उजाळा आठवणींचा ।।

Submitted by ashokkabade67@g... on 12 August, 2022 - 09:44

तस तर जनतेची स्मृती अल्पजीवीच असते अस प्रत्येक पक्षातील नेत्याला वाटत असत आणि म्हणून च ते एखाद्या प्रश्नावर आपण मागे काय मत मांडले आणि आता आपण काय बोलतोय किती विरोधी बोलतोय हे विसरून जातात ्खरतर मायबोलीच्या संचालक मंडळाला मला एक फुकटचा सल्ला द्यावासा वाटतोय आणि तो म्हणजे त्यांनी आठवते कानेत्यांनो या नावाच एक नवच सदर सुरु कराव आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याच एखाद्या घटनेवर मत परिवर्तन झाल की त्या नेत्याला त्यानेच केलेल्या गतकाळातील वक्तव्याची आठवण करून द्यावी भक्त असोत की गुलाम या सदराला प्चंड प्रतिसाद देतील ।
गेल्यामहिन्यात महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली वेष बदलून गाठीभेटी झाल्या भाजपच्या व शिंदेंच्या सत्ताजीवी धोरणांमुळे गरीब बिचारे आमदार काय त्यो डोंगार,काय ती झाडी काय त्ये हाटेल म्हनत समदच पाहुन आले आणि ठाकरे सरकार कोसळले अद्यापही ती लढाई सुरुच आहे म्हणा झाल ते झाल वाद त्याबाबतीत नाहीच वाद सुरु झाला तो चाळीस दिवसां नंतर या युती सरकारने तयार केलेल्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांबाबत .2021सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाची आग थंड होत असली तरी धुर मात्र निघतच होता आणि फडणवीस कंपनी धुराळा उडवतच होते त्याच काळातपुजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्महत्या केली आणि महाविकास आघाडीतील एका मंत्र्यांचे नाव समोर आले आणि फडणविस कंपनीच्या हाती कोलीतच आले .मंत्रीमंडळ बनवतांना स्वच्छ चेहरे मौत्रीमंडळात असतील अस आश्वासन देणा ऱ्या फडणविस मंत्रीमंडळात राठोड मंत्री झाले आणि त्यांचे समर्थन आज फडणवीस करत आहेत पण हेच फडणवीस पुजा चव्हाण प्रकरणात पत्रकार परिषदेत काय म्हणाले हे येथे सांगावेसे वाटते .
1 मार्च 2021 फडणविसांची पत्रकार परीषदेतील वक्तव्य . मुख्यमंत्र्यांनी साऔगाव की बाहेर आलेल्या अँडियो क्लीपखऱ्या आहेत की खोट्या 2)यवतमाळ मेडिकल काँलेजमधे घडल ते खर की खोट ? 3)माध्यमांनी बाहेर काढल ते खर की खोट? पण एवढ झाल तरी जर कुणाला साधुसंत ठरवायच असेल तर जरूर त्यांनी ठरवाव यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येत .
संजय राठोडांचा राजीनामा घेण्यात साठी याच भाजप नेत्यांनी रान उठवले होते शकतो वटी संजय राठोडांना राजीनामा दिला मग आता प्रश्न असे आहेत की
1)मविआ सरकारला व त्यातील मंत्र्याना बदनाम करण्यासाठी भाजपने हा उपदव्याप केला का?
2)सत्तेसाठी भाजप किती खालच्या स्थराचे राजकारण करत आहे?
3)जर ते खरोखरच दोषी होते तर मग आज ते पवित्र असल्याचा साक्षात्कार भाजपला अचानककसा झाला आणि एकदम युतीच्या मंत्रीमंडळात स्थान का दिले
4) ते दोषी नसतील तर त्यांच्यावर आरोप का केले आणि आज कुणाची नही तिकता जनते समोर आली.?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults