वह गली थी...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आपापली आयुष्य असतात. दिनक्रम असतात. ते सुरळीत चालू असतात. आणि मग चुकून एखादा रिकामा क्षण समोर येतो.. आणि नेमकी या माणसाची अशी ही जीवघेणी कविता वाचली जाते.
शब्दांवर काट मारण्याच्या सहजतेने नाती मिटवता येत नसतात. हे उशिरा आलेलं शहाणपण अशावेळी नव्याने जाणवतं फक्त!

मैं अपने बिझनेस के सिलसिले में,
कभी-कभी उसके शहर जाता हूं तो गुजरता हूं उस गली से |

वो नीम तारीक-सी गली,
और उसी के नुक्कड पे उंघता-सा
पुराना इक रोशनी का खंबा,
उसी के नीचे तमाम शब इंतजार कर के,
मैं छोड आया था शहर उसका !

बहुत ही खस्ता-सी रोशनी की छडी को टेके,
वो खंबा अब भी वहीं खडा है !
फतूर है यह, मगर मैं खंबे के पास जा कर,
नजर बचा के मोहल्ले वालों की,
पूछ लेता हूं आज भी ये-
वो मेरे जाने के बाद भी, आई तो नहीं थी?

वह आई थी क्या?

एक काट मारुन शब्द खोडून टाकावा इतक्या सहजतेने एखादं नातं तोडून टाकता येत असतं कां? कबूल आहे काही वेळा त्या गुंतण्याचा प्रयत्न करुनही न सोडवता येणारा गुंता झालेला असतो. तो सोडवत बसण्याइतका वेळ हाताशी नसतो, किंवा तो सुटेल असा विश्वास त्यावेळी वाटेनासा झालेला असतो. थोडा वेळ जावू द्यावा मधे, आपोआप सुटेल जरा वेळ मधे गेला तर, धाग्यांची खेचाखेच दोन्ही बाजूंनी करणं बंद केल्यावर असं वाटून कदाचित म्हणूनच नात्यांचा तो गुंताडा मनाच्या एका कोपर्‍यात काही काळासाठी ठेवला गेलेला असतो.. दिवस जातात मधे आणि कशामुळे नक्की ते कळत नाही.. धागे सगळे उसवूनच गेलेले असतात आपोआप. आपण शोधतो पण दुसरं टोकं हरवून गेलेलं असतं.काही शिल्लकच राहिलेलं नसतं.. एका विफल आशेशिवाय.. ते दुसरं टोक शोधण्याचा अजून कोणी प्रयत्न करत असेल कां?

आपण शहरं सोडली तरी त्यांनी आपल्याला सोडलेलं नसतं कधीच.. गुलझारला हे इतकं अचूक कसं उमगलेलं असतं कायमच?

विषय: 
प्रकार: 

<< गुलजारने लिहावं आणि ट्यु ने रसग्रहण करावं.. जबरीच! > > अगदिच सहमत!
गुलजार पुन्हा कितव्यान्दा आवडले असतील हे वाचून... आणि ट्युलिप तुझे लिखाण ही!! Happy

>>आपण शहरं सोडली तरी त्यांनी आपल्याला सोडलेलं नसतं कधीच
शंभर टक्के...मुंबईबाबतीत तर हे मत मी कधीच मान्य केलंय.....

Pages