Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2019 - 22:41
आज बहुधा सर्वांसाठीच हि सकाळची शुभवार्ता असेल.
काही लोक ही पद्धत योग्य की अयोग्य यावर किस पाडत राहतील..
पण एक नक्की...
न्याय झाला !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उन्नावमध्ये जाळल्या गेलेल्या
उन्नावमध्ये जाळल्या गेलेल्या पीडित मुलीचा मृत्यू झाला .:(
उन्माद बाजूला ठेवून आपण भरीव
उन्माद बाजूला ठेवून आपण भरीव बदलासाठी विचार कधीच करणार नाही का?>>>>>>+१
वॉस्सॅपवरून एक पटलेली
वॉस्सॅपवरून एक पटलेली आवडलेली पोस्ट
____________
"आपके सामने आने की नौबतही न आये ऐसा कुछ नही हो सकता क्या जजसाब?"
मला सस्पेन्स थ्रिलर प्रकारचे चित्रपट, मालिका, पुस्तके आवडतात. ह्यात अनेक प्रकार असतात. एखादा चित्रपट/मालिका गुन्हा कोणी केला, कसा केला हा तपास करून संपते. जणू त्याला 'आता शिक्षा झालीच, संपला त्याचा खेळ' अशा अर्थाची मांडणी. तर दुसरा चित्रपट असे दाखवतो, 'अरे पकडला म्हणून काय झाले, आता तर कोर्टबाजी बाकी आहे, 'दोनो वकिलो के सवाल जवाब, दलीले, दफा तीन सौ दो के तहत' वगैरे जुगलबंदी सॉलिड असणार आहे. मग त्यातून हिरो वकील कसे डोके चालवून (पोलिसांनी करायचा तपास स्वत: करून) खऱ्या गुन्हेगारावर आरोप शाबित करतो किंवा फाशी जाणाऱ्या निरपराध व्यक्तीला 'रुक जाओ जजसाब' असा कोर्टाचा दरवाजा तोडून येत न्याय मिळवून देतो. काही चित्रपटात गुन्हेगार तांत्रिक बाबींचा कायदेशीर फायदा घेत निसटतात आणि कायदा त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही ते दाखवले जाते.
हा सर्व घटनाक्रम खरोखरच्या गुन्ह्यांमध्येसुद्धा असतोच असतो. परंतु चित्रपट कथेत आणि खऱ्या गुन्ह्यात खूप खूप अंतर असते. पोलिसांनी केलेला तपास योग्य दिशेने आहे का कि त्यांची दिशाभूल होऊन भलत्याच मार्गाने होत आहे हा एक खूप मोठा प्रश्न असतो. पुरावे मिळणे, नष्ट होणे, नष्ट करणे, चार्जशीट फाईल करतांना चुकीची कलमे घालणे, बिनमहत्त्वाची कलमे घालणे, जामीन मिळेल-किंवा नाही मिळेल अशी कलमे घालणे, मेडिकल रिपोर्ट्स, पोस्टमार्टम रिपोर्ट्स, फोरेन्सिक (डॉक्टर सालुन्खेच्या ल्याबमधले नाही), मेडिको-इन्वेस्टीगेशन योग्य होणे, त्यावरून वेगवेगळे निष्कर्ष काढता येणे. चार्जशीट नीट फाईल करणे, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार शोधणे, त्यांना साक्ष कायम ठेवायला बाध्य करणे, त्यांची सुरक्षा निश्चित करणे, पुराव्यांची सुरक्षा निकालाच्या दिवसापर्यंत आणि त्यानंतरही सातत्याने करत राहणे. अशी अनेक कामे कर्तव्ये एका गंभीर गुन्ह्याच्या मागे असतात. त्यानंतर इतकीच सगळी कामे वकिलांना करावी लागतात. वेगवेगळी कलमे शोधणे, त्यासंदर्भात वेगवेगळ्या