शापित गड भाग ३

Submitted by श्रीमत् on 3 October, 2014 - 05:53

भिवा तिथुन जाताक्षणीच एक गुढ शांतता तिथे पसरली. आता फक्त हलणारया गवताची सळसळ आणि आमचे फुललेले श्वासच आम्हाला ऐकु येत होते. तिथुन पुढे.

पंडीत प्रश्नार्थक नजरेणे माझ्याकडे पाहात होता. मी काही बोलायच्या आतच तो बोलु लागला, "भास्क्या ह्या भिवाचं वागण मला काही ठिक वाटत नाहिये". असं का रे वाटतय तुला? मी विचारले. अरे तुला हा अनुभव आला की नाही ते माहीत नाही पण सबंध रस्ताभर मला अस वाटत होत की कोणीतरी आपल्यावर नजर ठेऊन आहे. म्हणुन मी त्या अनुषंगाने एक दोनदा तुझ्याकडे बघितलसुद्धा पण तु मात्र तुझ्याच विश्वात रमला होतास. ह्या भिवा ला विचारल तर एकदम कुस्तित पणे हसुन बोलतो कसा आता भर दुपारी इथं कोण कशाला येतय मरायला.....! मला तर पंडीतच वाक्य ऐकुन कान गरम झाल्यासारखे वाटले. म्हणजे मला जे वाटत होतं तो भास नसुन खरच कोणीतरी आमच्या मागावर होत. आणि ते जे पण काही आहे ते आत्ता आमच्या आजुबाजुलाच आहे. कदाचित आत्ता या क्षणी ही ते आमच्यावर डोळे रोखुन पाहात असेल? माझ संपुर्ण अंग गार पडल्यासारख वाटल. तरीही उसनं अवसान आणुन मी पंडीतला विचारल. तु म्हणतोयस त्यात तथ्य आहे. भास तर मलाही झालेत इवन एक दोनदा मला चक्क कोणीतरी शुक्क शुक्क केल्याचा आवाज पण झाला. पण मला वाटल कि हा भास फक्त मला एकट्यालाच होतोय. म्हणुन मी तुला काहीच बोललो नाही. पण कदाचित आपण दोघेही प्रवासाने थकल्यामुळे आपल्याला खरच असे भास होत असतील.

माझ्या धीरोत्त शब्दांनी पंडीतच्या चेहरयावर थोड समाधान दिसलं. मग मीच पुढे विचारल पण "भावा तुला भिवा बद्दल अस वाटण्याच कारण काय? तसा पंडीत सुरु झाला बहुतेक त्याला याच प्रश्नाची अपेक्षा असावी. "सर्वात पहिल तो कोन दादोसा का फादोसा भेटला होता ना खाली, ज्याने आपल्याला काहीबाही गोष्टी सांगुन या भिवाच नाव सुचवल वर अजुन ते कोन सर्व्हे करण्यासाठी आलेले ते पण गायब झाले त्यांची कपडे आणि सामानपण म्हणे या भिवालाच सापडलं अस सांगितल. "तु तो भिवाचा बाप पाहिलास मगाशी? "तो जे हातवारे करुन सांगत होता ना" ते भिवाला नसुन कशावरुन आपल्यासाठी नसतील. आणि सर्वात महत्वाच म्हणजे आयला भर दिवसा इथे आपली फाटतेय इकडे यायला तिथे हा भिवा बिनधास्त उंडगतोय, आताचच घे हा कसला विचित्र आवाज आला तसा हा एकटाच पसार झाला. त्यात त्याचे पैसे पण तु मगाशीच देऊन मोकळा झालायस म्हणजे आता "तेल पण गेलय आणि तुप पण" आणि ह्यात जर ह्या दादोसा आणि भिवाचा काही कट असला तर बहुतेक आपल पण सामान ह्या भिवालाच सापडेल एक दोन दिवसांनी.

