(भवताल नामक पर्यावरणविषयक जागृती करणार्या संस्थेतर्फे दरवर्षी एका विशिष्ट विषयाला वाहिलेला दिवाळी अंक प्रकाशित होतो. २०१८ च्या दिवाळी विशेषांकाचा विषय पारंपरिक जलसंधारण पद्धती हा होता. अंकाचे नाव 'उदक राखिले युक्तीने' (संपादक; अभिजित घोरपडे). त्यात प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची असंपादित/ संपादकीय काटछाट न केलेली आवृत्ती इथे पुनर्प्रकाशित करत आहे)
आलं आलं आलं
(चाल : पाडाला पिकलाय अंबा, पण फक्त या तीन शब्दांसाठीच.)
तर
आलं आलं आलं...
"अरं पण कोण आलं?"
पारावरच्या चोंबड्यापासून
खुडूक साल्या कोंबड्यांपर्यंत
आणि मरतुकड्याशा गुरापासून
मरतुकड्याशा पोरापर्यंत!
सगळ्या गावात उठली बोंब
आलं आलं आलं...
कुणी म्हणालं विटांसंगट माती फुकाट
कुणाला घावलं मातीसंगट शिमिट फुकाट
"सरकारदेव पावला! त्येची माणूसकी हाये म्हणायची अजून!"
"तर! गाव सारा नासवला इथं तिथं हागून- मुतून!"
"आयला, कसं वाटलं रं?"
"काय वाटायचं? मध्येच साल्या तुझं पाणी संपल रं!" हॅ हॅ हॅ
सटार्या सांगे भपार्याला आन भपार्या आणखी कोणाला!
दिवस सरला चर्चेत-