अरुणाचलप्रदेश २..... " आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो "

Submitted by Prasad Chikshe on 27 April, 2012 - 07:49

अरुणाचलप्रदेश १......."ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग"
http://www.maayboli.com/node/34433

Bramhapu_0.jpg
दिब्रुगड येथे महालयामध्ये आमची निवासाची व्यवस्था होती. सतत पडणारा पाऊस त्यामुळे बाहेर फिरणे जवळपास अशक्य. वाचन खूप करत होतो. या काळात सर्वात मोठी साथ होती माझा मित्र योगेश झोपेनी दिलेल्या मस्त गाण्याच्या कॅसेट्स व माझ्या आईने घेऊन दिलेल्या कॅसेट प्लेयरनी. ग्रेसच्या कविता आणि जगजितसिंगांच्या गझला ह्या माझ्या नित्याच्या साथीदार बनल्या.

माँ सुनाओ मुझे वो कहानी,
जिसमें राजा न हो न हो रानी,
जो हमारी तुम्हारी कथा हो,
जो सभी के ह्रदय की व्यथा हो.

गंध जिसमें भरी हो धरा की,
बात जिसमें न हो अप्सरा की,
हो न परियां जहाँ आसमानी,
माँ सुनाओ मुझे वो कहानी.
Bramhaputr.jpg
दिब्रुगडच्या ब्रह्मपुत्रच्या घाटावरून काही प्रवास जीपने ब्रम्हपुत्रच्या पात्रातून तर काही प्रवास बोटीने( फेरी) करत सकाळी ७ वाजता निघालेलो आपण नक्की कधी शिलापथारला पोहोंचू हे सांगता येणे कठीणच. माझ्या अनुभवानुसार कमीत कमी तीन तास तरी नक्की लागतात. शिलापथारला पोहोंचले की पहिले काम दापोरीजोला जाणाऱ्या बसचे तिकीट आरक्षित करणे. शिलापथार अरुणाचल व आसामच्या सीमेवरील एक छोटेसे गाव. दापोरीजोला जाणाऱ्या तशा दोन बस. एक अरुणाचल राज्य परिवहन निगमची, त्याला ट्रान्सपोर्टची बस म्हणतात तर दुसरी खाजगी वाहतुकीची आराम बस. ज्याच्यात जागा असेल त्यात बसायचे. सकाळी दापोरीजोहून जी बस असायची त्या बसने जायचे. कधीकधी बस येतच नसे मग शिलापथारच्या एखाद्या लॉज मध्ये राहायचे. त्यावेळी स्वच्छता,आरोग्य ह्या गोष्टी आमच्या विचार कक्षेच्या बाहेर.

दुपारी मस्त DBS (दाल,भात,सब्जी)वर ताव मारायचा, इकडे तिकडे फिरत बसायचे. सायंकाळी ५ वाजता शिलापथारहून बस निघायची. बसमध्ये कोंबड्या,मासे,वेगवेगळे सामान सगळे काही असायचे. बस ८ किलोमीटर पुढे गेली की लिकाबाली चेकपोस्ट. इथून अरुणाचल सुरु होणार. चेकपोस्ट म्हटल्यावर मला पहिल्यांदा थोडं आश्चर्य वाटले. एखादा पोलीस मग बसमध्ये चढून आतील अरुणाचली बंधू सोडून इतरांचे इनरलाइन परमिट तपासणार. अरुणाचलमध्ये जाण्यासाठी आपल्याला रीतसर अरुणाचल शासनाची परवानगी घ्यावी लागते. ईशान्य भारतातील नागालँड,मिझोरम व अरुणाचल या तीन राज्यात प्रवेश करण्यासाठी (ILP) ही परवानगी लागते.इंग्रजांनी हा सुरु केलेला कायदा आपण पुढे चालूच ठेवला. या बद्दल बरेच वादविवाद आहेत.

एकदा इनरलाइन परमिट तपासणी झाली की बस अरुणाचलच्या डोंगररांगातून जाऊ लागते नागमोडी वळणाने. सरळ रस्ता क्वचितच. डोंगरातून खूप परिश्रमाने निर्माण केलेले हे रस्ते म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे देशासाठी एक खूप मोठे योगदान आहे. पावसाळ्यात मात्र हाल होतात. डोंगरच्या डोंगर कोसळतात. रस्ते पूर्ण बंद. वायुमार्गाने फक्त रसद पुरवठा आणि बऱ्याच वेळा तो पण बंद असे. एका पावसाळ्यात जवळपास एक महिना रस्ते बंद होते. फक्त भात कधी तर कधी फक्त बटाटे हे आमचे जेवण असे.

निसर्गाचा एक वेगळाच सुगंध आपल्याला इथे अनुभवता येतो. खोल दऱ्या, उंच पर्वत आपली साथ कधीच सोडत नाहीत. अरुणाचलमधील लिकाबाली हे पहिले गाव. मालिनीथान (Malinithan) मंदिर इथून एक किलोमीटर वर. इथे काही पुरातनकालीन (महाभारत) अवशेष पहावयास मिळतात. अशी आख्यायिका आहे की मालिनीथान येथे भीष्मकनगरहून द्वारकेला जाताना नवीन लग्न झालेल्या श्रीकृष्ण व रुक्मिणीने पार्वती मातेची प्रार्थना केली. पार्वती मातेनी त्यांनी एक हार दिला. तो श्रीकृष्णाला खूप आवडला. श्रीकृष्णाने पार्वती मातेची सुचारू मालिनी (Sucharu Malini", or a lady who strings garlands beautifully ) म्हणून स्तुती केली. त्यावेळी पासून या स्थानाचे नाव मालिनीथान असे पडले.

Manga_0.jpg
लिकाबालीनंतर पुढचा थांबा येतो व सगळे लोक बस मधून खाली उतरतात. मी पहिल्यांदा गेलो त्यावेळी वाटले एखादा धाबा असेल पण खाली उतरून पाहतो तो समोर एक शिवमंदिर होते. अरुणाचलमध्ये असे अनेक स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर आहेत. दापोरीजो जवळचे मंगामंदिर तर खुपच अप्रतिम आहे. हिमालयात निवास असणाऱ्या भोलेनाथाचा आशिर्वाद घेऊन.पुढची अवघड यात्रा सुरक्षित व्हावी म्हणून सर्वांनी प्रार्थना केली व आमचा प्रवास पुढे सुरु झाला.

