बिचकते आयुष्य माझे

Submitted by आनंदयात्री on 11 April, 2012 - 08:35

बिचकते आयुष्य माझे आयते यश पाहिल्यावर
एरवी संतुष्ट असते कमविलेल्या अपयशावर

मी जरी नसलो तरी गर्दी स्वतःतच दंग असते
मी असा वागेन का हे चेहरेही पांगल्यावर?

ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)

ओठभर चव घेउनी, उष्टावले त्याने तुला! अन् -
अजुनही वाटे तुला की प्रेम करतो तो तुझ्यावर!

वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा
रान रेंगाळून जाते चालणार्‍या पावलांवर

ओळखीची खूण नसते वागण्यामध्ये कधीही
भाव परका ओळखीचा झळकतो पण चेहर्‍यावर!

जवळ कायमचे नको आहे तुला कोणी कधीही
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!

नेहमी दु:खात होते एक राजा, एक राणी
एकदा झाले सुखी ते! पण कहाणी संपल्यावर!

नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/04/blog-post.html)

गुलमोहर: 

ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)...... क्या बात !!!..

जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!................पहिल्या मिसर्‍यात एक गुरु कमी आहे.

चांगली गझल. Happy

आवडली Happy

कमवलेल्या >>> हा शब्द जरा खटकतोय. पण गझलेत अशी सूट असावी (मी अज्ञानी बालक!).

शेवटचा शेर खासच Happy

Chhan Happy

ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?

कया बात है!

वाह नचिकेत........ सुंदरच......
<<ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?) >>
मस्तच.....
<<भाव परका ओळखीचा झळकतो पण चेहर्‍यावर!>> हे तर खासच......

ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)... झक्कास!

जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!........व्वा व्वा, सखोल निरिक्षण अचूक शब्दबध्द केलय आपण...:-)

-सुप्रिया.

>>जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!.

सुप्रियांना अनुमोदन. वरील ओळी मलाही भावल्या.

जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी>> 'ही' राहिला का?

वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा>> मिसरा छान आहे

जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!

नेहमी दु:खात होते एक राजा, एक राणी
एकदा झाले सुखी ते! पण कहाणी संपल्यावर!

सुपर्ब!!
राजा-राणी... एकदम खास!

ओठभर चव घेउनी, उष्टावले त्याने तुला! अन् -
अजुनही वाटे तुला की प्रेम करतो तो तुझ्यावर!

नेहमी दु:खात होते एक राजा, एक राणी
एकदा झाले सुखी ते! पण कहाणी संपल्यावर!>>>>>

हे शेर खूप आवड्ले

रान रेंगाळून जाते .........हाही अफाट !!

वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा
रान रेंगाळून जाते चालणार्‍या पावलांवर

जवळचे कोणी नको आहे तुला कायम कधी
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!

आवडेश! Happy

<<बिचकते आयुष्य माझे आयते यश पाहिल्यावर
एरवी संतुष्ट असतो कमवलेल्या अपयशावर<<<

अफाट आवडला हा शेर! नचिकेत्...तुझ्या कल्पनाशक्तीला सलाम! Happy

धन्यवाद दोस्तहो! असाच लोभ असू द्यावात. Happy

डॉक, होय.. एक गुरू कमी झाला तिथे.. कालगंगेमध्ये एक गझल सुचत होती त्याच वेळी, तो परिणाम झाला इकडे.. Sad

सुप्रियाताई, Happy

Pages