खिचडी
मी त्या दिवशी खूप आनंदात होत्ये. प्रमोशन झालं होतं, त्यामुळे आमचं विमान एकदम हवेत तरंगत होतं. शनिवार आला आणि मी आईबाबां मागे भुणभूण लावली माझ्याबरोबर लंचला यायला. पपांना काम होतं मग आई फक्त शॉपिंगला तयार झाली, लवकर येऊ- या अटीवर. हेही नसे थोडके! थेट सिकिंदराबाद गाठले. हा ड्रेस, तो ड्रेस मग हिच्यासाठी, तो शर्ट दादासाठी करत 'पार्कलेन' आणि किरकोळ खरेदीसाठी 'जनरल बजार' पालथं घालून झालं. एव्हाना खूप उशीर झाला म्हणून आईला बळेबळे 'उत्सव'ला नेलं. ते कसं छान शाकाहारी आहे, मग फेस्टिवल्स चालु असतात, बेबी कॉर्न मसाला इथे छान मिळतो वगेरे वगेरे माझी टकळी चालुच होती. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की आई बोलत नाहीये, काही खात नाहीये, फक्त माझ्याकडं पाहत बसली आहे.
"काय झालं आई? आवडलं नाही का? बरं वाटत नाही का? जाऊ या का?"
माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.
"नाही गं राणी, काही नाही, तू होऊ दे सावकाश".
माझं लक्ष उडालं. कसंबसं पुढ्यात आलेलं संपवून बाहेर पडलो.
घरी निघालो. येतांना असलेला उत्साह आता साफ मावळला होता. संध्याकाळ होत आलेली. थोड्याच वेळापूर्वी जनांनी फुललेला रस्ता रिकामा वाटू लागला होता. तितक्यात रस्त्यावर माणसांचे लोंढेच्या लोंढे दिसायला लागले. आम्ही घाबरून चौकशी केली तर समजले. जवळच्या मैदानावर कुणाचे तरी भाषण आहे, त्यासाठी लोकं खेड्यापाड्यातून ट्रक किंवा जे वाहन मिळेल ते, पायी असे जमत होते.
आईला आता राहवेना. तिने घरी फोन करायला सांगितले, तर सेलफोनला सिग्नल नाही!
"पपा आले असतील, आपण खूप वेळेपासून बाहेर आहोत" इति ती.
आता मला तिच्या चिंतेच कारण कळाले. "अगं पपा अजून परतले नसतील, जरा गर्दी हटताच, लगेच पोचु आपण", मी असफल प्रयत्न केला.
कसेबसे पिकेटला आलो तसे सेलफोनमध्ये एक दोन बार दिसू लागले. घरी फोन केला. पपा तेव्हाच परतले होते. त्यांनी मला थोडावेळ परिस्थिती पाहून पपांच्या मित्राकडं जायचं सुचवलं.
"पपांनी काही खाल्लं नसेल, सकाळी फक्त ब्रेकफास्ट करून बाहेर पडलेत.". आईच्या न खाण्याच कारण कळलं. पपांना बाहेर खायला आवडत नाही. आम्हाला घरी पोचायची घाई झाली होती..
मला नेहमी आईच्या अश्या वागण्याचं आश्चर्य वाटत आलं आहे. पपा आमच्याबरोबर आले असते तर तिला कदाचित काही वाटलं नसतं, पण पपांनी काही खाल्लं नाही आणि आम्ही बाहेर 'चैन' करतोय, असं तिला काहीसं वाटलेलं.
पण या गोष्टीला काय हरकत आहे? नवरा कधी एकटा Enjoy करत नाही का? बायकांना एवढं guilty-feel का व्हावं? आपण काही मुद्दामून गेलेलो नाही ना? उशीर झाला म्हणूनच ना? मी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ.
रिक्षावाल्याला बाबापुता केले तर, शेवटी त्याने कसेतरी स्टेशन पर्यंत सोडले. तेथून दुसरी रिक पकडून घरी आलो. तोवर रात्रीचे दहा वाजले होते.
पपांनी दार उघडले. मग त्यांनी सांगितले की कामानंतर त्यांच्या मित्राने संध्याकाळी अकस्मातपणे जेवायला बोलावले होते, पण आईला सांगितल्याशिवाय असे अचानक तिकडं जायला त्यांना रुचलं नाही. त्याला, पुन्हा कधीतरी येइन असं सांगून घरी आले होते ते.
आई गडबडीने किचनमध्ये पळाली. पपांनी हसत हसत ताटं घ्यायला सांगितली. तूरीच्या डाळीची खिचडी, तळलेल्या मिरच्या अशी तयारी होती. मी कोशिंबीर करायला घेतली.
त्यादिवशीच्या त्या खिचडीची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय..
(एकमेकांबरोबर सुखी 'सहजीवन' साधणार्यांना समर्पित.)
छान लिहिलय. सहजीवन आणि खिचडी
छान लिहिलय.

