साधारण पंधरा-सोळा वर्षांपासून मी मायबोलीचा नियमित वाचक आहे . वेळ मिळेल तसा आणि मूड लागेल तसा इथल्या साहित्याचा आस्वाद मी घेत आलो आहे. फक्त त्यात सलगता राहिलेली नाही.
म्हणजे असं की नेहमी किंवा रोज इथे येऊन नवीन लेखन कोणी केले आहे याचा धांडोळा घेऊन वाचत राहिलो तर नियमित लिखाण करणाऱ्या लेखकांची मनात एक प्रतिमा तयार होते . आपल्याला कोणाचे लेखन आवडत आहे याचे ठोकताळे तयार होतात आणि मग आपण त्यांचं नवीन लेखन कधी येते याची वाट पाहू लागतो.
पण मधे गॅप आली , समजा एक दोन तीन महिन्यांनी परत आलो तर बऱ्याच वेळा वेगळे लेखक येथे लेखन करू लागलेले आढळतात आणि जुन्यापैकी किंवा आधीच्या पैकी लेखक दिसेनासे झालेले असतात. आता आठवायचा प्रयत्न केला तर त्यांची नावेही आपल्याला नीटपणे आठवत नाहीत. कधी कधी एखाद्या कथेतील छोटासं वर्णन~ कथा भाग आठवत राहतो आणि मन कुरतडत राहतं की कुठली कथा होती, कोणाची होती? त्यांचं लेखन परत वाचता येईल का?
मला हे अगदी आपल्या जीवनातल्या प्रवासाची साधर्म्य दाखवणारे वाटते . जसे की शाळेमधून कॉलेजमध्ये जेव्हा जातो तेव्हा मित्र-मैत्रिणी बदलून जातात. आधीचे जे अतिशय जवळचे जिवलग असतात ते हळूहळू भेटेनासे होतात, आठवणीतूनही हळूहळू काढता पाय घेतात. कॉलेजातून नोकरीत प्रवेश केल्यावर पुन्हा हेच घडते आणि नोकऱ्या बदलल्यावर तर हे अपरिहार्यपणे घडत राहते कारण आधीच्या नोकरीतल्या सवंगड्यांची ओळख ही कृत्रिमच झालेली असते.
मला आता मायबोलीवर आल्यावर हे जाणून घेण्याची खूप इच्छा असते की आपण त्या काळात वाचत होतो, ते लोक आता कुठे असतील? आता ते इथे का येत नाही? ते स्वतः लेखन करत नाहीत तर निदान दुसऱ्यांच्या लेखनाला प्रतिसाद का देत नाहीत? त्यांना त्यांच्या लेखनातून आणि आपल्या वाचनातून भेटावसं वाटत राहत
कहां गए वो लोग
Submitted by पशुपत on 20 May, 2026 - 07:56
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा