.

Submitted by वेडोबा on 21 October, 2016 - 11:21

.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बदल घडवुन आणावा लागतो. घराबाहेर पडा, नोकरी धंदा करत असाल तर नवीन छंद जोपासा. करत नसाल तर आधी आर्थिक स्वातंत्र्यासाठी नोकरी धंद्याचे पहा. ते सांभाळुन आपली आवडती कामे करा. बागकाम, लायब्ररी, समाजसेवा, छंद्वर्ग असे नवीन काही करा. जी नाती त्रास्दायक आहेत, ती कटाक्षाने दुर ठेवा. एकटेपणा हा नेहमीच वाईट नसतो. आजुबाजुला तापदायक मंडळी जोपासण्यापेक्शा एकांत बरा. वाचन करा, टिव्ही पहा, मुवीला जा, करण्यासारखे बरेच असते. काय करायचे आहे ते तपासा. आणि, येथे लिहित रहा.

माणसात असून पण एकटे का वाटते। अगदी रोजची कामे पण नको वाटतात करायला। कसलीही ओढाताण घाई गडबड नसलेल लाइफ जगायला आवडेल मला। पण ही अशी अवस्था थकव्यामुळे होतीय की काही आजारामुळे ते कळत नाही। सगळ्यात वाईट म्हणजे मुलांवर पण चिडचिड होते आणि नंतर मलाच अपराधी वाटत राहतं। वर्किंग वुमन्स किंवा मेन दोघानाहि अशा प्रकारचा त्रास होतो का आणि उपाय काय करावा।।
प्रतिसादाबददल धन्यवाद राया ।

अनेक वर्षे सततच्या कामाच्या (नोकरी) रुटीन मुळे असे होऊ शकते. मला वाटते तुम्हाला ब्रेकची जरुरी आहे. स्वत:साठी वेळेची जरुरी आहे. पण ब्रेक म्हणजे तसा नव्हे कि दोन चार दिवस सुट्टी काढली आणि सहलीला जाऊन आले. त्याने काहीही फरक पडत नाही. जमत असेल तर दीर्घ काळासाठी कामातून सुट्टी मिळते का पहा. आणि त्यानंतर ज्यात रस आहे असे काही करता येते का पहा.

अर्थात, कोणतीही पार्श्वभूमी माहिती नसताना केवळ अंदाजाने मी हे सगळे सुचवत आहे. कारण याला अनेक कारणे असू शकतात. बोलल्या सांगितल्या शिवाय कळणे मुश्कील आहे.

या धाग्यावर तुम्हाला वरती "संपादन" दिसेल त्यावर क्लिक करा. तिथे खाली "ग्रूप" मध्ये विविध ग्रुप्स दिसतील. "कोणाशीतरी बोलायचंय" सेलेक्ट करा.

मुलांवर चिड्चिड हे कॉमन आहे. मात्र कारणाशिवाय होत असेल तर ते चुक आहे. दुसर्या कुणाचा राग मुलांवर निघता कामा नये.

याला अनेक कारणे असू शकतात. बोलल्या सांगितल्या शिवाय कळणे मुश्कील आहे. - atuldpatil +1