Submitted by Nilesh Patil on 23 June, 2019 - 13:08
--ऐन वर्षाऋतूत--
ऐन वर्षाऋतूत हा कोण मास आला,
जरी काळ सरींचा पडे अनल ज्वाला..।
माय पृथ्वी सरींना भेटावयास आतुरली,
त्यावर मानवाचा किती अत्याचार झाला..।
झाड तोडूनी नव्याने नाही लावली झाडे,
हा हो कसला विकासाचा दुराचार झाला..।
ज्याने विकले देशाला तोच विरोधक झाला,
कसा देश विकणारा येथे सरकार झाला..।
कोण कुणासाठी अन का थांबेल येथे,
स्वार्थच मतलबींचा कसा सदाचार झाला..।
--निलेश पाटील,--
--पारोळा, जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३--
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कटु सत्य!
कटु सत्य!