मातृ देवो भव, पितृ देवो भव.
'गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु,
गुरुर्देवो महेश्वरः,
गुरु: साक्षात परब्रम्ह
'तस्मै श्री गुरुवे नमः'
आज गुरुपौर्णिमा. म्हणूनच माझा पहिला नमस्कार माझ्या आई-दादांना. हो माझे पाहिले गुरु तेच आहेत!
जिने अनंत यातना सहन करून, मला या सुंदर पृथ्वीवर जन्म दिला, ती आई, आणि अनेक काबाड-कष्ट करून मला वाढवल, त्या दादांना (माझे वडील) माझा नमस्कार.
माझी आई विमल (माहेरची). अतिशय तापट वडील (आईच्या शब्दात जहाल) आणि अतिशय गरीब आई यांचे दुसरे अपत्य! वडील (माझे आजोबा) रागीट असल्यामुळे, शेजारयांशी तर नाहीच पण घरात सुद्धा बोलायला खेळायला बंदी होती. कळायला लागल्या पासून माझ्या आईची (आजीला) मदत करायला सुरुवात झाली. हळू हळू घरातील सर्वच कामे करायला सुरुवात झाली. कारण घरात दर दीड-दोन वर्षाने होणारे बाळाचे आगमन (पूर्वीचा जमाना! :)) आणि ही घरातील मोठी मुलगी. त्यामुळे कामे करावीच लागत. म्हणूनच हुशार असूनही, शिक्षणाची आवड असूनही, तिला शाळेत जाता येत नव्हते. पहाटे चारलाच हीचा दिवस सुरू होई. केर काढणे, सडा घालणे,रांगोळि काढणे, दळणे, चहा करणे, विहीरीवरून पाणी आणणे, भांडी घासणे, कपडे धूणॆ, लहान मुलाना आंघोळ घालणे, स्वयंपाक करणे, ही सगळी कामे तीच करत असे. पण हिची जिद्दीच अशी होती की, ती भराभर कामे आवरून शाळत जात असे. आणि कधी कधी जेवणाच्या सुट्टीची घंटा देऊन घरी येत असे. तेही आनंदाने. असच कामे करत करत ती सातवी पर्य़ंत शिकली. त्याचबरोबर, विणकाम, शिवणकाम, अशाही कला तिने आत्मसात केल्या. एकदा एका मुलीने, भरतकाम केलेला रुमाल कसा केला हे सांगेना. तर माझी आई आपल्या दारात बसली होती आणि ती मुलगी तिच्या दारात बसली होती. हिने तिच्याशी बोलता बोलता, ती मुलगी किती खिडक्या, खांब (भरतकमातील मोजमापे ) घेते ते मोजून , अगदी तस्साच रुमाल तयार केला. तर अशा ह्या हुशार, जिद्दी मुलीच लग्न, खेडेगावातील एका शिक्षकाशी झाले.
माझे वडील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांचा स्वभाव अतिशय साधा. साधा म्हणजे इतका साधा, त्यांच्या ताटातील एखादा पदार्थ कोणी घेतला तरी ते बोलणार नाहीत. त्यानी शेती करता करता, आपले शिक्षण पूर्ण केले.राजापूरला वेदपाठशाळेत वैदिक शिक्षण घेतले. पुण्यातही काही दिवस शिक्षण घेत होते. नंतर ते प्राथमिक शिक्षक झाले. आणि माझ्या आईशी विवाहबद्ध झाले.
वडिलांची बदली झाली की आईसुधा त्यांच्याबरोबर जात असे. कोकणात तेव्हा काहीच सुविधा नव्हत्या. येइल त्या पारिस्थितीला तोंड देत देत संसार चालू झाला.
आईला जास्त शिकता आले नाही तरी तिने असे ठरवले की मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना शहरात आणायचे. म्हणून तिने आमच्या शिक्षणाकडे पूर्ण लक्ष दिले. २ ते ३० पर्यंत पाढे, सरळ, उलट, आडवे, आणि परत मागे असे आई-दादांचे तोंडपाठ होतेच. पण पावकी, निमकी, ते दिडकी-अडीचकी पर्यंत त्याना येत होत. माझी आई पाणी आणायला जाताना, माझ्या मोठया भावाना, एखादा पाढा पाठ करायला देत असे. आणि स्वत: अडीचकीच्या पुढची तयारी, पाणी आणता आणता करीत असे. मला कळायला लागल्यापासून, मी आई-दादाना नेहमी कष्ट करतानाच पाहिले. घरातील सगळी कामे करताना आईला दिवस पूरत नसे. आईचे, देव-धर्म, उपास-तापास बरेच असायचे. आणि ती नेहमी आनंदी दिसायची.
