गुढ-एक रहस्य कथा

Submitted by चेतन677 on 16 October, 2015 - 00:53

गुढ

इयत्ता सातवीचा निकाल लागला होता. अजिंक्य वर्गाबाहेर थांबलेल्या मुलींच्या घोळक्याकडे पाहात उभा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी ऐकु आले आणि तो थेट पळाला ते शिवमच्या घरी.....
"शिवम....ए शिवम...लवकर बाहेर ये..." तो ओरडला.
" व्वा,मित्रा आलास तु!! आणला का माझा निकाल?लवकर दे.आई यायच्या आत,लपवुन ठेवतो."
" शुभम,तु फक्त माझ्यासोबत चल." अजिंक्य अजुनही धापा टाकत होता.
"अरे पण कुठे ते तरी सांगशील?आणि निकाल कुठे आहे माझा?" शिवम.
पण अजिंक्य त्याचं काही ऐकायलाच तयार नव्ह्ता.तो त्याला ओढत घेऊन गेला ते थेट अमृताच्या घराकडे.....
बालवडीपासुन अमृता शिवमच्या वर्गात होती.शिवमला कधीची ती आवडली होती.पण एवढ्या वर्षांत त्याने कधी तिच्याशी बोलायची हिम्मतच नव्ह्ती केली.आणि आज ती हे गाव सोडुन चालली होती.कुठे ते शिवमला माहित नव्ह्तं....
..........................................................................................................................................................
आता या गोष्टीला बरीच वर्षे लोटली.शिवमने कॉम्प्युटर इंजिनिअरींग केले होते आणि नशीब आजमवण्यासाठी तो पुण्याला जायचे ठरवले.त्याचा जिवलग मित्र अजिंक्य सुद्धा पुण्यात जॉब करत होता.
पुण्यातल्या तळेगाव मध्ये अजिंक्य आता राहायला होता.अजिंक्यच्या मदतिने त्याने सगळीकडे रिस्युम दिले.पण जवळ जवळ एक ते दिड महिना झाला तरी काहिच झाले नाही.
"चिल, मिळेल रे....." आपल्या मित्राची समजुत काढत अजिंक्य म्हणाला.
"यार अजुन किती प्रयत्न करायचे?किती बेरोजगारी वाढली आहे." हताश होत शिवमने उत्तर दिले.
"चल आपण मस्त सिंहगडावर जाउन येऊत म्हणजे तुझा मूड पण ठिक होईल" अजिंक्य.
यावर शिवमने नाराजिनेच होकार दिला.
जायचे तर सिंहगडावर होते पण अजिंक्य हा आपल्या मित्राला पुर्ण पुणेदर्शन करायचे या दॄष्टीने निघाला.दुपारचे चार वाजत होते.सगळे लोक सिंहगड उतरत होते आणि हे शहाणे वरती चढत होते.परत यायला त्यांना अंधार पडणार होता.
दुपारचे चार वाजत होते.सगळे लोक सिंहगड उतरत होते आणि हे शहाणे वरती चढत होते.परत यायला त्यांना अंधार पडणार होता.शेवटी एकदाचे ते गडावर पोहोचले.सोबत आणलेली मिसळपाव त्यांनी खाल्ली.
" शिवम,असं म्हणतात की मेलेल्या लोकांचे आत्मा अश्या गडावर भटकत असतात.जरा लक्ष असु दे हा." अजिंक्य हसत म्हणाला.
"माझा अश्या फालतु गोष्टींवर विश्वास नाही.आता थोडा वेळ आराम करुयात." शिवम.
पंधरा-विस मिनिटे झाली असतील.इतक्यात आपल्या बाजुला अजिंक्य नाही हे पाहुन शिवम दचकलाच.
"अजिंक्य? अजिंक्य" शिवम त्याला इकडे तिकडे शोधायला लागला.
इतक्यात पाठिमागुन कुणितरी त्याच्या खांद्यावर हात टाकला.
"अजिंक्य, हा काय पोरखेळ चालवलाय" असं म्हणत शिवम मागे वळाला तर तिथे अजिंक्य नव्ह्ताच!!! अचानक त्याच्या समोर एक केस विस्कट्लेला चेहरा आला.शिवम खुप घाबरला आणि मोठ्याने किंचाळला.
"शिवम,शिवम अरे जागा हो आपल्याला उशिर होतोय." अजिंक्य त्याला झोपेतुन जागे करत होता.
"अजिंक्य तु?? तु कुठे गेला होतास आणि ती??" शिवमला काय बोलावे तेच समजत नव्ह्ते.
"अरे काय बोलतोस शिवम?मी कुठे जाणार? मी तर इथेच झोपलो होतो ना.आणि कोण मुलगी?" अजिंक्य जरा वेळ बोलायचे थांबला आणि अचानक हसायला लागला.
"शिवम,तुला काय अमृताची आठवण आली कि काय!!!" अजिंक्य अजुनही हसत होता.
'ते स्वप्न होते तर...' शिवम मनातच म्हणाला आणि त्याने सुट्केचा निश्वास टाकला.
"बाय द वे शिवम्, अमृता कुठे गेली काय माहिती आहे का तुला?"गड उतरताना अजिंक्यने विचारले.
"माहित नाही यार..तिच्या वडिलांची बदली झाली आणि ती कुठे गेलि काय माहित.." शिवम.
"खुप प्रेम करायचास ना तिच्यावर?" अजिंक्य ने पुन्हा प्रश्न केला.
त्यावर शिवम एकदम शांत झाला.आणि त्याने उत्तर दिले...
"माहित नाही. मे बी तिला दुसर कुणि मिळालं असेल"
रात्रीचे आठ वाजत आले होते.आज दोघेही खुप दमले होते.म्हणुन एकदम गाढ झोपी गेले.
