कोकणातील गूढ कातळ-शिल्पे

Submitted by रमेश भिडे on 7 December, 2012 - 00:18

कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर आढळणाऱ्या कातळ शिल्पांचे गूढ कायम असतानाच याच भागातील राजापूरच्या कातळावरही आता तब्बल चौदा चौरस किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत . मासे , जलकुंभ , जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत शिल्पाकृती या कातळांवर कोरलेल्या आहेत .

पुण्यातील भूगोल अभ्यासक डॉ . श्रीकांत कार्लेकर यांची टीम सध्या यावर अभ्यास करते आहे . कोकणातील भूजलस्रोतांबाबत संशोधन करताना कार्लेकर यांना राजापूरच्या उपळे गावात ही कातळ शिल्पे आढळली . कोकणातल्या जांभा दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्प हे आजही एक मोठे गूढ आहे . विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व नकाशांनी ही शिल्प समृद्ध आहेत . अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे अशी दुर्मिळ शिल्पे गायब झाली आहेत . ही चित्रे , नकाशे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही . काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इसवी सन पूर्व ६००० वर्षे जुनी असावीत , .

कोकणातील जांभा दगडाचा , विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की , इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती प्रामुख्याने काढली गेली आहेत . देवगड आणि विजयदुर्ग येथील सडा हा जांभ्याचे आदर्श असे कातळ आहे असे मानण्यात येते . मात्र , रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला कातळ सडा हा निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे . येथील कातळाची जाडी २५ मीटरपेक्षा जास्त असून , भूजल साठेही खूप खोल आहेत . राजापूरच्या कातळावर जुवाठी - उपळे - प्रिंदावण या त्रिकोणात उपळे गावाच्या सीमेवर आम्हाला चौदा चौरस किलोमीट कातळावर अनाकलनीय शिल्प आढळली आहेत . मासे , जलकुंभ , पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती यावर काढल्या आहेत . मे महिन्यात कातळावरचे सगळे गवत नाहीसे झाल्यावर त्यावर जलस्थानांशी संबंधित आकार दिसतात , असे स्थानिक नागरिक सांगतात . शास्त्रीय पद्धतीने या प्रदेशातील कातळ चित्रांचा मागोवा घेणे गरजेचे आहे ,

कर्नाटकातील बदामी येथे " रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया "या संस्थेची सतरावी राष्ट्रीय काँग्रेस संपन्न झाली . राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेमध्ये , महाराष्ट्राचेमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी सतीशलळीत यांनी एका शोध निबंधाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यामालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथीलकातळशिल्पांच्या सविस्तर माहितीचे छायाचित्रांसहसादरीकरण केले . स्वतः लळीत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचेरहिवासी आहेत .

" रॉक आर्ट " म्हणून ओळखली जाणारी आणि आदिमानवानेखोदलेली कातळशिल्पे , दगडावर रेखाटलेली रंगचित्रेजगाच्या विविध भागामध्ये आढळून येतात . भारतामध्येमध्यप्रदेशातील भीमबेटका येथील गुहेतील रंगचित्रे हीसुध्दा " रॉक आर्ट " चाच एक प्रकार मानला जातो . कुडोपीया गावाजवळच्या डोंगरावरील जांभ्या दगडाच्या कातळावर ( सड्यावर ) खोदण्यात आलेली सुमारे साठकातळशिल्पे ( रॉक आर्ट , पेट्रोग्लिफ्स ) हीसुध्दा अशाच प्रकारची आहेत . या कातळशिल्पांमध्ये मानवाकृती , मासे, विविध प्रकारची वर्तुळे , पक्षी , चित्रविचित्र आकृती मोठ्या प्रमाणात असून ती इसवी सनपूर्व चार ते सात हजारवर्षांपूर्वीची असावीत . एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी अशी कातळशिल्पे आढळण्याची ही पहिलीच वेळआहे . या ठिकाणी असलेले मातृदेवतेचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे . हिवाळे येथील सड्यावरही अशाचकातळशिल्पांचा शोध लळीत व त्यांचे बंधु प्रा . डॉ . बाळकृष्ण लळीत यांनी २००२मध्ये लावला होता . पश्चिमकिनारपट्टीवर गोव्यातील उसगाळीमळ , महाराष्ट्र - गोवा सीमेवरील विर्डी , हिवाळे , कुडोपी , खानवली ( राजापूर), निवळी ( रत्नागिरी ) अशा अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे आढळली असून त्यामध्ये काही परस्परसंबंध (लिनिएज ) असण्याची शक्यता लळीत यांनी आपल्या सादरीकरणाच्या वेळी व्यक्त केली .