असे खुपदा अनुभवायास मिळते की उत्तरेकडून दक्षिण टोकापर्यंतचा भारत रामाने जोडला. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा भारत कृष्णाने जोडला तर समुद्रसपाटी पासून ते उंच हिमालयाच्या पर्वतशिखरांपर्यंतचा भारत शिवशंकराने जोडला.
Picture1 (2).jpg
अरुणाचलच्या या पर्वतीय रस्त्यावरून बस चालवणे खुपच जिकीरीचे काम. खुपच सतर्क रहावे लागते. वळणावर समोरून येणाऱ्या गाडीचा वेध तिच्या प्रकाशाने घ्यावा लागतो. अरुणाचलचे क्षेत्रफळ ८४ हजार वर्ग किलोमीटर व लोकसंख्या १४ लाखाच्या आसपास. मनुष्यवस्ती खुपच तुरळक व खूप अंतरावर. त्यामुळे दहा तासाच्या प्रवासात काहीच गाव दिसतात. बसार हे त्यातल्या त्यात मोठे गाव. सकाळी सहाच्या आसपास आपण दापोरीजोमध्ये पोहोचतो. मारो हे छोटेसे गाव सोडल्यानंतर काही अंतरापासून आपला प्रवास सुबांशिरीन सोबत सुरु होतो. अरुणाचलच्या बहुतेक जिल्ह्यांची नावे त्या भूभागातून नद्यांच्या नावावरून दिले आहेत. त्याच प्रमाणे इथल्या गावाची नावे म्हणजे इथल्या बंधूंची आडनावे. मारो बस्ती मध्ये राहणाऱ्या सर्व बांधवांची आडनावे मारो. मुलांची व पुरुषांची नावे मुख्यतः त पासून किवा म पासून सुरु होतात उदा. ताके,तामो,तानिया,तागे, मार्को,मालार इत्यादी तर मुलींची व महिलांची नावे मुख्यतः य पासून. याबी, यांनी, याकब, यादे इत्यादी. वडिलांचे नाव लावण्याची पद्धत इथे नाही.

गावातील मुलं मुली एकमेकांची बहिण भाऊ व गावातील प्रत्येक आईच्या (आने) वयाच्या महिलेला मुलं आईच म्हणतात. आबो म्हणजे वडील तर आबोतानी हा त्यांचा आद्य पिता. सर्वं अबोतानीच्या वंशजांचे दोनि (सूर्य ) व पोलो (चंद्र) हे देवता. दोनि आई आहे तर पोलो वडील आहे. निसर्गाच्या सहवासात राहणारे हे बांधव निसर्गाचेच पूजक असणार.

आदित्यांत महा-विष्णु ज्यातिष्मंतांत सूर्य मी । मरीचि मुख्य वायूंत मी नक्षत्रांत चंद्रमा ॥गीत्ताई २१॥
मी एकाक्षर वाणींत महर्षींत असे भृगु । जप मी सर्व यज्ञांत मी स्थिरांत हिमालय ॥ गीत्ताई २५ ॥
Aai_0.jpg
भारतवर्षात एकूणच आई व मुलाचे नाते फारच वेगळे. तिच्या शरीराचा आपण एक भाग असतो. भारतात्तील आई मुलांच्या जोड्या पहिल्यातर आपल्याला लक्षात येईल की आईचे स्थान भारतीय अध्यात्मात तर महत्वाचे आहे पण इतिहासात ते खुपच उठून दिसते. गणपती -पार्वती, हनुमान-अंजनी, कृष्ण-यशोदा, शंकराचार्य व त्यांची आई,जिजाऊ-शिवबा, शाम व त्याची आई, विनोबा व त्यांची आई. अशा आई मुलांच्या जोड्यांनी सर्वच क्षेत्रात एक नवीन आदर्श ठेवला. मी काही माझ्या पंजाबी मित्रांना विचारले की खरे कशा मुळे पंजाबातील दहशतवाद संपला? त्यांचे उत्तर होते, “ पंजाबातील आईंमुळे!!!”

मला कधी कधी वाटते आपल्या देशातील आईंमुळे देश एकसंघ राहिला व कुटुंबे एकसंघ राहिली. आई जर दुर्बल झाली तर घर व देश पण दुर्बल होईल.
Aai_0.jpg
अरुणाचली आई पण याला कशी अपवाद असेल. अरुणाचली घराचा कणा म्हणजे आई.

M1_0.jpg
गम्मत म्हणजे अरुणाचलात लग्नपद्धती पण खूप वेगळी आहे. पुराणकाळात आपल्याकडे सर्वात श्रेष्ठ गोधन समजले जायचे. अरुणाचलमध्ये श्रीमंती ठरते ती त्यांच्याकडे असण्याऱ्या मिथुनच्या संख्येवर. मिथुनचे अरुणाचली बांधवांच्या आयुष्यातील स्थान खूप महत्वाचे. एका मिथुनची किंमत काही दश सहस्त्रात. एखाद्या मुलीशी आपल्या मुलाचे किवा मुलीचे लग्न लाऊन द्यायचे असेल तर त्या मुलीचे वडील मागतील तेवढे मिथुन लग्नात त्यांना द्यावे लागतात ही अरुणाचली रीत.

एक गंमतीदार किस्सा ऐकिवात आहे. पंडित नेहरू व इंदिराजी अरुणाचल मधील झिरो या गावी गेले होते. त्यांचे तिथे खूप जोरदार स्वागत झाले. झिरो गावच्या गावप्रमुखाला इंदिराजी खूप आवडल्या. गावप्रमुखाचे वय साठीच्या आसपास असेल. त्यांनी पंडितजींना विचारले,

“इंदिराजींचे लग्न माझ्याशी लाऊन द्याल का?”
त्याबदल्यात गाव प्रमुख पंडितजींना शंभर मिथुन देण्यासाठी तयार होते.
Mula.jpg

मी दापोरीजो मध्ये रहात असताना खूप जवळून अनुभव घेता आला या सर्व लोकांचा. एकदा काही बांधवांना आमचे कार्यकर्ते बंगाल मध्ये घेऊन गेले. कोलकत्याच्या रेल्वेस्टेशन वर एका बांधवाची बॅग चोरीला गेली.
“कुठे ठेवली होती?” असे विचारल्यावर त्याने सांगितले,

“वहाँ कोने मे रखी थी”
“आपका ध्यान नही था क्या?”
“हमने यह सोचा भी नही था न, की कोई बॅग उठायेगा.”
अगदी निरागसपणे त्याने उत्तर दिले. त्याच्या बस्ती मध्ये कुठल्याच घरांना कुलूप नसतात. चोरी हा प्रकार बस्तीतल्या लोकांना माहित पण नव्हता.

कुपोरीजो मधील विवेकानंद केंद्राच्या प्राथमिक शाळेतील मुले खुपच गोड दिसायची. त्यांचे हिंदी बोलणे पण फार भारी. तशी फार इरसाल ही पोरं. साप, पक्षी, विंचू हे सहज पकडायची. जंगलाचे ते राजेच होते. साठच्या दशकात रामकृष्ण मिशनच्या शाळांमध्ये अरुणाचलच्या विविध व खूप अंतर्गत भागातून मुलांना सरळ हेलीकॉप्टरने आणले जायचे. त्यातील काही मुले पुढे अरुणाचलचे मंत्री, मुख्यमंत्री व खासदार झाली. असेच अप्पर सुभांशिरीनच्या अतिअंतर्गत भागातून मुलांना शिकण्यासाठी कुपोरीजोच्या शाळेत आणले जायचे.

मारो ही एक अशीच दुरस्थ बस्ती. जवळपास ३० किलोमीटर दूर.तिथला तागे हा शिकण्यासाठी कुपोरीजो मध्ये होता. तागेचे वडील तो काही महिन्याचा असतानाच देवाघरी गेले होते. त्याच्या आनेची (आईची) इच्छा होती तागेनी खूप मोठे व्हावे. दिसायला तागे अगदी बाल हनुमानाचे रूप. खुपच मस्त दिसायचा.

विवेकानंद केंद्राच्या शाळांच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होत असत. ओयानच्या शाळेत झालेल्या लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिलीतील तागे मारा एक स्पर्धक होता. त्याची स्पर्धा होती त्याच्या पेक्षा वयानी खूप मोठया मुलांशी. स्पर्धा सुरु झाली तागे मारा मात्र शेवट पर्यंत धावला व शर्यतीचे सहा किलोमीटरचे अंतर त्याने न थांबता पूर्ण केले. तागे मारा त्या दिवसा पासून सर्वं विवेकांनद केंद्रांच्या शाळेत हिरो झाला होता. दापोरीजोची अनेक मुले ओयानच्या शाळेत शिकत होती. त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.पांडे होते. मुलांनी तागेला सांगितले की मुख्याध्यापकांशी ओळख करून देताना त्यांनी त्याचे स्वतःचे नाव सांगायचे पांडे म्हणून.

मुख्याध्यापकांनी तागेला नाव विचारले. त्याने सांगितले पांडे मारा !!! आणि त्या दिवसापासून सगळे त्याला पांडे म्हणू लागले. मी कुपोरीजो मध्ये अधूनमधून राहायला जायचो. नेत्रतपासणी शिबिरानंतर मला आता प्रवासासाठी मोटारसायकल पण मिळाली होती. पांडे व त्याच्या तीन मित्रांशी माझी पण खूप मस्त मैत्री झाली होती. ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे हे पांडेचे जिगरी दोस्त. ताई गंगो,मित्ती गंगो दोघे भाऊ दापोरीजोचे तर डॅनी मार्दे दुम्पोरीजोचा. या तिघांचा जन्म थोडया सुधारलेल्या भागातील. फार जंगली जीवनाचा अनुभव नाही. घरचे जीवन पण सुशिक्षित व समृद्ध होते. एकनाथ वसतिगृहात दुसरीचे मुले रहात. या चौघा जणांचे कॉट एक सलग. मी कुपोरीजो मध्ये असल्यावर या चौघांशी निदान अर्धा एक तास तरी रात्रीच्या जेवणानंतर गप्पा मारत असे. ते मला प्रसादजी सर म्हणायचे. त्यांच्यामुळे मला शाळेतील व अरुणाचलातील बऱ्याच गोष्टी पण कळायच्या.

“पांडे, आप इतना तगडा कैसे है? बहोत दुध, मक्खन, घी खाता होंगा?”

“नही न सर, हमलोग मे, दुध सिर्फ माँ का ही पिते है. जिसका दुध पियेंगे वो माँ बन जाती है. इस वास्ते तो हम गाय का दुध नही पिते.”

सृष्टीशी या भागातील बांधवांचे नाते पण फार वेंगळे. गाय व मिथुनचे हे लोक दुध पीत नाहीत कारण जिचे आपण दुध पितो ती आपली आई होते मग तिचे मांस नाही खाता येणार, त्यांचा बळी नाही देता येणार कुठल्याही पूजेत किंवा सण-समारंभात.एक झाड जर जंगलातील तोडले तर एक तरी नवीन झाड लावले पाहिजे हा नियम.

९ मार्च १९९७, पूर्ण खग्रास सूर्यग्रहण ईशान्य भागात दिसणार होते. मला सूर्यग्रहणा बद्दल प्रचंड आकर्षण होते. पूर्ण खग्रास सूर्यग्रहण आणि ते ही अरुणाचल मधून पहायला मिळणार या मुळे मी खूप खुश होतो. तसे दोन दिवसांपासून मी कुपोरीजी मध्ये ठाण मांडून बसलो होतो. संध्याकाळी जेवण झाल्यावर मी सर्व मुलांना ग्रहणाबद्दल माहिती देत असे. पिन होल कॅमेरा, ग्रहण पाहण्यासाठी खास प्रकारच्या चष्मे पण मी मागून घेतले होते. ग्रहणात उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पहायचे नाही, नाहीतर डोळे खराब होतील. शिक्षक हे सगळे सर्वं विद्यार्थ्यांना बजावून सांगत होते. आदल्या दिवशी दुपारी सूर्यग्रहणावर खूप छान माहिती दूरदर्शनवर दाखवण्यात आली होती. मुलं प्राथमिक शाळेतील असले तरी त्यांना एकूण बऱ्यापैकी संपूर्ण सूर्यग्रहणा बद्दल माहिती झाली होती. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मदतीला थांबण्यास पांडे व त्याच्या मित्रांना सांगितले. मुख्याध्यापक तामिळनाडूच्या कुमारवेल सरांनी झोपण्याआधी सर्वं मुलांना परत एकदा सूचना दिल्या.

मी पण माझ्या निवासकक्षात जाऊन शांत झोपी गेलो. अचानक रात्री कुमारवेल सरांनी माझ्या खोलीचा दरवाजा जोरात ठोठावला. काही क्षण मला काही कळलेच नाही. स्वप्न आहे की भास.

“प्रसादजी उठो ...जल्दी उठो” कुमारवेल सर जोरात हाक मारत होते.
“क्या हुआ सर ?” मी दरवाजा उघडत विचारले.
“चार बच्चे होस्टेल मे नही है”
“क्या ?”
“सेकंड के चार बच्चे होस्टेल मे नही है”

लंबोदरजीनां (वार्डन) रात्री १२ वाजता, झोपण्या पूर्वीची शेवटची तपासणी करताना लक्षात आले की चार मुले नाहीत. आम्ही सर्वांना जागे केले. शाळेच्या सर्व भागात तपासणी सुरु केली. कुठही मुलांचा ठिकाणां नाही.

“कौन कौन बच्चे नही है ?” मी वार्डनला विचारले.
“पांडे मारा, ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे”
“क्या, ये सब लोग नही है ?”
“हा सर वो ही लोग है”

बराच वेळ शोधल्या नंतर आम्ही शाळेबाहेर शोधण्याचा निर्णय घेतला. तीन दिशांना तीन गटानी जायचे ठरले. मी पण एका मोठया मुलाला घेऊन मोटारसायकलहून दापोरीजोच्या दिशेनी निघालो. मध्यरात्रीचा एक वाजला होता. मी सावकाश झाडांमध्ये मोटारसायकलचा प्रकाशझोत टाकत हळूहळू पुढे जात होतो. साधारण ४/५ किलोमीटर गेल्यावर अचानक मागे बसलेला मुलगा ओरडला,

“ सर , वो देखो वो लोग भाग रहे है.”
“कहा है? .....ठीकसे देखो”
“वो देखो न सर, नीला शर्ट है और वे भाग रहे है”

अरुणाचली मुलांची नजर फारच जबरदस्त. मी गाडी थांबवली. मागे बसलेला मुलगा उतरला व सरळ झाडांमध्ये घुसला. ही मुलं प्रचंड निर्भीड, कशाची भीती अशी नाही. मी गाडी लावून त्याच्या मागे धावत निघालो. मी जोरात ओरडलो,

“पांडे रुको ...भागो मत.”

तोपर्यंत माझ्याबरोबर आलेल्या मुलाने पांडेला पकडले होते. पांडेला पकडले हे पाहताच ताई गंगो,मित्ती गंगो,डॅनी मार्दे हे पण पळायचे थांबले.

“अरे कहा भाग रहे थे इतनी रात मे? सब लोग परेशान हो गये ना”

माझ्या या बोलण्याला फक्त माना खाली करून त्यांनी प्रतिसाद दिला. मी अनेक प्रश्न विचारत होतो पण एक जण पण तोंड उघडायला तयार नाही. शेवटी आम्ही पाच जण गाडीवर बसलो. ताई गंगो,मित्ती गंगो फारच लहान होते त्यांना पेट्रोलच्या टाकीवर बसवले तर डॅनी,पांडे यांना मागे. माझ्या बरोबर आलेल्या मुलाला तिथेच एका घरात थांबायला सांगितले. गाडीवर पण मी त्यांना अनेक प्रश्न विचारत होतो पण एक शब्द बोलत नव्हते. शाळेत कित्येक तास गप्पा मारणारे हेच का? हा प्रश्न मनात पडत होता.

एकदाचे शाळेत पोहोंचलो. कुमारवेल सर प्रेयर हॉल समोर काही मुलांसोबत उभे होते. गेल्या तासाभरा पासून ते खुपच अस्वस्थ होते. मुलांना पाहताच ते जवळ आले. पांडेला जवळ घेऊन विचारले,

“क्यू गया था ?”

मुलं चूप. एक दोनदा सरांनी विचारले पण पोर शांत. ताई गंगो मात्र जोरात रडायला लागला.

सर खुपच चिडले होते त्यांनी चांगला प्रसाद चारी जणांना दिला. पण बहाद्दर काही बोलायला तयार नाहीत. जोरजोरात मात्र रडायला सुरुवात केली. सर अजून चिडले. मग अजून प्रसाद. मग अजून रडणे.

शेवटी मी ताई गंगोला बाजूला नेले. शांतपणे त्याला विचारले,

“अभि आपको कोई भी नही मारेगा और डाँटेगा भी, सिर्फ बताओ क्यू भाग गये थे.”

ताई व माझी जास्त दोस्ती होती. तो थोडा वेळ शांत होता व मग बोलू लागला,

“सर कल तो सूर्य ग्रहण है ना? पांडे की मां बस्ती मे रहती है. उसको तो यह मालूम नही है न? अगर उसने सुरज की तरफ देखा तो उसकी आँखे खराब हो जायेगी न सर ? पांडे ने हमलोग को ये बताया. फिर मित्ती बोला रात मे भागते भागते बस्ती मे जायेंगे और उसे ये बताके फिर वापस आयेंगे. फिर हम सब लोग तैयार हुये और पांडे के माँ को बताने के लिये बस्ती जाने के लिये भाग निकले.”

माझे डोके सुन्न झाले. मी ताईला माझ्या मिठीत घेतले. उठलो व लंबोदरजींना मुलांना पाणी व साखर द्यायला सांगून कुमारवेल सरांना घेऊन माझ्या खोलीत आलो. सरांना मुलांच्या पळून जाण्याचे कारण सांगितले. सरांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले.

दोन वर्षांनी मला केंद्राच्या सर्व शाळांच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी दिली. त्यामुळे दापोरीजो सोडून दिब्रुगड माझे मुख्यालय झाले पण महिन्यातून २४ दिवस अरुणाचल मध्येच प्रवास असायचा. मुख्यतः माध्यमिक शाळांची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे दापोरीजोला जाणे थोडे कमीच म्हणजे वर्षातून एकदा. पांडेनी चवथीची परीक्षा दिली होती व तो सुट्टीत घरी गेला होता. मी नेमका सुट्ट्यांमध्येच कुपोरीजोच्या शाळेच्या भेटीसाठी आलो होतो. मी सरांकडे पांडेची विचारपूस केली.

“क्या बताये सर बहोत दुःख की बात है. गये साल, एक दिन पांडे की मां स्कूल मे आई. वो बोलने लगी मेरे बेटे के साथ मुझे आज की रात सोने दो. आपने यहा तो ये नही चलता है न ? मैने बताया स्कूल का नियम है,ऐसा नही करने देते. वो बहोत रोने लगी.”

