"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chann serial ahe
Pan murder vagere khup bayanak
Abhay satav cooma madhe gela ahe ase dakhvale pahije hote

धुरतला जगतापचा संशय आल्यामुळे त्याने मुद्दामहून त्याला जेवायले बोलावलं का?>>>> yesss !!जगताप ला आता खूप सांभाळून बोलायला पाहिजे..सदाशी .खोटं बोललेलं लक्षात ठेवायला लागत !

आता आज त्या मिबा चं काहीतरी दाखवायला पाहिजे कारण "आज रात्री आपण आपल्याच घरी जेवणार" असं म्हणाला होता . (सुटतोय का अडकतोय )>>>>>>

ते किरणच्या जीवावर बोललेला तो, किरणने टांग दिली. याचा स्वतःचा वकील असायला हवा. असल्या माणसांना लागतो कायम.

इथल्या काही प्रतिसादांची खूप गम्मत वाटते. टीका करायचा उद्देश वगैरे नाही पण गम्मत अशासाठी की इतरत्र मालिकात जे दिसते/घडते तेच इथे घडणार याचे आखाडे प्रतिसादात नकळत बांधले जातात. एका बाजूने मालिका वेगळी आहे याचे कौतुक आहे पण त्यात काय घडणार याचे अंदाज मात्र नेहमीच्या मालिकांसारखेच. या नेहमीच्या मालिकांनी एवढी गुंग मती केलीय की वेगळा विचार करणे सुचत नाही.

सुरवातीपासूनचे इथले प्रतिसाद वाचून केलेले हे निरीक्षण आहे. यात कोणाला व्यक्तिगत उद्देशून असे काहीही नाही.

दक्षिणाताई, हो सदा छानच आहे. पण त्याचं कौतुक केलेलंच आहे इथे. मिठबावकर दुर्लक्षित राहिला होता ना म्हणून मुद्दाम लिहिलं. Happy

ओहो एडिटर आहे का तो. मस्त उंचापूरा आणि हँडसम आहे की. तरुणपणी अॅक्टींग केली असती तर हिरोच शोभला असता. खरं तर त्याचे केस भारी आहेत. Happy

मिठबावकरचे पण फॅन्स तयार होणार बहुतेक इकडे ;).... मलाही त्याची बोलण्याची स्टाईल एकदम हटके वाटली. मस्त केलेय त्याने हे कॅरेक्टर.

रुद्रम मध्ये अगदी लहान सहान character किंवा गोष्टीना
पण उद्देश आहे. आजच्या भागात तर मढ मधल्या कुंड्यातल्या झाडांना पण काम मिळाले Lol

किरण बहुतेक नव्हे नक्कीच विवेकशीच बोलत होता. किरणचा बाॅस माखिजाही असू शकतो नाहीतर एवढ्या लोकांना टपकवल्यावर किरण म्हणतो तसं रागिणीलाच साॅफ्ट काॅर्नर का. झाडांना मोठा रोल होता आज Happy राव आणि मानसीला मूर्तीबद्दल माहिती असली पाहिजे कारण ते लगेच सटकले. सदा आणि जगतापचा वाद अपेक्षितच होता. मुक्ताचा ईमोशनल होण्याचा अभिनय अप्रतिम. वर कुणीतरी म्हटलय तसं, राची आई रोग झाल्याची लक्षणं वाचूनही असं वागत असेल म्हणजे मुद्दाम.

Raginichya aaiche reports pahun doctor mhanale ki tichi kalji ch karayala have. Mhanje aajaar khota nasava.

ललिता, त्या मधेमधे करणार्‍या झाडांना आज बरोब्बर जागी मधे आणले बर का. Happy

धुरत - जगताप चा आमना सामना छान दाखवला, अलंकारीक भाषा न दाखवता व लांब न दाखवता. धुरत नेहमीप्रमाणे मस्त अभिनय.

ललिता, त्या मधेमधे करणार्‍या झाडांना आज बरोब्बर जागी मधे आणले बर का >>> येस्स! Lol काल धुरत जगतापला शोधत बंगल्यात शिरतो तेव्हा त्या कुंड्या तिथे दिसल्या नाहीत म्हणताना माझ्या मनात आलंच की कुंड्या कुठे गायब झाल्या. Proud

कालचा आणि परवाचा एपिसोड म्हणजे वेगवान पटकथेतला एक ठहराव वाटला मला. बरेच दिवस प्रेक्षकांना `ऑन द एज ऑफ द सोफा' बसवलं, आता हा ठहराव आणि मग परत वेगवान घटना घडलेल्या दाखवतील. `नरेटिव कर्व`चा एक्सपरिमेंट!

धुरतने काल अप्रतिम काम केले.

फोन करणारे राव किंवा मानसी सुद्धा असू शकतील. कारण कामाचे नाव काढून ते दोघे लगेच कटतात. विवेक मात्र बसून राहतो. पण त्या तिघांपैकी कोणी एक थेट किंवा कोणामार्फत किरणपर्यंत पोचला हे नक्की.

