ईरोधी पक्षाच्या नेत्यायले येड म्हनाव की खुळ

Submitted by ashokkabade67@g... on 8 August, 2022 - 04:50

आजच म्या मीडियावर ऐकलकी ब्वा त्ये भाजपच्या वळघनीले जाउन बसलेल्या अब्दुल सत्तारची पोर पोरीभी त्या टिईटी घोटाळ्यात घावल म्हने आसा कुनीतरी आरोप केला आते याले काय म्हनाव आर बाबांनो सत्तार सायेब शिंदे सायबासोबत भाजपच्या वळचनीले जाऊन बसले पयले त सत्तार सायबाले भावना गवळीले जेलमधी धाडीन आशी किरकिर करनार त्ये बिचार किरीट सोमय्या ह्ये भाजपच्या वळचंनीले जाताच कोमात गेल त्ये कावून त यायले भाजप न आपल्या पवित्र वाशिंग पावडरन क्लिनचिट वाशिंगमशिन मधन धूधू धूवून काढल नी पवित्र केल तवा अशा भाजपत जाताच पवित्र व्हनाऱ्या आमदार खासदारांवर कायबाय आरोप करन बर हाय का आता भावानाताईसकट समदेच म्हनत्यात की ईडीची कटकठ नाय नी सुखान झोप भेटती मंग समजा आरोप कितीभी खर आसल तरी आशा पवित्र लोकांवर कारवाई तरी व्हयील का म्हनून म्या ईरोधी पक्षातील नेत्यायले आस बोललो ब्वा । तस त मले वाटायले लागल की मायबोलीन फकस्त राजकारण भारतात यासोबतच एक उपविभाग काढायले पायजे नी त्यो म्हंजी राजकिरण महाराष्ट्रात। छ

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पूर्ण विराम (।)
अल्पविराम (,)
योजना चिह्न (-)
प्रश्नवाचक चिह्न (?)
विस्मय बोधक चिन्ह (!)
उद्धरण चिह्न (” “)
अर्द्ध विराम (;)
उप विराम (:)
कोष्ठक {()}
लाघव चिह्न (o)
आदेश चिह्न (:-)
रेखांकन चिह्न (_)
लोप चिह्न (…) यांची कमी , बाकी ठीक आहे

दंड पूर्णविराम मराठीत 12 व्या शतकात अस्तित्वात होता |उदा चक्रधरस्वामी , ज्ञानेश्वरी इ इ |

||||

आता टिंब वापरतात.....

दांडक्याचे टिंब कुणी केले ?

संस्कृत दंड
मराठी दंड , मग टिंब
हिंदी दंड

हे कुठून आले ?

आर भावांनो काय म्हनाव ब्वा तुमाले भाषा हाय गावरान नी तीथ तुम्ही धुंडू रायलेत अल्प, नी पुर्नविराम बर झाल म्याअहिराणी भाषे नाय लिवल त्ये समदच डोक्यावरनच गेल आसत की राजेहो।

विरोधी पक्ष नेते,कार्यकर्ते ह्यांना ed, CBI, income-tax ही टार्गेट करतं आहे.

पण म्हणावा असा विरोध राजकीय पक्ष करत नाहीत.
ह्याचा अर्थ ह्यांचे khotale आहेत.
सर्व पक्षाचे राजकीय नेते घोटाळे बाज आहेत.
त्या मुळे पक्षीय भेदभाव न करता सर्रास सर्व नेत्यांवर कारवाई लोकांना अपेक्षित आहे .

जनतेवर तर कोणता दबाव नाही ना.
त्यांनी निवडणुकीत सत्ता धारी पकाशला धडा शिकवावा
जनता इतकी mature आहे असा विश्वास कोणालाच नाही .
जात,धर्म,दारू maton ह्या वर मत देणारी लोक आहेत

नितीश कुमार ह्यांनी बाहेर पडून चांगला संदेश दिला आहे.लोकशाही ल धोका bjp कडून आहे.हा पक्ष परत कधीच भारतात सत्तेत नको.
दोन टर्म मध्येच मित्र अब्जो पती आणि जनता भिकारी झाली.

संजय राठोड पेक्षा फडणवीस लाच उपमुख्यमंत्री का केले हा मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्र मधील सामाजिक वातावरण बिघडवण्या मध्ये फडणवीस च आघाडीवर आहे.
पण हे खरे गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत असतात.