सकाळी शिवमला एक मेल आला.एका कंपनीने त्याला इंटरव्हुसाठी बोलावले होते.शिवम लगेच तयारीला लागला. आणि लगेच कंपनीत कॉल करुन इंटरव्हुसाठी वेळ पक्की केली.
"Excuse me, मी इंटरव्हुसाठी आलोय" reception जवळ येत शिवम म्हणाला.
" तुम्ही थोड्या वेळ वेट करा" असं म्हणत receptionist ने शिवमला बसायला सांगितले.
शिवम तसाच खाली बसला.वर डोकवुन पाहिले तर काय तिथे कोणिही नव्हते.ते पाहुन शिवम दचकला.थोड्यावेळापुर्वी असलेले सगळेजण अचानक कुठे गायब झाले? याच शिवमला आश्चर्य वाटत होते.
तो उभा राहिला.तेवढ्यात शेजारच्या ऑफिसमध्ये कुणितरी असल्याचा त्याला भास झाला.तो तसाच त्या रुममध्ये गेला.कुणाच्यातरी रडण्याचा आवाज येत होता.
खोलित पुर्ण अंधार होता.तो त्या रडणार्या व्यक्तीजवळ गेला.शिवमने त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला तोच त्याला केस विस्कटलेला चेहरा दिसला.शिवम खुप घाबरला.
" Excuse me,hello??" या आवाजाने शिवमचे लक्ष वेधले.
" काय झालं? ए.सी. चालु असंताना तुम्हाला एवढा घाम कसा काय सुटला??" ती receptionist होती.
'पुन्हा भास झाला.' शिवम मनातल्या मनात पुट्पुटला. आपल्यासोबत असे का होत आहे.
सिंहगडावरुन आल्यापासुन काहितरी वेगळंच शिवम सोबत घडत होतं.सारखं तिच केस विस्कट्लेली तरुणी त्याला दिसत असे...
घरी गेल्या गेल्या त्याने ही हकिकत अजिंक्यला सांगितली.तो मोठ्याने हसायलाच लागला.
"यार ती सिंहगड्वाली आयटम तुझा पिच्छा सोडत नाहिये वाटतं." अजिंक्यच हसणं काही थांबत नव्हतं.
" तर मेन लोच्या असा आहे की तुझ्यावर प्रेम करणारं आपला माणुस पाहिजे" फिल्मी स्टाइल मध्ये अजिंक्य शिवमला म्हणाला.
" काय यार चुकिच्या वेळेला चुकीचे डायलॉग नको रे मारुस..." शिवम शांतपणे म्हणाला.
" अरे खरं तेच सांगतोय मी.अरे तुला जे भास होतात ना त्याचा अर्थ असा आहे की तुला कुणीतरी हवं आहे.तुझ्यावर प्रेम करणारं.तुझी काळजी घेणारं.." अजिंक्य शिवमला समजावत होता.
" पण त्याच्यासाठी एवढे भयानक भास???" शिवम एकदम शांत झाला.
" आता जाऊ दे ना...चल जेवण करुत.." अजिंक्यने विषय बदलला.
तीन दिवस झाले होते.कोणत्याच कंपनीचा काहीच रिप्लाय आला नव्ह्ता.ज्या कंपनीत इंटरव्हु दिला तिथुनही काहीच कळाले नव्हते.शेवटी शिवमने आपले बाडबिस्तर बांधले.
"शिवम,अरे कुठे चाललास? पुन्हा पिकनिकला जायचय का आपल्याला!!! व्वा मस्त..पण मग मला सांगितलं का नाही?"
अजिंक्यने विचारले.
शिवम एकदम शांत झाला.
"अजिंक्य, एवढ्या दिवस तु माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्द्ल धन्यवाद!!मी गावाला चाललोय परत." शिवम.
" तुला नेमक म्हणायचं काय?" कपाळावर आठ्या आणत अजिंक्यने विचारले.
" अजुन काय म्हणु....तीन दिवस झाले त्या कंपनीत इंटरव्हु देऊन त्याचा काहिच रिप्लाय नाही.जिथे रिस्युम दिलेत त्यांचा तर पत्ताच नाही. दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन वाटल पुण्यात तरी जॉब मिळेल पण काय ऊपयोग त्या फस्ट क्लास डिस्टिंक्शन मार्कस मिळवुन....." शिवम एकदम शांत झाला.
"झालं तुझ बोलुन्??की अजुन काही बाकी आहे?अरे काय तु तुला आठवतं लहानपणी तुला झाडावर चढता येत नाही म्हणुन सगळी मुलं तुला चिडवायचे तेव्हा किती जिद्दीने तु प्रयत्न करायचास.आणि कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत धडपड करत राहायचास....आणि आता??" अजिंक्य त्याला समजावुन सांगत होता.पण त्याचे भाषण थांबले ते शिवमला आलेल्या फोनमुळे.
"हॅलो...." असं म्हणत शिवम एकदम शांत झाला
"शिवम काय झालं? कुणाचा फोन होता?" अजिंक्यने सवाल केला.
" याहू................त्या दिवशी इंटरव्हु दिलेल्या कंपनीत माझ सिलेक्शन झालंय..." शिवम आनंदाने ओरडला.
आणि ते उदास वातावरण अचानक सुखमय झाले.
सोमवारपासुन शिवमला कंपनीत बोलावले होते.
शेवटी तो दिवस आला.कंपनीत सगळ्या फॉरम्यालिटीज झाल्यानंतर त्याला डेव्हलोपमेंट डिपार्टमेंट देण्यात आले.
तिथल्या मॅनेजरने शिवमचे स्वागत केले.
"वेलकम मि. शिवम चला मी तुम्हाला तुमच काम समजुन देतो." मॅनेजर.
असं म्हणत तो शिवमला काहीतरी सांगत होता.इतक्यात एका मंजुळ आवाजाने शिवमचे लक्ष वेधले.
"सॉरी सर जरा उशीर झाला." ती तरुणी म्हणाली.
तिचे केस वार्यावर भुरभुर उडत होते.तिचे नाक पोपटासारखे लांबट होते चेहरा निमुळता होता.तिच्या निळ्या डोळ्यांकडे सारखे पाहावेसे वाटे. तिच्या गुलाबी गालाकडे शिवम पाहातच राहीला.ती तरुणी स्वर्गातुन आलेली अप्सराच वाटत होती.
"शिवम मी तुमची ओळख करुन देतो.ही स्वरांजली तुमच्याच टीममध्ये काम करेल.आणि स्वरा,हा शिवम.आजच नविन आलेत"
मॅनेजर ओळख करुन देत म्हणाला.
"हाय" शिवम लगेच बोलायला पुढे सरसावला. पण स्वरा तशीच निघुन गेली.
"शिवम, तिच्या वागण्याचं वाईट नको वाटुन घेऊस.तशी ती एकदम फ्री आहे.पण त्या घटनेनंतर ती अशी झालीये."मॅनेजर.
"अशी कोणती घटना घड्लीये तिच्यासोबत??" शिवमने सवाल केला.
" अॅक्चुअली तिची एक मैत्रीण होती.इथेच काम करत होती.जिच्या जागेवर आता तु काम करणार आहेस."
"तिचं काय झालं?" मॅनेजरचे बोलणे पुर्ण व्हायच्या आत न राहवुन शिवम ने प्रश्न केला.
" ती नाहीये या जगात.एका दुर्दैवी घटनेत तीच निधन झालं.तिच नाव........" इतक्यात मॅनेजरला कुणाचा तरी फोन आला.
आणि तो तसाच निघुन गेला....
आता शिवमदेखिल स्वरासोबत त्यांच्या टीम मधला एक मेंबर होता.
" मस्त हॉट आहे ना स्वरांजली...." या आवाजाकडे शिवमचे लक्ष गेले.
"Excuse me???" शिवम.
तोच समोरुन एक तरुण त्याच्याकडे येत होता.त्याचे डोळे लाल झाले होते.बहुतेक तो रोज निदान एकतरी बियर घेत असेल यात अजिबात शंका नव्ह्ती.आणि कदाचित कालची त्याची अजुन उतरली नव्हती.
"प्लीज तुम्ही जरा नीट बोला.." शिवम जरा मोठ्यानेच म्हणाला.
तोच एक तरुणी शिवमच्या कानात कुजबुजली.
"तो संदीप आहे.आपला टीम लीडर...जरा सांभाळुन नाहीतर बॉस कडे तक्रार करेल तो तुझी."
"का? बॉसचा काय जावई आहे का तो?" शिवमने रागातच विचारले.
"सांगायला वाईट वाटतं...पण होणार आहे तो आपल्या मॅनेजरचा जावई..." ती तरुणी म्हणाली.
" इथेच आमची एक मैत्रीण होती.आमच्यासोबत काम करायची बिचारी खुप प्रेम करायची संदीपवर पण....गेली ती..." तरुणीचे डोळे भरुन आले.
" ए काय चाललय तुमचं आणि जरा कामाला लागा..चला..." संदीप.
शिवमने आतापर्यंत सगळ्यांची ओळख करुन घेतली.आता बाकी होती ती फक्त स्वरांजली.स्वराच्या जागेशेजारीच शिवमची जागा होती.शिवम हळुच तिथे गेला.
" हाय मी शिवम...आजच जॉइन झालोय." शिवमनेच सुरुवात केली.
"हिम्मत कशी झाली माझ्या मैत्रिणीची जागा घ्यायची?ही जागा तिची आहे.." ती मोठ्याने ओरडली.
सगळे शिवम आणि स्वराकडे पाहत होते.शिवम आपले काही चुकले का याचा विचार करत होता.
" आय अॅ म सॉरी.मला असं बोलायचं नव्हतं" असं म्हणत स्वरा तिथुन निघुन गेली.
संध्याकाळ झाली होती.शिवमने दिलेले काम आटोपले.आणि तो आता घरी जायच्या तयारीत होता.
" तिच्या अशा वागण्याचा जास्त विचार नको करुस.तुझी काही चुकी नव्हती." मघाचीच ती तरुणी शिवमकडे येत होती.
" हाय मी शैलजा" तिच्या या बोलण्यावर शिवमनेही हाय केला.ती खुप वेळेपासुन शिवमला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती.पण कामाच्या नादात सांगत नव्ह्ती.
" पण तु इथे येऊन खुप मोठी चुक केलीये.." तिच्या तोंडुन असं ऐकल्यावर मात्र शिवम काळजीत पडला.इथं नेमकं काय चाललय हे जाणुन घ्यायची शिवमला देखील उत्सुकता होती.
"तु पेपर नाही वाचत का?" शिवमच्या कपाळावरच्या आठ्यांकडे पाहात शैलजा म्हणाली.
" का? वाचतो ना रोज कुठे जॉब आहेत ते कायम शोधत असायचो.पेपर आणि इंटरनेट वापरतो म्ह्णुन तर या कंपनीत vaccancy असल्याचे समजले ना...म्हणुन तर हा जॉब मला मिळालाय.." शिवमने एकदम खुशित उत्तर दिले.
" पण तुझ्याच अगोदर याच कंपनीत याच जागेवर आतापर्यंत ४ जण येउन गेलेत.त्यांच काय झालं माहित आहे का तुला?" शिवमच बोलणं मध्येच थांबवत शैलजा म्हणाली.
" जरा समजेल अश्या भाषेत काहीतरी सांगशील का?" शिवम आता पुरता वैतागला होता.
आणि त्यानंतर त्याला शैलजाकडुन जे काही समजले ते ऐकुन शिवमला धक्काच बसला.
ज्या निधन झालेल्या तरुणीच्या जागेवर शिवम आला होता त्या जागेवर आधीही कोणितरी होते. ते ४ तरुण ज्यांचा एकानंतर एक असा मृत्यु झाला होता.त्यांनी आत्म्हत्याही केली नव्हती की कोणि त्यांना मारले नव्हते. त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे कुणालाच समजले नव्ह्ते. पण मरताना सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट सारखीच होती ते म्हणजे त्यांचे डोळे आणि तोंड उघडे होते.कदाचित त्यांनी काहीतरी भयानक पाहिले होते.
" सगळेजण असे म्हणतात की तिच्याच आत्माने त्या सर्वांना मारलेय.आता ती तुलाही नाही सोडणार." शैलजा पुढे म्हणाली.
" तिचा मृत्यु नेमका कसा झाला? आणि नाव काय होतं तिचं??" मध्येच शिवमने विचारले.
" अरे शिवम, शैलजा तुम्ही अजुन इथेच?ओव्हरटाइम करायचा विचार आहे काय?" या आवाजाकडे दोघांचे लक्ष गेले.
ते त्यांचे मॅनेजर होते.
" सर मी निघालेच" असं म्हणत शैलजा निघुन गेली.
"सर मी तुम्हाला एक विचारु?" हळु आवाजात शिवम म्हणाला.
" अरे शिवम आज तुझा पहिलाच दिवस ना जा जरा घरी जाउन आराम कर.." असं म्हणत मॅनेजर निघुन गेला.
शैलजा सांगत होती की आपल्याला जसे स्वप्न पडायचे तसेच स्वप्न त्या चार तरुणांना पडत असे. आपल्याला पडणारे स्वप्न, त्या चौघांचा मृत्यु तसेच त्या आधी झालेला त्या तरुणीचा मृत्यु या सर्वांमध्ये काहीतरी गुढ लपले होते.कशाही परिस्थीतीत हे गुढ सोडवायचे असे शिवमने मनात पक्के केले आणि तो त्या तयारीला लागला.................
घरी गेल्या गेल्या शिवमचे विचारचक्र सुरु झाले.अजिंक्य अजुन आला नव्हता.
" हॅलो अजिंक्य?कधी येणार आहेस तू?" अजिंक्यला फोन करत शिवमने विचारले.
"अरे मला उशीर होईल तु जेवण करुन घे." अजिंक्यने उत्तर दिले.
" अरे ऐक ना...रद्दीचे पेपर कुठे ठेवलेत तु?" शिवमने विचारले.
" अरे मागच्या रुममध्ये कोपर्यात असतील बघ.पण तुला काय करायचय? रद्दीला देतोस का पेपर्?सकाळी येणारा रद्दीवाला सायंकाळी कसा काय उगवला??" अजिंक्यची बडबड सुरु झाली.
पण तोपर्यंत शिवमने फोन ठेवला होता.
शिवमने मागचे पेपर चाळायला सुरुवात केली.आणि गुढ उकलायला सुरुवात झाली.शैलजाने सांगितले त्याप्रमाणेच त्या कंपनीतल्या त्या चौघांच्या मृत्युची बातमी होती.कंपनीत जॉइन झाल्याच्या दर २० दिवसानंतर त्यांचा मृत्यु झाला होता.आणि तेही भीतीने ह्र्दय बंद पडुन.पण त्यांनी नेमकं काय पाहीलं होतं याचं उत्तर अजुन शिवमला मिळाले नव्हते.
जॉबला लागुन आता शिवमला आठवडा झाला होता.स्वरांजलीसोबत हळुहळु त्याची मैत्री वाढत होती.स्वराला तिच्या त्या मैत्रिणीबद्द्ल कधीही विचारायचे नाही असं शिवमने ठरवले होते.कदाचित स्वरांजली शिवमला आवडत होती.पण शिवम ते मान्य करायला तयार नव्हता.कारण आधीच त्याला कुणितरी आवडले होते ती म्हणजे त्याची अमु---अमृता.पण तिला नेमक शोधायचं तरी कसं आणि कुठं? हा पण खुप मोठा प्रश्न होता. शिवमला जॉबही चांगला लागला होता आजपर्यंत केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे शिवमला वाटत होते.
रात्री नेहमीप्रमाणे शिवम घरी आला.त्याला कोणाचातरी फोन आला होता.तो त्याच्या गावावरुन होता.शिवमची आई खुप आजारी असल्याचे त्याला समजले.जाणे भाग होते. अजिंक्यने त्याची समजुत काढली.
शिवम गावाला गेला.खुप दिवसांनंतर शिवमला पाहुन त्याच्या आईला खुप आनंद झाला.शिवमने त्याच्या आईची चांगली काळजी घेतली. पाच दिवसांत ती बरी झाली.शिवमला लगेचच आपल्या जॉबवर परतायचे होते आणि लवकरच तो पुण्याला निघाला.
"शिवम, अरे अमृता भेटते का तुला?" आईने जाता जाता शिवमला विचारले.
" ती मला कसं भेटेल?" आश्चर्याने विचारले.अरे खुप दिवसांपुर्वी तिचे वडिल आले होते गावात.त्यांच काहीतरी काम होतं.मला शाळेजवळ भेटले.त्यांची जागा कायतरी विकणार होते.म्हणत होते की आता अमृताच्या लग्नाला पैसे नकोत का?सध्या पुण्यालाच असतात म्हणे आणि अमृतापण मोठ्या आयटी कंपनीत कामाला आहे म्हणे." आई सांगत होती. ते ऐकल्यावर शिवमचा चेहरा खुलला.
"कधी आले होते ते? एक महिन्यापुर्वी का? कि...." शिवम खुप उत्सुकतेने विचारत होता.
"अरे एवढी काय उत्सुकता तुला? त्याला आता एक वर्ष झालं असेल?"
"काय?" शिवम ओरडलाच. "मग तु आता एवढ्या उशीरा का सांगत आहेस मग? आणि मी कुठे होतो तेव्हा?"
" अरे पण तुला का एवढी माहिती हवी आहे.आणि तेव्हा तु जॉब शोधत होतास ना.पण तुला नेमकं काय करायचं होतं? बाई त्या पोरीच्या मागावर तर नव्ह्तास ना!!!" आई.
" अगं कायपण तुझं...चल मी जातो आता..आणि परत आजारी नको पडुस." स्मितहास्य करत शिवम म्हणाला.
शिवम कधी ही आनंदाची बातमी अजिंक्यला सांगु असं त्याला झालं होतं.
तीन तासांत शिवम पुण्यात आला.आज रविवार होता.अजिंक्य घरीच होता.
"च्या मारी!!!!याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा!!!!" अजिंक्य जोरात किंचाळलाच.
" अजिंक्य अरे ती पुण्यात आहे एवढ्च समजलं." शिवमचा चेहरा उतरला होता.
" अरे उसमे क्या आगे का पता हम ढुँढ लेंगे." अजिंक्य म्हणाला.
"यार पण एवढ्या मोठ्या पुण्यात कसं काय शोधणार तिला?" शिवम
" किसी चीज को अगर....." अजिंक्यचे फिल्मी डायलॉग सुरु झाले. पण शिवमने त्याला मध्येच थांबवलं.
" बर ते जाउदे. तु आल्याच्या खुशिमध्ये आपण आता खाउयात मस्त पुणेरी मिसळ पाव". अजिंक्य.
................................................................................................................................................................................
सकाळी नेहमीप्रमाणे शिवमचं रुटीन चालु झालं.आज जरा लवकरच तो कामाला गेला. तिथे गेला तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वास राहिला नाही. संदीप आणि स्वरांजली हातात हात घालुन बसले होते.अजुन कोणिही आले नव्हते.
शिवमला पाहताच स्वराने हात बाजुला घेतला.क्षणभर शांतता पसरली.आणि स्वरा तिथुन निघुन गेली.शिवम रागाने संदीपकडे पाहात होता.
" काय राव आमच्या पाखरावर नजर होती तुमची!!!!" संदीप.
" काय म्हणायचं काय आहे नेमकं?" शिवमने शांतपणे विचारले.
"मग एवढ्या दिवस हालचाली ठीक दिसत नव्ह्त्या तुझ्या.आता तुझा पता कट!!" संदीप.
"मॅनेजरचा होणारा जावई आहेस ना तु?" शिवम .
" कोण म्हणालं? ती शैलजा म्हणाली वाटतं.मॅनेजरच्या पोरीसोबत एक दिवस बाइकवर काय पाहिलं, शैलजाने मला मॅनेजरचा जावई बनवला.." संदीप हसत म्हणाला.
" हे तु ठीक करत नाहीयेस.मॅनेजरच्या मुलीसोबत आणि स्वरांजली सोबत..." शिवम.
इतक्यात त्यांना मॅनेजर आत येताना दिसले.
" थांब आत्ताच तुझे प्रताप मॅनेजरना सांगतो.की तुमच्या मुलीला फसवतोय हा" शिवमचा रागाचा पारा चढला होता.
" नक्किच जा सांग." हसत संदीपने उत्तर दिले.
शिवमही मॅनेजरकडे निघाला.
" गुड मॉर्नींग सर..." शिवम.
" ओह. मि शिवम. तुम्ही आज कंपनीत कसे?" मॅनेजरने सवाल केला.
" सॉरी मी समजलो नाही काही." शिवम
"अरे तु आता इथे जॉबला नाहीस.तुला काढुन टाकण्यात आलंय" मॅनेजरने सांगितले.
"पण कारण समजु शकेल का की काय चुकलय माझं" शिवम.
" सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा performance नीट नाही आणि अजुन बरंच काही संदीपने सांगितलय मला सगळं.." असं म्हणत मॅनेजर आत निघुन गेला.
"अजुन काय काय सांगितलस बॉस ला?" शिवमला आता आपला राग अनावर होत होता.
"हेच की गेले चार पाच दिवस तु नशेत पडला होता आता नीट झाला" असं म्हणत संदीप हसायला लागला.
शिवमला आता जाण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. शिवम तिथुन बाहेर आला.इतक्यात त्याच्या मागुन कोणितरी हाक मारत असल्याच त्याला जाणवलं.ती शैलजा होती.
" मला माहीत आहे शिवम की तुझी काहीच चुक नाही.सगळं त्या संदीपमुळे झालंय.तुला स्वरांजली खुप आवडायची ना म्हणुन त्यानं तसं केलंय.काय जादुटोणा केलाय त्याने तिच्यावर काय माहीत.त्याच्या ताब्यातच आलीये ती आता.
अमृतालापण असंच जाळ्यात ओढलं होतं त्याने.."
" काय म्हणालीस कोण ती?" शैलजाच बोलणं मध्येच थांबवत शुभम ने विचारले.
"अरे अमृता साने.मस्त मुलगी होती रे.स्वराची बेस्ट फ्रेंड." शैलजा बोलतच होती.आणि शिवमच्या डोळ्यांतुन पाणी वाहु लागले.
