काही आठवड्यांपूर्वी मायबोलीवर मराठी दिन साजरा करावा असा बूट निघाला. काहीतरी करायचं आणि मुलांसाठी करायचं इतकंच मनात होतं. पण नेमकं काय, कुठे हे काही ठरलं नव्हतं. वेळ कमी होता त्यामुळे शक्य असेल तर आधीच संघटीत असलेल्या ग्रूपला विचारलं तर वेळ वाचणार होता. मुलांशी संबंध होता त्यामुळे या उपक्रमावर काम करणार्या व्यक्तींची खात्री असण्याची आवश्यकता होती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका शब्दात मिळण्याची शक्यता दिसली, "संयुक्ता" !
आम्ही संयुक्ता प्रशासनाला विचारल्यावर त्यांनी ग्रूपमधे साधकबाधक चर्चा करून या साठी मदत करायचा निर्णय घेतला.
आम्ही सुचवलेली मूळ कल्पना फक्त ०.२५% इतकीच होती. उरलेलं ९९.७५% काम हे संयोजक (अमृता, बस्के, चिन्नु, रैना, सायलीमी, सायो, सिंडरेला, सीमा) , परीक्षक (स्वाती_आंबोळे) आणि संयुक्ता प्रशासन यांनी केलं. इतकंच नाही संयुक्ता प्रशासनातल्या मंडळीनी स्पर्धेच्या पारितोषिकांसाठी प्रायोजक मिळवून दिले आणि फक्त विजेत्यांसाठी नाही तर सगळ्याच स्पर्धकांचे कौतूक व्हावे म्हणून पैसेही उभे केले. मायबोली या सगळ्यांची ऋणी आहे.
मायबोलीचे उपक्रम कसे सुरु होतात, कुणाला नेतृत्वाची संधी मिळते, हे निर्णय कसे घेतले जातात या बद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात. या निमित्ताने थोडं त्याबद्दल लिहतो.
कल्पना निघते तेंव्हा सगळंच हवेत असतं. ती कल्पना यशस्वी होईल याची खात्री नसते. अमुक अमुक रंगाचा ढग इतपत माहीती असते म्हणा. या वेळेला हो मी हे काम अंगावर घेतो/घेते म्हणणारं (आणि तसं प्रत्यक्षात आणून दाखवणारं) कुणीतरी लागतं. कधी कधी अशा एकापेक्षा जास्त व्यक्ती असून शकतात. आणि मग सर्वसाधारणपणे त्या व्यक्तींकडे/ग्रूपकडे नेतृत्व जातं. यशाची कुठलीही खात्री नसताना स्वतःचं नाव त्या उपक्रमाशी निगडीत होण्याचा धोका ते पत्करतात. (काही वर्षांपूर्वी "संयुक्ता" ग्रूप अशीच एक हवेतली कल्पना होती हे काही मायबोलीकरांना माहिती आहे)
पुढचा टप्पा म्हणजे उपक्रमासाठी संयोजक मंडळ तयार होण्याचा. यात हौसे, गवसे, नवसे सगळ्या प्रकारचे लोक काम करण्यासाठी उत्सुक असतात. कधी कधी हे मंडळ आपोआप (किंवा ज्याना भाग घ्यायचा त्यांना घेऊन) तयार होतं. तर कधी ग्रूपचे नेतृत्व करणार्या व्यक्ती त्यांना योग्य वाटेल किंवा विश्वासू वाटेल अशा व्यक्तीना घेऊन संयोजक मंडळ स्थापन करतात. इथे टीमवर्क सगळ्यात महत्वाचे असते. प्रत्येक कामासाठी सगळ्यात योग्य (तांत्रिक दृष्ट्या) व्यक्ती घेतल्या तरी ते सगळे एकत्र काम करतील याची खात्री नसते. All star players don't make a good team. त्यामुळे ज्यांनी कामाची जबाबदारी घेतली आहे, त्याला/तीला योग्य वाटेल अशा व्यक्ती निवडणेच योग्य ठरते. या निवडीत फक्त ओळखीच्या लोकांना घेतलं जातं असं बर्याचदा म्हटलं जातं. आणि ते खरं आणि योग्य आहे. यात नेतृत्व करणार्या व्यक्तीचा दोष नसून ही मुद्दाम जाणीवपूर्वक योजलेली प्रक्रीया आहे.
संयोजक मंडळ ठरलं की कामाची यादी, मिळालेल्या साधनांमधून योग्य त्या गोष्टी पार पाडणं सुरु होतं. मुळातली कल्पना, आणि त्यामागचं Planning कितीही उच्च असलं तरी अंमलबजावणी अवघड असते. संयोजक काही पूर्णवेळ यासाठी व्यस्त नसतात. घरातली, नोकरी व्यवसायातली कामं, मुलंबाळं, आजारपण सगळं संभाळून उपक्रम कसा पुढे जाईल ते पहावं लागतं. कुणीतरी घड्याळाकडे (किंवा कॅलेंडरकडे) लक्ष ठेवणारं लागतं. एखादे जुने मायबोलीकर (ज्यांनी कधी उपक्रमात भाग घेतला आहे) मधून मधून सल्ले देत असतात. काही सल्ले घ्यायचे असतात. म्हणजे पूर्वी केलेल्या चुका परत होत नाहीत. तर काही सोडून द्यायचे असतात. नाहीतर नवीन कल्पना पूर्वी जमल्या नाहीत या कारणास्तव कधीच परत प्रयत्नात आणल्या जाणार नाहीत.
काही उपक्रम असे असतात की जे संपल्यावर काही कामं राहिली असतात. ती सगळ्यांचा उत्साह टिकवून पार पाडावी लागतात. उदा. या उपक्रमात सगळ्या प्रायोजकांना संपर्क करून, त्यांच्या कडून पैसे उभे करून मुलांपर्यंत बक्षीस पोहचवण्याचं काम तातडीने करण्यात आलं. कधी कधी पुढच्या वर्षीच्या उपक्रमाला मदत म्हणून नोंदी करून ठेवायच्या असतात.
ज्याना कधी व्यवस्थापन या क्षेत्रात काम करायचे आहे किंवा नेतृत्वाची आवड आहे त्यांनी कुठल्याही अशा मायबोली किंवा मायबोलीबाहेरच्या स्वयंसेवकांवर आधारित उपक्रमावर जरूर काम करून पहावं. त्यातून जे शिकायला मिळतं ते तुम्हाला कधीच Paid Job मधून किंवा शाळेत जाऊन शिकता येणार नाही. (स्वानुभवाने सांगतोय). Paid job मधे पगार हवा असेल तर काम कर असे म्हणून काम करून घेणे नेहमीच सोपे असते. पण स्वयंसेवकांबरोबर ते त्यांचा वेळ/कष्ट देत असताना, प्रत्येकाच्या दहा वेगवेगळ्या कल्पना , तर्हा, Timezones, रुसवे फुगवे संभाळून सगळ्यांनी मिळून उपक्रम यशस्वी करणे म्हणजे काय, हे त्यातून गेल्याशिवाय समजणार नाही.
या लष्कराच्या भाकर्या भाजूनही का आनंद मिळतो , हे एकदा करून पहा म्हणजे समजेल
येस्स.. अगदी खरंय..
येस्स.. अगदी खरंय..
छान लिहिलं आहे. सहमत. आर्थिक
छान लिहिलं आहे. सहमत.
आर्थिक वा अन्य कुठलाही फायदा नसताना केवळ आवड म्हणून स्वतःच्या आणि दुसर्याच्या आनंदासाठी केलेल्या कामातून खूप समाधान मिळतं.
अश्या प्रकारच्या उपक्रमांमागे स्वयंसेवकांचा बराच वेळ, कष्ट असले तरी बाकी मायबोलीकरांचा त्यात सहभाग असल्याशिवाय तो उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. शेवटी हे सगळं तुमच्यासाठीच आहे. तेव्हा भाकर्या तर भाजून पहाच पण इथून पुढेही मायबोलीकरांनी जमेल तेव्हा अश्या सर्व उपक्रमात आवर्जून भाग घ्या आणि त्या कष्टांचे चीज होऊ द्या ही विनंती. संयोजकांबरोबरच या कार्यक्रमात भाग घेऊन तो यशस्वी करायला हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे आभार.
मस्त लिहिलंय अगदी. तुम्हा
मस्त लिहिलंय अगदी.
तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!!
इथून पुढेही मायबोलीकरांनी जमेल तेव्हा अश्या सर्व उपक्रमात आवर्जून भाग घ्या>> मलाही इच्छा आहे, काय नीट करुन शकेन माहीत नाही, पुढचा उपक्रम कोणता आहे आणि त्यात काम करण्यासाठी कुणाशी सम्पर्क साधायचा?
ज्ञाती, ते 'भाग घ्या' काम
ज्ञाती, ते 'भाग घ्या' काम करण्यासाठी नाही म्हटलं गं, ते तर आहेच पण एखादी स्पर्धा असेल तर स्पर्धेत भाग घ्या, फोटोंचं, पत्रांचं प्रदर्शन असेल तर तिथे फोटो, पत्रं टाका असं म्हणायचं होतं.
हे बघ - http://www.maayboli.com/node/8699
>>>>> तर स्पर्धेत भाग घ्या,
>>>>> तर स्पर्धेत भाग घ्या, <<<<<

अगदी बरोब्बर
आता वरील स्पर्धेचेच बघितल का? पत्रविषय होता, तर मी कपाट वगैरे धुन्डाळली, इथे टाकले त्याव्यतिरिक्तही बरेच मिळाले, हे इथले निमित्त नस्ते तर जसे गेली कित्येक वर्षे त्या बाबी कपाटात बन्दिस्त राहिल्यात तशाच अजुन अनेक वर्षे राहिल्या अस्त्या... अन पुढेही बरच काही..... कोणतरी त्या रद्दीत टाकेल मागाहून! असो
याच निमित्ताने का होईना, मी पुन्हा गतायुषात रमू शकलो, जे एरवी मुद्दामहून मी केल नसत.
अन तसही पहाता, मूर्ख-नालायक मिडीया वरच्या भिक्कार बातम्या अन टुक्कार सिरियल्स बघत बघत आम्हि आमच्या मेन्दूत बरच काही अनावश्यक भरुन घेतो नि तेच जीवन समजुन त्यावरच विचार करु लागतो.
मला वाटते की वरील स्पर्धा प्रकार हे आमच्या (अदरवाईज) गबाळग्रन्थी बनलेल्या मेन्दुला क्रिएटीव्ह उत्तेजना देण्याची सन्धी निर्माण करतात. त्याचा लाभ उठवला पाहिजे येथिल प्रत्येकाने!
एका गणेशोत्सवाआधी मी सूचना केली होती की चित्रे वगैरेची स्पर्धा असावी. प्रत्यक्षात स्पर्धा जाहीरही झाली, पण त्यावर्षीचे माझे चित्र म्हणजे अक्षरषः "इ.कचरा" होता. चित्राचा विषय दीपस्तम्भ असा होता, अन मला काही केल्या कॉम्प्युटर वर गोटीचा माऊस वापरुन हवा तो परिणाम मिळत नव्हता, स्कॅनरची सोय नव्हती, प्रत्यक्ष रन्ग वापरण्याची क्षमता नव्हती, अन तरी मी ते चित्र दाखल केलेच! जुन्या मायबोलीवर असेल ते! त्याचाच जोडीने साप्-मुन्गुस असे काहीतरी चित्र काढले होते असे आठवते!
मात्र यामुळे इतकेच झाले की मला माझ्यातील तृटी व मर्यादान्ची जाणीव होऊन मी फावल्या वेळात निश्चयाने-इर्ष्येने माऊस वापरुन अधिक (वा पूर्ण) क्षमतेने चित्रे काढू लागलो, इतकी की कुणाला तरी सणानिमित्त पुजायला गायवासराचे चित्र हवे होते, ते पुढील दहा मिनिटात काढून अपलोड करुनही दिले
जर या स्पर्धाच नस्त्या, तर मला नाही वाटत की मी मुद्दामहून माऊसने फावल्या वेळात चित्रे काढली अस्ती..... जास्तीत जास्त फावला वेळ अन्प्रॉडक्टिव्ह्/अन्क्रियेटीव "गॉसिप" मधेच घालवला अस्ता.. तोन्डाच्या वाफा फुका दवडीत! नाही का?
प्रत्येक कामासाठी सगळ्यात
प्रत्येक कामासाठी सगळ्यात योग्य (तांत्रिक दृष्ट्या) व्यक्ती घेतल्या तरी ते सगळे एकत्र काम करतील याची खात्री नसते. >>>>>> जे जे भेटतील भुते त्यासी मानिजे भगवंत, अश्या प्रकारे काम केले कि मग मोठे काम प्रत्यक्षात उतरु शकते असे म्हणतात.
Pages