नोकरी करून घर सावरताना, दादाना वेळच मिळत नसे. दादांचे अक्षर छान वळणदार! दादांना बागबगीचा , भाज्या लावणे हे फार आवडायचे. ते झाडांची काळजी तर मुलांपेक्षा जास्त घेत.
दादा प्राथमिक शिक्षक असल्यामुळे, खेडेगावात बदली व्हायची. घरापासून किराणा मालाचे दुकानही ४-५ किलोमीटर अंतर डोंगर-दरया ओलांडून पायी जावे लागे. दादा शाळेतून आल्यावर म्हणजे संध्याकाळी ६ वाजल्या नंतर, घरात लागणारया वस्तूंची यादी करून जात असत. आणि रात्री उशीरा १०-११ वाजता अंधारातून डोक्यावर भलं मोठ्ठ ओझ, दोन्ही खांद्याना भरलेल्या पिशव्या, एका हातात कंदील/बॆटरी, असे दमून-भागून घरी येत. कधी कंदील विझला तर, तसेच अडखळत अडखळत नदीपर्य़ंत येत असत. आणि नदीपलिकडून कुकारा देत.(कुकारा-खुणेचा विशिष्ट आवाज) कारण नदीकाठावर काजरयाची मोठी झाडे होती. जिथे खूप पालापाचोळा व अंधार होता. साप व इतर श्वापदांची भीती होती. मग माझी आई, आम्हा मुलांना कुलूपबंद करून कंदील घेऊन कितीतरी अंतर एकटीच चालत दादाना आणायला जायची. आई खरतर खूप भित्री होती पण, मागे एकटी असलेली मुले, पुढे अंधरात, सामान घेऊन दमून आलेले पतिराज, यापुढे तिची भिती यायचीच नाही. आजही ते दृश्य़ जसच्या तसं माझ्या डोळ्यासमोर उभ आहे.
एकदा असेच संध्याकाळी ते सामान आणायला निघाले. शेजारच्या लोकानी सांगितले."गुरुजी एवढ्या संद्याकाळी जाऊ नका, यायला रात्र होईल. घाटीत वाघ आलाय, अस ऐकलय." पण दादाना जाण्यावाचून पर्याय नव्हता. परत येताना रात्र झाली. आणि घाटीतून येताना दादाना खरच हळू आवाजात गुरगरल्याचा आवाज आला. त्यांच्या तोंडच पाणी पळाले. आता वाघ आपल्याला पोटात घेणार. याची त्याना खात्री वाटू लागली. त्यानी मनातल्या मनात राम्,राम,राम, राम म्हणायला सुरुवात केली. त्यांची चाल फार वेगात होती. त्यामुळे थोड्याच वेळात ते बरेच अंतर चालून आले. जरा हुश्श वाटलं, तोपर्यंत परत गुरगुरल्याचा आवाज आला. आणि ते हसतच सुटले. (त्यांच्या पोटात भुकेने गुरगुरत होते.)
असे एक ना अनेक प्रसंग.
त्याची, चूल पेटवण्यासाठी, लाकडे फ़ोडणे, फ़ुलझाडे लावणे, भाजीपाला लावणे, झाडाना पाणी आणून घालणे, अशी त्यांची कामे सतत चालू असत. आणि आई त्याना मदत करत असे. त्यावेळी आमची घरे खूप लांब असत व नोकर वगैरे तेव्हा परवडणारेच नव्हते !