कारण ती तीच होती.शिवमची लाडकी अमु.. ती इथेच कामाला होती हे आज शिवमला समजलं.ती आपल्या कामात एकदम हुशार होती.आणि तिची बढतीही होणार होती.पण अचानक तिचा मृत्यु झाला आणि सगळंच संपलं.
" पण तिचा मृत्यु कसा झाला?" शिवम ने पुन्हा सवाल केला.
" त्याच काय झालं...." शैलजा काहीतरी बोलणार तेवढ्यात तिला आतुन बोलावणे आले.
" सॉरी मला जायला हवं"
" अगं पण ती कसं काय......" शिवम अजुन काही विचारणार तेवढ्यात शैलजा आत निघुन गेली.
शिवम थोड्यावेळ तसाच स्तब्ध उभा राहीला आणि परतीच्या वाटेवर निघाला.
" उशीरा कसं काय?? कधीची वाट पाहतोय तुझी. आणि तुझा मोबाइलपण स्विच ऑफ आहे..काय झालंय चेहरा का उतरलाय तुझा?" अजिंक्य.
"अरे एक सांगायचं होतं तुला...." शिवम
"काय झालंय नीट सांगशील!!!" अजिंक्य
" अरे अमु सापडली.." शिवम.
" व्वाव ग्रेट न्युज आहे यार.पण कसं काय अचानक भेट झाली वाटतं हो ना??" अजिंक्य उत्सुकतेने विचारायला लागला.
" यार....." शिवम बोलायचं थांबला.
" अरे लवकर सांग!!!!" अजिंक्यला राहवत नव्हते.
" यार अमृता नाहीये आता या जगात.." असं म्हणत शिवमने त्याला घडलेली हकीकत सांगितली.
" पण कसं काय घडलं हे? काही माहीत आहे का तुला?" अजिंक्य.
यावर शिवमने नकारार्थी मान हरवली.
" यार खुप उशीर झालाय मी आता झोपतो असं म्हणत तो तिथुन निघुन गेला.
काहीवेळ तो तसाच अमृताचा विचार करत बेडवर बसला होता.तेवढ्यात एक वार्याची झुळुक आली आणि एक पेपर त्याच्याजवळ आला.तो खुप जुना पेपर होता.
"यार हा अजिंक्य पेपर तर वाचत नाही मग आणतोच कशाला.उगीच रद्दी जमवुन ठेवलीये." मनात असं म्हणत त्याने तो पेपर उचलला.त्यात जे लिहले होते त्यावर त्याचा विश्वास बसेना.त्यात अमृताच्या मृत्युची बातमी होती.
अमृता साने हीचा सिंहगडावरुन पडुन मृत्यु झाला होता!!!!!!!!!! आणि विशेष म्हणजे तुच्यासोबत कोणीही नव्हते.
'असं कसं?? कोणिही सिंहगडावर एकटं कसं काय जाईल? नक्कीच स्वरांजलीच काम असणार हे..कदाचित स्वराला संदीप आधिपासुन आवडत असंणार...म्हणजे तिच ते उदास होणं वगेरे सगळं खोट होतं की काय???' शिवम स्वतःच वेगवेगळे तर्क करत होता.तेव्हा अचानक त्या पेपरमधुन हात आले आणि त्यांनी शिवमचा गळा दाबला.शिवम डोळे फाडुन बघतच होता.पुन्हा त्याला तोच केसांनी विखुरलेला चेहरा दिसला आता मात्र शिवमची शुद्ध हरपली.आणि शिवम बेशुद्ध झाला.
जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो चक्क सिंहगडावर होता. शिवमला धक्यांवर धक्के बसत होते.तिथे कोणीही नव्हते. तो फक्त एकटाच होता.अचानक त्याला कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला तो त्या दिशेने धावला.पण तिथे कोणिही नव्हते. शिवमचे शरीर घामाने ओलेचिंब झाले होते.आणि तो मागे वळाला तोच तो मागे वळाला.अचानक त्याला पुन्हा तोच चेहरा दिसला. कोण आहेस तु? आणि मला का सतावत आहेस.तेवढ्यात कुठुनतरी वार्याची झुळुक आली. आणि तिच्या चेहर्यावरचे केस दुर झाले.आता शिवम तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता.शिवमने नीट पाहिले...
" अमृता!!!!" शिवम आश्चर्याने ओरडलाच..एवढ्या वर्षांनंतरही शिवम तिला ओळखु शकला.
" हे सगळं काय आहे?" शिवम
" तिला वाचव शिवम.." अमृता.
" तिला कोणाला?"
" स्वराला वाचव त्याच्यापासुन..नाहीतर जसं त्याने मला मारले तसं तो तिलाही मारेल.." अमृता.
" कोण?? मला सांग कोण आहे तो? का आणि कसं मारले त्याने तुला??" शिवम मोठ्याने ओरडला.
तेवढ्यात अमृताने आपला हात पुढे केला.आणि शिवमला त्याचा हात आपल्या हातावर ठेवण्याचा इशारा केला.
शिवमने तिच्या हाताला स्पर्श केला तोच त्याला करंट बसल्याचे जाणवले.त्याने डोळे उघडले तेव्हा तो तिथे एकटाच होता. अमृताची आत्मा तिथुन गायब झाली होती. इतक्यात त्याला कुणाचातरी बोलायचा आवाज आला...
" हॅपी बर्थडे टु यु.....हॅपी बर्थडे टु यु.....हॅपी बर्थडे डियर अमृता....हॅपी बर्थडे टु यु"
त्याने नीट पाहिले तर तो संदीप होता आणि त्याच्या सोबत होती ती अमृता!!!
"यार काय सरप्राइज दिलंय तु मला खरंच खुप आनंद झालाय!!!"अमृता संदीपला सांगत होती.
