Submitted by राजेंद्र देवी on 12 April, 2021 - 21:36
गुढी
उधळलास तू आयुष्याचा सारीपाट
पुन्हा भिजला हा नयनांचा काठ
दिली पुन्हा जुन्याच अश्रूंना वाट
आता कुणाची मी पाहू वाट
किती आठवू पुन्हा पुन्हा
जगलेले ते अनमोल क्षण
मोडली आयुष्याची चौकट
ना त्याला आता कोणता कोन
बदलून आयुष्याचा जोडीदार
घाव घातलास तो पण हळूवार
तुझ्या लेखी होता फक्त व्यवहार
हरपला मी जिवाभावाचा आधार
ठेऊन जुन्या स्मृतीवर कलश
अन पचवूनी कडूलिंबाचा मोहोर
जोडून पुन्हा संसाराची काडी
निर्धाराने उभारली आज गुढी
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कविता . प्रत्येकाला सुखी
छान कविता . प्रत्येकाला सुखी जगाय चा हक्क आहे.
धन्यवाद अमाजी
धन्यवाद अमाजी