Submitted by writetonikhil on 19 April, 2022 - 02:28
तुम्ही म्हणा बंद संपूर्ण अयशस्वी झाला,
आम्ही ठासून सांगू तो यशस्वी झाला,
काहीही म्हणा… गोंधळ निर्माण झाला पाहिजे हे पक्के!
सब घोडे बारा टक्के….
तुम्ही म्हणा सरकार मधे कोणाचाच कोणाला मेळ नाही
आम्ही परस्पर विरोधी विधने करून सावरून घेऊ ह्यात शंका नाही
काहिही असो…. गोंधळ निर्माण झाला पाहिजे हे पक्के!
सब घोडे बारा टक्के….
तुम्ही आमचे धोटाळे रोज शोधून काढा
आम्ही तुमच्या मंत्र्याना अराजक भाषणे केली म्हणून अडकवू
कामकाज हेवो न होवो…गोंधळ निर्माण झाला पाहिजे हे पक्के!
सब घोडे बारा टक्के….
आमची शेते, आमच्या शाळा, आमच्या साखरेवर आमचाच डेळा
तुम्ही कितीही साय काढा… मलई होते आपोआप गोळा
विकास कामांचे टेंडर निघताच कामं झाल्याचे रबरी शिक्के
सब घोडे बारा टक्के…
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सही बात है!
सही बात है!
ऊस हे आळशी लोकांचे पीक आहे,
ऊस हे आळशी लोकांचे पीक आहे, मधून मधून कपाशी, सोयाबीन असे शेतकर्यांनी पीक घेतले पाहीजे असे कोणीतरी बोलले. नौ सौ चुहे खाके बिल्ली हज को चली रे रामा हज को चली.
छान..
छान..