भोलागडी.......................! भाग ३

Submitted by श्रीमत् on 31 August, 2012 - 14:16

भाग एक http://www.maayboli.com/node/37250

भाग दोन http://www.maayboli.com/node/37349

नानु गुरवाला लगेचच तालुक्याच्या दवाखाण्यात नेण्यात आले. ईकडे गावभर चर्चांना नुसते उधान आलेलं यात्रा हप्त्यावर आलेली असताना गावात हे असे चमत्कारी प्रकार घडु लागले होते. त्यात गावच्या गुरवाचीच दातखिळी बसली म्हणजे नक्की भोलागडीत काहीतरी उलथा पालथ चालु आहे असे भरपुर जणांना वाटु लागले.संध्याकाळ झाली की गावातल्या बाया-बापड्या लहाण पोर हिंडेणासी झाली.त्यात झाला प्रकारावर चर्चा करण्यासाठी आबा आणि पंचांच्या पुढाकाराने रात्री सर्वांनी केदारनाथाच्या मंदीरासमोरील पटांगणात जमण्याचे ठरवले.

रात्री ठरल्याप्रंमाणे सर्वजण मंदीराच्या प्रांगणात जमले. मंदीराच्या प्रांगणातच उजव्या बाजुला पंच मंडळी तर त्यांच्या समोरच सतरंजीवर गावकरी समोरासमोर बसले. उगीचच खोगीर भरती आणि विषयाला फाटे नको म्हणुन घरपट एकच माणुस बोलावण्यात आला होतां.

नानु गुरवाच्या अनुपस्तिथीत खिशातुन तंबाखुची पिशवी काढत पोलीस पाटलानेच विषयाला सुरवात केली.
"हे बघा! यात्रलां आता फकस्त सहाच दिस र्हायल्यात, सुमीच्या तब्येतीमुळं तात्या सरपंच आज येऊ शकले नाहीत तवा त्यांच्या आणि नानु गुरवाच्या माग आपल्या समध्यासनीच समद बघाया लागणार हायं, मग ती नवसकर्यांची यादी असो, गावची वर्गणी असो वा कुस्त्यांचा फड परत्येकानं आपल काम यवस्तीत वाटुन घ्येतल मग झाल. ऋषी आई आणि केदारबा बसलेत चांगल वाईट बघाया. तवा काय बी काळजी करायची गरज न्हाय.

पोलीस पाटलाचा शब्द पडतो न पडतो साबळ्याचा देनबा बोलला, "पाटील समद बरुबर पण नानु गुरवाच काय? गड्यान आस काय बघीतल? जे तोंडाला एकदम फेसच आला त्याच्या, आणि त्याच्या मागं केदारबाचा अभिषेक कोन करणार? का यंदा बी भोलागडी बळी घेणार यात्र आधी? यावर पंचामधील भगवान नाना बोलु लागले, हे पहा भीतीने घाबरुन आपण जुन्या चालीरीती बंद पाडु शकत नाही. चालीरीती प्रमाणे यात्रेच्या सहा दिवस आधी पासुन यात्रा संपेपर्यंत रोज रात्री ऋषी आईच्या घळीत दिवा जाळायचा असतो. पण नानु गुरवाच्या माग आता आपल्यापैकी कोणाला तरी हे काम केलच पाहीजे.

यावर पोलीस पाटीलच म्हणाले "ती काळची तुम्ही करु नका, ह्ये बघा गॅलण. घरुण येतानाच मी आज तेल घेऊन आलोय. गावात कणची भुतं नाचायची हायत ती नाचु द्या ऋषी आईसमोर दिवा ज़ळणारच.

" हे अगदी छान झाल हा "आबा म्हणाले, "हे भुत बीत काही नसत, "हा मी पुर्वजांच्या प्रथेच्या आड नाही. पण ह्याच प्रथांचा वापर करुण जर कोणी गाववाल्यांची फसवणुक करत असेल तर मात्र हा मोठा अपराध आहे.
बैठकीतल्या काही जणांना आबांचे शब्द बरोबर समजले होते.

