वाड्यातल्या गप्पा

Submitted by अस्मिता. on 24 June, 2021 - 11:18

वाड्यातल्या गप्पा
IMG-20240909-WA0003_1.jpgहा धागा एक माणसांनी भरलेला वाडा आहे , कोणीही या, कधीही या, अंगणात कोणीतरी बाज टाकून बसलेले असेलच. तुमचे हसूनच स्वागत होईल.  मायबोलीवरचे इतर लेखन इथे कॉपी करून आणू नका. त्या विषयीचे गॉसिपही नकोच. राजकारण नकोच. कसलेही चित्र द्या , कसल्याही शुभेच्छा द्या. रोज द्या / कधीतरी द्या. लिंक्स द्या.

धाग्याचे नियम-
कुणालाही हेटाळणीजनक प्रतिसाद देऊ नका. प्रत्येकजण (अमेरिकेतले/ भारतातले/ किंवा अजून कुठलेही) आपापल्या अनुभवविश्वातील गप्पा मारायला येथे येणं साहजिकच आहे. हा धागा फनहितार्थ आहे, जनहितार्थ नव्हे. त्यामुळे अपेक्षा नकोत आणि दबाव आणण्याचे प्रयत्नही नकोत. त्यांना आपापल्या समविचारी लोकांसोबत आनंदाने गप्पा मारायचा अधिकार आहे. सर्वांशीच सौजन्याने वागा आणि गोड बोला. Happy
धन्यवाद.


Happy करा सुरू.. !

***दवंडी***
वाडा निवडक हा धागा वाडा, मग, अग वरील निवडक पोस्ट्ससाठी काढला आहे. तो पहाण्यास पश्चिम महाराष्ट्र ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
वाड्याची तिजोरी गप्पांचाच ठेवा.
ही तिची किल्ली-उघड दार वाडेकरा
प्रताधिकारमुक्त चित्र सौजन्य - अनिरुद्ध

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाबास किल्ली.
दोन तीन दिवस एवढ्या सगळ्या गदारोळात किल्लीचा फोकस तसूभरही ढळला नाही.
आणि हा अगदी ओरिजिनल चहा !

दोन तीन दिवस एवढ्या सगळ्या गदारोळात किल्लीचा फोकस तसूभरही ढळला नाही.
आणि हा अगदी ओरिजिनल चहा !

>>> हो, पण किटलीतुन चहा ओतताना एका हाताने किटलीचे झाकण धरुन ठेवतात ना? Proud

नमस्कार वाडकर्स.

जनगणना २०२१ मध्ये होणार होती जी कोविडमुळे झाली नाही.

आत्तापर्यंत महिला आरक्षण लागू न करण्याचे छुपे कारण मला असे वाटते की सर्वच पक्षांना आपल्या १/३ खासदारांना तिकिट नाकारणे परवडणार नव्हते. अगदी घरातील महिला असेल तरी. नवीन डिलिमिटेशनसोबत ते इम्प्लिमेंट करणे हे राजकीयदृष्ट्या सोयीचे होते कारण डिलिमिटेशन करणे न करणे खासदारांच्या इच्छेवर अवलंबून नव्हतेच. ते करावेच लागणार होते. त्यात जे नवीन मतदारसंघ होतील तिथे जास्तीत जास्त महिलांना संधी देऊन आपला कोटा पूर्ण करणे जे जास्त सोयीचे होते. त्यासाठी सगळा अट्टाहास होता.

शेतात आलो शंभर एक क्विंटल कांदा काढलाय पण भाव अगदी नगण्य!
>>>> कृष्णा एखादी जागा तात्पुरती भाड्याने वगैरे घेऊन कांदा साठवून ठेवता येणार नाही का? नीट सुकवून ठेवला तर कांदा वर्षभर टिकतो किंवा मग ग्राहक संघ अपना बाजार किंवा तश्याच एखाद्या संघटनेशी बोलून त्यांना विकता येणार नाही?

कांदा साठवणुकीचा खुप खर्च आहे. हवेशीर नसेल तर कांदा कुजतो. शिवाय सुकत जाऊन कमी होतो. आज जो १०० क्विंटल आहे त्यातला सुकुन २-३ क्विंटल तरी कमी होईल.

सढ्या सगळेजण कांदा काढताहेत त्यामुळे भाव पडलाय. मीही काढला. माझ्या सहा वेण्या झाल्या Happy आम्ही वेण्या बनवुन टांगुन ठेवतो. चार किलोची तरी असेल एक वेणी. मोजुन बघायला हवी. माझा आत्मबिर्भर कांदा. जास्त खत द्यायला वेळ मिळाला नाही. लावताना गांडुळखत व घनजीवामृत दिले. नझ्न्तर जीवामृतात भिजवुन बायोचार दिले. तेवढेच.

हाय हॅलो सुप्रभात रामराम वाडा

कृष्णा
चांगला कांदा किरकोळ मार्केट मध्ये साधारण 20 रु किलो आहेच..
तुम्हाला दहा रु देखील मिळत नाहीत असे दिसतेय.
विक्री करण्याचे मार्केट फिक्स करत गेलो तर फरक पडत असेल.
किसान कनेक्ट वै हेच मॉडेल आहे ना?

शेतीत काही राहिलं नाहीये हल्ली.
जमीन वडिलोपार्जित असेल तर त्यातल्या त्यात ठीक. जमिनीची किंमत धरली तर शेती तोट्यात.
आमच्या आंब्याची मशागत , खत पाणी वर्षभर , पीक एकदाच, त्याचा भरवसा नाही, मार्केट मध्ये आडत्यांच्या हातात आमचा भाव कारण एवढा आंबा स्वतः विकण शक्य नाही. नेहरू गेले त्या वर्षीची आठवण अजून काढतात. तीन दिवस मार्केट बंद, तयार आंबा विकला गेला नाही. तीन दिवस आंबा पुढे जायला खूप झाले. सगळं नीट असून शेवट नुकसान झालं.
आमच्या घरातली पुढची पिढी गेली शहरात आणि शिक्षण ही असं घेतलं आहे (कॉम्प्युटर इंजिनियर वैगरे ) ज्याचा गावाला स्कोप नाही. आमच्या आजूबाजूचे सगळे मुलगे ही शहरात गेलेत. कुलुपं लावून बाहेर पडावं लागतं कारण घरात दोघं दोघं च रहातात. आमच्याकडे तेवढी वेळ आलेली नाही पण तरुण पिढी घरात नाही सगळे ज्येष्ठ नागरिक.
मी शहरात राहून गावाला जा हे सांगण्याचा मला अधिकार शून्य आहे , त्यांनी का नाही अर्बन लाईफ अनुभवायचं हा विचार ही येतोच मनात. असो.

Screenshot_20260507-123212~2.png
Hope
ही आहे तोवर सगळं आहे
आजच लावलाय moneyplant ह्या मग मध्ये
मला क्ष वर्षांपूर्वी secret सांता मध्ये मिळाला होता
त्यात दूध पाणी कॉफी काहीही घाला
गळत असे
मग पेना ठेवायला केला होता
आज सुचलं की गळका आहे तर मनी प्लांट लावून बघूया
..
चर्चा वाचतेय
राजकारण वाली स्किप केली
शेती बद्दल वाचतेय

कांदा वाळवून ठेवला तर जास्त भाव मिळेल..... एखाद्या हॉटेलवाल्याला विकता येईल. आमच्या गृपवर मिळतो वाळवलेला कांदा पण महाग असतो. उन्हाळ्यात तळलेल्या कांद्याशिवाय चिवडा होतं नाही खासकरून विदर्भात! चिवडा करायचया आधी दोन दिवस वाळवून ठेवते .

बरोबर. आणि जमीन वडिलोपार्जित असली तरीही पिढ्यानपिढ्या वाटण्या होत होत इतकी कमी जमीन हातात असेल की त्यात पोट भरणे कठीणच.

कृष्णा , शेतीबद्दलची पोस्ट वाचली. शेतकरी ला मिळणारा भाव आणि बाजारा चा भाव यात खूपच फरक आहे. आम्ही कांदे २५ रू किलो आणि कोबी २० रू पावशेर नी आणतोय.

कांदा साठवून ठेवायला मोठी जागा लागते आणि त्या ऐरणी सतत निवडाव्या लागतात. किडका माल काढावा लागतो.
आता पाऊस सुरू होईल. मग आणखी अवघड.

चर्चा वाचतेय मीही. कधीकधी काहीच समजत नाही. आणि हे असं "कधीकधी" आता ऑलमोस्ट रोजच येतंय Uhoh नुसतेच प्रश्न. उत्तरं नाहीतच. किंवा अपुरी.

रोजच्या वापरातल्या वस्तूंना मालकिणीचे गुण लागले आहेत.
लॅपटॉप - तापट झालाय जरा.
दुचाकी - जास्त रनिंग झालं की सांध्यातून कुरकुरते.
मोबाईल - बोलून झालं की मीच लाल बटण दाबलं, तरी, "बोलायचं राहिलंय पण डिसकनेक्ट केलंय तर राहूदेत आता" मोडवर जाऊन २-३ सेकंद हँग होऊन मगच बंद होतो. यातला "बोलायचं राहिलंय" मोड मालकिणीकडून आलाय.

लिस्ट खरंतर वाढेल अजून असं लिहिता लिहिता लक्षात येतंय पण आता लिखाण करते आधी. मग लिस्टी करते उरल्यासुरल्या.
टीचिंग लोड संपलं. आता मैं और मेरा लिखाणकाम एक दूसरे से बातें करेंगे... खरं तर गाणी ऐकत झोपायचा मूड आहे. पण कॉलेजात आहे. आणि हे जुनं कॉलेज नाही त्यामुळे डोकं डेस्कवर पाडून चालणार नाही Wink
जमेल तशी चक्कर टाकते. गाणी ऐकतेच आहे जरा कानात बटणं टाकून. खरं अशी सवय नाहिये मला पण आज जमत नाहिये लक्ष फोकस करायला. एक दिवस चलता है. काम संपल्यामुळे हलकं वाटतंय म्हणून मूड लागत नाहिये.

प्रज्ञा
बोलायचं राहिलंय ला हसलो Happy
किल्ली
छान आहे मग
कांदा पिक दिले तर बोलेरो घेउन देते इतके पैसे
( पण हे दहा वर्षांत एखादं वेळी होते )

कांदा वाळवून ठेवला तर जास्त भाव मिळेल..... एखाद्या हॉटेलवाल्याला विकता येईल.>>>>>

हे कांदा लावायच्या आधी ठरवावे लस्गते. १०० क्विंटल
कांदा म्हणजे १० टन. इतका वाळवायचा तर मनुष्यबळ लागणार व इन्डस्ट्री ग्रेड ड्रायर्स लागणार. ही इन्वेस्टमेंट इतकी मोठी होईल
की त्यापेक्षा कांदा सडलेला बरा म्हणायची वेळ येईल.

पण तरीही प्रोसेसिंग ही आजची गरज आहे. प्रोसेसींग उत्पादनाचे आयुष्य वाढवते.

कृष्णा तुम्ही निराश झाले असणार मला माहित आहे. हे वर्ष फुकट गेले समजा आणि आजच पुढच्या बर्षाची तयारी करा. तुम्ही जर शेतकर्‍यांचा गट स्थापन केलातर ७५ टक्के सबसिडी मिळते. अर्थात ती मिळायला वेळ लागतो तोवर कायतरी कर्जाची सोय करा आणि ओनियन पावडर बनवायचे युनिट सुरु करा. बाजारात खुप मागणी आहे. तुम्ही रिटेलिण्ग करुच नका. व्होलसेलमध्येच तुमचा सगळा माल जाईल. सोबत शेजारचे शेतकरी घेतले तर पुर्ण वर्षन्हर तुमचे युनिट चालेल.

रिस्क घ्या, हातपाय हलवा, दोन तिन वर्षे त्रासात जातील पण नंतर फक्त प्रगतीच पाहाल तुम्ही.