आई-दादानी आमच्यावर खूप छान संस्कार केले. (माझ्या वडिलाना व आम्हाला कोणालाच कसलेही व्यसन नाही. यचे सर्व श्रेय त्यानाच आहे.) आईने आम्हला लहानपणापासून सगळी कामे करायला शिकवले. ती नेहमी आम्हाला सांगत असे."तुमचे वडील तुमच्यासाठी दिवस रात्र राबातायत. तुम्ही पण जमेल तेवढी मदत केली पाहीजे." तिने आम्हाला स्वावलंबी बनवले. आईने आम्हा सगळ्या भावंडाना स्वयंपाक शिकवला. म्हणून वडिल आजारी असताना आई त्याना आणि आम्हा दोघी बहीणीना घेऊन पुण्याला आली. तर माझ्या दोन्ही भावानी (तेव्हा वय वर्षे १२ आणि १४) स्वत: स्वयंपाक करून, शाळेत जाणे, रेशनचे सामान आणणे, व घरातील सर्व कामे केली होती. आम्ही परत गेलो तेव्हा दादांची रजा बिनपगारी झाली होती. (मुळात पगार दोन आकडी होता.) थोड़े दिवसानी अन्न-धान्य संपत आले. तर माझ्या आईने स्वत: फ़क्त भाज्या (शिजवून) खाल्या. जेव्हा वडिलाना कळल तेव्हा त्यानीही, त्याना भाजीच वाढायला सांगितले. आम्हाला मात्र क्वचितच कधीतरी भाज्या खाव्या लागल्या. असे हे माझे प्रेमळ आई-दादा. तो कालखंड आमच्या कुटुंबाची अगदी सत्त्वपरिक्षा घेणारा ठरला. पण माझ्या आई-दादांनी न डगमगता खंबीरपणे सर्व प्रसंगाना तोंड दिले.
आईची अनेक रुपे मला आजही डोळ्यासमोर दिसतात. त्यातील एक म्हणजे मी १९८१ साली बारामतीला शेवटच्या घटका मोजत होते. आई माझ्या शेजारी बसून मला गोष्ट सांगत होती. नेत्रातून संतत धार चालू होती. मनातल्या मनात देवाची करूणा भाकत होती. मुद्दाम गोष्ट चुकवत होती. नेहमी प्रमाणे मी बरोबर करून सांगेन म्हणून. पण मला ऐकू येत होत, दिसत होत, पण शब्द बाहेर पडत नव्हते. तेव्हाची तिची अगतिक मुद्रा मला अजुनही आठवते. एकदा माझी बहीण कोरड्या विहिरीत पडली. तेव्हा मला ओळखीच्या आजींच्या हातात देऊन, वेड्यासारखी बहीणीला शोधत भिरी भिरी फ़िरणारी आई आज ही आठवते.
माझ्याबाबतीतला एक किस्सा मला सांगावासा वाटतो. माझ्या जन्मानंतर आईने जेव्हा मला प्रथम पाहिले तेव्हा तिला, हे आपल बाळ नाही , कुणीतरी बदलल आहे अस वाटल होते. (माझी सर्व भावंडे, गोरी, सुदृढ़ होती. . आणि मी काळी, आणि हडकुली होते पण जेव्हा डॊक्टरानी हे बाळ तुमचेच आहे अस तेव्हा पासून तिने मला जवळ घेऊन, मला घरी औषधे देऊन बरे केले. व आजपण ती माझी जरा जास्तच काळजी घेते
आज आमच्या घरातील सर्वाना या दोघांबद्दल नितांत प्रेम व आदर आहे. (आमच्या नातलगाना सुद्धा)ते दोघेही आपले जीवन शांतपणे व आनंदात जगत आहेत. सर्वत्र आनंदी आनंद आहे.
रक्ताचे पाणी करून आम्हा भावंडासाठी सुखाची पखरण करणार्या अशा या माझ्या वंदनीय आई-दादांना कोटीकोटी प्रणाम!
छान लिहिलंय सुशोलभा! खरे
छान लिहिलंय सुशोलभा!
खरे गुरू आई, बाबाच.
(No subject)
खरय तुझं सुशोलभा! लेख तर छान
खरय तुझं सुशोलभा! लेख तर छान लिहिलायसच पण त्यामागच्या तुझ्या भावनाही थेट पोचल्या. मला सुद्धा सर्व जसेच्या तसे आठवतेय! पण तुला खरं सांगू का त्यांनी त्यावेळी जे कष्ट घेतले, जे संस्कार कले त्यामुळेच आताचे त्यांचे जीवन किती आनंदात आहे ! म्हणतातच ना "प्रत्येक अंधार्या रात्रीनंतर सोनेरी पहाट उगवते!"

