Submitted by अरविंद डोंगरे on 19 May, 2020 - 03:40
आयुष्याच्या एका वळणावर
ति अशी भेटली।
वळण मी घेतलं की दिलं देवानी
पण जीवनाची दिशा पालटली।
जे नको होतं आयुष्यात
तेच आवडायला लागलं।
मनाचे बंध तुटले
तिच्या आठवणीत मन रमलं।
प्रेम कसं असतं
ते आज उमगलं
मनावरचं ब्रीद वाक्य
आज पुसलं गेलं।
प्रेम समजलं तर
जीवनाचं सार असतं।
नाही समजलं तर
वासनेचा भार असतं।
ज्यांना दोन्ही तिल अंतर समजलं
त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा