Submitted by सुरेश on 22 April, 2014 - 08:56
वठलेलं एक झाड, ना फुल ना पालवी
वसंत, शिशिर काय, दोन्ही सारखेच घालवी
किती पक्ष्यांनी यावर आपली घरटी बांधली
किती वाटसरूंना याने दिली उन्हात सावली
पोरासोरांनी तोडून याची फळे चाखली
झोके बांधले किती, फांदी जरा न वाकली
आता झाडावर आहेत काही पिवळीशी पानं
नसा आठ्ल्यात आतून, झालंय सुष्क आणि जीर्ण
कुणी म्हणालं "कशाला वीज पडायची पहा वाट,
हातचं सरण जाऊन, येईल कोळसाच हातात
दोन दमडी येतील एवढी लाकडं आहेत अजून,
चार दिवस चुलीवर भाकर निघेल भाजून”
कधीतरी व्हायचं होतं शेवटी घडून गेलं
काल रात्रीच्या वादळात झाड उन्मळून पडलं
वादळातली मृतं जाळायला सरण कामी आलं
मयतांचं माहित नाही, झाड स्वर्गात गेलं
सुरेश नायर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आई ग्ग!!!
आई ग्ग!!!
अप्रतिम
अप्रतिम
छान.
छान.
फार सुंदर.
फारच सुंदर कविता.