सहजीवन आणि खिचडी सहजेवण
सहजेवण धन्यवाद
सहजेवण

धन्यवाद आशुतोष-सात-अकरा
चिन्नु....... फार छान लिहिलं
चिन्नु....... फार छान लिहिलं आहेस गं...... त्या खिचडीच्या चवीची कल्पना आम्ही पण करु शकतो
चिन्नु.. खिचडी हा शब्द बघीतला
चिन्नु.. खिचडी हा शब्द बघीतला व लगेच वाचायला घेतल. कारण माझे आई-वडिल दोन्ही मुळचे खानदेशचे असल्यामुळे व घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्यामुळे माझ्या लहानपणी आमच्या घरी रोज रात्री जेवायला(फोडणीची) खिचडी.. त्याबरोबर कधी भरीत-भाकरी.. तर कधी नुसते लोणचे-पापड.. तर कधी पन्ह.. तर कधी मिरचीचा ठेचा..तर कधी कोबी-टमॅटो-मिरचीचे सॅलड...तर कधी कढी.. तुझे हे सुंदर ललित वाचुन माझ्या आइच्या हातच्या खिचडीची चव माझ्या जिभेवर आली व मी माझ्या बालपणाच्या आठवणीत हरवुन गेलो... मनापासुन लिहीलेल्या लेखनात किती जादु असते बघ.. मस्तच लिहीले आहेस.
(मात्र आमची खिचडी बहुतकरुन मुगाच्या डाळीची असायची..:))
खिचडी आवडली, छान जमलीये,
खिचडी आवडली, छान जमलीये, प्रमाण कमी जास्त झालेले नाही
जयुताई, मुकुंद, शुभंदादा
जयुताई, मुकुंद, शुभंदादा
धन्यवाद!
अय्या चिन्नु !!! मस्त लिहिलय.
अय्या चिन्नु !!! मस्त लिहिलय. सगळ्या खांदेशी लोकांचे अन खिचडीचे एक विशिष्ट नात आहे. तुझ्या लेखाने मी पण आईच्या हातची खिचडी खूप मिस केली.
सहजीवन... हो जे मागच्या पिढीला सहज साधले ते आपल्याला खूप प्रयत्नांनी जमवावे लागते. तुझा लेख मस्तच. सहज अन सुंदर.
मुकुंद, परिस्थीती कशी का
मुकुंद, परिस्थीती कशी का असेना, खानदेश/कान्हदेशात संध्याकाळी ६-६.३० ला थापल्या जाणार्या हातावरच्या गरम भाकर्या आणि दरवळणारा खिचडीचा हंडा असायलाच पायजे

मोठा थांकु प्रिंसेस! आईच्या हातची खिचडी मिस केलीस, यातच लेखाचा उद्देश्य सफल
सहजीवनाबद्दल अनुमोदन. पण रसाळ गोमट्या फळांसाठी एवढे तर करावे लागेलच.
मस्त झालीय खिचडी
मस्त झालीय खिचडी
धन्यवाद केश्विनी
धन्यवाद केश्विनी
मस्त लिहिल आहे. आवडल.
मस्त लिहिल आहे. आवडल.
धन्यवाद अजय!
धन्यवाद अजय!
Pages