"हीथे जिवंत माणुसच माणसाचा वैरी आहे.तिथे भुताच काय घेऊन बसलात, त्यातच जर एखादा मुंजा बिंजा भेटलाच वाटेत तर या तंबाखु देऊन "आबा म्हणाले. तसे पंचासहीत सर्वजण हसायला लागले. यात्रेच्या तयारीविषयीची सर्व बोलणी झाल्यानंतर सर्वजन ऊठुन आपआपल्या घरी जायला निघाले एव्हाना बर्‍यापैकी अंधार झाला होता. मगाशी ठरल्याप्रमाने पोलीस पाटील आणि देनबा तेलाचं गॅलन घेऊन ऋषी आईच्या घळीच्या दिशेने वर जाऊ लागले.

वरच्या आवाडातली घर मागे पडेपर्यंत दोघे व्यवस्थीत एकमेकांशी झाल्या प्रकारावरुन चर्चा करत जात होते.
मगाशीच त्यांनी तात्यांच्या घरापासुन जाताना सुमनच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता. तेव्हा न राहवुन देनबा पाटलाला बोलला "पाटील काय झाल आसल वो सुमनला? यावर पाटील एकही शब्द न बोलता त्याने फक्त हातानेच त्याला गप्प राहण्याची खुण केली. आता गाव बर्‍यापैकी मागं पडलं होतं. समोर फक्त छोटीसी पायवाट आजुबाजुला करवंदीच्या जाळ्या आणि मधीच एखाद आंब्या फनसाच झाड. वातावरणात गुढ अशी शांतता भरुन गेलेली. आणि ती शांतता त्या दोघांव्यतीरिक्त फक्त रातकिडेच मोडण्याचं धाडस दाखवत होते.

ईतक्यात चालता चालता देनबा मध्येच थबकला. त्याला आस मध्येच थांबलेल पाहुन पाटील चपापला. त्याने डोळे मोठे करुन त्याला श्श्शश्श्स्स्स्स्स्स्स्स. केलं आणि आपला हात काणाकडे नेऊन शांत पणे काहीतरी ऐकण्यास सांगितले. तसे दोघेही घाबरुन कानोसा घेऊ लागले तसा वार्‍याच्या घोंगावणार्‍या आवाजा बरोबर त्यांना एक वेगळाच आवाज येऊ लागला.

धिन धिन तक.तक.....धिन धिन तक तक........धिन धिन तक तक.........आता दोघांच्याही पोटात भितीचा गोळा येऊ लागला. आवाजाच्या भीतीने दोघेही झपाझप पावल ऊचलु लागले. जस जसे ते घळी च्या दिशेने जाऊ लागले तस तसा तो आवाज अजुनच मोठा होऊ लागला. देनबा बरोबर असल्यामुळे कदाचित पाटील घाबरत का होईना पण पुढे पुढे चालत होता. आता बस अजुन एक वळण घेतल की उजव्या बाजुलाच घळ होती पटापट तेल ओतल की पळायच इथुन पाटील मनाशीच बोलत होता. त्याने हळुच देनबाला आवाज दिला. पण कसलीच चाहुल लागेना म्हणुन पाटलाने मागे वळुन पाहीले. तसे त्याच्या काळजात धस्स झाले.मागे कुणीच नव्हते. देनबा घाबरुन मागच्या मागेच पळाला होता. त्यात समोरील द्रुश्य पाहुन तर पाटील थरथर कापायलाच लागला. घळीत अगोदरच दिवा जाळला होता आणि समोरच दिव्याच्या मंद प्रकाशात पाच सहा माणस संथ तालात गोल गोल फिरत होती. त्यांनी गुडघ्यापर्यंत धोतर घातले होते. आणि डोक्यापासुन घोंगड्या बांधल्या होत्या, आणि त्यांच्या रिंगणात त्याच वेषातली दोन माणसं चमड्याचे ढोल संथ लयीत बडवत होते. धिन धिन तक तक......धिन धिन तक तक.......धिन धिन तक तक... ...............

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबासाहेब तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
Happy
पुढचा भाग नक्की मोठा टाकण्याचा प्रयत्न करेन.