या परिषदेला देशभरातून जमलेल्या रॉक आर्ट क्षेत्रातील तज्ज्ञ , तसेच हौशी संशोधकांनी लळीत यांच्यासंशोधनाबद्दल आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच रॉक आर्टच्या नकाशावर येतअसल्याबद्दल संतोष प्रकट तर केलाच . पण , एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच जगासमोर आलेला आपल्यादेशातील हा अनमोल खजिना जतन करुन त्याची नीट प्रसिद्धी केल्यास सिंधुदुर्ग रॉक आर्टच्या जागतिक नकाशावरमानाचे स्थान पटकावेल , असा विश्वासही व्यक्त केला .

सिंधुदुर्गप्रमाणे कोकणातील ठाणे , रायगड आणि रत्नागिरी या अन्य जिल्ह्यातही विविध ठिकाणी जांभा पाषाणावरकोरलेली लक्षणीय अशी चित्रे , नकाशे , काष्ठ शिल्पे , गुहा , लेणी , मंदिरे आढळून येतात . मुंबई - गोवा राष्ट्रीयमहामार्गावर हातखंब्याच्या पुढे निवळी तिठ्याजवळ जांभा दगडावर कोरलेला एक भला मोठा पथदर्शक नकाशाहा कुतुहलाचा विषय होता . सध्या मात्र हा पथदर्शक नकाशा निदर्शनास येत नाही . बहुदा तो रस्तारुंदीकरणाच्याकारणाने गायब केला गेला असावा . नव्या पिढीला या कोरीव नकाशाची फारशी माहिती देखील नाही . सदरनकाशा हा आंबा घाट , अणुस्कुरा घाट , गगनबावडा घाट , संगमेश्वर आदी ठिकाणाहून त्या काळात व्यापार -उदीमासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना निश्चितच पथ - मार्गदर्शक ठरला असेल .

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात एकेकाळी बंदर असलेल्या बारसू या गावातील मोठ्या डोंगरावर असलेलीकोरीव चित्रे ऐतिहासिक अभ्यासकांना व संशोधकांना आजवर एक आव्हान ठरली आहेत . ही चित्रे प्रत्यक्ष पाहतानाती कोणत्या तरी धार्मिक कारणासाठी काढलेली असावीत असेच वाटते . मात्र ती चित्रे कोणी आणि कधी कोरली यासंदर्भातील शोध अद्यापही लागलेला नाही . रत्नागिरीनजिकच्या नाचणे या गावीही अशाच प्रकारचे जांभादगडावर कोरलेले नौकेचे चित्र पहावयाला मिळते .

रायगड जिल्ह्यात कान्हेरी , कुडेमांदाड , चौल गांधारपाले ( महाड ) तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पणदेरी ,पन्हाळेकाझी , कोळकेवाडी , कळंबस्ते या ठिकाणची जीर्णावस्थेत असलेली लेणी हीसुध्दा बहुतांशी दुर्लक्षितचराहिलेली आहेत . कोकणात या व अशा अनेक लेण्यांची उभारणी इसवी सनापूर्वी २०० वर्षे आधी झाली असावी ,असा अंदाज वर्तविला जातो . कोकणात बौध्द धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरणारे बौध्दभिक्खू हे या लेण्यांचा वापर त्यांच्या वास्तव्यासाठी आणि साधनेसाठी करीत असावेत , असे अनुमान काढले गेलेआहे .

नंतरच्या मध्ययुगीन काळात कोकणात दीर्घकाळ शिलाहार राजांनी राज्य केले . त्या कालखंडात कलेचा खऱ्याअर्थाने विकास व संरक्षण झाले , असे अभ्यासकांचे मत आहे . शिलाहार राजांच्या कालावधीमध्ये विकसित झालेलीकला व कलाकारांना मिळालेले आश्रयस्थान याची साक्ष म्हणजेच कसबा - संगमेश्वर येथील हेमाडपंथी श्री कर्णेश्वरमंदिर , हे होय . या संपूर्ण परिसरात लहानमोठी सुमारे ३६० मंदिरे आढळून येतात . म्हणूनच या ठिकाणालापूर्वीच्या काळी दक्षिण काशी असेही म्हटले जात असे .

कोकणातील पाषाण प्रस्तरावर निर्मित झालेली चित्र व शिल्प संस्कृती ही वैविध्यपूर्ण असून ती फारच अतिप्राचीनआहे . या कलात्मक संस्कृतीची निश्चित कालगणनाही अद्याप झालेली नाही . तसेच ही कलानिर्मिती कोणत्याकारणासाठी , कधी , कोणासाठी निर्माण झाली आणि कोणी निर्माण केली , याबद्दलचे ठोस पुरावे अद्यापपर्यंतउपलब्ध झालेले नाहीत किंवा त्यांचा साधा मागमूसही सापडलेला नाही . कोकण किनारपट्टीवरील हिवाळे आणिकुडोपीसारखी अनेक ठिकाणे पुरातत्वीय दृष्ट्या खूप महत्वाची असून ती या भागातील आदिम मानवी समूह वत्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध करून देऊ शकतील . मात्र , या ठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्यानेपरिक्षण होणे , हाती येणाऱ्या माहितीचा संयुक्तिक अर्थ लावणे , त्यांचा कालावधी निश्चित करणे इत्यादी बाबींवरलक्ष केंद्रीत करावे लागेल . अशा प्रकारच्या संशोधनामुळे कोकण प्रांताच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याचीशक्यता आहे . तसेच , ही ठिकाणे पर्यटनदृष्ट्याही विकसित केल्यास कोकणच्या पर्यटन विकासालाही त्यांचानिश्चितच हातभार लागू शकेल . मात्र त्यासाठी सरकारला संबंधित क्षेत्रे अधिग्रहीत करुन ती संरक्षित म्हणून जाहीरकरावी लागतील . मात्र अशी कृती आजपर्यंत कोणत्याच सरकारने केलेली नाहीत . कोकणातील लोकप्रतिनिधीहीया बाबतीत उदासीन आहेत . अशा पार्श्वभूमीवर स्वतः " हौशी रॉक आर्ट संशोधक " आणि रॉक आर्ट सोसायटी ऑफइंडियाचे सदस्य असलेल्या सतीश लळीत यांनी बदामी येथील परिषदेमध्ये आपला शोध निबंध सादर करूनकोकणाच्या दृष्टीने फार मोठे काम केले आहे . आजवर कोकणातील अमूल्य अशा भारतीय चित्र - शिल्प संस्कृतीचीफारशी दखल कोणी घेतलेली नाही . अशा वेळी लळीत यांच्यासारख्या सरकारमधील एका मोठ्या पदावरअसलेल्या अधिकाऱ्याने या कामात रस घेऊन काही बाबींवर प्रकाश पाडण्याचे जे काम केले , त्याबद्दल त्यांचेअभिनंदन आणि कौतुक करायला हवे .

संदर्भ- महाराष्ट्र टाइम्स व इतर लेख

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजापूरजवळच आर्यादुर्गा मंदिरासमोरच [ हसोळ ?]असंच एक कातळशिल्प पाहिलं होतं. त्याचा संदर्भ व अन्वयार्थ मात्र अधिकारवाणीने सांगणारं तिथं कुणी नाही भेटलं. खरंच संशोधनासाठी चांगला विषय आहे हा !

रमेश चांगली माहिती आहे, खरच संशोधन व्हायला हवे.
मला वाटत मायबोलीकर वरदा यावर प्रकाश टाकू शकतील.

मंदार चित्र पाहिले नव्हते, धंन्यवाद.

अरे व्वा, मला आधि वाटायचे की हे असे फक्त अमेरिकेतच (दक्षिण?) आहे.
बर, हे बघण्यासाठी गुगल म्याप्/अर्थ वापरताना गाव/ठिकाण काय देऊ? Happy