बळी
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
तो आलायं... चांडाळ ..!! वैरी बनलायं माझा... त्याचा राक्षसी आवाज माझ्या कानावर येतोयं... धमकी देतोयं ...??
कुणाला देतोयं धमकी..?
' थाड्' ' थाड्'... !!
__मग तोंडात पदर खूपसून दिलेले दबके हुंदके... !!
त्या हुदक्यांनी शेवाळलेल्या, ओल्या भिंतीही शहारून उठल्यात..!
अरे, काय आहे तिच्या हातात ??
काठी...??
फट्....!
किंकाळीचा आवाज , रक्ताचा सडा...??
देवा..!
काय घडतयं ह्या अंधार खोलीत..??
" पाप्या, माझ्या तिसऱ्या लेकीचा बळी देतोस..? कशासाठी..?? घराण्याच्या वंशासाठी..?? हे कालिका माते... हा घे तुझा बळी..!! "
तो खाली निपचित पडलायं...
__आणि हातात आयुधं घेतलेली देवी तारवटलेल्या डोळ्यांनी हे सारं पाहतेयं...!
खूप च छान लिहिली आहेस
खूप च छान लिहिली आहेस
धन्यवाद..!
धन्यवाद..!
हर्पेनजी, मनीमोहोर ताई..!
Pages