इतिहास 2 - टिपू सुलतान

Submitted by princess on 17 February, 2015 - 01:46

इतिहास 2 - टिपू सुलतान

म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यास मिळाले असावे. हैदर अलीचा हा थोरला मुलगा. कर्नाटकातील देवणहळ्ळी (बंगलोर) या गावी जन्मला. त्याच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि त्याने मौलवींकडून पारंपरिक शिक्षण आणि गाझीखान या अधिकाऱ्याच्या हाताखाली लष्करी शिक्षण घेतले होते. पहिली काही वर्षे तो हैदरबरोबर लढाईत भाग घेत असे. एवढेच नव्हे, तर स्वतंत्र रीत्याही त्याने लढाया केल्या होत्या. म्हैसूरच्या गादीवर येण्यापूर्वी १७७१ मध्ये त्याने मराठ्यांच्या सैन्याबरोबर मुकाबला दिला होता, तर १७८१ मध्ये सेनापती कर्नल बेली आणि कर्नल ब्रॅथवेट असे दोघेजण टिपूवर चालून आले असता; उभयतांचा पराभव करून त्याने दोघांनाही पकडले व काही फौज कैद केली. १७८२ मध्ये हैदरच्या मृत्यूनंतर टिपू म्हैसूरच्या गादीवर आला. टिपूचे फ्रेंचांशी प्रथमपासून सख्य होते. यामुळे इंग्रज सेनापती एअर कूट हा टिपूवर चालून आला असता फ्रेंच सेनापती बुसी याने टिपूला मदत केली. सालबाईच्या तहाप्रमाणे इंग्रजांचा जो मुलूख हैदर अलीने जिंकला होता, तो परत करावा असे ठरले होते. पण टिपूस ही अट मान्य नव्हती. म्हणून इंग्रजांनी टिपूचा बीदनूर प्रांत घेतला. तेव्हा त्याने जनरल मॅथ्यूझला पकडले. त्यामुळे इंग्रजांना मंगलोरचा शांतता तह करावा लागला (१७८४). त्यानुसार एकमेकांचा घेतलेल्या प्रदेश परत करावा, असे ठरले. याच साली टिपूने नरगुंद व कित्तूर या संस्थानांवर सैन्य पाठवून लूट केली व तेथील किल्ले हस्तगत केले. टिपूचे धोरण नेहमी आक्रमक होते; परंतु लढाई अंगाशी येत, असे दिसताच तो तह करी. पण पुढे तो तह कधीच पाळीत नसे. टिपूच्या या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्याकरिता नाना फडणीसाने निजामची यादगीर येथे भेट घेतला आणि दोघांनी टिपूवर स्वारी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे उभयतांनी टिपूवर स्वारी करून अनेक ठाणी काबीज केली. सावनेर येथे मोठी लढाई झाली. पण ती निर्णायक झाली नाही. तेव्हा नाना फडणीसाने मॅलेट यास भेटून इंग्रजांची मदत घेण्याचे ठरविले. त्या वेळी टिपूने मराठ्यांबरोबर १७८७ मध्ये तह केला. त्यानुसार ४८ लक्ष रु. खंडणी ठरली व गजेंद्रगड, बादामी, नरगुंद व कित्तूर येथील किल्ले मराठ्यांस परत द्यावेत, अदवानी संस्थान निजामास द्यावे आणि सावनेरकरांचा मुलूख त्यांचा त्यांना परत करावा. पुढे मराठ्यांच्या सैन्याने कर्नाटकातून माघार घेताच त्याने कित्तूरचा किल्ला पुन्हा हस्तगत केला आणि मराठ्यांशी कायमचे वैर निर्माण केले. निजामाने टिपूशी मैत्री करण्याचे प्रयत्न केले; ते असफल ठरले. तेव्हा कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांना टिपूविरुद्ध एकत्र आणण्यास ही संधी चांगली आहे, हे हेरून त्यांच्याशी स्नेह वाढविला. शिवाय टिपूच्या या धोरणामुळे शेजारच्या राजवटी त्यावर विश्वास ठेवीत नसत.

