२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन २०२२

Submitted by bvijaykumar on 24 January, 2022 - 07:01

भारत निवडणूक आयोगाची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली . हा दिवस संपूर्ण देशभरात ''राष्ट्रीय मतदार दिन'' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात होणारी प्रत्येक निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाचा घसरणारा टक्का यामुळे निवडणुकीत लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने २०११ पासून भारत सरकारने भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिन २५ जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिन" म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून जनजागृतीसाठी केला जात आहे. या दिवशी भारत निवडणूक आयोगाची ओळखपत्रे [VOTER CARD ]वाटले जात असून सध्या वाटल्या जातात की नाही माहीत नाही जाणकारानीं सांगावे ... या दिवसाबद्दल एक मतदार म्हणून काय वाटते ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मतदार म्हणून माझी अपेक्षा - निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र, निष्पक्ष यंत्रणा आहे हे त्यांनी स्वतः: लक्षात ठेवावे.

मतदार म्हणून माझी अपेक्षा - निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र, निष्पक्ष यंत्रणा आहे हे त्यांनी स्वतः: लक्षात ठेवावे. >>>>>>>>>> त्यांनी म्हणजे कोणी ?????

ध न्य वा द .. भरत.

भारताची जनता अपरिपक्व आहे. रामायण,महाभारत हा काळ सोडला तर
भारतीय नागरिक महा मूर्ख आहेत हे वेळोवेळी इतिहासात पण सिद्ध झाले आहे.
किरकोळ ताकत असणाऱ्या मुघल आणि ब्रिटिश लोकांनी भारतावर अनंत काळ राज्य केलें
.
महायुद्ध झाले नसते तर आज पण भारत गुलाम असता.
मतदान ची ताकत काय आहे हे अती मूर्ख भारतीय नागरिकांना समजत नाहीं
लोकशाही आणि मतदान चा अधिकार अती हुशार ब्रिटिश लोकांनी भारतीय नागरिकांना
फुकट दिला आहे.
आणि तो सहज मिळाला आहे .
ह्यांचे अधिकार जेव्हा गोठवले जातील तेव्हा च अडाणी जनता जागी होईल
,

भारताची जनता अपरिपक्व आहे. रामायण,महाभारत हा काळ सोडला तर
भारतीय नागरिक महा मूर्ख आहेत हे वेळोवेळी इतिहासात पण सिद्ध झाले आहे.
किरकोळ ताकत असणाऱ्या मुघल आणि ब्रिटिश लोकांनी भारतावर अनंत काळ राज्य केलें
.
महायुद्ध झाले नसते तर आज पण भारत गुलाम असता.
मतदान ची ताकत काय आहे हे अती मूर्ख भारतीय नागरिकांना समजत नाहीं
लोकशाही आणि मतदान चा अधिकार अती हुशार ब्रिटिश लोकांनी भारतीय नागरिकांना
फुकट दिला आहे.
आणि तो सहज मिळाला आहे .
ह्यांचे अधिकार जेव्हा गोठवले जातील तेव्हा च अडाणी जनता जागी होईल
,

नवीन Submitted by Hemant 33 on 27 January, 2022 - 14:35........+++++११११११