"तो-शतशब्दकथा"
"साह्यब्या सारा गाव पाण्यासाठी कासावीस झालाय, निट इचार कर.. असला मौका बारबार न्हाय." त्यानं म्हटलं तसा साहेबराव विचारांत गढला.
"आन् म्या हा म्हणलून् तू माव्हं काम नाय केलं म्हंजी?" साहेबराव मनाशी ठरवून बोलला.
"आसं व्हणार नाय. आमी दिल्या शब्दाला जागतू, गद्दारी करीत न्हाय कधीच." त्यानं सांगितलं.
"कोण पायजेल?" साहेबरावानं विचारलं.
"आप्पासाहेब."
"भाऊशिवाय दुसरा कोणबी चालन का?"
"नाय, ह्यो तुकडा आप्पाच्या नावावर हाय."
"काय करावं लागन?" साहेबरावानं विचारलं.
"पुनवेच्या दिवशी त्याच्यावरनं 'नारळ उतरून' विहीरीत टाक."
पौर्णिमेच्या रात्री आप्पाची मयत करून गाव निघून गेलान् त्याचवेळी,
शिवारातल्या पाण्यानं काठोकाठ भरलेल्या विहीरीतलं चंद्रबिंब हसत होतं.
शेकडो वर्षांपासूनची वरती येण्याची 'त्याची' इच्छा पुर्ण झाली होती.
-आनंद/०३.०१.१८
जमलिये ... पु.ले.शु.
जमलिये ...
पु.ले.शु.
चान्गलिच जमलिये
चान्गलिच जमलिये
भारी!
भारी!
मस्त..जमलिये.
मस्त..जमलिये.
भारीच...
भारीच...
मस्त जमलीये!!
मस्त जमलीये!!
जोरदार !!
जोरदार !!
भारी लिहलय... आवडली कथा!
भारी लिहलय... आवडली कथा!
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
व्वा! मस्तच कथा आहे ही.
व्वा! मस्तच कथा आहे ही. मनापासून आवडली. पुलेशु
वा... सहीये... आजच वाचली....
वा... सहीये... आजच वाचली....
छान ...
छान ...
मस्त आवडली
मस्त आवडली
म्या पन आजच वाचली.. झ्याक
म्या पन आजच वाचली.. झ्याक जमलंय
जुई, सिद्धी, somu, पंडितजी,
जुई, सिद्धी, somu, पंडितजी, च्रप्स धन्यवाद