अशा परिस्थितीत टिपूने त्रावणकोरवर हल्ला केला तो फसला. पण दरम्यान कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांच्याशी मैत्रीचा तह करून टिपूवर स्वारी करण्याचे ठरविले. १७९० मध्ये प्रत्यक्ष मोहिमेस सुरुवात झाली. टिपूने आपल्या कणखर नेतृत्वाखाली प्रतिकार केला. पण या तिघांच्या सैन्यापुढे त्यास अखेर शरणागती पतकरावी लागली. त्याने २३ फ्रेब्रुवारी १७९२ रोजी श्रीरंगपटण येथे तह केला. त्यानुसार निम्मा प्रदेश व तीन कोट रु. नुकसानभरपाई व ती फिटेपर्यंत दोन मुलगे इंग्रजांकडे ओलिस ठेवणे त्यास भाग पडले. या अपमानास्पद तहामुळे तो पुढे अधिकच बेफिकीर व आक्रमक झाला आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तो इतरांच्या मदतीची शोधाशोध करू लागला. या संदर्भात त्याने इराण, तुर्कस्तान तसेच नेपोलियन यांच्यांशी संधान बांधून आपली बाजू बळकट करण्याचाही प्रयत्न सुरू केला. एवढेच नव्हे, तर त्याने काही फ्रेंच पलटणी नोकरीस ठेवल्या. या सर्व कारवायांसंबंधी लॉर्ड वेलस्ली याने त्यास जाब विचारला आणि तैनाती फौज स्वीकारण्यासंबंधी विचारणा केली; तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून वेलस्लीने निजामाशी तह केला, मराठ्यांनाही त्याला यात सहभागी करून घ्यावयाचे होते. पण पेशव्यांचे धोरण अनिश्चित होते. १७९९ च्या सुरुवातीस इंग्रजांनी युद्ध पुकारले व टिपूची वेलस्लीने कुर्ग, मळवळ्ळी वगैरे काही ठाणी काबीज केली. पुढे श्रीरंगपटणास वेढा घातला. तिथे टिपून शिकस्तीचा पराक्रम केला. अखेर तो गोळी लागून मरण पावला. नंतर इंग्रजांनी भयंकर लुटमार केली. टिपूचे एक कोटी सहा लक्ष रुपायांच्या उत्पन्नाचे राज्य घेतले व काही भाग निजामाला दिला व काही भाग मुळाच्या चामराज वोडेयर यांच्या वंशजास दिला. टिपूच्या मुलांना व नातेवाईकांना २४,००० होनांचा मुलूख लावून दिला. पुढे वेल्लोरच्या बंडात टिपूच्या मुलाचा हात आहे, या सबबीवर इंग्रजांनी टिपूची जहागीर खालसा केली. अशा रीतीने टिपूचे राज्य इंग्रजांनी पुढे पूर्णतः गिळंकृत केले.

टिपूच्या खासगी जीवनासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला दोन बायका होत्या. त्यांपैकी पहिली नवायेत मुस्लिम घराण्यातील असून हैदरने निवडली होती व दुसरी रुकय्या बानू स्वतः टिपूने निवडली होती. यांपासून त्यांस अनेक मुले झाली. त्यांत १२ मुलगे होते. यांपैकी दोन मुलगे त्याने इंग्रजांकडे ओलिस ठेवले होते. काही इंग्रज लेखकांच्या मते टिपू हा अत्यंत धर्मवेडा, क्रूर, लोभी, अविश्वासू व चंचल होता; परंतु टिपूचा एकूण कारभार, राज्यव्यवस्था व धडाडी पाहिली असता, हे आरोप सबळ पुराव्यांवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही. तथापि काही दुर्गुण व सेनापतींची फितूरी यांमुळे त्याच्या सुसंघटित सैन्याचा अखेर पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे.

राज्यकारभारात त्याने चोख व्यवस्था ठेवून प्रांतांची नावे बदलली. स्वतःची नवीन मापे, वजने व नाणी पाडली. एवढेच नव्हे, तर स्वतःची कालगणना सुरू करून तीमधील वर्षे व महिने यांस नवी नावे दिली. त्याचप्रमाणे मुलकी व लष्करी खात्यांत अनेक सुधारणा केल्या. त्याला कलाकौशल्याचा व वाङ्‌मयाचा छंद होता. फार्सी, मराठी, उर्दू व कन्नड या भाषा अवगत होत्या. त्याची मराठी पत्रे उपलब्ध आहेत. त्याने जमविलेला संग्रह लंडन, मद्रास व कलकत्ता या ठिकाणी आहे. त्यात दहाव्या शतकापासून त्या वेळेपर्यंतच्या अनेक कलाकुसरींच्या वस्तू, हस्तलिखित ग्रंथ,कुराणाची भाषांतरे, मोगल कालीन इतिवृत्ते, तवारिखा इ. साहित्य आहे. टिपूने फर्मान बनाम अलीराजा व फतह-उल्-मुजाहिदैनत या नावांचे ग्रंथ लिहिले, असे म्हणतात. तो खुतबापठणाच्या बाबतीत दक्ष असे. त्याने आपल्या नावे खुतबापठण करण्याची प्रथा सुरू केली होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजय जी,
प्रथम तुमच्या प्रतिसादाबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते.
तुमचा प्रतिसाद वाचून बरे वाटले कि , कुणीतरी जागरूकपणे टाकलेले लेख वाचतायत.
मायबोलीवर फक्त स्वत:चे लेखन अपेक्षीत आहे असा नियम आहे.या गोष्टीशी मी पूर्णता परिचित आहे.

महत्वाची गोष्ट अशी कि मी काही हाडाची लेखिका आहे असे काही नाही. किंवा मी फार मोठी इतिहासकार हि नाही.
त्यामुळे मला हे ऐतिहासिक लेख टाकताना वैयक्तिक मला असणारी माहिती, पुस्तके, इंटरनेट आणि आणि घरच्यांचे मार्गदर्शन यांचा ताळमेळ बसवून मी ते मांडण्याचा प्रयत्न करतेय. मला वाक्यरचना करण्यासाठी या सर्वांची खूप गरज पडतेय.याचा अर्थ नक्कीच असा होत नाही कि कॉपी-पेस्ट आहे. इतिहास हा इतिहास असतो मग तो कसाही लिहा.जर इतिहास हा स्वतः च्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला तर तो चुकीच्या पद्धतीने समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी या सर्वांची मदत घेतली.यापुढे मी माझी वाक्यरचना वापरण्याचा प्रयत्न करेन. येवढा सगळा खटाटोप फक्त एवढ्या साठीच कि बर्याच जणांना इतिहास पूर्णपणे माहित आहेच असे नाही त्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यांना माहित नसलेला किंवा अल्प माहिती असणारा इतिहास मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.त्यामुळेच आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन व पाठींबा याची गरज आहे.मला योग्य ते मार्गदर्शन व पाठींबा मिळाला तर कदाचित मी हा इतिहास सर्वांपर्यंत पोहचवू शकते.

जर माझ्या या प्रतिसादामुळे (आता किंवा भविष्यात) जर कोणी दुखावला गेला किंवा जर वाईट वाटले असेल मी मी मनापासून सर्वांची क्षमा मागते. माझ्याकडून होणार्या चुका निदर्शनास आणून मला/ मी टाकलेल्या लेखाला सुधारावे हि मनपूर्वक विनंती.

आणि माझ्या या प्रयत्नासाठी मी तुमच्या प्रतिसाद व पाठिंब्याची वाट पाहते.

मी आणखी एकदा विनंती करेन कि मी टाकलेला प्रतिसाद आवर्जून एकदा वाचा.आणि मी नेमक काय सांगितलय याबाबत एकदाच विचार करा.
मनपूर्वक विनंती

कदाचित ते कॉपीपेस्ट नसून वाचून पाठ करून मग जसेच्या तसे लिहिलेले / टाईप केलेले असावे.

शाळेत ईतिहासाच्या परीक्षेत मी असेच करायचो Happy

पण शिक्षक पैकीच्या पैकी मार्क न देता, `काय रे, कॉपी केलीस का?' असा शेरा द्यायचे Sad

princess तुमचा प्रयत्न वा हेतु ठीक आहे, पण तुम्ही लेख पूर्णतः कॉपी करून पेस्ट केला आहे, नक्कीच पुस्तके, इंटरनेट आणि घरच्यांचे मार्गदर्शन यांचा ताळमेळ बसवा आणि माहिती स्वतः च्या भाषेत लिहा.

दोन्ही लेख वाचले. माझे काम अशा विविध विषयांवरील लेखांशी संबंधित असल्यानं यामध्ये मला थोडीफार अक्कल आहे असे मानायला हरकत नसावी.

ला वाक्यरचना करण्यासाठी या सर्वांची खूप गरज पडतेय.याचा अर्थ नक्कीच असा होत नाही कि कॉपी-पेस्ट आहे.>>>> मग काय आहे?

http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=articl... इथे क्लिक करा आणि वाचा.

तुमच्या लेखामधले पहिले वाक्यः
म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यास मिळाले असावे. हैदर अलीचा हा थोरला मुलगा.

मराठी विश्वकोशम्मध्ल्या लेखामधले पहिले वाक्यः
म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यास मिळाले असावे. हैदर अलीचा हा थोरला मुलगा.

