जन लोकपाल बिल आणी अण्णा हजारेंचे आंदोलन

Submitted by चाणक्य. on 6 April, 2011 - 12:18

भ्रष्टाचाराच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी किंवा माहितीसाठी खालील लिंक पहा.

http://www.indiaagainstcorruption.org/

जन लोकपाल विधेयकावर आपल्या सुचना आपण या ब्लोगवर देउ शकता. अजुन काहि नंबर्/मेल मिळाले की इथे टाकतो!

http://www.indiaagainstcorruption.com/forum/showthread.php?t=11419&page=2

पंतप्रधानांना लिहिण्याचा मसुदा खालीलप्रमाणे. तो वरच्या साइटवरही मिळेल.

Mr. Chief Public Servant,
Manmohan Singh

We have suffered enough due to corruption. We are deeply hurt and disappointed with any lack of a real and meaningful solution from you and your government.

We want change, and we want accountability and we cannot wait any longer to have this! We will not vote for you if an effective anti-corruption bill is not enacted. Not the farce Lokpal Bill proposed by your government, but the peoples “Jan Lokpal Bill”. We want strict and effective punishment for the corrupt. They MUST go to jail! Or you Mr. PM, along with your party, will fall from the people’s grace. We assure you, stand by us, and we will stand by you. The opposite will also hold true.

Your government has appointed a GoM to draft the Lokpal Bill. This GoM includes -
Sharad Pawar,Veerapa Moily and Kapil Sibal. Mr. Pawar and Mr. Moily have a past of corruption and mis-deeds that the entire country if aware of. Mr. Sibal does not feel there was corruption in the 2G scam. Having these people draft the anti-corruption law – is it not an insult to the people of India? How can the corrupt be asked to draft an anti-corruption bill? We urge you to consider the choice put forth by the people – credible names such as Justice Santosh Hegde, Prashant Bhushan, Shanti Bushan and others, to be part of the committee to draft the Lokpal Bill.

Shri Anna Hazare, one of the Greatest Social Reformers India has ever seen has announced a Fast Unto Death beginning April 5th. His demands are extremely beneficial for the future of India. We urge you to immediately accept the demands of the people of India represented by the demands of Shri Anna Hazare lest the discontent among the people grows out of control.

The sentiments against rampant corruption in this country are quickly becoming as strong as those that led to the uprising in Tahrir Square. The honest and hardworking people of this country refuse to be innocent bystanders in the wholesale public looting that is taking place as you read this letter. We request your immediate and strong response to this concern of the people as corruption should be the top priority of your government. If the challenge is not met effectively and promptly, it has the potential of undermining every valuable effort made by upright citizens of this country over the last century - including you. It also has the potential of leaving your government with a legacy of shame.

Tahrir square can yet be a reality in India.

We trust you will take immediate steps to give us our solution, and not force us to take the above steps!

Citizen of India

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला एक प्रश्न पडतो - जसं विश्वचषकाच्या रात्री पूर्ण भारत जागा झाला होता, त्याच्या अर्धे तरी लोक आता उठून धावत येतील का आण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ? >> अनुमोदन.

पवारांनी तशी IPL ची सोय करून ठेवली आहे ८ एप्रिल पासून.. तेव्हा सगळे लोक तहान भूक विसरून म्याचेस पाहतील..

आण्णांनी थोडासा दम धरायला पाहिजे होता.. मधेच उपोषण चालू केलं.. पवारांना थोडा तरी अवधी द्यायचा.. आत्ताच तर कुठे विश्वचषक संपलाय..

दोन - चार छोटे बदल करुन आत्ताच पाठवली ईमेल. ईतरही ईमेल आयडी कुठे तरी होते (उदा. सोनीया गांधी) ते कोणी एकत्र करुन इथे टाकेल का?

रीक्षा फिरवतात तसे दुसर्या कोणत्या बाफ वर काही लिहिलेत तर या बाफची लिंक द्या.
http://www.maayboli.com/node/24882

aschig सहमत.
निवडक १० मध्ये नोंद केलीय.. Happy

फेसबुकवर पण बरंच काही campaigning चालुये. तिकडेही संदेश पोचवा.

