Submitted by बागेश्री on 23 June, 2013 - 01:16
ही झाली संध्याकाळ
दिवसाचे कलणे झाले,
अंबरी चांदणे येता
श्वासांना गहिवर आले..
गलबलून येते काही,
ना गाव न नाव तयाला
रुजलेली, मनि जपलेली
अव्यक्त भावनामाला..
ना डोळा रुचते काही
जरि पाते हिरवे हिरवे
पाऊस दाटलेला अन
ऋतु मुग्ध गुलाबी बरवे
टपटपले थेंब सभोती
ही धरती ओली ओली
गलबलुन भावडोहाने
गाठली आणखी खोली...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुन्दर!
सुन्दर!
वाह! बागे मस्त आवडेश
वाह! बागे मस्त आवडेश
खूप सुरेख.... शेवट फारच
खूप सुरेख....
शेवट फारच 'ग्रेसफुल'...निशःब्द करून गेला..!:)
खुपच छान कविता, अप्रतिम.
खुपच छान कविता, अप्रतिम.
सुरेख कविता. गलबलून येते
सुरेख कविता.
गलबलून येते काही,
ना गाव न नाव तयाला >> फारच छान
Pages