हिशोब

Submitted by रमेश पुष्पा on 9 July, 2021 - 15:11

गुरु आणि शिष्य यांच्यात असलेल्या नात्यामध्ये
कोणीही व कधीही देण्या--घेण्याचा हिशोब ठेवू नये.

देव आणि भक्त यांच्यात असलेल्या संबंधांमध्ये
कोणीही व कधीही भक्तीचा हिशोब ठेवू नये.

आई आणि मुलांमध्ये यांच्यात असलेली आपुलकीत
कोणीही व कधीही प्रेमाचा हिशोब ठेवू नये.

दोन मित्रांमध्ये त्यांच्यात असणारी मैत्रीत
कोणीही व कधीही त्यांनी एकमेकांना दिलेल्या आधाराचा हिशोब ठेवू नये.

मालक आणि कामगार यांच्यात असलेल्या व्यवहारामध्ये
कोणीही व कधीही प्रामाणिकपणाचा हिशोब ठेवू नये.

जनता आणि मंत्री यांच्यात झालेल्या तोंडी आश्वासनाचा
कोणीही व कधीही खरे-खोटेपणावर हिसाब ठेवू नये.

डॉक्टर आणि पेशंट यांच्यात होणाऱ्या उपचारात
कोणीही व कधीही त्यांनी दिलेल्या सेवेचा हिशोब ठेवू नये.

खेळाडू आणि जनता यांच्यात असणारी खेळाडू वृत्तीत
कोणीही व कधीही त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचा हिशोब ठेवू नये.

दोन देशांमध्ये त्यांच्यात असणाऱ्या मैत्रीत
कोणीही व कधीही वाईट प्रसंगांमध्ये केलेल्या मदतीचा हिशोब ठेवू नये.

नवरा आणि बायको यांच्यात लग्नात झालेल्या सातफेरे व शपथविधी
कोणीही व कधीही विश्वासावर हिशोब ठेवू नये.

सैन्य आणि देश यांच्यात संरक्षणात
कोणीही व कधीही त्यांनी दिलेल्या बलिदानाचा हिशोब ठेवू नये.

--रमेश पुष्पा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान कविता तुमच्या कवितेत खुपसा अर्थ लपलेला आहे. माणूस दिवसेनदिवस स्वार्थी होत चाललेला आहे.प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक नात्यात तो स्वतःचा फायदा बघत असतो आणि त्याचा हिशोब लावत असतो. हे दिसून आले.

प्रशासक आणि मायबोलीकर
ह्यांच्यातील सौहृदतेचे
कुणी हिशेब ठेवू नयेत

२महीने २दिवस की
६२दिवस ऎसेही
कुणी हिशेब ठेवू नयेत

4 वर्ष 3 दिवस की
1552 दिवस ऎसेही
कुणी हिशेब ठेवू नयेत
4 वर्ष 3 दिवस झाला पण
आतापर्यंत एकही लेखन नाही.

आले शब्द उतरवून घेतले
मात्रांचा हिशोब ठेऊ नये
.....
गलितगात्र होईना का वाचणारा
त्याच्या वेदनांचा हिशेब ठेवू नये

लिहिणाऱ्याने लिहित जावे,
'वाचावं आपण' असं
म्हटलं नाही कुणी तरी वाचणाऱ्याने वाचत जावे.
वाचताना काय वाचलं याचा मात्र हिशेब कोणी ठेवू नये. Light 1

आपणच रचावी कविता,
आपणच द्यावेत प्रतिसाद..
इतरांना काय वाटते याचा हिशेब कोणी ठेवू नये.

छान

keep it up .
लेखन म्हणजे लेखन म्हणजे लेखनच नसते .
तर विचारांचा सागर असतो.
शब्दांनी जमवलेला घागर असतो.
भावनांचा जोर असतो.
तर मनात नाचणारा मोर असतो .
स्वप्नात रंगवलेली लहर असते .
तर जीवनात येणारी बहर असते.

4 वर्ष 3 दिवस की
1552 दिवस ऎसेही
कुणी हिशेब ठेवू नयेत
4 वर्ष 3 दिवस झाला पण
आतापर्यंत एकही लेखन नाही
पण प्रतिसाद लिहिण्याचा हिशेब ठेवू नये.
बरेच आयडी तयार करा आणि म्हणा तोह मी नव्हेच.