एकदा नदीच्या काठावर रामकृष्ण परमहंस अंघोळीला बसायच्या तयारीत होते.
समोर एक मोठं घंगाळं ठेवलेलं होतं ज्यात अंघोळीचं पाणी भरलेलं होतं, त्याबरोबर एक चंबू ( गडवा ) ठेवला होता, ज्याने त्या घंगाळ्यातुन पाणी घेउन अंघोळ करायची असे.
रामकृष्ण त्या समोर एका लहान चौरंगावर बसले होते.
इतक्यात काही लोकांच्या मोठ्याने आपसात बोलण्याचा आवाज त्यांच्या मागच्या बाजुने आला. त्यांनी वळुन मागी पाहिले, ते लोकं नदीकडे निर्देश करुन काही दाखवत होते . . . .
तिकडे पाहिले तो काय ? एक साधु पाण्यावरुन सरळ चालत येत होता इकडच्या किनार्यावर.
रामकृष्ण उठुन उभे राहिले, त्यांनी त्या साधुचे स्वागत केले आणी त्यांना आपल्या समोरच बसायला एक चौरंग द्यायला सांगितले.
साधु : मी ईथे कोणा रामकृष्ण परमहंसांना भेटण्यासाठी आलो आहे. कुठे भेटतील ?
रा.कृ : मीच आहे रामकृष्ण, सांगा मी आपली काय सेवा करु शकतो ?
साधु : नमस्कार स्वीकार करावा माझा आणी मला हे सांगावं, कि, तुम्ही ज्या देवीचे पुजारी आहात ती देवी तुमच्या हातुन नैवेद्य आणी जेवण करण्यासाठी रोजच येते तुमच्या सम़क्ष हे खरे आहे का ?
रा.कृ. : हो, हे खरेच आहे . . . .मग त्यात काय झालं ?
साधु : अहो काय झालं म्हणजे ? मी फार वर्षे तपस्या आणी साधना करुन ह्या सिद्धी प्राप्त करुन घेतल्या आहेत, मी पाण्यावरुन चालत जाऊ शकतो, हवेत उडु शकतो, अंतर्धान होऊ शकतो, सर्व जाळुन भस्मसात करु शकतो, पर्जन्य वृष्टी करवु शकतो आणखीन बरेच काही आहे.
पण मला आजपर्यंत तुम्हाला भेटतात तसे कोणी देव-देवता येऊन भेटत नाहित, मला देव भेटला नाही अजुन, तुम्हाला ह्यातले काहिच येत नाही असे ऐकले आहे, सिद्धी प्राप्त नाही, मग असे कसे होऊ शकते ?
रा.कृ. : अरेच्या ! असे होय ? काही हरकत नाही, सांगतो, पण तुम्ही पाण्यावरुन का होईना, चालत आलात, त्याआधी ही आकाश मार्ग असे काही केलेच असेल ? थकवा घालवा, निवांत बसा, पाणी प्या.
सांगतो.
साधुने काही विचार न करता समोर ठेवलेला अंघोळीचा चंबू उचलुन घंगाळ्यातुन पाणी घेणार . . . . तोच रामकृष्ण म्हणाले, अहो त्या गडव्याने नका घेऊ त्याने मी अंघोळ करतो.
तुम्ही तुर्तास ह्या घंगाळ्यातच तोंड लावुन पाणी प्या ना ? अश्याने ते पवित्र सुद्धा होईल तुमच्या मुखस्पर्शाने.
साधुने तसेच केले, थोडे पाणी त्याला पिऊ दिल्यावर रामकृष्णांनी त्याची मान धरुन त्याचे पूर्ण तोंड पाण्यात बुडवले . . . . साधुला हे अनपेक्षित होते, त्याने वर डोके काढण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तसे होऊ शकले नाही, रामकृष्णांनी पूर्ण ताकद लावुन त्याला दाबून ठेवला, त्याने शेवटी हात पाय झाडायला आरंभ केला तसा रामकृष्णांनी त्याला सोडुन दिला.
डोके वर काढुन जेव्हा साधुने रामकृष्णांकडे क्रोधाने पाहिले, बाकि सर्वांच्या अंगाला घाम सुटला, आता काय होणार ? हा साधु तर आता प्रलय करवणार ईथे.
रामकृष्ण जणु काहिच झाले नसावे अश्या शांतपणे साधुकडे पाहात मिस्किल हास्य करीत उभे होते.
साधु : अरे ! हे तु काय आणी का केलेस ? माझे तुझ्याशी काय एव्हढे शत्रुत्व आहे कि तु माझा जीव घ्यायला प्रवृत्त झालास ?
आत्ताच्या आत्ता तुला मी ईथेच शि़क्षा करतो, पण त्या आधी तू मला कारण सांग असे का केलेस ?
रा. कृ. : सांगतो, तेही सांगतो पण तुम्ही एव्हढे कासाविस का झाले होते ? असे हातपाय का झाडत होतात जोर जोराने ?
साधु : मुर्खा ! माझ्या नाका तोंडात पाणी गेले, श्वास घेणे अशक्य झाले, काहीच दिसेनासे झाले डोळ्यांत अचानक पाणी गेल्यामुळे , आणी मी जर हात पाय झाडुन जीव तोडुन माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नसता, तर मी संपलोच होतो.
रा. कृ. : अरेच्या ? हो का ? पण तुम्हाला तर पुष्कळ सिद्धी प्राप्त आहेत ना ? त्यातली एकही आत्ता कुठल्याच कामी नाही आली ?
साधु : ! ! ! ! ? ? ? ?
रा. कृ. : अहो साधु महाराज हे असे पाण्यावरुन चालणे ह्यासाठी तर ह्या नौका ह्या नदी मध्ये आहेतच कि हो ! अगदी अर्धा आणा दिला कि ते नावाडी हवे तिथे घेऊन जातात नावेतुन, आणी हवेत उडुन काय करायचे आहे ?
असो . . . .
जेव्हढा प्रयत्न तुम्ही तुमचा प्राण वाचविण्यासाठी आणी ज्या एकाग्रतेने तुमची सर्व गात्रे आणी बुद्धी पणाला लावुन केलेत ना ? तसेच आणी तितकेच प्रयत्न ह्या सिद्धी प्राप्तिकरता न करुन जर सरळ भगवंताला प्राप्त करण्यासाठी केले असतेत ना . . . . .
तर शेकडो वर्षे तो आधीच तुम्हाला मिळाला असता . . . . !
साधु सगळे विसरुन झटकन रामकृष्णांच्या पायांवर पडला, अंघोळी आधीच त्यांचे चरण आपल्या पश्चातापाच्या अश्रुंनी धुवुन टाकीत होता.
-----------------------------------------------------
नमस्कार . . . .
श्री गामा_पैलवान जी, श्री
श्री गामा_पैलवान जी,
श्री परब्रम्ह जी.
सप्रेम नमस्कार या निमीत्ताने विचार मंथन झाले,मनोमन आनंद झाला. धन्यवाद.
ज्ञानेश यांच्या मताला महत्त्व
ज्ञानेश यांच्या मताला महत्त्व देवू नये ते वेगळ्या वाटेचे प्रवासी आहेत
आपली बाकीची चर्चा छान चालली आहे चालूद्या !!!
अभय, काही प्राप्ति झाली कि
अभय,
काही प्राप्ति झाली कि नाही अजुन ?
नमस्कार . . . .
Pages