साल्या हे सगळ ना सावधान इंडीया आणि क्राईम पट्रोलचे परिणाम झालेत तुझ्यावर. आसलं काही एक होणार नाही आपल्याबरोबर आता इथेच शंकासुराचा जप करण्यापेक्षा त्या वाड्यात जाऊन राजा भ्रमर वर्मा ला भेटुया मग तडक घरी. भिवा नसल्यामुळे माझ्या हातातील मॅपचा आधार घेत आम्ही पुढे चालत राहिलो. एक दहा पंधरा मिनिटांनी पुरुषभर ऊंचीच्या गवतातुन वाट काढत आम्ही त्या वाड्यापाशी येऊन पोचलो. पण तिथे गेल्यानंतर खरच समोर जे पाहील ते विस्मयकारक होते. गडावरील पाच तळ्यांपैकी जे शेवटचं तळ होत ते वाड्याच्या अगदी समोरच होते आणि पाणी तर एकदम स्वच्छ अगदी पहिल्या चार तळ्यांपेक्षाही. तळ्याचा आकार षटकोणी असुन त्याच्या मधोमध दगडाचा कसलातरी अर्धवट तुटलेला भग्नावषेश होता तो नक्की तिथे कशासाठी होता हे माहीत नाही. "वास्तविक एवढ्या वर्षांनंतरही जर गाळ वैगरे काढला नाही तर तळी हिरवीगार होऊन जातात". त्यावर कसल्या ना कसल्या शेवाळंचा तवंग वाढतो. पण त्याची बांधकाम शैली सोडली तर तळ्यातील पाण्याकडे पाहुन ते बाराशे वर्षांपुर्वीच असावे असा कुठलाच मागमुस दिसत नव्हता. तळ्याच्या मागच्याच बाजुला म्हणजे वाड्याच्या समोरच्या दिशेला एका छोट्याश्या उंचवटावजा जागेवर "ते" विचित्र झाड होतं. त्याच खोड पोकळ असुन व्यास आतमध्ये दोनतीन माणस सहज मावतील येवढा होता. पण फांद्या पर्ण हीन असुन एकदम लहान होत्या. त्याच्या एकंदर अवतारावरुन प्रत्येक पक्षाने त्या झाडाला वाळीत टाकले असावे असच दिसत होतं.

झाडाच्या दोन्हीबाजुंनी तळ्याकडे उतरणार्‍या दोन पाय वाटा होत्या. तर मेन पायवाट वाड्याच्या समोरच होती. जिथुन तळ्यात उतरण्यासाठी फरसबंदी पायर्‍या वर्तुळाकार करण्यात आल्या होत्या. वाड्याच्या आणि तळ्याच्या मध्ये वीस-पंचवीस फुटांचे अंतर असावे त्या जागेतही मधोमध कसला तरी शिलालेख सांकेतिक भाषेत कोरला होता. अर्थात आम्हाला तो काही वाचता येत नव्हता. पंडीत महाशय सभोवताली फिरुन आपल्याकडील डिजी कॅमचे फ्लॅश पाडत होते. साल्याला फोटोग्राफीचा भलता शौक घड्याळात आता दुपारचे तीन वाजले होते. आणि आश्चर्य म्हणजे आमच्या आऊ साहेबांचा सकाळपासुन एकही कॉल नव्हता. ना व्हॉटस अप वर कुणाचा मेसेज मोबाईल बघण्यासाठी बाहेर काढला तर नेटवर्कच्या सारया कांड्या रोमिंग करायला गेलेल्या आढळल्या. म्हणजे आता घरी गेल्यावर आपली बिन पाण्याची होणार. पंडीतला तर काय टिळा लावुनच सोडलाय. मोबाईल परत बॅगेत टाकुन मी सहज पंडीतला विचारल "साहेब सकाळपासुन आपण जी फोटोग्राफी केलीय ती पाहण्यास मिळेल काय? अरे का नाही? बर झालस आठवण केलीस मी स्वताःपण नुसता क्लिक करत फिरतोय. बर झालस आठवण केलीस. आम्ही दोघे त्या शिलालेखाला टेकुन बसलो.

पठ्या ने काही काही इमेजेस अगदी अप्रतिम कैद केल्या होत्या. स्लाईड शो ऑन केल्यामुळे एक एक फोटो पुढे सरकत होता. भिवाच्या घरापर्यंत सर्व आलबेल होतं पण जसजसे तिथुन पुढेचे पिक्स येऊ लागले तसे आम्ही एकदम गपगार झालो. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे एक शांत कटाक्ष टाकला. कारण प्रत्येक फोटो मध्ये माझ्या मागे एक धुरकट पांढरया रंगाची आक्रुती दिसत होती. आणि अचानक गडाच्या प्रवेशद्वारा पासुन ती आक्रुती दिसण्याची बंद झाली. पंडीत जवळ जवळ ओरडलाच "बघीतलस भास्क्या", "मी बोलत होतो ना मगाशी. म्हणजे आपल्याला होणारे नक्कीच भास नसुन कसली तरी अमानवीय शक्ती आपला पाठलाग करत आहे. आणि त्या गावठी भिवाला हे सर्व माहीत असणार म्हणुनच तो गां--ला पाय लाऊन पळाला. आता आपल काही खर नाही. भेंच्...उगाच आलो इकडे. भास्क्या चल ऊठ आता बस झाल हे अडवेंचर. साला फोन पण डेड झालेत आपले. आणि अजुन थोडा वेळ गेलाना तर आपण पण डेड होऊ चल ऊठ लवकर. पंडीत गन चालल्यासारखा धडधडत होता.

