Submitted by सत्यजित on 8 June, 2008 - 14:13
चालः गोमू माहेरला जाते गो नाखवा..
पवार आयपीलात रमला गो नाखवा
ह्याला देशातले शेतकरी दाखवा
संसाराची आमच्या झाली होळी
IPLवर भाजतोय करोडोची पोळी
हा भाजतोया करोडोची पोळी
ह्या शेतकर्यांना विष तरी चाटवा..
परदेशी पोरींचा नंगा तमाशा
आमची विरली पोलकी हा बघतो कशाला
विरली पोलकी हा बघतो कशाला
नागव्या शेतकर्यांना IPLमध्ये नाचवा
कितीही भरला जरी ह्यांनी भरणा
तरी मेल्यांची काही भुक भागना
तरी मेल्यांची भुक भागना
कॄषीमंत्र्यांना कुणी तरी जागवा
ह्यांना देशातले शेतकरी दखवा.....
हय्या हो हय्या हो...
गुलमोहर:
शेअर करा
सत्यजित,
सत्यजित, मस्त जमलं आहे विडंबन!!
छान जमलय
छान जमलय सत्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सत्याभाय
सत्याभाय भन्नाट... मस्त जमलेय विडंबन.. सत्य परिस्थिती आहे अगदी. आणि परिस्थिती अशी आहे ह्याचे दु:ख आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सत्यजीत
सत्यजीत जळजळीत सत्य!!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
विडंबन
विडंबन मस्त जमलं आहे...!
उपरोध पुरेपूर उतरला आहे..!
देव मंत्रीमहोदयांना सद्बुद्धी देवो..!
विडंबन मधे
विडंबन मधे नको रे हे !!!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अरे तुम्ही
अरे तुम्ही सगळे फार Serious झालात यार.
अरे हे निव्वळ विडबन आहे. निव्वळ..
पवारांच आयपीलच्या समारोप समारंभातल भाषण ऐकल नाहीत का, काय अभिमान होता वाह!...
देशातल्या सगळया शेतांच क्रिकेट ग्राउड का नाही करत कृषीमंत्री मग नाचायला परदेशी नागव्यांचि गरज नाही...
घॄणा वाटते रे मी भारतीय असल्याची आणि त्याचा मला अभिमान असल्याची.
असामी, हसु आल लिहुन म्हणुन विडंबन,
काही अनावर झाल ना की हे अस होत
कोंडलेल्या दु:खाच देखिल मग हस होत
तुमच्या प्रतिक्रीयांबद्दल आभार, चागल्या वा वाईट प्रतिक्रिया द्यारे. आपल्यात असल्या सारख वाटत.
-सत्यजित
सुरेख ..
सुरेख .. जळजळीत सत्य मस्त शब्दात पकडले आहेस. त्यामुळॅच ते विडंबन वाटतच नाही.
उत्कृष्ट.
उत्कृष्ट. सामाजिक जाणिव असलेले लिखाण केले हे उल्लेखनीय.
पवारांनी
पवारांनी वाटले की शेतकर्यांना ७१००० कोटी..
स्वतःच्या खिशातले!
कशाला राव शिव्या देता आमच्या साहेबांना!!
विडंबन
विडंबन मस्तच जमले आहे! आणि हो साहेबांनी वाटलेले पैसे खर्या शेतकर्याला कधी मिळणार? नाहितर अमिताभ सारखे तोतया पैसे घेऊन पसार होतील.
साहेबांनी
साहेबांनीच बसवले असतील स्वतःच्याच कंपूतले तोतये देखील!! एक हातसे दे, दुसरे हातसे फिरसे ले!!
खरचं भयानक
खरचं भयानक परिस्थिती आहे शेतकर्यांची.
बारोमास नावाची कादंबरी वाचली होती. वाचवत नाही.
मनात आतून तुटतं. कुठेच सुखाचा कवडसाही नसावा, अस काल्पनिक वाचायलाही नको वाटतं.
सुयोग्य
सुयोग्य शब्दांकन. मस्त विडंबन!!