निसटता पतंगाची दोर ,का सुटेना हाताशी
चुकले माझेच कि , चूक ही नशिबाची ....
होता क्षितिजाची पहाट , सोडले मी तुझे ध्यास
तरी शब्दवेडे पुन्हा ,का तुलाच गुंफतात ....
कळे ना झाले आज , का छळतात आभास तुझे
होता गडद आकाशी,जळतात श्वास माझे ,जळतात श्वास माझे....
ओसरत्या पावसांच्या सरी ,भिजले मी एकटीच
नव्हतास तू कधीच ,नसणार तू कधीच .....
गारवा या मनातला , ना कळणार कधी तुला
अबोलके तुझे नयन , का स्पर्शतात या देहाला ....
असह्य झाले आता , नको ना आता दुरावा
थांबून जातील स्पंदने ,विरून जातील आठवणी, विरून जातील आठवणी....
सोडू पाहते नात्यांची पतंग , तरी लोभ का जीवाशी
जोडीले हे कसले बंध ,तुझे माझ्या हृदयाशी....
शोधिले मी माझेच , उमगले आज मला
पुरेल तुझ्या आठवणी ,आयुष्य हे जगायला....
घे जगून तुझे तू , झाले मी वाट परकी
तुझ्या त्या अनमोल आठवणींची ....
बांधून गाठ काळजाशी , चालले मी एकटी , चालले मी एकटी....