पुणे-संगमनेर (विशेषत: राजगुरूनगर नंतर) फारच अरूंद रस्ता आहे (अंधारा ही आहे) त्यामुळे अंधाराचा प्रवास नवख्यानी टाळावा, बाकी पुणे नाशिक प्रवास तसा अल्हाददायी आहे
मी सहसा प्रत्येक महिन्याला
मी सहसा प्रत्येक महिन्याला जातेच पुणे -नाशिक रस्त्यावरुन, संगमनेर बायपास झाल्याने मजा येतेय.
साधारणपणे निवांत गेल्यास ५ तास लागतातच. एकदा मात्र येताना ४ तासातच आले होते
मी नशिक पुणे कमीत कमी १५०
मी नशिक पुणे कमीत कमी १५० वेळा - गेल्या ५ वर्षात केले आहे ( कारने). सकाळी ६ च्या सुमारास निघाल्यास , नाष्टा ब्रेक घेऊन ५ ते ५.५ तासात पोहोचता येते. संगमनेर ते नाशिकच , विशेषतः सिन्नर ते नाशिक वेळ जातो. संगमनेर बाय पास झाला आहे.
कल्याण मार्गे प्रयत्न करू नका कारण रस्ता नक्कीच चुकतो व भयानक ट्रॅफिकही असतो.
कालचा प्रवास झकास झाला...
कालचा प्रवास झकास झाला... फ्लॅट ५ तास विथ १ ब्रेक.. नाशिक फाटा फ्लायओव्हर झालेला आहे.. संगमनेर बायपास झालेला आहे.. पुढे सिन्नरलाच थोडा काय तो वेळ लागला. .आणि सगळ्यात जास्त वेळ द्वारका सर्कलला लागला... तिथला फ्लाय ओव्हर होऊन सुद्धा कित्येक ट्रक खालून जाताना दिसत होते.. आणि तिथे पोलिसांना ट्रॅफिक अजिबातच मॅनेज करता येत नाही..
मी ही जातेय उद्या.
मी ही जातेय उद्या.
पुणे-कल्याण-ठाणे आणि मग नाशिक
पुणे-कल्याण-ठाणे आणि मग नाशिक महामार्ग
<
is the best bet.
Daily travellers use that same route.
नाशिक पुणे रस्ता अत्यंत बेक्कार आहे. हौसच असेल तर ड्राईव्ह करा. हौस नसेल तर शिवनेरीने जा. ते चांगले.
४ तासात पोहोचले कल्याण मार्गे
४ तासात पोहोचले कल्याण मार्गे रस्ता मस्त पण टोल भयानक
४ तासात पोहोचले कल्याण मार्गे
४ तासात पोहोचले कल्याण मार्गे >>>>>>>> सुप्रिया - ४ तास हे बरोबर आहे का?
मला वाटत नाही कल्याण मार्गे ४ तासात नाशिक ला जाता येइल.
जरा ब्रेक-अप लिहा.
मनस्मी.. बिन्धास्त पुणे-नाशिक
मनस्मी.. बिन्धास्त पुणे-नाशिक हायवेने जा.. रस्ता फारच थोड्या ठिकाणी खराब आहे... सकाळी लवकर निघालात तर कमी वेळात पोहोचाल..
रस्ता बेकार असे मी म्हटले
रस्ता बेकार असे मी म्हटले याचा अर्थ रस्त्याचे खड्डे वा त्याची फिजिकल कण्डिशन नव्हे.
चिंचोळा सिंगल रस्ता आहे. ट्रॅफिक भरपूरच आहे. समोर लायनीत एकादा हातगाडी/बैलगाडीवाला लागला की १५-१५ मिनिटे पायी चालल्यासारखी गाडी चालते. समोरून येणारी लाईनही नॉनस्टॉप असल्याने ओव्हरटेक करता येत नाही.
४ घाट आहेत ते वेगळेच.
दीड पावणेदोनशे किलोमीटर्स साठी ५ तास जरा जास्त होतात..
पुणे - नाशिक अंतर हे २२० किमी
पुणे - नाशिक अंतर हे २२० किमी आहे... आणि अॅव्हरेज ४० च्या स्पीडने गेल्यास साडेचार तास लागणे अपेक्षित आहे..
रस्ता अगदीच चिंचोळा नाहीये.. सिंगल तर नक्कीच नाहीये.. सगळा रस्ता डबल आहे. आणि आता चार लेनचे काम चालू आहे..
सिंगल रस्ताच बघायचा असेल तर कोकणातले काही रस्ते बघा.. तिथे तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आहे.. समोरुन गाडी आल्यावर खालीच उतरावे लागते... तशी परिस्थिती आख्ख्या नाशिक रस्त्यावर कुठेच येत नाही..
७ ला बावधानवरुन निघाले
७ ला बावधानवरुन निघाले लोणावळा चहा ब्रेक १० मि. , के एफ सी पार्सल १० मि.
स्कोरपिओ मुलगा चालवत होता .
@ सुप्रिया - त्यातुन टोल
@ सुप्रिया - त्यातुन टोल वगैरे साठीचा वेळ वजा केला तर २८० की.मी. साठी अॅव्हरेज स्पीड च ८० च्या वर येतो. जरा हळु जात जा. अॅव्हरेज स्पीड ८० येण्यासाठी गाडी १२० च्या पुढे ही न्यायला लागेल बर्याच वेळा.
Pages