तिला होस्टेल वर सोडायला तिचे बाबा सोबत गेले होते आणि संध्याकाळ व्हायच्या आत परतले सुद्धा . आता समोरचा प्रवास तिला एकटीलाच करायचा होता . १२ वि च्या निकालामुळे बाबा तिच्यावर थोडे नाराजच होते . "आता निदान समोर तरी अशी चूक नाही करशील म्हणजे झालं" . ते प्रवासात तिला सारखी एकच गोष्ट सांगत होते , आम्ही तुला कितीही शिकवायला तयार असलो तरी , अभ्यास तुलाच करायचा आहे . १० वि पर्यंत मराठी मिडीयम असल्यामुळे तुला हे पॉलीटेकनिक थोडं कठीणच जाणार , आणि १२ वि ला सायन्स जरी घेतली असशील तरी त्यामध्ये काही फारसे चांगले मार्क्स मिळाले नाहीत . ती फक्त निमूटपणे ऐकत होती , कारण १२ वि चा निकाल का चांगला लागला नव्हता हे फक्त तिलाच माहित होते आणि ती बाबाला काही सांगू शकत नव्हती . त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो म्हणण्यावाचून पर्याय नव्हताच तिच्याकडे .
आणि शेवटचं वाक्य नेहमी लक्षात राहील असेच बोलले होते तिचे बाबा . "पोरी , आता छातीला माती लावून अभ्यास कर , म्हणजे नक्कीच जमेल तुला सगळं ! "
एक उत्सुकता होती तिच्या मनात होस्टेलवर पोहोचत पर्यंत , मात्र पहिलाच दिवस तिचा अविस्मरणीय ठरला . कॉलेज मध्ये फक्त पहिलाच राउंड झाला होता त्यामुळे खूप कमी मुली होत्या होस्टेलवर . दुसऱ्या आणि तिसऱ्या राउंड चे ऍडमिशन अजून व्हायचे होते . तिला तिच्या खोलीवर सोडून बाबा परतले होते . तस तिला काय हवं ,नको ते विचारून बाबानी सगळं सामान आणलं होत बाजारातून .
चार पाच मुली होत्या सोबतीला , पण सगळ्या आपापल्यामध्ये व्यस्त . कोणी फक्त फोनवर बोलण्यात मग्न, तर कोणी गाणे ऐकण्यात . रात्र झाली ती आपल्या खोलीमध्ये एकटीच मोबाइल विचकत बसली होती , तेवढ्यातच सगळ्या होस्टेलवरची लाईट गेली . ती किंचाळतच बाहेर आली , तिला असं किंचाळताना बघून बाकींच्या मुलींना हसू आवरत नव्हतं . बाई , किती घाबरट आहेस ग तू , सगळ्या मुली व्हरांड्यात जमा होऊन तिला बोलू लागल्या . ती कधी एकटी राहिलेली नव्हती त्यामुळे थोडा घाबरटपणा होता तिच्यामध्ये . घरी दिवे लागायच्या वेळी तर चुकूनही ती एकटी राहत नव्हतीच आणि इथे तर ती एकटीच खोलीमध्ये होती आणि वरून हि लाईट अचानक गेल्यामुळे ती घाबरूनच बाहेर किंचाळत आली होती .
सगळ्या मुलींना खूप आश्चर्य वाटलं होत, एवढी शांत स्वभावाची मुलगी अशी भित्री ... मग थोडी ओळखीपाळखी झाली त्यांच्यासोबत आणि ती त्यातल्या एका मुलीच्या खोलीमध्ये झोपायला गेली . दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज ला जाऊन आली , आता तिच्या खोलीमध्ये एक मुलगी राहायला आली होती . तिच्याच क्लासमधली होती ती , सगळ्यांपेक्षा खूप वेगळी होती ती .
आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या मुली तिला थोड्या अल्लडच वाटल्या होत्या , त्यांच्यासोबत राहणे तर तिला कठीणच होते. पण हि मुलगी आल्याने तिच्या जीवात जीव आला होता .
"आज जया येणार आहे क्लास मध्ये , ती हि होस्टेलवरच राहणार आहे तर तिला तू रूममेट्स बनवशिल का "?
क्लास मध्ये गेल्यावर एका मुलासोबत तिची ओळख झाली होती , आणि त्याने लवकरच तिच्यासोबत मैत्री सुद्धा करून घेतली .