विश्वचषकाच्या विजया नंतर लाखो लोकं रस्त्यावर येतात आणि उत्साहाने विजय साजरा करतात, माझी काहीच तक्रार नाही. पण त्याच्या १० % जरी उत्साह भ्रष्टाचाराविरुद्ध दाखवला तरी देश कुठल्या कुठे जाईल. पण तसे होत नाही>>> अनुमोदन....

दोन प्रकारचे भारतिय आहेत

एक रिस्पॉन्सिबल आणि दुसरे उत्सवी..>>>> अनुमोदन. फक्त ज्या दिवशी हा रेशो वाढेल तो सुदिन...

या आंदोलनाला पुरेपुर यश मिळो.... एक साधा जय (भ्रष्टाचाराविरुध्ह) भ्रष्ट राजकारण्यांच्या 'हम कुछ भी कर सकते हैं' या व्रुतीला लगाम घालेल.

अण्णा हजारेंना सरकारने आजपर्यंत किती आणि कोणते पारितोषिके दिलेली आहे ?

माझ्यासाठी अण्णा हजारे हे भारताचे रत्न आहे. त्यांच्यासाठी महारष्ट्र सरकार राष्ट्रपतींना लिहीणार?

मी केंद्राला पत्ररुपाने विनंती करणार आहे. Happy

ज्या लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे आणि त्यांच्या समर्थकांनी देशभर आंदोलन छेडले आहे, ते लोकपाल विधेयक आहे तरी काय, याचा मटा ने घेतलेला आढावा :-

- पहिले लोकपाल विधेयक १९६९मध्ये म्हणजे ४२ वर्षांपूवीर् राज्यसभेत मांडले गेले.

- ते मंजूर न झाल्याने १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये तेच लोकपाल विधेयक पुन:पुन्हा मांडण्यात आले.

-अद्यापही ते मंजूर झालेले नाही. त्यामुळेच सध्या भ्रष्टाचारविरोधी कोणताही कायदा नाही.

- काही नव्या मागण्यांसह जन लोकपाल विधेयकासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत.

- डिसेंबर २०१० मध्ये नव्या विधेयकाचा मसुदा सरकारला सादर.

वेगळेपण

निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा असावी तसेच राजकीय व्यक्ती, नोकरशहांवर भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद असावी.

नव्या मागण्या

- आता भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत केंदीय पातळीवरील मंत्र्यांचा समावेश व्हावा, अशी मागणी होत आहे. मात्र मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे असा आग्रह अण्णा हजारे, किरण बेदी इत्यादींचा आहे आणि उपोषणातील हा प्रमुख मुद्दा आहे.

- तात्काळ निवाडा व्हावा.

- भ्रष्ट अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार

- कोणत्याही न्यायाधीशाच्या, अगदी भारताच्या सरन्यायाधीशांच्याही विरोधात थेट चौकशी आणि कारवाई करण्याचा अधिकार मिळावा. सध्या कोणत्याही न्यायाधीशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारताच्या सरन्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागते.

- लोकपाल समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा हस्तक्षेप असू नये.

- दोषी व्यक्तीला पाच वर्ष ते जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा असावी. सध्या ही शिक्षा सहा महिने ते सात वर्ष इतकी आहे.

मसुदा कोणी तयार केला

- शांती भूषण, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, निवृत्त न्या. संतोष हेगडे, अॅड. प्रशांत भूषण, माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह.

निवड समितीमध्ये कोण असावे?

- दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष

- सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश

- हायकोर्टाचे दोन वरिष्ठ मुख्य न्यायाधीश

- भारतीय वंशाचे नोबेल विजेते

- राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष

- भारतीय वंशाचे दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते

- भारताचे महानियंत्रक आणि लेखापाल

कायद्याची व्याप्ती

- भ्रष्टाचार नियंत्रण कायदा, गैरव्यवहार या अंतर्गत केल्या गेलेल्या तक्रारींचा समावेश.

- तसेच या गैरव्यवहारांची माहिती देणाऱ्यांना संरक्षण.

समर्थक

- किरण बेदी, स्वामी रामदेव, श्री श्री रवीशंकर, स्वामी अग्निवेश, मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल, कपिल देव, मनेका गांधी,

- राजकीय पाठिंबा- भाजप, जनता दल (युनायटेड), समाजवादी जनपरिषद

- लोकांचा पाठिंबा- अण्णा हजारे यांनी केलेल्या आवाहनानंतर सहा कोटी एसएमएस.

सरकारची प्रतिक्रिया

- विधेयकांच्या प्रस्तावाची प्रत उपलब्ध नाही.

- सरकार यावषीर् पुन्हा एकदा लोकपाल विधेयक संसदेत सादर करणार आहे. सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सल्लागार समितीसमोर विचारार्थ मांडले जाईल.

- सध्याच्या विधेयकात अनेक त्रुटी, पळवाटा आहेत.

वादाचे मुद्दे

- मसुदा समितीत लोकांच्या थेट समावेशाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा नकार.

- निवृत्त न्या. संतोष हेगडे, अ‍ॅड. प्रशांत भूषण आणि अग्निवेश : महाराष्ट्रातील अनेक जमिनींच्या घोटाळ्यात ज्यांचा नावाचा वारंवार उल्लेख होता अशा शरद पवार यांच्या समावेशाला हरकत.

मला अण्णांच्या आंदोनलाचा गैरअर्थ काढला जाऊन त्याला राजकीय वळण मिळण्याची भीती नेहमीच वाटते.. तितके मुरलेले राजकारणी दुर्दैवाने भारतात भरपूर आहेत...

आनंदयात्री - सहमत, शेवटी हजारे हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहेत हे सर्व जाणतात. कुठल्याही पक्षाशी जवळिक नसणार्‍या आणि समाजात आदराचे स्थान असणार्‍यांनी (जसे कपिल किंवा अमिर) पुढे यावे असे वाटते.

देशा बाहेर रहाणारे काय करु शकतात?

आण्णांच्या आंदोलनाला राजकीया वळण लागणे अवघड ठरेल कारण त्यांना पाठिंबा देणे कुठल्याच राजकीय पक्षाला परवडणारे नाही, सगळेच चोर!
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर संसदेत भाजपचा अतुलनीय शेपूटघालपणा आपण पाहिलाच आहे.

ह्या बीबी लिंक कानोकानीवर टाकली आहे.

अण्णांच्या आंदोलनामुळे खुर्ची गेलेले पुढारी सुरेश जैन म्हणतात की अण्णाच सर्वात भ्रष्ट आहेत. (संदर्भ : सकाळ मधील बातमी) . राजकारणी मंडळी ढोंगी आणि गेंड्याच्या कातडीची असतात याला आणखी कोणता पुरावा हवाय

शिवसेना आणि काही इतर पक्षांनी अण्णांना पाठिंबा दिलाय ते ठिक पण त्यांच्या पक्षात असलेल्या भ्रष्टाचारी लोकांबद्दल काय? राजकीय फायदा उठवण्याचा खटाटोप.

मी वाचकांचा पत्र व्यव्हारातुन ईसकाळ च्या संपादकाला चांगलेच झापले..
आता बातम्या दिसत आहेत Happy
http://72.78.249.107/esakal/20110406/5592116303155162301.htm

ईसकाळ शरद पवार यांचा पेपर आहे Happy

मला आत्ताच एक समस आलाय -
Please give 1 missed call on 022-61550789 (call gets auto cut) to support Anna Hajare for his fast against corruption. 7.5 Cr calls done so far.

खरं असेल का हे?

अण्णांच्या आंदोलनामुळे खुर्ची गेलेले पुढारी सुरेश जैन म्हणतात की अण्णाच सर्वात भ्रष्ट आहेत. (संदर्भ : सकाळ मधील बातमी) . राजकारणी मंडळी ढोंगी आणि गेंड्याच्या कातडीची असतात याला आणखी कोणता पुरावा हवाय
---- ज्यांना जळगाव जिल्ह्याचे राजकारण माहित आहे पण अण्णा माहित नसतील, ते वरिल प्रतिक्रिये नंतर अण्णा किती स्वच्छ व्यक्तीमत्व आहे हे जाणतील.