कुमारवेलसर खुपच भावूक व्यक्तिमत्व. ते सांगतांना त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.

“क्या करता सर बहोत समझाया पर वो बहोत रिक्वेस्ट करने लगी. मुझे तो बहुत दीकदारी थी. मेरा मन कहने लगा एक रात की तो बात है, सोने देंगे. फिर मैने भय्या को बताया की पांडे को नीचे लाओ. पांडे आने के बाद उसके माँ की और उसके सोने की व्यवस्था एक quarter मे की. सुबह उठकर उसकी माँ स्कूलसे चली गयी.”

आता मात्र सर चांगलेच रडत होते.

“दुसरे दिन पांडे का मामा आया और उसने कहा कल रात पांडे की मां का निधन हुआ.....मुझे तो बहोत अस्वस्थ होने लगा.पांडे को लेके वो लोग चले गये. रात भर मुझे नींद नही आई प्रसादजी.”

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

@ वरील लेख छायाचित्रांबरोबर वाचला तर अधिक समजेल त्यासाठी जर आपल्या कडे वेळ असेल तर नक्की माझ्या ब्लॉगवर आपल्याला ते समजून घेता येईल...
http://prasadchikshe.blogspot.in/2012/04/blog-post_27.html

गुलमोहर: 

दापोरीजोची अनेक मुले ओयानच्या शाळेत शिकत होती. त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.पांडे होते. मुलांनी तागेला सांगितले की मुख्याध्यापकांशी ओळख करून देताना त्यांनी त्याचे स्वतःचे नाव सांगायचे पांडे म्हणून.<<<

नक्की उजेड पडला नाही डोक्यात.
हे असं का सांगितलं असावं?
धर्मांतर करविणारी फादर लोकं असली नावं लावायला सांगतात असं काही तरी वाचलेलं आठवतंय.

असो.

बाकी माहीतीपूर्ण व संयत लिखाण.

सुंदर लेख, प्रसाद. तुम्हाला भेटलेलं अरुणाचल अतिशय कळकळीनं शब्दांत उतरवलय... आणि वाचकापर्यंत पोचवण्यात नक्की यशस्वी.
विवेकानंद केंद्र व रामकृष्ण मिशन च्या कामा बद्दल वाचायला खरच आवडेल.

इब्लिस अरुणाचल मुलं भारीच असतात. ती विनोद पण मस्त करतात व मस्ती पण. ओयानच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडे होते. क्रीडा स्पर्धा संपल्यावर प्रत्येक शाळेच्या विशेष मुलांची ओळख मुख्याध्यापकांशी करून दिली जायची. ही प्रथा शाळा सुरु झाल्या पासूनची आहे. कुपोरीजो शाळेत शिकलेले काही मुले पुढे शिक्षण घेण्यासाठी ओयानला गेली होती. ते तागे मारा लं ओळखत होती. दापोरीजो भागात बस्तीचे नाव आडनाव म्हणून लावले जाते. तागे ची बस्ती मारा म्हणून त्याचे नाव तागे मारा. शाळेत त्याच्या नावावरून खूप कोट्या व्हायच्या आणि ते मुलं आपसात करायची. एकदा एकाने तागेला विचारले तुझ्या वडिलांचे नाव गोली असतं तर तुझे पूर्ण नाव काय असते. तागे पण मिश्कील होता. तो म्हणाला तागे गोली मारा...!!!

तागे खूप निरागस पण होता. तो प्रत्येक गोष्ट हसत खेळत घेई. त्याच्या ओयान मधील मित्राने त्याला मुख्याध्यापकाला आपले नाव पांडे मारा असे सांगायला सांगितले यात तांच्या बालवयातील मिश्कील पणा होता. तागे नी पण सरळ मुख्याध्यापकाला आपले नाव पांडे मारा सांगितले. हे सांगताना सगळेच जण हसले व त्या दिवसापासून सर्वं मित्र त्याला पांडे मारा म्हणून हाक मारत. ते लोण मग सगळ्यां पर्यंत पोहोंचले.

धर्मांतर याच्याशी व या नावाशी काही योग नाही.

धन्यवाद ..................उत्तम लेख!

मी काहीच वाचू शकलो नाहीये, पण सहज हे वाक्य नजरेस पडले, ते असे
>>>>असे खुपदा अनुभवायास मिळते की उत्तरेकडून दक्षिण टोकापर्यंतचा भारत रामाने जोडला. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा भारत कृष्णाने जोडला तर समुद्रसपाटी पासून ते उंच हिमालयाच्या पर्वतशिखरांपर्यंतचा भारत शिवशंकराने जोडला. <<<<
हे वाक्य अतिशय महत्वाचे वाटले. Happy या धाग्याचा तो विषय नसेल कदाचित, पण जमल्यास थोडक्या शब्दात घटनान्च्या रोखाद्वारे काही सान्गु शकाल का? कारण असाच काहीसा विषय माझी आई देखिल सान्गायची लहानपणी, जरा वेगळ्या शब्दात, पण मतितार्थ तोच. मी या वाक्यावर विचार करीत राहीन Happy
धन्यवाद.
बाकी लेख स्वतन्त्रपणे वेळ मिळाल्यावर वाचिन.

limbutimbu
महात्मा गांधीजी गोलमेज परिषदेल इंग्लंडला गेले असता त्यांनी पहिल्यांदा असे विधान केले असे म्हटले जाते. ते इंग्रजांना म्हणाले आमचा देश तुमच्या रेल्वे किवा तारयंत्रांनी आता जोडला नाही तर तो आधीच जोडला होता. लोक तीर्थयात्रा करायचे. सोमनाथ ते कैलासमानसरोवर शिवाचे अस्तित्व. द्वारका ते अरुणाचल मधील भीष्मकनगर कृष्णाचे अस्तिव व इकडे दक्षिणेकडे रामेश्वर श्रीलंका श्रीराम.

चारधाम
बद्रिनाथ (उत्तरांचल), रामेश्वरम (तामिळनाडू), द्वारिका (गुजरात), जगन्नाथपुरी (उडीसा).

भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना आपण १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतो. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

या व्यतिरिक्त एक नेहमी राहून जाते ते ५१ शक्तीपीठे मला जी महिती मिळाली आहे ती हिंदीतून आहे.
बाह्य आक्रमण होण्याच्या आधी पासून लोक या सर्वं स्थानांची परिक्रमा करायचे व देशात आदानप्रदान व्हायचे. सांस्कृतिक दृष्ट्या देश जोडलेला होता.
नवरात्र: 51 शक्तिपीठों के बारे में जानें
पुराणों में 51 शक्तिपीठो का वर्णन है।

1. किरीट कात्यायनी
पश्चिम बंगाल के हुगली नदी के तट लालबाग कोट पर स्थित है किरीट शक्तिपीठ, जहां सती माता का किरीट यानी शिराभूषण या मुकुट गिरा था। यहां की शक्ति विमला अथवा भुवनेश्वरी तथा भैरव संवर्त हैं।
2 कात्यायनी कात्यायनी
वृन्दावन, मथुरा के भूतेश्वर में स्थित है कात्यायनी वृन्दावन शक्तिपीठ जहां सती का केशपाश गिरा था। यहां की शक्ति देवी कात्यायनी हैं।
3 करवीर शक्तिपीठ
महाराष्ट्र के कोल्हापुर में स्थित है यह शक्तिपीठ, जहां माता का त्रिनेत्र गिरा था। यहां की शक्ति महिषासुरमदिनी तथा भैरव क्रोधशिश हैं। यहां महालक्ष्मी का निज निवास माना जाता है।
4 श्री पर्वत शक्तिपीठ
इस शक्तिपीठ को लेकर विद्वानों में मतान्तर है कुछ विद्वानों का मानना है कि इस पीठ का मूल स्थल लद्दाख है, जबकि कुछ का मानना है कि यह असम के सिलहट में है जहां माता सती का दक्षिण तल्प यानी कनपटी गिरा था। यहां की शक्ति श्री सुन्दरी एवं भैरव सुन्दरानन्द हैं।
5 विशालाक्षी शक्तिपीठ
उत्तर प्रदेश, वाराणसी के मीरघाट पर स्थित है शक्तिपीठ जहां माता सती के दाहिने कान के मणि गिरे थे। यहां की शक्ति विशालाक्षी तथा भैरव काल भैरव हैं।
6 गोदावरी तट शक्तिपीठ
आंध्रप्रदेश के कब्बूर में गोदावरी तट पर स्थित है यह शक्तिपीठ, जहां माता का वामगण्ड यानी बायां कपोल गिरा था। यहां की शक्ति विश्वेश्वरी या रुक्मणी तथा भैरव दण्डपाणि हैं।
7 शुचीन्द्रम शक्तिपीठ
तमिलनाडु, कन्याकुमारी के त्रिासागर संगम स्थल पर स्थित है यह शुची शक्तिपीठ, जहां सती के उफध्र्वदन्त (मतान्तर से पृष्ठ भागद्ध गिरे थे। यहां की शक्ति नारायणी तथा भैरव संहार या संकूर हैं।
8 पंच सागर शक्तिपीठ
इस शक्तिपीठ का कोई निश्चित स्थान ज्ञात नहीं है लेकिन यहां माता का नीचे के दान्त गिरे थे। यहां की शक्ति वाराही तथा भैरव महारुद्र हैं।
9. ज्वालामुखी शक्तिपीठ
हिमाचल प्रदेश के काँगड़ा में स्थित है यह शक्तिपीठ, जहां सती का जिह्वा गिरी थी। यहां की शक्ति सिद्धिदा व भैरव उन्मत्त हैं।
10. भैरव पर्वत शक्तिपीठ
इस शक्तिपीठ को लेकर विद्वानों में मतदभेद है। कुछ गुजरात के गिरिनार के निकट भैरव पर्वत को तो कुछ मध्य प्रदेश के उज्जैन के निकट क्षीप्रा नदी तट पर वास्तविक शक्तिपीठ मानते हैं, जहां माता का उफध्र्व ओष्ठ गिरा है। यहां की शक्ति अवन्ती तथा भैरव लंबकर्ण हैं।
11. अट्टहास शक्तिपीठ
अट्टहास शक्तिपीठ पश्चिम बंगाल के लाबपुर में स्थित है। जहां माता का अध्रोष्ठ यानी नीचे का होंठ गिरा था। यहां की शक्ति पफुल्लरा तथा भैरव विश्वेश हैं।
12. जनस्थान शक्तिपीठ
महाराष्ट्र नासिक के पंचवटी में स्थित है जनस्थान शक्तिपीठ जहां माता का ठुड्डी गिरी थी। यहां की शक्ति भ्रामरी तथा भैरव विकृताक्ष हैं।
13. कश्मीर शक्तिपीठ
जम्मू-कश्मीर के अमरनाथ में स्थित है यह शक्तिपीठ जहां माता का कण्ठ गिरा था। यहां की शक्ति महामाया तथा भैरव त्रिसंध्येश्वर हैं।
14. नन्दीपुर शक्तिपीठ
पश्चिम बंगाल के सैन्थया में स्थित है यह पीठ, जहां देवी की देह का कण्ठहार गिरा था। यहां कि शक्ति निन्दनी और भैरव निन्दकेश्वर हैं।
15. श्री शैल शक्तिपीठ
आंध्रप्रदेश के कुर्नूल के पास है श्री शैल का शक्तिपीठ, जहां माता का ग्रीवा गिरा था। यहां की शक्ति महालक्ष्मी तथा भैरव संवरानन्द अथव ईश्वरानन्द हैं।
16. नलहरी शक्तिपीठ
पश्चिम बंगाल के बोलपुर में है नलहरी शक्तिपीठ, जहां माता का उदरनली गिरी थी। यहां की शक्ति कालिका तथा भैरव योगीश हैं।
17. मिथिला शक्तिपीठ
इसका निश्चित स्थान अज्ञात है। स्थान को लेकर मन्तारतर है तीन स्थानों पर मिथिला शक्तिपीठ को माना जाता है, वह है नेपाल के जनकपुर, बिहार के समस्तीपुर और सहरसा, जहां माता का वाम स्कंध् गिरा था। यहां की शक्ति उमा या महादेवी तथा भैरव महोदर हैं।
18. रत्नावली शक्तिपीठ
इसका निश्चित स्थान अज्ञात है, बंगाज पंजिका के अनुसार यह तमिलनाडु के चेन्नई में कहीं स्थित है रत्नावली शक्तिपीठ जहां माता का दक्षिण स्कंध् गिरा था। यहां की शक्ति कुमारी तथा भैरव शिव हैं।
19. अम्बाजी शक्तिपीठ, प्रभास पीठ
गुजरात गूना गढ़ के गिरनार पर्वत के प्रथत शिखर पर देवी अिम्बका का भव्य विशाल मन्दिर है, जहां माता का उदर गिरा था। यहां की शक्ति चन्द्रभागा तथा भैरव वक्रतुण्ड है। ऐसी भी मान्यता है कि गिरिनार पर्वत के निकट ही सती का उध्र्वोष्ठ गिरा था, जहां की शक्ति अवन्ती तथा भैरव लंबकर्ण है।
20. जालंध्र शक्तिपीठ
पंजाब के जालंध्र में स्थित है माता का जालंध्र शक्तिपीठ जहां माता का वामस्तन गिरा था। यहां की शक्ति त्रिापुरमालिनी तथा भैरव भीषण हैं।
21. रामागरि शक्तिपीठ
इस शक्ति पीठ की स्थिति को लेकर भी विद्वानों में मतान्तर है। कुछ उत्तर प्रदेश के चित्राकूट तो कुछ मध्य प्रदेश के मैहर में मानते हैं, जहां माता का दाहिना स्तन गिरा था। यहा की शक्ति शिवानी तथा भैरव चण्ड हैं।
22. वैद्यनाथ का हार्द शक्तिपीठ
झारखण्ड के गिरिडीह, देवघर स्थित है वैद्यनाथ हार्द शक्तिपीठ, जहां माता का हृदय गिरा था। यहां की शक्ति जयदुर्गा तथा भैरव वैद्यनाथ है। एक मान्यतानुसार यहीं पर सती का दाह-संस्कार भी हुआ था।
23. वक्त्रोश्वर शक्तिपीठ
माता का यह शक्तिपीठ पश्चिम बंगाल के सैिन्थया में स्थित है जहां माता का मन गिरा था। यहां की शक्ति महिषासुरमदिनी तथा भैरव वक्त्रानाथ हैं।
24. कण्यकाश्रम कन्याकुमारी
तमिलनाडु के कन्याकुमारी के तीन सागरों हिन्द महासागर, अरब सागर तथा बंगाल की खाड़ीद्ध के संगम पर स्थित है कण्यकाश्रम शक्तिपीठ, जहां माता का पीठ मतान्तर से उध्र्वदन्त गिरा था। यहां की शक्ति शर्वाणि या नारायणी तथा भैरव निमषि या स्थाणु हैं।
