Submitted by मण - मानसी on 25 September, 2019 - 08:36
सांजवेळी केसरी तळी,
तुझी आठवण येते आहे,
सौभाग्याची अभागी ही,
अमावास्येत जगत आहे,
पावसाची सर,
प्रेमाचे गाणे गाते आहे,
गाणे प्रेमाचे कि विरहाचे,
हे मात्र गूढच आहे,
प्रेम असो वा विरह,
आहे ते आपले आहे,
म्हणूनच, प्रेम आपले जिंकणार,
हे आता उमजते आहे,
काळोख्या रात्री नंतरची रम्य,
पहाट आता झाली आहे,
या विचारातच,
आता मी निद्राधीन होत आहे.....
@किर्ती कुलकर्णी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे कविता. स्वल्पविराम
छान आहे कविता. स्वल्पविराम दिले नसते तर?
छान आहे
छान आहे
वाह! आवडली..
वाह! आवडली..