अण्णांवर कुठलेही भ्रष्टाचाराच्या आरोपाचे शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाल्यास सुर्यावर थुंकण्या सारखा प्रकार आहे.

माझा सुद्धा या आंदोलनाला पुर्ण पाठींबा आहे.
भ्रष्टाचाराची किड मारुन टाकायची असेल तर त्यावर कठोर कायदे हवेत अन त्याचे पालन सुद्धा तंतोतंत व्हायला पाहिजे.आपल्याकडे कायद्याला भरपुर पळवाटा असतात.खर म्हणजे आपण सुद्धा भ्रष्टाचाराला थोड्याफार प्रमाणात खत-पाणी घालतो.जर या किडिला समुळ नष्ट करायची असेल तर आधी स्वतःपासुन सुरुवात केली पाहिजे.
सध्या भारत महासत्ता बनण्याची स्वप्न रंगवतोय पण या रोगामुळे ते कधीच साध्य होऊ शकणार नाही.
फक्त अण्णा हजारेच का? आपण सुद्धा त्यात सामील होऊया.

http://www.annahazare.org/

या ठिकाणी जनतेचे जनलोकपाल आणि सरकारचे लोकपाल (सर्वात खाली, डावी कडे) बद्दल माहिती आहे. pdf मला या संगणकावर वाचता येत नाही :अरेरे:.

काल आय्बीएन लोकमत्वर नवाब मलिक आलेले. त्यांचा रोख अण्णा हजारेच भ्रष्ट आहेत वगैरे असाच होता. अण्णा ह स.घ परिवाराच्या अजेन्ड्यावर हे अन्दोलन करत आहेत असेही हे महाशय म्हणत होते. निखिल वागळे नी पुरावे मागितले तर उद्या देतो म्हणाले.

हेमन्त देसाई आणि कोळसे पाटील तसेच विनोद तावडे खूप मुद्देसूद आणि व्यवस्थित बोलले. पण निखिल वागळे स्वतः भयानक भडकून नवाब मलिक आणि राष्ट्रवादीची कान उघडणी करते झाले.

मला पडलेला एक प्रश्न म्हणजे ऑनलाईन पाठिम्बा देऊन खरेच काही फ़रक पडू शकेल का? ईतर देशात हे झाले पण लोक खरोखर रस्त्यावर उतरल्याशिवाय खरा फ़रक पडला नाही. जिथे मायबोलीसारख्या एका साईटवर डु आय वगैरे चे प्रताप पाहता कोणत्या गोष्टी मनावर घ्याव्या आणि कोणत्या नाही हे आपल्याला समजू लागते तिथे हे बेरकी राजकारणी ऑनलाईन पाठिम्ब्याला खिजगणतित तरी घेतिल का?
मीवर म्हटल्याप्रमाणे अण्णा कसे कुणाकुणाचे एजन्ट आहेत आणि त्यनि सरकारचा पैसा कसा घेतला आहे याची मोर्चेबन्धणी आधीच सुरू झाली आहे.

सचिनने अण्णांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा. जसा आमिरने दिला. याचा नक्किच फायदा होइल. परवा नोएडा मधे मोठी rally काढुन अण्णांच्या आंदोलनाला जनतेने पाठींबा दिला.

> मला पडलेला एक प्रश्न म्हणजे ऑनलाईन पाठिम्बा देऊन खरेच काही फ़रक पडू शकेल का?

फक्त ऑनलाईन पाठींब्याने पडणार नाही, पण त्याचा एक फायदा हा की त्यचे रेकॉर्ड आंतरजालावर फीरत राहील, आरकाईव्ह होईल.

नुस्ते आन्दोलन करून काहि होनार नहि. जो पर्यन्त अण्णा हझारे सारखे लोक स्वतः राजकारणात येत नाहित तो पर्यन्त एका भ्रष्टाचारी नेत्याऐवजि दूसरा भ्रष्टाचारी नेता जागा घेइल.

Pages