खटल्यांमध्ये कोर्टाने दिलेले निकाल शोधणे, फिर्यादीचा वकील असेल तर कोर्टाने आधी दिलेल्या कोणत्या निर्णयांचा आपल्या केसला फायदा होउ शकतो किंवा नुकसान होऊ शकते ह्या दोन्ही बाजूने विचार करणे. आरोपीच्या वकिलाने हेच सर्व उद्योग करणे. त्यातून दोघांपैकी जो हुशार असेल, लकी असेल, किंवा प्रामाणिक-भ्रष्टाचारी असेल-नसेल ह्या सगळ्या गोष्टींचा केसच्या फक्त कोर्टात 'चालण्यावर' मोठा फरक पडतो. यानंतर न्यायाधीशाला ह्या प्रकरणात दोन्ही वकिलांच्या मांडणीचा व पुराव्यांचा पूर्ण अभ्यास करावा लागणे, मागच्या केसेसचा संदर्भ घेणे, कायदेशीर बाबींची पूर्तता झाली कि नाही झाली ह्याचा विचार करणे, घटनादत्त अधिकारांची पायमल्ली ना होता, संविधानाच्या कक्षेत राहून, नियमांच्या कायद्यांच्या बंधिस्त चौकटीत राहून खटल्यावर आपला निर्णय तयार करणे (भ्रष्टाचार/राजकीयदबाव/भीती असेल तर गुन्हेगाराला अभय मिळेल अशी मांडणी करणे) इतकी कामे असतात. त्यानंतर शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला तुरुंगात पोचवणे, त्याच्या आणि फिर्यादीच्या दोघांच्या सुरक्षेची जबाबदारी पाळणे ही पोलिसांची कामे असतात. तुरुंगात असलेल्या गुन्हेगाराला झालेली शिक्षा योग्य पद्धतीने दिली जाते कि नाही हे पाहणे तुरुंगाधिकाऱ्याचे कर्तव्य असते. गुन्हेगाराने तुरुंग सोडून पळून जाऊ नये म्हणून राखण करणे किंवा चिरीमिरी घेऊन 'येऊन जाऊन' राहायला मदत करणे किंवा त्या गुन्हेगाराच्या जागी दुसराच तोतया आणून बसवून खरा माणूस गुपचूप मोकळा सोडून देणे असे अनेकोविध पर्याय असतात. शिक्षा झाली तरी आरोपीने अपील करत कोर्ट दर कोर्ट करून शेवटी सुप्रीम कोर्टात पोचणे हे तर इतके अध्याहृत आहे कि मला प्रश्न पडतो ही खालची कोर्ट का न्यायाधीश-वकिलांसाठी रोजगार हमी योजना आहेत का?
ह्या सर्व प्रोसेसमध्ये तुमच्या माझ्यासारखे जनसामान्य जो 'न्याय, न्याय' मिळायला पाहिजे म्हणतात, त्याची शक्यता किती धूसर आणि दुर्मिळ होत जाते आहे हे आपोआप लक्षात येईल. कित्येक प्रकरणात तर न्याय म्हणून जे दिले जाते तो खरा तर व्यवस्थेने पिडीत व्यक्तीवर केलेला निर्लज्ज विनोद असतो. असे सर्व बघता दंड व न्याय व्यवस्था हा एक भ्रम आहे असे जनतेला वाटू लागले तर त्यात नवल ते काय असावे? बरे यात कोणीही काहीही बदल घडवू शकत नाही हे स्पष्ट दिसत आहे. कारण ज्यांनी बदल घडवायचा असतो ते राजकारणी स्वत:वरच इतके गुन्हे नोंदवून घेतलेले असतात कि त्यांनी न्याय व्यवस्था स्वच्छ करायची म्हटली तर आधी त्यांना तुरुंगात बसावे लागणार आहे. स्वत:च्या पायावर कोण मूर्ख कुऱ्हाड मारून घेईल? त्यापेक्षा मिडियाला हाताशी धरून जनतेला भावनिक हिंदोळ्यावर झुलवणे, आभासी अनुभव देत राहणे सहजशक्य आहे.
अनादीकाळापासून समाजात गुन्हे घडत आले आहेत, ते घडत राहणार आहेत. न्याय व्यवस्था कठोर झाल्याने गुन्हे कमी होतील ह्यावर माझा काही विश्वास नाही. आज काय तर याला फाशी लटकवला, त्याला ठेचून मारला, ह्याना गोळ्यांनी उडवला, त्यांचे मॉब लीन्चींग केले हे सगळे 'उपाय' गुन्हा घडल्यानंतरच्या प्रतिक्रिया आहेत. त्या का येतात तर माणसाच्या मूळ मेंदूत तीन मुलभूत प्रतिक्रिया देण्याची व्यवस्था आहे. पळा, लढा किंवा निपचित मेल्यासारखे स्तब्ध राहा. जेव्हा व्यक्ती स्वत: संकटात असते, तेव्हा ती आधी पळण्याचा विचार करते, कोणी दुसरा संकटात असेल तरीही बहुतांश लोक पळून जातात किंवा स्तब्ध राहून बधीर झाल्यासारखे नुसते बघत बसलेले असतात, आपण त्यांना दोष देतो पण तो नैसर्गिक मेंदू आहे. आपले सर्व विचार ह्या मूळ प्रेरणांवर आधारित असतात. पण मोठ्या जमावाचा एकत्र विचार आला, त्यांना धोका वाटू लागला कि ते 'लढा' ह्या प्रतिक्रियेत येतात. आज आपण जो एन्काउंटरला समर्थन मिळताना बघतो आहोत त्याचे कारण आता एक एकट्याने घाबरणारा जमाव एकत्र झाला आहे. त्याला ह्या दंड आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे तो मारा, संपवा च्या 'instant reaction' मध्ये आहे. परंतु ह्या सर्व प्रकाराने समाजाची मूळ शांतताप्रिय कायदेप्रिय चौकट उद्वस्त होईल. त्याचा त्रास ह्या जमावातल्याच चिडलेल्या प्रत्येकाला होणार आहे.
सौदी मध्ये भरचौकात अशा गुन्हेगाराना कापले जाते, तसेच आपल्याकडेही झाले पाहिजे असे काही लोक म्हणतात. जेव्हा पहिल्यांदा मी हा युक्तिवाद ऐकला तेव्हा पहिला प्रश्न होता कि जर इतकी भयंकर शिक्षा आहे तर ते गुन्हे होतातच कसे काय? गुन्हे जर शिक्षेच्या भीतीने होतच नसतील तर मग शिक्षा देतात तरी कोणाला व कशाला? बऱ्याच काळाने लक्षात आले कि असले युक्तिवाद करणारा न्याय मागत नसतो, गुन्हा घडू नये अशी व्यवस्था मागत नसतो. तो फक्त सूड मागत असतो. सूडाला फक्त न्याय नावाच्या गोंडस आणि सामाजिक मान्यतेच्या चंदेरी वर्खात गुंडाळले कि झाले. संसदेत ज्यांना कायदे करायला पाठवले तेही आता अशा रानटी सुडाच्या भावनेला सामाजिक मान्यता देण्याचा मूर्खपणा करत आहेत. हा रानटी विचार आहे. मध्ययुगीन काळात होता. आता नाही चालणार.
असे अराजक माजण्यापूर्वी वातावरण बदलणे आपल्याच हातात आहे. गुन्हा घडल्यावर न्यायालयातून न्याय मिळतो हा अतिशय मूर्खपणाचा विचार आहे. तो लवकर मिळाला काय आणि उशिरा मिळाला काय, त्याने कोणताही परिणाम पिडीतेच्या आयुष्यावर होत नाही. त्याचा परिणाम पुढे होणाऱ्या गुन्ह्यांवर तरी नक्की होईल असे कोणी मानत असेल तर ते मूर्ख आहेत. बहुतांश लोकांना वाटते कि आपण 'लवकर' निकाल आणि 'लवकर' शिक्षेचा आग्रह धरतोय म्हणजे योग्यच बोलतोय. 'लवकर' शिक्षा व्हायला हवी हि भावना फक्त सूड घेण्याबद्दल असते. न्यायालयातून फक्त निर्णय दिला जातो, तोही कायद्याच्या कसोटीवर आणि वर वाचलेच तशा शंभर आणखी बाबी असतात. कोर्ट कितीही फास्टtrack करा. ते त्यांच्या कायदेशीर मार्गानेच जाणार. हे महत्त्वाचे आहे लक्षात घ्या. पिडीतेला बलात्काराच्या पहिल्या क्षणापासून ते पुढे कित्येक काळ दर क्षणाला भयंकर यातनातून जावे लागते. कोर्ट फास्ट असो कि स्लो असो, तिच्या दुर्दैवाच्या दशवातारांवर काहीही फरक पडत नाही. फास्टtrack कोर्ट ही ज्यांना स्वत:ला काहीही झळ लागलेली नाही त्या जनतेच्या मनाला 'समाधान' मिळवण्यासाठी सोडलेली फक्त एक पुडी आहे. कारण एक घटना ते जास्तीत जास्त महिना दोन महिने चिघळत बसतात आणि शेवटी आपल्या आयुष्याच्या मार्गाने जात राहतात.
त्यापेक्षा गुन्हाच घडू नये म्हणून अनेक पातळ्यांवर सर्वंकष बदल घडवून आणणे जास्त सोपे आणि शक्य आहे. आपल्याला अपघात होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेणे हे अपघात झाल्यावर इतर सतरा प्रकारचे नवीन मनस्ताप, शारीरिक त्रास, आर्थिक त्रास भोगण्याच्या दु:खापेक्षा जास्त सोपे असते. 'चला, आज काय अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गल्लोगल्ली झालेत, हवे ते उपचार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मिळतात म्हणून माझ्या मणक्याचे हाड मोडले तरी चालेल" असे कोणी म्हणतो का? अनेकांनी सांगितले तरी मी परत परत तेच सांगणार आहे. बलात्कार करण्याची मानसिकता असलेले नागरिक तयार होऊ नये हा पहिला उपाय आहे. त्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक बदलाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यातून समाजाच्या कोणत्याही घटकाला आपली जबाबदारी टाळण्याची मुभा नाही. दुसरा उपाय आहे की सर्वाना दुर्घटनेच्या आधीच योग्य ती सुरक्षा उपलब्ध असायला हवी. विमान प्रवास जगातला सर्वात सुरक्षित प्रवास आहे कारण त्यांनी आजवर जितक्या दुर्घटना झाल्या त्या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याला कारणीभूत असलेल्या शक्यता यापुढे निर्माण होणार नाहीत अशी उपाययोजना केली आहे म्हणून. जगण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळणे हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. त्यासाठी पोलीस व्यवस्थेने गुन्हा घडूच नये ह्यासाठी कायम सतर्क आणि शीघ्र कारवाईसाठी तयार असणे आवश्यक आहे. एकदा गुन्हा घडून गेल्यावर कोर्टात केसेस उभ्या करत तारीख पे तारीख करत बसणे पोलिसांना योग्य वाटते कि त्या केसेस निर्माण होऊ नये असे वातावरण तयार करणे योग्य वाटते हे पोलिसांना ठरवायचे आहे. गुन्हेगारांना जरब वाटत नाही आणि सामान्य निरपराध जनतेला मित्र वाटत नसेल तर अशी पोलीसयंत्रणा निरर्थक आहे. रात्री एकट्या असलात तर पोलिसांच्या गाडीने तुम्हाला हवे तिथे सोडून देऊ हे आश्वासन म्हणजे सुरक्षित वातावरण नाही. तर रात्री दोन वाजता सुद्धा शहरात कोठेही कोणत्याही भीतीशिवाय माझी मी एकटी फिरू शकते ही एखाद्या स्त्रीच्या मनातली भावना म्हणजे खरे सुरक्षित वातावरण आहे. ही आदर्शवादी वाक्ये नाहीत तर हवा, पाणी, अन्न, निवारासारखीच मुलभूत गरज आहे.
परंतु होते काय की माणूस हा प्राणीच instant gratification नावाच्या भावनेचा बळी असतो. ज्या कामांनी दूरगामी परिणाम मिळतो ती कष्टाची आणि वेळ घेणारी कामे टाळण्याकडे माणसाचा कल असतो. ज्याने ताबडतोब आनंद मिळतो, भावनांचा निचरा होतो, समाधान सुख मिळते त्या कृती करण्याकडे जास्त ओढा असतो. त्यामुळे वर दिलेले दीर्घकालीन योजनेचे पर्याय जनतेला आवडत नाहीत, जनता त्यातले काहीसुद्धा करत नाही. पण सौदीत बलात्कारी पुरुषास कसे भरचौकात कापले जाते याच्या निष्फळ गप्पा हाकण्यात पोकळ टाईमपास मनोरंजन करून घेत असते. परत आपल्या नेहमीच्या पुरुषप्रधान, स्त्रीविरोधी समाजव्यवस्थेत गढून जाते. पुढच्या भीषण बलात्कारापर्यंत.
हो. फक्त भीषण बलात्कार आणि खून झाला तरच हि जनता पेटून उठते बरे का? बाकी तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हाला अधिक काय सांगावे!
Sorry for long post... but can't help.
~Sandeep Daange
भारताची लोकसंख्या त्या
भारताची लोकसंख्या त्या प्रमाणात असलेलं पोलिस च व्यस्त प्रमाण
.
तीव्र स्वरूपाची गरिबी.
स्वतःची बुध्दी नसले ली शिक्षित जनता.
