भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन

Submitted by उपाशी बोका on 14 August, 2022 - 14:05

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा होणार आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांना शुभेच्छा.

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आजचं पंतप्रधानांचं भाषण फार छान झालं. भ्रष्टाचार, नेपोटिझम विरुध्द सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले. याशिवाय सर्व सुयोग्य व्यक्तींना समान संधी मिळणार नाही.

हो. आत्ताच भाषण ऐकले. छान मुद्दे मांडले. आत्म निर्भर व्हायची गरज दिवसेदिवस वाढतच जाणार.

स्वातंत्र्यवर्धापनदिन >> +१

स्वातंत्र्यदिन 75वा की 76वा >> स्वातंत्र्यदिन असेल तर ७६वा, कारण १९४७ ला पहिला होता. एक वर्ष झालं तेव्हा १९४८ला दुसरा होता, या न्यायाने ७५ वर्षे झाल्यावर ७६वा हवा. वर्धापनदिन असेल तर ७५वा.

जितवा कितवा असेल तितव्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

नारीचा सन्मान करण्याचा विचार देऊन त्याचवेळी स्त्रीवरून शिव्या देण्याची मानसिकता चुकीची आहे हे पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून सांगणे हे भावले. संयुक्त कुटुंब पद्धतीत स्त्रियांनी केलेला त्याग आणि परिश्रम यांचीही दखल घेतली.

माझ्या तुमच्या जुळती तारा मधुर सुरांच्या बरसाती धारा
मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा

ह्या आशावादी ओळींसह

सगळ्यांनाच स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .

सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

सगळीकडे ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या जातायत. बहुदा अमृतमहोत्सवी वर्ष म्हटल्यामुळे तसा गोंधळ उडत असावा. स्वातंत्र्य मिळून जरी ७५ वर्षं झाली असतील तरी हा ७६ वा स्वातंत्र्यदिन आहे. भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजे ७५ वा वाढदिवस हे बरोबर आहे. पण स्वातंत्र्यदिन ७६ वा आहे. पहिला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट १९४७ होता. त्यामुळे ते गणित (२०२२-१९४७)+१ असं आहे.

स्वतंत्र भारताचा जन्मदिवस. मग तो स्वतंत्रतेचा काळ एक वर्षाने वाढला की स्वतंत्रतेचा पहिला वाढदिवस. स्वातंत्र्यकाल दोन वर्षे इतका वाढला की स्वतंत्रतेचा दुसरा वाढदिवस वगैरे...

वरील चर्चेच्या अनुषंगाने :-

'लाल किल्ल्यावरून' उर्फ 'लाल किले की प्राचीर से' पंतप्रधानांच्या हस्ते ध्वज फडकवण्याचा पहिला कार्यक्रम १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला असावा असे आपण सर्वच समजतो, पण तो पहिलावहिला कार्यक्रम पंडित नेहरूंच्या हस्ते १५ ला न होता १६ ऑगस्ट रोजी सकाळी झाला आहे !!!! ह्याच कार्यक्रमात पंडित नेहरूंच्या आग्रहावरून विख्यात सनईवादक बिस्मिल्लाह खान यांनी लाल किल्ल्यावर मंगल सनईवादन केले होते.

(संदर्भ - सर्व प्रत्यक्षदर्शी - तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचे Mountbatten Papers, त्यांची मुलगी Pamela Mountbatten हिचे पत्रवर्णन, सत्ता हस्तांतरणाच्या विविध कार्यक्रमांची प्रत्यक्ष जबाबदारी असलेले उच्चस्तरीय अधिकारी श्री एम एस रंधावा आणि श्री बद्रुद्दीन तैयबजी यांचे आत्मकथन)

Starting पॉइंट झीरो ,शून्य हा खूप महत्वाचा आहे.
तो विसरलात तर जगातील सर्व व्यवस्था कोलमडून पडेल.
संगणक पण चालणार नाहीत.

मी 'लाल किल्ल्यावरून' पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या झेंडावंदनाबद्दल लिहिले आहे !

<<शहात्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!>>
शहात्तरावे वर्ष म्हणायचे आहे का? दिन म्हणजे दिवस - ७५ दिन झाले असते तर शहातरावा दिन म्हंटले असते..