हे विडंबन नसुन जन जागृती आहे असे समझले तरी चालेल,
(चालः- ए मेरे वतन के लोगो)
नालायक राज्यकर्त्यांनो, जरा लाज बाळगा मनी,
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||धृ||
तुम्ही केले किती घोटाळे, पैशांनी भरले वाडे,
टाळुचे खाऊन लोणी ,त्या प्रेतांना मग गाडे,
तुम्हा ठायी कसली निती, तुम्ही निर्लज्ज बेईमानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||१||
इथे रक्त सांडले ज्यांनी, त्यांना मरते समयी ना पाणी,
पण कैदेचा शत्रु जो, त्यासी रोज चिकन बिर्याणी,
जनतेच्या समोर तांडव, आणि आत मदन मस्तानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||२||
आता कसले हवे पुरावे, किती बघावे तुमचे कावे
शहिदांनी चढविले जे, ते जॅकेट तुम्हा न गावे,
गेला देश, धर्म खडड्यात, तुम्ही करा आपली मनमानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||३||
नालायक राज्यकर्त्यांनो, जरा लाज बाळगा मनी,
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||धृ||
छान..
छान..
गेला देश, धर्म खडड्यात,
गेला देश, धर्म खडड्यात, तुम्ही करा आपली मनमानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी....
छान आहे...विचारप्रवर्तक आहे !!
अभिनंदन !!
धन्यवाद
धन्यवाद
छान आहे.
छान आहे.
छान आहे
छान आहे
छाने!!!!!!!!!
छाने!!!!!!!!!