जातपात,धर्म,भाषा अशा अनेक प्रकारात विभागलेला समाज.
भारतीय म्हणून कोणताच समाज अस्तित्वात नाही हे सत्य स्वीकारा.
व्यसनी लोकांचे प्रमाण.
अत्यंत कनिष्ठ कामाची प्रत असलेले प्रशासन.
अनेक प्रश्न भारतात आहेत.
त्या मुळे गुन्हेगारी सुधा जास्त आहे
हा फेसबुकवर फिरणारा मेसेज.
हा फेसबुकवर फिरणारा मेसेज. खरे खोटे काय आहे हे माहीत नाही.
हैद्राबाद प्रकरणात जरा इतर महत्वाच्या बाजूंवरही लक्ष दिले पाहिजे. या घटनेतील पिडीता ही पशूवैद्यकीय डाॅक्टर होती , ती गोवंश हत्या विरोधी मोहीमेत सक्रिय होती , गोवंश तस्करांविषयी तिला माहीती होती व ती एक लढा देत होती . या पिडीतेला यासंदर्भात धमक्या मिळाल्या होत्या. तिच्याबाबत घडलेली घटना ही पूर्वनियोजित होती आणि या घटना व तिची हत्या यामागिल खरे सुत्रधार शोधणे आवश्यक होते.चार आरोपी पोलीसांच्या हाती लागल्यावर चौकशीतून मुख्य सुत्रधार समोर आले असते , त्यांना वाचविण्यासाठीच चारही आरोपींना एकदाचे ठार मारून हे प्रकरण दडण्यात आले असावे असेच स्पष्ट दिसत आहे
एन्काउंटर हे संशयास्पद आहे . मोठ्या चार गुन्हेगारांना रात्रीच्यावेळी घटनास्थळी चौकशीसाठी कसे नेले जाते ?
पोलीसांची कुमक चार आरोपींसमोर कमी होती काय ?
पोलीसांच्या तावडीतून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न कसा करू शकतात ?
पोलीसांचे पिस्तूल ते कसे हिसकावू शकतात ?
आणि या प्रकरणात पोलीसांनी पिस्तूलासह पळत असलेल्या एक दोन आरोपींना न मारता सर्वच चारही आरोपींना कसे मारून टाकावे ?
असे अनेक प्रश्न आता उभे राहतात !
तेलंगाना सरकारने हैद्राबाद पोलीसांच्या हातून नेमके कोणाला वाचवले आहे याची सर्वच पातळींवर सखोल चौकशी झाली पाहीजे कारण हा पिडीतेवर सरकारतर्फे झालेला दुसरा मोठा अत्याचार आहे.
<<< हा पिडीतेवर सरकारतर्फे
<<< हा पिडीतेवर सरकारतर्फे झालेला दुसरा मोठा अत्याचार आहे. >>>
मुख्य सुत्रधार कुणीही असला तरी प्रत्यक्ष बलात्कार करणारे जर एनकाऊण्टर मध्ये ठार झाले असतील तर त्याला poetic justice म्हणता येईल.
एनकाऊण्टरची चौकशी होईल तेव्हा खरे खोटे काय ते कळेल.
पोलिसांनी या सीसीटीव्ही
पोलिसांनी या सीसीटीव्ही फूटेजवरून तपास केला म्हणे..
https://www.indiatoday.in/india/story/hyderabad-telangana-woman-doctor-r...
या ट्रकमधेच पीडीता होती आणि ट्रकच्या ड्रायव्हरने तिच्याशी बोलणे केले असे चित्रण यात दिसतेय का ? चेहरे तर अजिबात स्पष्ट नाहीत. पीडीतेच्या अंगावर टाकण्यासाठी पेट्रोल मागितले असे पोलीस म्हणतात. पण त्यांच्याकडे डिझेल असेलच की. ट्रकच्या टाकीतून काढणे किंवा ट्रकसाठी एक्स्ट्रा मागणे त्यांना अशक्य नव्हते.
पोलिसांची कहाणी सत्य असेलही. पण हा पुरावा तितका दमदार वाटत नाही.
पुन्हा एक व्हॉटसपपोस्ट वाचनात
पुन्हा एक व्हॉटसपपोस्ट वाचनात आली...
असे कळते की ,
१ . परदेशात गो मास निर्यात करणार्या कपंण्यांच्या विरोधात डॉ.प्रियंका रेड्डी लढा लढत होत्या .
