Submitted by स्वरुपसुमित on 20 November, 2024 - 13:58
मित्रानो
महायुती ला बहुमत मिळेल कि नाही ते जाऊ द्या
समजा मिळालं तर ?
फडणवीस ह्याची इच्छा नाही
तावडेंच्या गेम झाला
गडकरी केंद्रात
मुंडे भाऊ बहीण बीड पुरते
पूर्ण महाराष्ट्र भर असा चेहरा नाही
एकनाथ शिंदे वेळो वेळी डोईजड झालेत
अजित पवार मु मा सध्या शक्य नाही
शकयतो मराठा समाजाचा चेहरा पाहिजे
आणि ज्यांना प्रशासचनाचा दांडगा अनुभव आहे तेच होणार
अजून कोणती नावे सुचतात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दोन नावे सुद्धा येतील.
दोन नावे सुद्धा येतील.
अडीच-अडीच पॅटर्न!
दादा शिंदे अडीच वर्षे..
दादा शिंदे अडीच वर्षे.. महत्वाची खाती भाजप कडे
देवालाच ठाऊक !
'देवा'लाच ठाऊक !
अजित पवार मुमं व्हावेत ही
अजित पवार मुमं व्हावेत ही वैयक्तिक ईच्छा आहे. प्रशासनावर मजबूत पकड आणी अधिकारी वर्गाकडून काम करून घेण्याची हातोटी हे गुण मला आवडतात. पुण्यात ते पालकमंत्री म्हणून बदलून आल्यावर प्रशासनाचा सूर मवाळ झाला आहे.
आमच्या सोसायटीतल्या भाजप
आमच्या सोसायटीतल्या भाजप कार्यकर्त्याने भाजपने छापलेल्या व्होटर स्लिप्स वाटताना सांगितलं - मोदीजी को लाना है. म्हणजे आदर्णीय मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. किंवा कोणीही मुख्यमंत्री होऊ द्या. राज्य आदर्णीय मोदीजीच चालवतील.
राजस्थान , छत्तीसगढ, मध्य प्रदेशात भाजपने मुख्यमंत्री म्हणून कोणीही अपेक्षा केली नसेल, असे चेहरे निवडले. राजस्थानचे मुख्यमंत्री तर पहिल्यांदाच आमदार झाले होते. महाराष्ट्रातही तसंच व्हावं.
भाजपला जास्त सीटस मिळाल्या तर
भाजपला जास्त सीटस मिळाल्या तर भाजपचाच होईल मुख्यमंत्री, ते पाच वर्ष पदापासून दूर राहीलेत. फडणवीस व्हायचे जास्त चान्स वाटतात, पण पद घेऊ नये त्यांनी असं वाटतं कारण आत्ता जे तावडे प्रकरण झालं त्यात दोन प्रवाह ऐकले एकतर गेम त्यांनी केला किंवा ते दुसऱ्या पक्षाचेच आरडाओरडा करत त्यांचा उमेदवार हरेल ह्या भीतीने त्या पक्षाने केला.
विनोद तावडे यांच्यासाठी मनापासून वाईट वाटतंय. भाजप जास्त संख्येने आली तर मुख्यमंत्री त्यांचा व्हावा पण तो आयात केलेला नसावा. ओरिजनल असावा. एक भाजप मतदार म्हणून वाटतंय. इथले डोंबिवलीचेही होऊ शकतात, ते दे फ यांच्या जवळचे आहेत. पर्सनली तावडे किंवा मुंडे झालेल्या आवडतील.
बाकी माझ्याकडून सर्वच पक्षांना मनापासून शुभेच्छा.
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे
अजित पवार मुख्यमंत्री चालतील
अजित पवार मुख्यमंत्री चालतील मला पण भाजपतर्फे नाही. कारण मग ते राष्ट्रवादीचं सरकार होईल जस उबाठा काळात ते उमुंम असताना झालेलं. मुंम कुणीही असो जर ते सत्तेत असतील तर अर्थकारण राष्ट्रवादीच्या फायद्याचे करण्यात अजितदादा वाकबगार आहेत. ते मुंम झाले तर बघायलाच नको. अख्ख्या राष्ट्रवादीला नवचैतन्य मिळेल.
तावडेंचा घात झालाय. आशिष शेलार फारशी चमक दाखवू शकले नाहीत असे वाटते.
फडणविसांची खरोखर ईच्छा नसेल तर मग गडकरी किंवा भाजप नेहमीच्या धक्कातंत्रानुसार पोतडीतून नवा चेहरा काढेल.
तेवढी कुवत नाही त्यामुळे कुठलेच मुंडे अज्जीबात नको.
कुणाला किती जागा मिळतील हे
कुणाला किती जागा मिळतील हे लवकरच स्पष्ट होईल, राष्ट्रवादीचे पारडे नेहेमी प्रमाणेच जड राहिल.
पातळयंत्री फडणवीस आणि त्यांनी उभे केलेले जरांगे ठरवतील मुख्यमंत्री पदावर कुणाला टिकवायचे.
शकयतो मराठा समाजाचा चेहरा
शकयतो मराठा समाजाचा चेहरा पाहिजे>> जरांगे पाटील यांना संधी द्यावी.
बऱ्याच जणांना तावडें यांचा
बऱ्याच जणांना तावडें यांचा घात झाला असे वाटते.
पण राष्ट्रीय पातळी वरचा नेता इतका गाफिल राहील असे वाटत नाही.
तावडेंनी सहानुभूती मिळवली आणि ठाकूरांनी कोणाचे नाव घेतले नाही पण एकच नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर आले.