आणि थोडं इकडे - तिकडेच विचारून झाल्यावर त्याने तिला, हे जयाबद्दल सांगितलं होत . जया क्लासमध्ये एन्ट्री करताना सगळ्यांची नजर तिच्यावरून हटतच नव्हती . ती हि तिच्याकडेच बघत होती , दिसायला सुंदरच होती ती .
क्लास सुटला आणि सुजित (तो मुलगा ) ने जया आणि तिची ओळख करून दिली . जया आता तिच्यासोबतच होस्टेलवर राहणार होती . आज बऱ्यापैकी मुली होस्टेलवर राहायला आल्या होत्या . सपना तिच्या बाजूच्या च खोलीत राहायला आली होती . आता या तिघींची चांगली ओळख झाली आणि त्या तिघी हि रात्री बसून एकत्र गप्पा मारणे , चिवडा खाणे आणि बरच उपद्रव करणे असं चालू होत .
थोड्याच मुली असल्यामुळे त्या तिघी एकाच खोलीत झोपत होत्या .
रात्री २ वाजता ती उठली , कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता तिला . पाहते तर काय ! जया फोनवर बोलत होती , आणि बोलता बोलता रडतही होती .
"काय गं , एवढ्या रात्री कुणाशी बोलतेस आणि रडत कशासाठी आहेस" , तिने न राहवून विचारलं जयाला .
हा असाच करतो ग , नेहमी भांडत असतो माझ्याशी , मी किती प्रेम करते त्याच्यावर , पण त्याला मात्र माझ्या प्रेमाची जाणीव नाही . अशी म्हणतच जया अजून रडत होती .
तिला मात्र हे सगळं एकदम नवीन भासत होत , असं कोणी रात्रीचे २ वाजता फोनवर बोलतात का ? आणि प्रेम करतात तर मग एवढे रडतात कशाला ? काल रात्रीचा प्रकार ती दुसऱ्या दिवशी सकाळी सपना ला सांगत होती आणि दोघीही हसत होत्या .
अ ग ज्याचे girlfriends, boyfriends असतात ते बोलत असतात रात्र - रात्रभर फोनवर , हे असं चालूच असते ग , तू नको काळजी करू . सपना तिला समजावून सांगत होती .
तिला जया ने सांगितलं होत कि सुजित च तिचा बॉयफ्रेंड आहे .
तिला हे सगळं ऐकून थोडं नवलच वाटलं होत , बापरे एवढे रात्रभर काय बोलतं असतील हे लोक .
आणि त्याची आठवण झाली , कदाचित त्याने आपल्याला होकार दिला असता तर आपण हि त्याच्याशी असेच फोनवर रात्रभर बोललो असतो काय ? कदाचित बोललो असतोच , कारण त्याच्याशी बोलताना वेळ कसा जायचा ते कळतसुद्धा नव्हतेच ना आपल्याला !
होस्टेलवर सगळ्या मुलींना एक ना एक बॉयफ्रेंड होताच , काही मुली तर फक्त timepass म्हणून बॉयफ्रेंड ठेवतात हे तिला तिथे राहूनच कळलं होत .
दिवाळीपर्यंतचे दिवस छान मजेत गेले होते तिचे . अभ्यास करणे , मस्ती करणे , आणि त्यातल्या त्यात त्याची आठवणही . पण तिने त्याच्याबद्दल अजून कोणाला काहीच सांगितलं नव्हतं . बाकीच्या मुली ऐटीत सांगायच्या , माझा boyfriend आहे , तस तिला ते जमणार नव्हतंच आणि तो तिचा boyfriend तर नव्हताच आता . तिने होस्टेलवरून सुद्धा त्याला एक - दोनदा फोन केला होता ,त्याला हे ऐकून बरं वाटलं होत कि ती समोरचा शिक्षण घेत आहे . आणि तो फक्त तिला तिच्या पुढच्या शिक्षणाला शुभेच्छा देऊन फोन ठेवत होता .
-------------------------------------------------------------------------
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ती घरी आली होती , आपली मुलगी एवढ्या दिवसांनी आली म्हणून घरी नवीन नवीन पक्वान बनत होते . दिवाळी असल्यामुळे सगळे पाहुणे सुद्धा होते घरी . पण ती गावाकडे आली कि त्याची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती तिला . त्याला एकदा तरी भेटायचं का असं वाटायचं तिला, पण का म्हणून भेटायचं आता असं वाटून ती आपली इच्छा आतल्या आतच दाबून टाकत होती . एकटेपणा काही केल्या जात नव्हताच तिचा , घर गच्च भरून असतानाही मनात मात्र एकलकोंडेपणा होता .
ती दारावर रांगोळी काढत होती , आणि तिच्यासमोरून एक व्यक्ती तिच्या घरात गेला . त्याच्याकडे बघून नाही बघल्यासारखं करून ती आपली रांगोळी काढण्यात मग्न होती .
"अभय , तू केव्हा आलास गावाकडे "? तिचे वडील त्या व्यक्तीला विचारत होते . कालच आलो म्हणत त्याने तिच्याकडे बोट दाखवत विचारलं , हि तुमची मुलगी काय ?
तिच्या बाबानी हो म्हणत तिला आत बोलावलं आणि त्याच्याशी ओळखी करून दिली .
खरंतर ती त्याला ओळखत होती , पण कधी बोलली नव्हती त्याच्याशी. तिच्याच गावात राहणारा तो , ती ज्या ठिकाणी poly करत होती तिथेच poly करून त्याने नोकरी मिळवली होती . हुशार असल्यामुळे कॅम्पस सिलेक्शन झाला होता त्याचा . आणि गाव छोटा असल्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा हि असायचीच... किती गरीब परिस्थिती होती त्याची तरी तो शिकला आणि आता मोठ्या पदावर नोकरीला लागला . हे सगळं तिला तिच्या घरच्यांकडूनच माहित झालं होत . नोकरी करत असूनदेखील त्याने त्याचा शिक्षण चालूच ठेवला होता . तिलाही अभय च थोडं कौतुक वाटलं होत ,पण तिने तस काही न दाखवताच मौनव्रत धारण करून त्याच्याशी न बोलणेच पसंत केले होते . आईने लवकिचे वडे बनविले होते , आणि तिला ते अभय ला नेऊन द्यायला सांगितले . कामाचा थोडा आळस असल्यामुळे ह्या बाई ने नाक मुरगडतच त्याला ते वडे आणून दिले . तो तिच्याशी बोलू पाहत होता पण हि आपल्याच तालात असल्याने त्याच्याशी धड बोलत नव्हतीच .
अभय ये उद्या म्हणत बाबाने त्याचा निरोप घेतला , तो जाताच ती आईवर बरसली होती ... कशाला ग त्याला वडे बिडे खाऊ घालायला सांगितले मला , एवढंच होत तर तू नेऊन द्यायचीस ना त्याला . मला दुसरे पण काम असतातच ना .
आई तिला समजावू लागली कि एक - दोन काम करायला शिका बाई आता आणि कोणाला फक्त वडे नेऊन देणे हे काही काम नसतेच . पण हे ऐकायला ते नव्हतीच , ती बाहेर येऊन आपली अर्धवट रांगोळी पूर्ण करायला लागली होती . अभय हि घरी गेला नव्हताच , समोर दारात तो अजून दुसऱ्या व्यक्तीशी बोलत होता. त्याचा लक्ष तिच्याकडे गेला आणि तो तिच्याजवळ येऊन , "छान रांगोळी टाकता येते तुला ". ती फक्त थँक्स म्हणत आपल्याच रांगोळीमध्ये गुंग होती . तो मात्र तिला एकसारखा बघत होता . का बरं अशी शांत हि , लहान असताना ओळखायचो आपण हिला तेव्हा तर हि एवढी शांत नव्हती वाटत , किती बदल झाला आहे हिच्यामध्ये .. . मनातच तो बोलत होता
आणि तिच्या मनातला तो एकलकोंडेपणा त्याच्या मनापर्यंत पोहचला होता .
हा पण भाग छान झाला आहे ..
हा पण भाग छान झाला आहे ..
छान लिहिलंय, आवडलं!
छान लिहिलंय, आवडलं!
धन्यवाद Ashok Waghole, आणि
धन्यवाद Ashok Waghole, आणि अज्ञातवासी ...
छान कंटिन्यु केलीये कथा..
छान कंटिन्यु केलीये कथा..
धन्यवाद ...
धन्यवाद ...