३ . डॉ . प्रियांका रेड्डीला भलत्याच माणसाने त्यांच्या पंटरांकरवी उचलुन , किडनॅप करून , रेप करून , जाळूून तर टाकले नसेल ना?
४ . पोलिसांनी भलीमोठ्ठी सुपारी घेऊन या चार पंटरांना ठोकुन फाईल बंद करून त्या मुख्य पडद्याआडच्या गो मास निर्यात करणाऱ्या अतिश्रीमंत धंदेवाईकाला वाचवले असु शकेल का? तो तर आता उजळ माथ्याने फिरणार .
५ .एन्काउंटरमध्ये ४ मारले गेलेले इसम नक्की गुन्हेगारच होते की त्यांना हैद्राबादी बळीचा बकरा बनवलं गेलंय? त्यांचे स्पर्म वगैरे किंवा बॉडी फ्युल्ड असं काही पुराव्या दाखल पोलिसांना सापडलं होतं का?
मेडिकल अर्थात वैद्यकीय चाचणी वगैरे झाली होती का? नार्को टेस्ट घेता आली नसती का?
६ . गायीच्या कत्तली करून धंदा करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांनीच हे नीच कृत्य केले अथवा करवुन घेतले तर नसेल ना?
७ . हिंदी मुव्ही पाहता ना? गरीब लोकांना पंटर बनवुन एखाद्या मुलीला किडनॅप करण्याचे आदेश मालक देऊ शकत नाहीत?
८ . पोलिस सांगतात म्हणून खरं मानायचं झालं तर पोलिस यंत्रणा १०० % भ्रष्ट्राचार मुक्त आहे , सज्जन आहे हे मान्य करणार काय?
एकंदरित डॉ . प्रियांका रेडी हे प्रकरण गंभीर आहे आणि यातलं सामान्य नागरिकांपैकी कुणालाच काही माहीत नाही . मलाही .
डॉ . प्रशांत गंगावणे .
कुलदीप सेनगरचं एण्काउंटर कधी
कुलदीप सेनगरचं एण्काउंटर कधी ?
कुलदीप सेनगरचं एण्काउंटर कधी
कुलदीप सेनगरचं एण्काउंटर कधी ?
>>
असं कसं? आमच्या प्रिय पक्षाचा आहे ना तो?
हैदराबाद: एन्काऊंटर
निर्भया: फाशी
आमच्या प्रिय पक्षाचा माणूस: फौजदारी, जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय. फक्त आरोप आहेत हो त्याच्या वर. तुम्ही लगेच त्याला अपराधी ठरवू नका. आमदार आहे तो. निर्दोष असण्याची शक्यता जास्त. जळतात काही मेले.
या पोस्टमधे अनेकदा आक्षेपार्ह
या पोस्टमधे अनेकदा आक्षेपार्ह उल्लेख करावे लागत आहेत. पण नाईलाज आहे.
छत्तीसगढ हायकोर्टाचे न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास यांनी बलात्कारा संदर्भात वादग्रस्त निर्णय दिला आहे ?
हे 2004 मध्ये झालेल्या एका प्रकरणातले अपील होते. आरोप असा होता की आरोपीने पीडितेला जबरदस्तीने खोलीत नेले, तिचे कपडे काढले, तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. हे तिच्या संमतीविना झाले.
IPC 375 (बलात्कार) Indian Penal Code कलम 375 नुसार Penetration to any extent आवश्यक आहे. पूर्ण **भोग किंवा वी*स्खलन आवश्यक नाही.
बलात्काराच्या केसेस मधे आरोपी सुटू नयेत हा उद्देश ठेवून २०१३ मधे ही दुरूस्ती केली गेली. ही दुरूस्ती निर्भया कांडाच्या वेळी केली.
या केस मधे पीडीतेला वारंवार प्रश्न विचारले गेले आणि नंतर तिच्या जबाबात विसंगती आहे असे आरोपीच्या वकीलांचे म्हणणे कोर्टाला योग्य वाटले. जर कायद्याचा हेतू न्याय देणे असा आहे तर कायद्याचे शब्दशः वाचन करणे स्विकारार्ह ठरते का ?
जी पीडीता आहे तिची मनःस्थिती काय असते ? एक तर तिलाच बलात्कार कसा झाला हे वारंवार सांगावे लागते. तिला हजार प्रश्न विचारले जातात. लाज, शरम खुंटीला टांगून उत्तरं द्यावी लागतात. त्यात पेनिट्रेशन झाले कि नाही हे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले, उत्तर देताना ती गोंधळली कि संपले का ?
