मास्टर ऑफ स्किलःःः.
‘ प्रत्येक माणूस हा स्वतःच एक स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार असतो त्याला स्वतःला घडवण्यासाठी स्वतः कडील शक्ती पेक्षा अन्य कोणत्याही शक्तीची त्याला गरज भासत नाही किंवा ती त्याला बदलू शकत नाहीःःः.प्रा महेश पाटील
मास्टर ऑफ स्किल हा त्याच सत्यते वर आधारित मी लिहिलेला लेख आहे वरील विचाराचे जनक आणि आज ज्याच्या विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे अशी एक सामान्य व्यक्ती प्रा.डॉ. महेश पाटील ज्यांनी वरील विचार प्रमाणे स्वतःला घडवले आणि स्वतःच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार झाले. लहान पणापासून जीवनात काहीतरी वेगळे करण्याची उमीद बाळगून नेहमी प्रत्येक क्षेत्रात डोकावून पाहणारे आमी त्या क्षेत्राचा अनुभव घेणारे,स्वतःच्या जीवाची किंवा संकटाची पर्वा नकरता नेहमी धाडसाने पुढे पाऊल टाकणारे .प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संपादन करीत आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणारे ज्यांनी कधीही कुणाची मुजोरी स्वीकारली नाही असे स्वतःच्या मनाचा राजा. विविध क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करीत त्या क्षेत्रावर विजय प्राप्त करणारे महाराष्ट्रातील किंवा देशातील कदाचित त्या पहिल्या व्यक्ती असाव्यात एवढे ज्ञान त्यांनी लहान पानापासून आत्मसात केले आहे.
कित्येक क्षेत्रातील पदव्या ,भाषा ,ज्ञान कला,गुण अवगत करीत ते त्या क्षेत्रातील मास्टर बनले आहेत अशी सर्व गुण संपन्न व्यक्ती म्हणजे प्रा डॉ महेश पाटील हे आज हि सामान्य माणसा प्रमाणे आपले जीवन जगत आहेत त्यांना कोणत्याच गोष्टीचा स्वार्थ किंवा मोह नाही कि आपल्याकडे असणा- ज्ञानाची घमड नाही अगदी साधे पणाने जीवन जगणारे गृहस्थ गेले कित्येक वर्ष सामाजिक कार्यात सामान्य माणसाची सेवा करण्यात मग्न असतात अशा व्यक्तीच्या आयुष्याला खरी सुरुवात सन १९८७ पासून सुरु झाली आणि आज पर्यंत सतत शिकत रहाणे आणि त्या क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करणे हाच त्या मागचा उद्देश आहे .असे नेहमी म्हणत असतात अशी हि व्यक्ती प्रशिध्दी पासून खूप दूर आहे कोणताही स्वार्थ नाही किंवा गमवण्या सारखे काही नाही छत्रपती शिवरायांचे विचार सरणीचे आणि भगवान शिव ला मानणा- या व्यक्तीचा जीवन प्रवास खूप खडतर आणि संघर्षतुन झाला आणि त्यातून त्यांनी स्वतःला सावरले आणि घडले या सगळ्याचा जीवनपट त्यांनी आपल्या ‘ पाटलाचे पोर ङ्क या आत्मचरित्रातून उलगडले आहे. अशा सर्वगुण संपन्न व्यक्तीचा आम्ही घेतलेला वेद म्हणजे मास्टर ऑफ स्किल ........
माध्यमिक पर्यंत शिक्षण घेत असताना काही संकट निर्माण झाली आणि दहावीतून आपले शिक्षण अर्धवट सोडून ते स्वतःसाठी आणि कुटूंबासाठी प्रत्येक क्षेत्रात आपले नशीब अजमावू लागले मिळेल ते काम हसतमुखाने करत त्या त्या क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करून ते पुन्हा नव्या क्षेत्राकडे प्रस्तान करीत त्यामुळे फार काळ ते एका क्षेत्रामध्ये थांबत नव्हते आणि थांबवू शकेल असे एक हि क्षेत्र या भारतात उपलब्ध नव्हते त्यामुळे त्याचा प्रवास नेहमी नवीन क्षेत्राच्या दिशेनं चालू असे कशाचा स्वार्थ नाही कि काही गमावण्यासारखे नाही पण नेहमी शोध घेणे त्यावर संशोधन करणे आणि त्याचा निष्कर्ष काय हे जाणून पुढे नवीन क्षेत्राकडे प्रस्थान करणे हि त्याची नेहमीची सवय त्यामुळे अनेक भाषा अवगत करीत नको त्या क्षेत्रात जाऊन त्यांनी संशोधन केले आणि पुन्हा नव्या उमेदीने नव्या क्षेत्रात प्रदार्पण करीत सामान्य शेतक-च्या, बिगा-च्या कामापासून ते डॉक्टर, इंजिनियर ,वकील अशा उंच शिक्षित लोकांच्या क्षेत्राचे ज्ञान अवगत होण्यासाठी त्यांनी नव्याने शिक्षणाचे धडे गिरवले आणि ज्ञान आत्मसात केले ते सर्वगुण संपन्न ...... प्रा डॉ महेश पाटील (दत्ताजी किसन चव्हाण ) हे चिखलहोळ ता खानापूर जी सांगली येथिल क्रांती बहुद्देशीय संस्था व क्रांती समूह विटा, पंचमुखी ऑनलाईन , क्रांती नोकरी मार्गदर्शन , मास्टर माईंड क्लीनीक ,कायदे सह्वागार , अशा विविध सेंटर चे ते संस्थापक असून आजही ते स्वतःला सामजिक कामात वाहून घेत असतात आणि येणा- प्रत्येकाची समस्या सोडवण्यात व्यस्त असतात चेह-वर कोणत्याच प्रकारचा ताण नाही नेहमी समाधानी चेहरा आणि सामोरं बसणारी मंडळी त्याच्या वाणीवर, ज्ञानावर ,मंत्रमुगद होऊन स्वतःच्या जीवना बदल विचार करित त्याचा आदर्श घेताना दिसतात तेव्हा आमच्या सारख्या लेखकांना देखील वाटत कि अशा आदर्शवादी माणसावर आपण सुद्धा चार शब्द लिहून आपण सुद्धा त्याचे स्नेही आहोत हे व्यक्त करण्यासाठी शिष्याने गुरुसाठी केलेला छोटासा प्रयत्न ... ,,,,,
फार अपुरे व्यक्तिचित्रण वाटलं
फार अपुरे व्यक्तिचित्रण वाटलं. शुद्ध लेखनाकडे ही लक्ष द्यायला हवं.