25. बहुला शक्तिपीठ
पश्चिम बंगाल के कटवा जंक्शन के निकट केतुग्राम में स्थित है बहुला शक्तिपीठ, जहां माता का वाम बाहु गिरा था। यहां की शक्ति बहुला तथा भैरव भीरुक हैं।
26. उज्जयिनी शक्तिपीठ
मध्य प्रदेश के उज्जैन के पावन क्षिप्रा के दोनों तटों पर स्थित है उज्जयिनी शक्तिपीठ। जहां माता का कुहनी गिरा था। यहां की शक्ति मंगल चण्डिका तथा भैरव मांगल्य कपिलांबर हैं।
27. मणिवेदिका शक्तिपीठ
राजस्थान के पुष्कर में स्थित है मणिदेविका शक्तिपीठ, जिसे गायत्री मन्दिर के नाम से जाना जाता है यहीं माता की कलाइयां गिरी थीं। यहां की शक्ति गायत्री तथा भैरव शर्वानन्द हैं।
28. प्रयाग शक्तिपीठ
उत्तर प्रदेश के इलाहाबाद में स्थित है। यहां माता की हाथ की अंगुलियां गिरी थी। लेकिन, स्थानों को लेकर मतभेद इसे यहां अक्षयवट, मीरापुर और अलोपी स्थानों गिरा माना जाता है। तीनों शक्तिपीठ की शक्ति ललिता हैं।
29. विरजाक्षेत्रा, उत्कल
उत्कल शक्तिपीठ उड़ीसा के पुरी और याजपुर में माना जाता है जहां माता की नाभि गिरा था। यहां की शक्ति विमला तथा भैरव जगन्नाथ पुरुषोत्तम हैं।
30. कांची शक्तिपीठ
तमिलनाडु के कांचीवरम् में स्थित है माता का कांची शक्तिपीठ, जहां माता का कंकाल गिरा था। यहां की शक्ति देवगर्भा तथा भैरव रुरु हैं।
31. कालमाध्व शक्तिपीठ
इस शक्तिपीठ के बारे कोई निश्चित स्थान ज्ञात नहीं है। परन्तु, यहां माता का वाम नितम्ब गिरा था। यहां की शक्ति काली तथा भैरव असितांग हैं।
32. शोण शक्तिपीठ
मध्य प्रदेश के अमरकंटक के नर्मदा मन्दिर शोण शक्तिपीठ है। यहां माता का दक्षिण नितम्ब गिरा था। एक दूसरी मान्यता यह है कि बिहार के सासाराम का ताराचण्डी मन्दिर ही शोण तटस्था शक्तिपीठ है। यहां सती का दायां नेत्रा गिरा था ऐसा माना जाता है। यहां की शक्ति नर्मदा या शोणाक्षी तथा भैरव भद्रसेन हैं।
33. कामरूप कामाख्या शक्तिपीठ कामगिरि
असम गुवाहाटी के कामगिरि पर्वत पर स्थित है यह शक्तिपीठ, जहां माता का योनि गिरा था। यहां की शक्ति कामाख्या तथा भैरव उमानन्द हैं।
34. जयन्ती शक्तिपीठ
जयन्ती शक्तिपीठ मेघालय के जयन्तिया पहाडी पर स्थित है, जहां माता का वाम जंघा गिरा था। यहां की शक्ति जयन्ती तथा भैरव क्रमदीश्वर हैं।
35. मगध् शक्तिपीठ
बिहार की राजधनी पटना में स्थित पटनेश्वरी देवी को ही शक्तिपीठ माना जाता है जहां माता का दाहिना जंघा गिरा था। यहां की शक्ति सर्वानन्दकरी तथा भैरव व्योमकेश हैं।
36. त्रिस्तोता शक्तिपीठ
पश्चिम बंगाल के जलपाइगुड़ी के शालवाड़ी गांव में तीस्ता नदी पर स्थित है त्रिस्तोता शक्तिपीठ, जहां माता का वामपाद गिरा था। यहां की शक्ति भ्रामरी तथा भैरव ईश्वर हैं।
37. त्रिपुरी सुन्दरी शक्तित्रिपुरी पीठ
त्रिपुरा के राध किशोर ग्राम में स्थित है त्रिपुरे सुन्दरी शक्तिपीठ, जहां माता का दक्षिण पाद गिरा था। यहां की शक्ति त्रिापुर सुन्दरी तथा भैरव त्रिपुरेश हैं।
38. विभाष शक्तिपीठ
पश्चिम बंगाल के मिदनापुर के ताम्रलुक ग्रााम में स्थित है विभाष शक्तिपीठ, जहां माता का वाम टखना गिरा था। यहां की शक्ति कापालिनी, भीमरूपा तथा भैरव सर्वानन्द हैं।
39. देवीकूप पीठ कुरुक्षेत्र (शक्तिपीठ)
हरियाणा के कुरुक्षेत्र जंक्शन के निकट द्वैपायन सरोवर के पास स्थित है कुरुक्षेत्र शक्तिपीठ, जिसे श्रीदेवीकूप(भद्रकाली पीठ के नाम से मान्य है। माता का दहिने चरण (गुल्पफद्ध गिरे थे। यहां की शक्ति सावित्री तथा भैरव स्थाणु हैं।
40. युगाद्या शक्तिपीठ (क्षीरग्राम शक्तिपीठ)
पश्चिम बंगाल के बर्दमान जिले के क्षीरग्राम में स्थित है युगाद्या शक्तिपीठ, यहां सती के दाहिने चरण का अंगूठा गिरा था।
41. विराट का अम्बिका शक्तिपीठ
राजस्थान के गुलाबी नगरी जयपुर के वैराटग्राम में स्थित है विराट शक्तिपीठ, जहां माता का दक्षिण पादांगुलियां गिरी थीं। यहां की शक्ति अंबिका तथा भैरव अमृत हैं।
42. काली शक्तिपीठ
पश्चिम बंगाल, कोलकाता के कालीघाट में कालीमन्दिर के नाम से प्रसिध यह शक्तिपीठ, जहां माता के दाएं पांव की अंगूठा छोड़ 4 अन्य अंगुलियां गिरी थीं। यहां की शक्ति कालिका तथा भैरव नकुलेश हैं।
43. मानस शक्तिपीठ
तिब्बत के मानसरोवर तट पर स्थित है मानस शक्तिपीठ, जहां माता का दाहिना हथेली का निपात हुआ था। यहां की शक्ति की दाक्षायणी तथा भैरव अमर हैं।
44. लंका शक्तिपीठ
श्रीलंका में स्थित है लंका शक्तिपीठ, जहां माता का नूपुर गिरा था। यहां की शक्ति इन्द्राक्षी तथा भैरव राक्षसेश्वर हैं। लेकिन, उस स्थान ज्ञात नहीं है कि श्रीलंका के किस स्थान पर गिरे थे।
45. गण्डकी शक्तिपीठ
नेपाल में गण्डकी नदी के उद्गम पर स्थित है गण्डकी शक्तिपीठ, जहां सती के दक्षिणगण्ड(कपोल) गिरा था। यहां शक्ति `गण्डकी´ तथा भैरव `चक्रपाणि´ हैं।
46. गुह्येश्वरी शक्तिपीठ
नेपाल के काठमाण्डू में पशुपतिनाथ मन्दिर के पास ही स्थित है गुह्येश्वरी शक्तिपीठ है, जहां माता सती के दोनों जानु (घुटने) गिरे थे। यहां की शक्ति `महामाया´ और भैरव `कपाल´ हैं।
47. हिंगलाज शक्तिपीठ
पाकिस्तान के ब्लूचिस्तान प्रान्त में स्थित है माता हिंगलाज शक्तिपीठ, जहां माता का ब्रह्मरन्ध्र गिरा था।
48. सुगंध शक्तिपीठ
बांग्लादेश के खुलना में सुगंध नदी के तट पर स्थित है उग्रतारा देवी का शक्तिपीठ, जहां माता का नासिका गिरा था। यहां की देवी सुनन्दा है तथा भैरव त्रयम्बक हैं।
49. करतोयाघाट शक्तिपीठ
बंग्लादेश भवानीपुर के बेगड़ा में करतोया नदी के तट पर स्थित है करतोयाघाट शक्तिपीठ, जहां माता का वाम तल्प गिरा था। यहां देवी अपर्णा रूप में तथा शिव वामन भैरव रूप में वास करते हैं।
50. चट्टल शक्तिपीठ
बंग्लादेश के चटगांव में स्थित है चट्टल का भवानी शक्तिपीठ, जहां माता का दाहिना बाहु यानी भुजा गिरा था। यहां की शक्ति भवानी तथा भेरव चन्द्रशेखर हैं।
51. यशोरेश्वरी शक्तिपीठ
बांग्लादेश के जैसोर खुलना में स्थित है माता का प्रसि( यशोरेश्वरी शक्तिपीठ, जहां माता का बायीं हथेली गिरा था। यहां शक्ति यशोरेश्वरी तथा भैरव चन्द्र हैं।