न्यायालयाने निकाल दिला आहे कि जर पुरूषाचे लिंग योनीवर ठेवून किंवा स्पर्श करून बाहेरच स्खलन झाले तर तो बलात्काराचा गुन्हा मानता येत नाही. बाहेर स्खलन झाले पण पेनिट्रेशन झाले नसल्यास तो बलात्कार नाही. हा कायद्याचा शब्दशः अर्थ आहे. मेडीकल अहवालात बलात्कार झाला कि नाही हे स्पष्टपणे सांगता येत नसल्याचे म्हटले होते.
कायदा कडक करण्याअगोदर परिस्थितीचा विचार करून काही गुन्ह्यात कडक शिक्षा दिल्या आहेत. जसे कि या गुन्ह्यात आरोपीने बंद खोलीत तिचे कपडे काढले हे मान्य आहे. लिंग योनीवर ठेवले हे मान्य आहे. तर मग आरोपी एव्हढा संस्कारी होता का कि त्याने कायद्याच्या व्याख्येप्रमाणे पेनिट्रेशन केले नाही ? काही वेळा न्यायाधीश असाही विचार करतात.
मग हा कायदा कडक झाला आहे कि पातळ ? ज्या निर्भया केसच्या संदर्भात कायदा कडक केला त्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात नाही का ?
यापूर्वीही अलाहाबाद हायकोर्टाचे जज्ज जस्टीस राम मनोहर मिश्र (किंवा मिश्रा) यांनी असा निकाल दिला आहे कि जर स्त्री ला बाहूपाशात जबरदस्तीने आवळले किंवा तिच्या शरीराशी छेडखानी केली, तिच्या स्तनांशी छेडछाड केली तरीही तो बलात्काराचा किंवा बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा मानला जाणार नाही. स्तनाशी छेडछाड बलात्काराच्या व्याख्येत येत नाही.
या गलगोटिया युनिवर्सिटीच्या जज्जेसच्या नात्यातल्या स्त्रियांबाबत असे झाले असते तर असेच निकाल आले असते का ? असे निकाल येऊ लागले तर आरोपींचा उत्साह दुणावेल. त्यांच्या वकीलांना हत्यार मिळेल आणि पोलीस त्यांचं बाकीचं काम करतील. मेडीकलला उशिरा पाठवणे, तपासात हेळसांड करणे इत्यादी.
एखाद्या मुलीच्या स्तनांना स्पर्श करणे, तिच्या पायजम्याची नाडी तोडणे हे बलात्काराच्या प्रयत्नांमधे येत नाही हा निकाल दारू पिऊन दिला असेल कि काही खाऊन ? अशा निकालांबाबत महिला संघटना आक्रमक होतील का ? निर्भया प्रकरणात झाले तसे आंदोलन होईल का ? १८ वरून १६ वर वय आणण्यासाठी दबाव आणला तसा आता या कायद्याचा शब्दशः अर्थ काढून दुरूपयोग होऊ नये म्हणून होईल का ?
घोडं पलटी टांगा फरार यांच्या
घोडं पलटी टांगा फरार यांच्या प्रतिसादाशी सहमत. आरोपीचा हेतू काय आहे तोसुद्धा पाहायला हवा. त्याने काय काय केले यावरून त्याचा हेतू स्पष्ट होतो आहे.
किचकट आहे. थेट उल्लेख टाळून
किचकट आहे. थेट उल्लेख टाळून असे म्हणतो,
एखाद्या प्रसंगी पूर्ण उद्देश सफल झाला नसेल, तरीही अल्प संपर्क किंवा प्रवेश झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, बाह्य जखम नसणे किंवा योनीपटल अखंड असणे यावरून ठाम निष्कर्ष काढता येत नाही. हे अनेक शारीरिक घटकांवर अवलंबून असते.
कायद्याची माहिती नाही. पण अशा परिस्थितीत आरोपीला फायदा मिळत असेल तर चिंताजनक आहे. कायदा बदलला पाहीजे.
सुप्रीम कोर्ट ने स्यू मोटो
सुप्रीम कोर्ट ने स्यू मोटो घेऊन या प्रकरणात दखल देण्याची गरज आहे. पण माझ्या अंदाजाने प्रकरण २००४ मध्ये घडल्याने सुप्रीम कोर्ट मध्ये ही 'law cannot be applied retrospectively' या तत्वावर आरोपीच्या वकिलांकडून बोट ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसे झाल्यास सुप्रीम कोर्ट आरोपीचे 'संविधानिक संरक्षण' (कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन) झुगारून पीडितेला न्याय देणारा निवाडा करू शकते की नाही हे पाहावे लागेल.
काल सवयीप्रमाणे दोन नवीन वर
काल सवयीप्रमाणे दोन नवीन वर क्लिक केली आणि विषयच असा असल्याने प्रतिक्रिया दिली पण धागा कोणता हे समजलेच नव्हते. आत्ता शोधाशोध करून सापडला धागा.
काही दिवसांपूर्वी अशाच कुठल्यातरी धाग्यावर बलात्काराचा विषय जर त्याच प्रकरणात दोषी असलेल्यापुढे चालवला तर काय होईल अशा अर्थाचा प्रतिसाद दिला होता. इथे न्यायाधीश तसे आहेत असे म्हणायचे नाही. तो दाखला होता. वरच्या पोस्टमधे निकालात नोंदवलेल्या आक्षेपार्ह गोष्टी आहेत. पण सुनावणीदरम्यान अनेक न्यायाधिशांच्या टिप्पण्या अशाच असतात. खरे तर त्या वर्तमानपत्रातून किंवा अन्य माध्यमातून समजलेल्ञा असतात. त्या तशाच असतील तर आक्षेपार्हच असतात. पण अंतिम निकालात तसे उल्लेख नसतात. तसेच सुनावणीदरम्यान पीडीतेला अपमानास्पद वाटेल असे कामकाज रोखण्याचा प्रयत्नही होत नाही. अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे पीडीतेचं मनोधैर्य खचतं.
म्हणून आता खरोखर बलात्काराचे खटले कुठल्या न्यायाधिशांपुढे चालवायचे, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड, त्यांनी केलेली विधाने, खटल्याच्या कामकाजाची गुणवत्ता हे तपासले पाहीजे. पीडीतेला विश्वास वाटेल असे वातावरण असल्याशिवाय न्याय मिळणार नाही. ट्रॅ़क रेकॉर्ड खराव असलेली व्यक्ती देवतुल्य पदावर बसलेली असेल तर त्या व्यक्तीने केलेल्या काहीही बडबडीला रोखण्याची व्यवस्था सुद्धा असायला हवी. सामान्यांना आदेश देणारे निष्कलंकच हवेत.
आता असं ऐकलं की सुप्रीम
आता असं ऐकलं की सुप्रीम कोर्टाने हा निर्णय उलटून लावला आहे. पण तेवढे करून पुरेसे नाही. असे निकाल देणाऱ्या न्यायाधिशांनाही जबर वचक बसेल असे काहीतरी केले पाहिजे. शिवाय न्यायाधीशांची टिपणी ही कायद्याच्या कक्षेत आणली पाहिजे.
यावरून अरुणा शानबागची दुर्दैवी केस आठवली त्यावेळी sodomy हा बलात्कार मानत नसल्यामुळे तिचा गुन्हेगार ७ वर्षात सुटला होता.
इथे निदान तांत्रिक मुद्दे
इथे निदान तांत्रिक मुद्दे आहेत. कायद्याने केलेल्या व्याख्येचा अर्थ लावला जातोय.
यांचं काय?
While hearing an appeal challenging Bombay High Court order, Chief Justice of India SA Bobde asked the rape accused who is a government employee, whether he would marry the minor girl who he has raped multiple times.
हे तर सरन्यायाधीश.
आता असं ऐकलं की सुप्रीम
आता असं ऐकलं की सुप्रीम कोर्टाने हा निर्णय उलटून लावला आहे.>>> नाही, असं आजून तरी काही घडलेलं नाही. (आणि सापडलेल्या माहिती प्रमाणे असं काही घडण्याचे संभवत सुद्धा नाही, Supreme court also don't have such authority within constitutional framework) छत्तीसगढ हायकोर्ट च्या निर्णयाप्रमाणे आरोपी वरचा ठपका 'बलात्कार' वरून 'बलात्काराचा प्रयत्न' (२००४ च्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांप्रमाणे) असा शिथिल करण्यात आला आहे. आणि ७ वर्षांऐवजी ३ १/२ वर्षांची सजा सुनावली आहे.
Pages