सौ. आई व ती. दादांना माझे शतशः प्रणाम!!!
प्रज्ञाताय, मी बघितलं बरका
प्रज्ञाताय, मी बघितलं बरका
ग्रेट तुझे आईबाबा!
मी ही पाहिलं ते मगाशी.
मी ही पाहिलं ते मगाशी.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
खूप छान लिहलय.
खूप छान लिहलय.
शैलजा धन्यवाद!
शैलजा धन्यवाद!
छान लिहलय... <<<<घरापासून
छान लिहलय...
<<<<घरापासून किराणा मालाचे दुकानही ४-५ किलोमीटर अंतर डोंगर-दरया ओलांडून पायी जावे लागे. दादा शाळेतून आल्यावर म्हणजे संध्याकाळी ६ वाजल्या नंतर, घरात लागणारया वस्तूंची यादी करून जात असत. आणि रात्री उशीरा १०-११ वाजता अंधारातून डोक्यावर भलं मोठ्ठ ओझ, दोन्ही खांद्याना भरलेल्या पिशव्या, एका हातात कंदील/बॆटरी, असे दमून-भागून घरी येत. कधी कंदील विझला तर, तसेच अडखळत अडखळत नदीपर्य़ंत येत असत. आणि नदीपलिकडून कुकारा देत.(कुकारा-खुणेचा विशिष्ट आवाज) कारण नदीकाठावर काजरयाची मोठी झाडे होती. जिथे खूप पालापाचोळा व अंधार होता. साप व इतर श्वापदांची भीती होती. मग माझी आई, आम्हा मुलांना कुलूपबंद करून कंदील घेऊन कितीतरी अंतर एकटीच चालत दादाना आणायला जायची. आई खरतर खूप भित्री होती पण, मागे एकटी असलेली मुले, पुढे अंधरात, सामान घेऊन दमून आलेले पतिराज, यापुढे तिची भिती यायचीच नाही.<<<<
अगदी डो ळ्यापुढे उभा राहिला.. ( गाडीतून वरच्या मजल्यापर्यन्त सामान आणायला किती कष्ट पडतात म्हणून स्वताची कीव करणारी मी :()
तुमच्या आइ - दादा ना नमस्कार.
सुशोलभा, मस्त लिहिलंय.
सुशोलभा,
मस्त लिहिलंय. तुमच्या आई-वडिलांना माझा नमस्कार सांगा.
अगदीच त्या काळी कष्टाची सवय
अगदीच त्या काळी कष्टाची सवय होती, समाजही चांगलाच होता.
माझे वडीलही पोरवयात असताना येथील टॉकीजवर गेटकिपर म्हणून काम करायचे, काका सुध्दा तेथील हॉटेलवर कपबश्या धुने, पेपर वाटने अशी कामे करायचे, नोकरी लागेपर्यंत तर त्यांच्या पायात चप्पल नव्हती.
छान लिहीले !
छान लिहिलंय. तुमच्या
छान लिहिलंय.
तुमच्या आई-बाबांना माझा नमस्कार सांगा.
सुशोलभा. खर् च मस्त लिहिले
सुशोलभा. खर् च मस्त लिहिले आहेस. तो सर्व काळ डाओळ्यासमोर उभा राहिला... काका आणी काकुना
माझाहि नमस्कार साग.
तुझे असेच लेख येएउ देत... आणी प्रतिभा फुलु देत.....
चांगलं लिहिलयं.
चांगलं लिहिलयं.
लेख अप्रतिम आहे. अपल्या बाळा
लेख अप्रतिम आहे. अपल्या बाळा साठी आई वडील किति कष्ट घेतात ते खुप उशिर समजते पण म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे तसेच माझे आहे.
आज त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे जगात मान खाली घालण्याची वेळ आली नाही
अशा त्या मझ्या आणि तुझ्या आई वडिलांना मझा कोटि कोटि प्रणाम
सुंदर !!! लेख आणि त्यावरील
सुंदर !!!
लेख आणि त्यावरील प्रतिक्रियाही
सर्वाना मनापासून धन्यवाद.
सर्वाना मनापासून धन्यवाद.
खुप छान लिहलस सुलु आई
खुप छान लिहलस सुलु
आई बाबांना मनापासुन नमस्कार
सुशोलभा अग खुप छान
सुशोलभा अग खुप छान लिहिलयस.
तुझ्या आई-वडीलांना माझा नमस्कार सांग.
सखी, जागू, धन्यवाद.
सखी, जागू, धन्यवाद.
सुंदर लेख. !
सुंदर लेख. !
अमित, धन्यवाद.
अमित, धन्यवाद.
अप्रतिम.
अप्रतिम.
<<घरापासून किराणा मालाचे
<<घरापासून किराणा मालाचे दुकानही ४-५ किलोमीटर अंतर डोंगर-दरया ओलांडून पायी जावे लागे. दादा शाळेतून आल्यावर म्हणजे संध्याकाळी ६ वाजल्या नंतर, घरात लागणारया वस्तूंची यादी करून जात असत. आणि रात्री उशीरा १०-११ वाजता अंधारातून डोक्यावर भलं मोठ्ठ ओझ, दोन्ही खांद्याना भरलेल्या पिशव्या, एका हातात कंदील/बॆटरी, असे दमून-भागून घरी येत. कधी कंदील विझला तर, तसेच अडखळत अडखळत नदीपर्य़ंत येत असत. आणि नदीपलिकडून कुकारा देत.<<<
चांगलं लिहिलयस शोभे!! आणि महत्त्वाचं म्हणजे आई वडीलांच्या कष्टाची तुला जाणीव आहे. तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार! या लोकांनी खरच फार मेहनत घेतली असते गं, आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी.
आपण कमावते झालो ना की कुठे काही दिसलं की घ्यावसं वाटतं. खिशात पैसे खुळखुळत असतात मग आपल्यासाठीच खर्च करायला काय हरकत आहे? हा भाव प्रगट होतो.. पण आपल्या आई बाबांचं मन हे करायला धजत नाही. तुला एक गोष्ट सांगते...माझे आई बाबा एकदा भर उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस पुण्यात गेले. घरी आम्ही चारही भावंड! उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असतांना समोर आईस्क्रीमची गाडी दिसली. ३० रु.चं आईस्क्रीम होतं म्हणे...आई सांगते. घेउ की नको असा आई बाबांचा जीव होत होता...शेवटी त्यांनी आईस्क्रीम घेतलच नाही. बाबा म्हणाले म्हणे," घरी सोन्यासारखी पोरं आहेत नि आपण इथे आईस्क्रीम खायचं?, जाऊ दे ... नकोच ते!"
इथे आपण बाहेर गेलो की पटकन चायनिज, भेळ,वर ताव मारतो, तेव्हा आईवडीलांची कुणाला आठवण येते???
मला तर अजुनही १० रु.(त्या काळात) ची रिक्षा करण्यापेक्षा पायी फिरणारे, आईला चालत नेणारे बाबा आठवतात.
शोभे, अगं अगदी डोळ्यात पाणि
शोभे, अगं अगदी डोळ्यात पाणि आणले....छान लेख
राजे, आर्ये, स्मितू,
राजे, आर्ये, स्मितू, धन्यवाद.
आर्ये, खरच मी इथे खूपच कमी लिहिलय. अग त्यांचा जीवपट डोळ्यासमोर ऊभा राहिला ना की अक्षरशः रडू येत. आपल्यासाठी त्यानी किती कष्ट, त्याग केलेला असतो, पण आपल्याला मात्र त्याची आठवणही नसते. आज आपल्या यशाच, आनंदाच सार श्रेय तर त्यानाच आहे.
शोभा, त्या दोघांना आमचाही
शोभा, त्या दोघांना आमचाही नमस्कार !
दिनेशदा, धन्यवाद.
दिनेशदा, धन्यवाद.
सुशे आज वाचला लेख, नजरेतून
सुशे आज वाचला लेख, नजरेतून सुटला नव्हता.. राहून गेला होता.
खूप भावला लेख...
सुरेख लिहीलं आहे.
सुरेख लिहीलं आहे.
Pages