" मग म्हटलं की आपण मोठ्ठ सरप्राइज द्यावं...म्हणुन घेउन आलो मी तुला इथं सिंहगडावर...आता फक्त आपण दोघेच आहोत...." संदीप हसत म्हणाला.
" जानु मी खरच खुप खुश झाले...आय लव यु सो मच..." अमृता खुप खुश होती.
" चल तिथे कडावर जाउन टायटनिक पोझमध्ये एक फोटो काढुयात" संदीप.
त्यावर अमृता तयार झाली.
अमृता एकदम कडेला उभी राहिली. तेवढ्यात संदीपने तिला खाली ढकलले.
अमृता हवेत अधांतरी लटकत होती आणि तिचा फक्त एक हात संदीपच्या हातात होता.
" संदीप हे काय करतोस तु?काय आहे नेमकं तुझ्या मनात??" अमृताने घाबरत विचारले.
" फक्त वीस दिवस झालेत आपली लव्हशीप सुरु होउन आणि लगेच लग्नाचं विचारत होती तु मला सारखी...." संदीपचे डोळे लालभडक होते.
" संदीप प्लीज नको करु असं..." अमृता त्याला विनंती करत होती.
" यार तसंपण आता तुझं जे प्रमोशन होणार होतं ना ते आता माझं होणार...तुला काय वाटलं मी खरंच प्रेम करतो तुझ्यावर? अगं पोरी असतात कशाला टाइमपास करायला.."
असं म्हणत संदीपने अमृताचा हात सोडला...तिच्या किंकाळीने सिंहगडावरची ती शांतता भंग पावली..
" अमृता.........................." ते सगळं पाहुन शिवम मोठ्याने ओरडला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" शिवम शांत हो.डॉक्टर शिवमला शुद्ध आली." असं म्हणत अजिंक्य डॉक्टरला बोलवायला पळाला.
" आली शुद्ध तुला.." शिवमला चेक करत डॉक्टर म्हणाला.
" पंधरा दिवस झालेत तु कोमात होतास शिवम.बरं झालं लवकर बाहेर आलास कोमातुन.डॉक्टर तर म्हणत होते की अवघड आहे...पण बघ आता सगळं ठीक झालय."
आता शिवमला संपुर्ण गुढ उकलले होते.त्याच्या स्वप्नांमध्ये जी मुलगी येत होती ती अमृता होती.ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती.शिवम खुपच हताश झाला होता.सायंकाळचे नऊ वाजत होते.
" शिवम कसा आहेस?" या आवाजाकडे शिवमचे लक्ष गेले.ती शैलजा होती.
"ठीक" शिवमने मोजकेच उत्तर दिले.
" सॉरी मी एकटीच आले.." शैलजा
" इट्स ओके. स्वरा कशी आहे?" शिवमने विचारले.
" अरे बरं आठवण केली आज रात्री बाराला तिला बर्थडे विश करेन.
"काय आज तिचा बर्थडे आहे!!!" शिवमचे विचारचक्र सुरु झाले.
तो अचानक उठुन उभा राहिला.
" अजिंक्य चल माझ्याबरोबर..." शिवम.
" कुठे..अरे आता कुठं तु शुद्धीवर आलास" अजिंक्य.
" सिंहगडावर" शिवम शांतपणे म्ह्णाला.
" तुला वेड लागलंय का? एवढ्या रात्री तिथे जाउ देतील का?" जाताना रस्त्यात अजिंक्य शिवमला समजावुन सांगत होता.पण त्याकडे शिवमच लक्षच नव्हतं.. त्याने गाडी सिंहगड रोडला घेतली. पायथ्यापासुन दहा मिनिटांत ते वरती गेले.
शिवम घाई घाईत स्वराला शोधायला लागला.तोच त्याला त्याच्या स्वप्नातली जागा आठवली जिथे अमृता पडली होती. आणि तो त्या दिशेने धावला.
तिकडे संदीप आणि स्वराच बर्थडे सेलेब्रेशन चालु होतं...
" खरंच इतकं प्रेम करतोस माझ्यावर?" स्वरा संदीपला म्हणाली.
"हो गं माझी जान...चल आपण तिकडे कडेला एक मस्त पिक घेऊ"संदीप.
" का?तिकडे का? जसं अमृताला मारलं तसंच मला मारायचा विचार आहे का?" स्वराच्या या बोलण्याने संदीप दचकला.
"हे तुला कसं माहित?" त्याने विचारले.
" अच्छा म्हणजे तुच तिला खाली ढ्कलुन दिलंय तर....." स्वरा म्हणाली.
तिने त्याला अमृता आणि तिच्यामधलं व्हाट्सअॅिप संभाषण दाखवलं.बरोबर बारा वाजता स्वराने अमुला बर्थडे विश केलं होतं. आणि त्यावर अमुने रिप्लाय दिला होता की आम सेलेब्रेटींग बर्थडे विथ माय लव्ह...त्या वेळी स्वरा एका मिटिंगसाठी पंधरा दिवस बंगलोरला गेली होती.
"तुला काय वाट्लं की मी तिकडे लांब गेले तर मला काहीच नाहि समजणार...जेव्हा मी पेपर मध्ये बातमी वाचली की अमुची एकटीचीच बॉडी तिथे सापडली तेव्हा मला शंका आली.पण मला माहित नव्हते कि तिचं प्रेम कोण आहे.मी इतक्या जवळची असुन पण तिने कधी तुझ्याबद्द्ल सांगितले नाही.त्या दिवशी ती मला तु आणि तिच्या नात्याबद्दल सांगणार होती.पण......का केलं तु असे सांग" स्वरा संदीपची कॉलर पकडत रागाने म्हणाली.
संदीपने कॉलर झटकली आणि तो मोठ्याने हसायलाच लागला.
"हो मीच मारलं तिला.कारण माझ्याऐवजी तिच प्रमोशन होणार होतं..आणि......" पुढे संदीप काही बोलणार तोच त्याला मागुन आवाज ऐकु आला....
"फक्त वीस दिवस झालेत रिलेशन सुरु होउन आणि तु सारखं लग्नाचं विचारतेस.....अगं पोरी असतात कशाला टाइमपास करायला...." हा शिवमचा आवाज होता.
" हे तु......तुला कसं माहित हे मी फक्त अमृताला बोललो होतो.तेव्हा इथं फक्त आम्ही दोघेच होतो..." संदीप खुप घाबरला होता.
" अमृताने सांगितलं" पुढे येत शिवम म्हणाला.
" ए कायपण नको बडबडु...आणि पुढे नको येऊस नाहितर स्वराला पण खाली टाकेन.." संदीप बोलता बोलता मागे सरकत होता.अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पड्ला. हळुहळु सरकत कडेपाशी आला जिथे अमृता पडली होती.आता तोही अधांतरी हवेत लटकत होता..कसेबसे त्याने एका दगडाला पकडले होते.
" वाचवा वाचवा.." संदीप मोठ्याने ओरडायला लागला..
" वाचवेन पण आधी कबुल कर की तुच अमृताला मारलेय..." शिवम
" शिवम हे काय करतोय?? जाउदे त्याला तसंच खाली." स्वरा म्हणाली.
" नाही स्वरा त्याला आता कोर्ट्च शिक्षा करेल" असं म्हणत शिवमने मोबाइल मध्ये रेकॉर्डींग चालु केलं
" हो मीच मारलं तिला....." संदीपचे सगळे बोलणे शिवमने रेकॉर्ड केले.
" आता तरी वर घ्या मला...मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे..." संदीप ओरडला.
शेवटी स्वरा आणि शिवमने त्याला वर खेचले.
शिवमने स्वराला घट्ट मिठी मारली.दोघांच्याही डोळ्यांत पाणी होते. मोबाइल शिवमच्या हातात होता.तोच अचानक संदीपने बेसावध असलेल्या शिवमच्या हातातला मोबाइल हिसकुन घेतला आणि काय होतंय ते कळण्याच्या आत तो खाली दरीत टाकुन दिला.आणि स्वराच्या गालावर एक जोरदार ठोसा लगावला.त्यामुळे स्वरा खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली.
" आता कोण शिक्षा करणार मला??कोण देणार पुरावा??हा हा हा.........." संदीप मोठ्याने हसायला लागला.
" तुला शिक्षा करायला पुराव्याची काय गरज आहे??" शिवमच्या मागुन आवाज आला.
संदीप तिकडे डोळे वटारुन पाहायला लागला.
" हे कसं शक्य आहे...!!!! तु......" संदीप घाबरला होता. कारण शिवमच्या मागे अमु होती.
" शिक्षा तर तुला होणारच....आठव तु मला कसं मरण्यासाठी सोडुन दिलंस....खाली पडले तरीही दहा मिनिटं जिवंत होते मी...." अमु चा चेहरा भयानक दिसत होता.
" नाही मला नको मारुस...प्लीज" असं म्हणत संदीप मागे मागे सरकायला लागला आणि अचानक त्याचा तोल गेला.
एक आर्त किंकाळी ऐकु आली आणि पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली.
" शिवम....मी आता चालंलेय.खुप वाईट वाटतं की तु मला शोधायचा प्लॅन करत होतास आणि मी.....
अजुन एक प्रश्न पडलाय ना तुला की ते चार लोक जे तुझ्या आधी कामाला होते त्यांना मी का मारलं???कारण ते संदीपचे तट्टु होते. तुझ्यासोबत जे काही घडायचं त्याबद्द्ल स्वराला काहीही नको सांगुस नाहीतर ती मला कधीही विसरु शकणार नाही.स्वरा खुप आवडते ना तुला तिला लवकर प्रपोज मार मग..नाहीतर ती दुसर्या कोणाची तरी होईल...चल निघते मी आता....माझ्या आत्म्याला आता शांती लाभेल...काळजी घे..." असं म्हणत अमृता अदृश्य झाली.
तेवढ्यात स्वरा शुद्धीवर आली.
"शिवम,संदीप कुठे आहे???" तिने विचारले.
" संदीपला त्याच्या पापाचे प्रायश्चित मिळाले." शिवम शांतपणे म्हणाला.आणि क्षणभर शांतता पसरली.
" शिवम...शिवम कुठे आहेस तु?? दम लागला यार तुला शोधुन आणि तु??" या आवाजाने ती शांतता भंग पावली.तो अजिंक्य होता.
" शिवम चल लवकर.यार तु म्हणत होता ते खंर आहे वाटतं.खरंच आत्मा वगेरे असंत वाटतं.यार कालच न्युज वर भारतातले दहा हॉन्टेड प्लेस दाखवत होते आणि कदाचित त्यात हे देखील असेल प्लीज चल लवकर"
त्याच्या या बोलण्यावर शिवम हसायला लागला आणि पुन्हा सिंहगडावर भयाण शांतता पसरली
..................... समाप्त................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीच कथा एका मराठी वेबसाईट वर वाचली आहे.. साईटचे नाव नक्की आठवत नाही आत्ता...

ती तुम्हीच लिहीली होती अशी आशा करते...

छान, प्रेडिक्टेबल कथा आहे पण सिंहगड पायथ्यापासुन दहा मिनिटात सिंहगडावर पोचणे शक्य नाहिये. कितीही सराव असला तरी अर्धा तास लागतोच असो.