रोमहर्षक जीवन भाग ५
कार आणि बसेसच्या असंख्य अपघातातून मी गेलो आहे.
१९८१ मध्ये स्टाटफील्ड चे घैसास, आपटे, देशपांडे, मी आणि ड्राइवर असे कारने मुंबईला लवकर निघालो. गाडी कोरी होती आणि ड्राइवर प्रदीर्घ अनुभव असलेला होता. प्रथेप्रमाणे खोपोलीतील संगमला ब्रेकफास्ट करून गाडी पुढे निघाली. वातावरण रम्य होते रिमझिम पाऊस सुरु होता आणि गाडी ५०-६० च्या वेगाने धावत होती. चौक जवळ वावंढळ गाव आहे. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. अचानक काहीही कारण नसताना गाडी स्पिन झाली आणि ८०-९० फूट फेकली गेली. रस्त्याच्या उजव्याबाजूच्या गवतातून चालणाऱ्या एका प्रौढ माणसाला त्याचा बॅट सारखा जबरदस्त फटका बसला आणि गाडी पुण्याकडे तोंड करून उभी राहील. तो माणूस जखमा होऊन बेशुद्ध पडला होता. आम्ही एक एस टी बस थांबवून कंडक्टरला दादा - पूता करून त्या माणसाला गाडीत चढवले. जवळच असलेल्या खालापूरच्या सरकारी दवाखान्यात त्याला न्यायचे होते. आमचा ड्राइवर, घैसास आणि देशपांडे एस टी मधून त्याचा बरोबर गेले. मी व आपटे गाडीवर लक्ष ठेवण्यासाठी तेथेच थंबलो . तो माणूस जवळपासचा असला तर आम्हाला लोकं बडवतील आणि गाडीचीही नासधूस करतील अशी शक्यता होती. पण तो माणूस तिथला नसावा. दोन तासानंतर देशपांडे आणि पोलीस त्या वृद्धाला ऍम्ब्युलन्स मधून घेऊन आले. खालापूरच्या दवाखान्यानी त्या माणसाला ताबडतोब ठाण्याच्या दवाखान्यात नेण्याचे सांगितले होते. देशपांडे त्या प्रकारात फारच घाबरला होता आणि तो ठाण्याला जाणे शक्य दिसत नव्हते. शेवटी मी, आपटे आणि पोलीस असे तिघे ऍम्ब्युलन्स मधून ठाण्याला गेलो. हॉस्पिटल मध्ये पोहचताच स्ट्रेचरवरून त्याला आत नेण्यात आले. नेहमीप्रमाने कागद पत्राची आवश्यकता होती. तेथूनच जाणाऱ्या एका लेडीज डॉक्टरला सासागितले कि आमच्या पेक्षा जास्त माहिती पोलिसांकडे आहे. तुम्ही याच्यावर उपचार चालू करा . तिनेही ते मान्य करून स्टमक पंप आणि सलाईन स्ट्रेचर वर असतानाच लावले आणि त्याला वॉर्ड मध्ये हलविले. कागदपत्रांची पूर्तता करून आपटे, मी आणि पोलीस वॉर्ड मध्ये गेलो. थोड्याच वेळात एक सिनियर डॉक्टर तेथे आला आणि आम्हा तिघांना वॉर्ड बाहेर हाकलले. अर्ध्या तासांनी तो डॉक्टर बाहेर आला आणि म्हणाला ' तुम्ही आता घरी जायला हरकत नाही ' आम्ही त्याला उत्सुकतेने विचारले ' पेशन्ट बरा आहे ना ? ' यावर तो डॉक्टर जांभई देऊन म्हणाला ' नो ! नो ! ही इज ऑलरेडी डेड' आम्हाला वाईट वाटत होते पण पोलीस हसून म्हणाला ' चला आता चहा पिऊ या ' नंतर तो थांबून म्हणाला साहेब १५ वर्ष नोकरी झाली आहे हायवे असल्यामुळे महिन्यात १०-१५ तरी प्रेते सापडतात. किती जणांसाठी रडायचे ?' परत येताना ऍम्ब्युलन्स ड्राइवर ही व्यतीत झाला होता. पोलीस चौकीत, प्राणघातक अपघात असल्यामुळे ड्रायव्हरला गजाआड केले. ड्राइवर गजावर डोके आपटून घेत होता आणि पोलीस त्याला समजावत होते. इन्स्पेक्टर आम्हाला म्हणाला कि जागाच रक्ताला चटावली आहे. दर अमावास्येला ५-६ बळी तरी जातातच'. आणि खरोखच त्या दिवशी आम्ही ठाण्यावरून परत यायच्या कालावधीत वेगवेगळ्या अपघातात ५-६ जण तरी मृत्युमखी पडली होती. पोलिसांनी मृत माणूस पनवेलचा असून भिक्षुकी करणारा आहे असे सांगितले. त्याच्या हातामधील पिशवीत त्याच्या घरचा पत्ता होता.
पुढची काय व्यवस्थेकरिता त्याला मदत लागणार आहे का ? त्याची घरची स्थिती कशी आहे हे माहित नसल्यामुळे मी व आपटे परत ठाण्याला निघालो. आम्ही पोहचलो त्या अगोदर पोलिसांनी त्याच्या सर्व फॅमिलीला ठाण्याला पाठवण्याची व्यवस्था केली होती. सर्वच मध्यमवर्गातील आणि असहाय्य दिसत होते. त्या माणसाचे आडनाव ही जोशींचं असून त्याला तीन मुली, बायको आणि आई होती आणि त्याच्या भिक्षुकीवरच घर चालत होते. त्यांच्या हतबलते पुढे आम्हीच रडलो.
सर्व स्थिरथावर झाल्यावर त्यातील एका मुलीला कंपनीच्या मुंबई येथील ऑफिस मध्ये आम्ही कायमस्वरूपी नोकरी दिली .
माझ्या बऱ्याच मित्रांना त्या टप्पयातून जाताना विचित्र अनुभव आलेले आहेत. गोस्वामी नावाच्या मित्राला काही सेकंदाकरिता कार ७-६ इंच उचलली गेली आहे असे दोनदा अनुभवयास आले. त्यावेळी त्याचा कारवरचा कंट्रोल पूर्णपणे गेला होता.
.................. अपूर्ण
ते १८८१ आईवजी १९८१ करा सर.
ते १८८१ आईवजी १९८१ करा सर.