Submitted by द्वैत on 9 February, 2017 - 06:07
ढोल वाजू लागले
अन् शंखनाद हे जाहले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
तेज थोडे मुखावरती
उसनवारी घेतले
वाढती काया (माया) लपवण्या
वस्त्र त्यानी बदलले
ते एकवचनी एकनिष्ट
आज पुन्हा जाहले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
जुने सारे विषय त्यानी
मग नव्याने मांडले
काम केले तीळ-
मात्र श्रेय घेण्या भांडले
ऐकुनी ती जुगलबंदी
कान पुन्हा फाटले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
भाबडे भुलती कशाला
नीट त्यानी ताडले
धर्म,भाषा,प्रांत,जाती
भेद किती पाडले
पेटता ही रणधुमाळी
धर्मराजे जाहले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
जाण तु आता जरा हे
काय भोवती चालले
कोण ढोंगी, कोण उपरे
कोण आहे आपले
कौल दे ऐसा कि आता
होवू दे सारे भले
पाच वर्षे झोपलेले
वीर पुन्हा जागले
कवी - द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच कि....
छानच कि....
हे राजकारणाशी निगडीत लिहिले आहे ना???
हो
हो
वा !!समयोचित आणि लय असलेली
वा !!समयोचित आणि लय असलेली कविता वाचून आनंद झाला.
जुने सारे विषय त्यानी
जुने सारे विषय त्यानी
मग नव्याने मांडले
काम केले तीळ-
मात्र श्रेय घेण्या भांडले
ऐकुनी ती जुगलबंदी
सुंदर रचना. अप्रतिम ..!
कान पुन्हा फाटले
धन्यवाद
धन्यवाद
सद्य परिस्थितिवर छान भाष्य
सद्य परिस्थितिवर छान भाष्य आहे......आवडली कविता
धन्यवाद
धन्यवाद