किरणचा बॉस रागिणीला वाचवू पाहतोय त्यावरून तो माखिजा असण्याची शक्यता आहे, फक्त रागिणी व त्याची ओळख होणे व त्याला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटणे योगायोग् असावा.

धुरत अप्रतिम. जगताप शेवटी त्या रघुला पुरलेल्या खड्डयाकडे बघतो, तेव्हा सर्रकन अंगावर काटा आला. त्याच्या डोक्यात धुरतला मारण्याचा plan शिजतोय. तसं नको व्हायला. धुरत हवाच शेवटपर्यंत मालिकेत.

मिठबांवकरचं खरं नांव जयंत जठार - हल्लीचा आघाडीचा मराठी फिल्म एडिटर आणि माझा वर्गमित्र >>> अरे वा, नाटक डायरेक्ट पण करतात ते, मध्ये जुने दीपस्तंभ नव्याने आले होते रंगभूमीवर ते त्यांनीच डायरेक्ट केलेलं बहुतेक. त्या नाटकाची निर्मिती मुक्ता बर्वे आणि दिनू पेडणेकर यांनी केली होती.

धुरत आणि जगताप पोलीस स्टेशन मध्ये जाऊन काय सांगणार ? हे तर त्यांचं सिक्रेट मिशन होत ना ? फोन नक्कीच राव किव्वा विवेक ने केला आहे . मिठबावकरच काम केलेल्या जयंत जठार नेच नवीन नाटक ( खर तर पुनरुजीवित ) दीपस्तंभ चा डिरेक्शन केलाय. थोडक्यात मालिकेत मुक्ताच्या आजूबाजूला / बरोबरीने काम करणारे कलाकार/डिरेक्टर/लेखक घेतलेत बहुतेक Wink

या मालिकेचा लेखक गिरीश जोशी मुक्ता बरोबर काम केलेले ( नाटक फायनल ड्रॅफ़्ट- लेखन त्यांचंच डिरेक्शन त्यांचंच ) सुहास मुक्ता बरोबर " छापा काटा " नाटकात. ते नाटक मुक्ता बर्वे प्रोडक्शन च नाटक होत . त्यात तो तिचा प्रियकर होता आणि आता आलेलं दीपस्तंभ चा डिरेक्टर जयंत जठार मिठबावकर च्या भूमिकेत Happy

जगताप धुरतला मारणार नाही. कल शेवटच्या क्षणी धुरत जगतापकडे वळून पाहताना दाखवलाय. तो माफ करेल कदाचित.

हो, मीही जयंत जठारबद्दल काल वाचले. खूप हरहुन्नरी कलाकार आहे.

किरणला विवेकाचाच फोन आलेला असणार, कारण तो अरे तुरे करत बोलत होता, मानसी किंवा राव सरांना करेल अस वाटत नाही. किरण चा बॉस मखिजा surely. कारण तो अजूनही तिला वाचवतोय किंवा खेळावतोय

तो किरण काय कोणालाही अरे तुरे करु शकेल असा आहे. सरपोतदार अगदी चीड आणेल असं काम करतात. मालिकेचा दिड महिना झाला ना, हळो हळू क्लायमॅक्सकडे जाईल वाटतं.

किरण ला आलेला फोन राव किंवा मानसी चा असेल असं वाटत नाहिये.ईतकं साधं सरळ असेल मालिकेत असं ईतक्या दिवसांच्या एपिसोड मधुन तरी वाटत नाहीये..प्रेक्षकांना फसवण्यासाठी राव व मानसीला अचानक उठुन गेलेलं दाखवलं असु शकेल...कदाचित दुसर्याच कोणाचा असेल हा फोन.
रा ने डावा ला मूर्ती ला शोधण्यासाठी पैसे दिलेत. डावा मूर्ती चा शोध घेत आहे हे कोणालातरी कळलं असेल त्या माणसाने पण केला असु शकतो हा फोन.
रा ला न मारण्याचं कारण काय हे मात्र कळत नाहिये अजुन..तिची आई या मागे आहे आणि लेकीला मारु शकत नाहिये असं तर नाही ना Wink

दक्षिणाताई.. Lol

जगताप जाताना मढचा बंगला उघडाच टाकून गेलेला?? आणि त्या एवढ्या जड कुंड्या जगतापने खूण म्हणून रघूच्या प्रेत पुरलेल्या जागी नेऊन ठेवल्या की काय?? Lol त्यापेक्षा त्या सगळ्या माडांच्या झावळ्याच रचून ठेवायच्या तिथे.

सदा पटत नसूनही गप्प राहिल जगतापच्या बाबतीत. कारण तोही बऱ्याच गोष्टींबाबत अडकणार आहे असं जगतापच्या बोलण्यावरून वाटतंय. शेवटच्या त्याच्या नजरेवरून तसंच वाटलं.

Pages