Submitted by अविनाश राजे on 7 August, 2020 - 11:48
कोणीही म्हंटले कि निघून ये
तरी असे वाऱ्यागत निघू नये
जाताना उजळावी तेलवात
स्मृतींना न्यावे धरून हात
तोडू नये कधी एकही बंध
जपावेत गुंतलेले संबंध
जाताना जावे छान खुशाल
घेऊन निरोपाची तलम शाल
असाच असतो जीवनाचा खेळ
वियोगसूत्री गुंतलासे मेळ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा