का होतं असं!

Submitted by सांज on 20 January, 2023 - 02:19

का होतं असं?
मन विस्कळीत झालं की,
गुंत्यांमध्ये गुंतत गेलं की
तू आठवतोस.
मध्यरात्री रस्ते शांत झाल्यावर,
खिडकीतून बाहेरचे दिवे मिणमिणतात तेव्हा
वारा रहमानच्या सुरावटी सारखा तरंगत असताना
मन हलकं हलकं होत जाताना,
तूच आठवतोस.
का होतं असं?

चार ओळी मनाच्या तळातून पोहून वर आल्या की
कागदावर त्या उतरवताना
तू आठवतोस.
कोणालाही दाखवण्या आधी 
तू त्या वाचाव्यास 
असं मग उगाच वाटत राहतं..
का होतं असं?

माझ्या प्रत्येक कवितेचा पदर
विणला जातो, तुझ्या जाणिवेच्या धाग्याने.
तो नेसून तुला दाखवण्याचा मोह मग आवरता आवरत नाही..
तुझं असं माझ्या आत-आत असणं
मनातून डोळ्यांत तरळत राहणं
भिजवत रहावंसं वाटतं.. सतत शाईतून.
का होतं असं?

सांज

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
सांज, अगं आधीच्या कथा अर्धवटच राहिल्यात ना....!!

@आंबट गोड
हो, मधल्या काळात काही कारणाने खूपच मोठा ब्रेक झाला. आता लिहायला घेतल्यात परत.

खूप सुंदर झालीय...
मागे एका कवितेवर प्रतिसाद दिला होता, तेच इथे लिहितो.
ही कविता एखाद्या आर्ट वेबसीरिज किंवा मुवीचा सुरुवातीचा मोनोलोग म्हणून शोभेन!!!

वाह! खुप सुंदर

माझ्या प्रत्येक कवितेचा पदर
विणला जातो, तुझ्या जाणिवेच्या धाग्याने.
तो नेसून तुला दाखवण्याचा मोह मग आवरता आवरत नाही..>>>>>>>>>> खूपच आवडलं.