काय वाक्यरचना बदलली आहे? पूर्णविरामदेखील बदललेला नाहीये.
हे असंच मी प्रत्येक वाक्य घेऊन संपूर्ण लेखामधली "तथाकथित" बदललेली वाक्यरचना दाखवून देऊ शकेन.
विश्वकोशामधील लेख ८२१ शब्दांचा आहे, आणि मायबोलीवर टाकलेला लेख देखील ८२१ शब्दांचा आहे.

चोरी तो चोरी फिर सीनाजोरी!!!!

princess,

तुमच्या फोटोतला अनारकली ड्रेस आवडला.

इथून कॉपी पेस्ट केलाय :
http://www.craftsvilla.com/catalog/product/view/_ignore_category/1/id/46...

अनारकली हे नावही तिथेच सापडलं.

आ.न.,
-गा.पै.

ह्या मुसलमान राजाची आणखीही माहिती द्यायची होती कि. सगळ्या महत्वाच्या पदांवर हिंदूंची नियुक्ती त्याने बंद केली
केरळातल्या हिंदुंवर अत्याचार करण्यसाठी खास १ लाखांची फौज उभारली होती .
ह्यात हिंदू स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी खास सैनिक नेमले होते

I think, माहिती ही माहिती असते... या मुसलमान राजाने काय positive-negative केले हे समजायला तरी माहिती वाचली पाहिजे.

ह्या मुसलमान राजाची आणखीही माहिती द्यायची होती कि.>>>>>>> तुम्हीच दिलीत,

सगळ्या महत्वाच्या पदांवर हिंदूंची नियुक्ती त्याने बंद केली
केरळातल्या हिंदुंवर अत्याचार करण्यसाठी खास १ लाखांची फौज उभारली होती .
ह्यात हिंदू स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी खास सैनिक नेमले होते>>>>>>

मला हे माहित नव्हते

मैसूर ची सत्ता हातात आल्यानंतर त्याने मैसूर हे मुस्लीम राज्य मानून घोषित केले. आपल्या राज्यातील सर्व मुस्लीम अधिकारी यांना त्याने हिंदुना मुस्लीम धर्माची दीक्षा देण्याबद्दल आदेश हि पाठवले आणि जे स्वतःच्या इच्छेने मुस्लीम धरम स्वीकारणार नाहीत त्यांना जबरदस्तीने मुसलमान करा अन्यथा त्यांना ठार करा.

शप्पथ!, हा टिपू सुलतान धर्मांध होता ?
अश्यांना हिरो असल्याच्या थाटात यांच्यावर मालिका बनतात...

टिपूबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे.

इंग्रजांनी टिपूचा काटा काढल्यावर त्याचे सिंहासन, भरजरी कपडे, शस्त्रे आणि बरेच काही उचलून लंडनला नेले. ते सर्व विंडसर कॅसलमध्ये ठेवलेले आहे.

स्वतःच्या धर्माच्या बायका आणि देवळं न संभाळता आलेले नपुंसक लोक सदैव मुसलमानांच्या नावाने का बोंबा मारतात हे समजत नाही.

काउ,

>> स्वतःच्या धर्माच्या बायका आणि देवळं न संभाळता आलेले नपुंसक लोक सदैव मुसलमानांच्या नावाने का बोंबा
>> मारतात हे समजत नाही.

स्वत:च्या धर्माच्या बायका आणि देवळं सांभाळता यावी म्हणून. इतकंही तुम्हाला कळंत नाही. कमाल आहे!

आ.न.,
-गा.पै.

काउ,

आम्ही लंडनमध्ये असू, उत्तर धृवावर बसू, वा चंद्रमंगळावर दिसू. तुम्हाला काय करायचंय? तुमच्यासमोर हात पसरले नाहीयेत ना, मग गप पडून ऱ्हावा की!

आ.न.,
-गा.पै.

इंग्रजांनी टिपूचा काटा काढल्यावर त्याचे सिंहासन, भरजरी कपडे, शस्त्रे आणि बरेच काही उचलून लंडनला नेले. ते सर्व विंडसर कॅसलमध्ये ठेवलेले आहे.
हि सर्व माहिती टिपू सुलतान च्या दुसरया भागात टाकणार आहे. परंतु त्यासाठी मला आणखी काही माहितीची गरज आहे. १.टिपू सुलतान च्या पत्नी
२. मुले
३. त्याला खेळण्यासाठी असलेला लाकडी वाघ
या सर्वांची विस्तारपूर्वक माहिती शोधत आहे. तुमच्यापैकी कोणाला याची माहिती असेल तर जरूर सांगावी हि विनंती.