Submitted by राजेंद्र देवी on 22 November, 2019 - 08:50
आता जिणे बास झाले...
आता जिणे बास झाले
पावलो पावली उपहास झाले
वाट पाहतो रोज तुझी
तुझे येणे महामास झाले
झोंबता वारा सहीला परी
झुळुक येणे त्रास झाले
तरळते डोळ्यात पाणी
तुझ्या आठवांचे भास झाले
आपल्यांनीच छळीले आता
वैरीच आता विश्वास झाले
झेलले वार किती तरी
जखमांचे व्यास झाले
सजवले होते फुलांनी तरी
कफनाचे निमित्त खास झाले
राजेंद्र देवी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता ! सुरेश भट
सुंदर कविता ! सुरेश भट साहेबांची आठवण झाली
नावातच राजेंद्र असता
जीणे ना कधीही बास होऊ दे
नव्या कवितेतुन नवस्वप्नांची
उज्वल पहाट एक येऊ दे
धन्यवाद सर्वेशजी
धन्यवाद सर्वेशजी
छान! लिहिणे कधी न बास होवो.
छान! लिहिणे कधी न बास होवो.
धन्यवाद कांचनजी
धन्यवाद कांचनजी