हा भागही सुरेख आहे. अगदी बारीकसारीक तपशील तुम्ही अति भावनेच्या आहारी न जाता लिहीत आहात, त्यामुळे गुंगून वाचले जात आहे. Happy
तो सूर्यग्रहणाच्या वेळचा चार मुलांचा किस्सा फारच हृद्य आहे !!

ललिता-प्रीति धन्यवाद ....मी तसा लेखक नाही त्यामुळे काही कौतुकाबरोबर काही चुकत असेल काही नेमके लिहावयाचे असेल तर नक्की सांगा. लोकांपर्यंत ईशान्य भारत पोहोंचला पाहिजे ही तळमळ आहे.

खूपच सुंदर लिखाण आहे.
नुकतेच विवेकानंद केंद्राचे योगा शिबीरला जाऊन आल्याने, विवेकानंद केंद्र, एकनाथजी रानडे यांच्या कार्याबद्दल बरीच माहिती मिळाली.
उत्सुकतेने माबोवर काही लेख आहेत का बघत होते...तर हा लेख सापडला.
मास्तुरेंनी टाकलेल्या फळ्यावरील पहिले व्याख्याते श्री विश्वासजी लपालकर यांचे सेशन्स आमच्या शिबिरातही झाले.
अरुणाचल च्या खूप छान छान गोष्टी सांगितल्या त्यांनी! शिबिराचा अनुभव ही खूप छान होता.

Pages