"अरे शांत हो जरा हे बघ मी डिस्कव्हरी वर पाहिलय एखाद्या विशिष्ट ठिकाणी मॅग्नेटिक प्रभाव जास्त असल्यामुळे असे विचित्र अनुभव येतात. त्यात तुझा कॅमेराचा फ्लॅश लाईट पण ऑण आहे अशावेळी जर फोटो काढताना काही हालचाल वैगरे झाली तर प्रकाशाच्या अपस्करणामुळे फोटोत असे टच अप दिसतात सो डोन्ट वरी भावा मी आहे ना. आणि प्रवेश दारा पासुन आत आल्यानंतरचे सर्व फोटो व्यवस्थित आहेत मिन्स नीड नॉट टु वरी ओके. माझ्या विज्ञाननिष्ठ उत्तराने त्याच काही समाधान झालेल दिसल नाही परंतु स्वारी तुर्तास तरी शांत झाली. पण मला पण आता खरंच आतुन भीती वाटायला लागली होती. आणि "माणसाच्या मनात एकदा का भितीचा प्रवेश झाला की स्वताची सावली पण त्याला घाबरवण्यास पुरेशी असते".

या सार्‍याचा परिणाम म्हणजे पंडीत आता त्या वाड्यात येणार नव्हता तो बाहेर बसुनच माझी वाट बघणार होता. पंडीत येणार नसल्यामुळे त्याचा कॅमेरा मी स्वताःकडे घेतला आणि माझ सर्व सामान त्याच्याजवळ ठेऊन मी त्या वाड्यात प्रवेश केला. वाड्यात प्रवेश केल्या केल्या सभोवतालच्या वातावरणात एकदम गारवा जाणवु लागला. संपुर्ण वाडा काळ्या कातळाने बांधलेला होता आणि त्यासाठी लागणारे दगड बहुतेक समोरील तळ्याच्या खोदकामातुन काढले असावेत. वाड्यात जिथे मी उभा होतो त्या ठिकाणी एका वेळी शंभर माणसे आरामात उभी राहतील येवढी जागा होती. दोन्ही बाजुंना नक्षीदार खांब जे महिरपी कमाणींनी एकमेकांना जोडले होते. या सर्व खांबाच वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कसल्या ना कसल्या वाद्य वाजवणारया आणि काम करणार्‍या माणसांच्या, प्राण्यांच्या आक्रुत्या कोरल्या होत्या. बहुतेक हे सर्व खांब राज्यातील प्रजेचे प्रतिनिधित्व करत असावेत. त्याच्या मधुनच एक वाट सरळ जात होती जिथे आडव्या सज्जावरती मागे दोन आणि पुढे दोन असे एकुन चार कोरीव खांब होते आणि मधोमध बहुतेक राजाची बसण्याची व्यवस्था असावी. कारण त्याच्या बरोबर वर एक जबडा उघडलेल्या आयाळधारी सिंहाची प्रतीक्रुती दगडातच कोरली होती.

वाड्याच प्रवेश द्वार वगळुन दोन्ही बाजुला चार-चार असे एकुन नऊ दरवाजे होते.एकंदर आतील बांधकाम प्रशस्त असुन हवा खेळती रहाण्यास पुरेपुर वाव होता. राजाच्या सिंहासनाच्या समोरच म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर वर एक पंधरा वीस लोक बसु शकतील अशी माडी होती. बहुतेक राजाचा जनान खाना इथे बसत असावा जेणेकरुन दरबार भरला असताना फक्त राजाच तिकडे पाहु शकत असावा. त्या माडीच्या मधोमध एक गोलाक्रुती कवडसा अशा प्रकारे बसवण्यात आला होता जेणेकरुन सकाळी सुर्योदय झाल्यानंतर कोवळ्या किरणांची पहिली तिरीप बरोबर त्या आयाळधारी सिंहावर पडत असावी. मी कुठेतरी वाचल्याच मला आठवल की काही राजवंशा मध्ये सुर्याला फार मह्त्व दिलेल आहे आणि त्याचाच प्रभाव त्यांच्या स्थापत्य शैलीवरही आढळतो.

