नसतोस घरी तू जेव्हा..

Submitted by अलका_काटदरे on 9 August, 2009 - 04:58

(मान्यवर कवींची माफी मागून..)

नसतोस घरी तू जेव्हा
कसं शांत शांत वाटते
भूणभूण कसली नाही
मी एकांतवासी असते..

नसतोस घरी तू जेव्हा
माझ्या आरश्यात मला मी बघते
किती प्रेम तुला दिले अन
किती गुन्हे तव केले न्याहाळते..

नसतोस घरी तू जेव्हा
मैत्रिंणींशी गप्पा मी मारते
एकीच्या बोलण्यात मात्र
विरहाची भावना दिसते..

नसतोस घरी तू जेव्हा
सेलफोनची किणकिण वाढते
माझ्या लक्षात येईपर्यंत
फोनबील दुप्पट झालेले असते..

नसतोस घरी तू जेव्हा
कविता निवांत मी लिहिते
वाचतांना त्या मात्र
सर्वांची घरघर वाढते..

गुलमोहर: 

अलकाताई,
तुम्ही पण विडंबन छान लिहीता!
<<"तो घरी नसल्यावर थोडसे बरे वाटते..
पण परत त्याच्या वाचून करमत नाही">> Happy

<<<धन्यवाद मंडळी.
फोनबील दुप्पट झाल्याचे कारण समजलेच असेल.
दोघे एकमेकाशी दर तासाभराने बोलत राहतात! >>>

मग कविता लिहिता कधी ?:)
चांगली लिहिलिये .