राजाच्या बसण्याच्या जागेच्या दोन्ही बाजुलाच दोन दरवाजे मागच्या भिंतीलाच समांतर न बांधता आतील बाजुस २०-२५ अंशात थोडे तिरपे बांधले होते जेणेकरुन एखादी व्यक्ती जरी तिथे उभी असेल तर मान वळवल्यानंतर फक्त राजालाच ती दिसु शकत असेल. अर्थात तिथपर्यंत जाण्याचा मान राजाच्या कुटुंबाव्यतीरिक्त फक्त त्याच्या मर्जीतल्या माणसांनाच असावा. तिथुनच दगडी पायरया गोलाकार वळुन वर गेल्या होत्या. बहुतेक तिथे राण्यांची दालणे असावीत व तिथुनच समोरील माडीपर्यंत जाण्याचा रस्ता असावा. थोडेफार फोटोशुट झाल्यानंतर मी डाव्या बाजुच्या दरवाजाने आत जाण्याचा जाण्याचा निर्णय घेतला. बहुतेक मी ज्या गुप्त दरवाजाच्या शोधात होतो तो तिथेच असावा. खरतर मला आत प्रवेश करण्यास जाम भिती वाटत होती. पण माझ्या मनातल कुतुहल मला स्वस्थ बसुन देत नव्हत. अखेर कुतुहलाने भितीवर विजय मिळवला. मी हातातला टॉर्च ऑन केला आणि हळु हळु पुढे पाऊले टाकु लागलो.

मी काही अंतर जातोय न जातोय तसा बाहेर तळ्यात धप्पकन काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला. आवाज येताक्षणी मी जोरात बाहेर धुम ठोकली कारण सर्वात पहिला जो विचार माझ्या मनात आला असेल तो म्हणजे पंडीतचा, स्वारी वाकुन बघायच्या नादात पडली बिडली तर नाही ना? बाहेर येताच माझ्या हातातला टॉर्च तसाच गळुन पडला व समोरील द्रुश्य पाहुन मला आता फक्त भोवळ यायचीच बाकी होती. कारण मगाशी ज्या तळ्यातल पाणी एकदम स्वछ होतं ते आता एकदम हिरवगार झांल होतं त्याच्यावर कसल्यातरी शेवाळाचा उग्र तवंग चढला होता. आणि विशेष म्हणजे तो दगडाचा भग्नावशेस पण त्याच्या जागेवर उभा नव्हता. संपुर्ण वातावरणात एक उग्रसा कुबट दर्प भरुन गेला होता. मी आजुबाजुला पाहील पण पंडीत कुठेच दिसत नव्हता. बर तळ्यात पडला म्हणावं तर त्याचा कसला आवाजही आला नव्हता. ना पाण्यात कसली हालचाल दिसत होती. सार काही एकदम गुढ. मी बेंभीच्या देठापासुन त्याला आवाज द्यायला लागलो. वाड्याच्या आजुबाजुला सैरभैर पळुन सर्वीकडे पाहिलं. जमेल त्या टेकडीवर चढलो. परत वाड्यात जाऊन पाहिल अगदी आजुबाजुंच्या तटबंदीवर चढुन कुठे काही दिसतय का याचा मागोवा घेतला पण त्याचा कुठेच मागमुस लागत नव्हता. पंडीत हवेत विरुन गेल्यासारखा गायब झाला होता. मी हताशपणे चालत तसाच तळ्यापर्यंत आलो. मगाशी हातातुन पडलेला टॉर्च तसाच चालु होता व त्याचा प्रकाश समोरील भिंतीवर पडला होता. मी तो ऊचलला आणि बंद करुन खिशात ठेवला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काही अंतर जातोय न जातोय तसा बाहेर तळ्यात धप्पकन काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला.
बर तळ्यात पडला म्हणावं तर त्याचा कसला आवाजही आला नव्हता. पंडीत हवेत विरुन गेल्यासारखा गायब झाला होता. >> टायपो आहे कि आणखी कै ?

खूपच छान श्रीमत , मला सुनील डोईफोडे ची online वाचलेल्या अद्धभूत कादंबरीची आठवण झाली, please , पुढचा भाग लौकर टाका Happy

प्रफुल्ला, प्रथम, बादशहा, रामडी, टीना, प्रीती, एक ससा, रानी तुमच्या अमुल्य प्रतिसादांबद्दल आभार.

@टीना: मी काही अंतर जातोय न जातोय तसा बाहेर तळ्यात धप्पकन काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला.
बर तळ्यात पडला म्हणावं तर त्याचा कसला आवाजही आला नव्हता. पंडीत हवेत विरुन गेल्यासारखा गायब झाला होता.
पाण्यात पडण्याचा आवाज आला म्हणुन कथेतला नायक बाहेर पळतो. आवाज ऐकुन सर्वप्रथम त्याला पंडीतचा विचार मनात येतो. पण लगेचच याची जाणीवही होते की एखादा माणुस पाण्यात पडला तर जीव वाचवण्यासाठी तो काहीतरी आकांत तांडव हा करतोच. नायकाला तसली काहीच लक्षने न दिसल्यामुळे त्याला शेवटी पंडीत हवेत विरुन गेल्यासारखा गायब झाला होता.
तरीही तुमच्या सखोल वाचनाबद्दल +१०० Happy